वैजापूर तालुक्यातील 12 गावांना पाण्याचा वेढा पडला असून त्यांचा संपर्क तुटला आहे. तसेच वैजापूर-श्रीरामपूर महामार्ग पाण्याखाली गेला आहे.
वगावातील 50 ते 60 घर पाण्याखाली आहेत. 50 कुटुंब आणि 250 नागरिकांना वारी जिल्हा परीषद शाळेत हलवण्यात आलं आहे. 12 गावातील 3 हजार लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे.
पावसाच्या पाण्यात शिंदे वस्ती, सरलाबेट आणि सय्यद वस्ती मिळून 400 लोक अडकले आहेत. एनडीआरएफच्या जवानांच एक पथक पुण्याहुन औरंगाबादमध्ये दाखल झालं आहे.
गोदावरी नदीममध्ये 2 लाख क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.