नाम संस्थेनं संपूर्ण मराठवाड्यात 562 किलोमीटर लांबीचं काम केलं. त्यातच पावसानंही साथ दिल्यानं मोठ्या प्रमाणात जलसाठा होताना दिसतो आहे. चांगल्या कामाला सकारात्मक साथ मिळते. असं सांगत मकरंद अनासपुरेंनी समाधान व्यक्त केलं आहे. कंधार इथं आमदार प्रताप चिखलीकर यांच्या वाढदिवस कार्यक्रमाच्या निमित्तानं ते बोलत होते.
कोरडवाहू शेतकऱ्यांच्या पाठीशी नाम संस्था कायमच उभी असेल कारण आम्ही समाजाचे देणे लागतो याची आम्हाला जाणीव आहे. असंही मकरंद म्हणाले