राम सत्यवचनी, मग भक्त नरेंद्र मोदी असत्यवचनी कसे? : राजू शेट्टी
एबीपी माझा वेब टीम | 20 Aug 2017 07:14 PM (IST)
खासदार राजू शेट्टी यांनी नरेंद्र मोदी यांच्यासह देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींना घरचा आहेर दिला आहे.
फाईल फोटो
नागपूर : राम सत्यवचनी होता, मग भक्त नरेंद्र मोदी असत्यवचनी कसे, याचे उत्तर रेशिमबागेतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने द्यावे, असे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी म्हटले. ते नागपुरात बोलत होते. 20 नोव्हेंबरला 10 लाख शेतकरी दिल्लीला चाल करुन जाणार आहोत आणि शेतकरी प्रश्नावर गंभीर नसलेल्या सरकारला जाब विचारणार आहोत, असेही यावेळी राजू शेट्टी यांनी सांगितले. नागपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शोतकऱ्यांचा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रातील मोठे मंत्री नितीन गडकरी सोडवू शकले नाही यांचे मला आर्श्चय, असे म्हणत खासदार शेट्टींनी महायुतीतल्या नेत्यांनाच घरचा आहेर दिला आहे.