राज ठाकरे मराठवाड्यात, दोन वर्षांनी दुष्काळ दौऱ्यावर
एबीपी माझा वेब टीम | 20 Apr 2016 02:35 AM (IST)
लातूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे दहा दिवसांच्या दुष्काळ दौऱ्यासाठी लातूरला पोहोचले आहेत. आज सकाळी ट्रेनने राज ठाकरेंचं लातूरमध्ये आगमन झालं. तब्बल दोन वर्षांनंतर राज ठाकरे दुष्काळ दौरा करत आहेत. लातूर, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यांचा राज ठाकरे दौरा करणार आहेत. राज ठाकरेंसोबत मनसेचे नेते नितीन सरदेसाई आणि इतर नेतेही आहेत. आघाडी सरकारवर घणाघात दुष्काळ दौऱ्यावर निघताना राज ठाकरेंनी आघाडीसह विद्यमान राज्य सरकारवरही टीका केली. राज ठाकरे म्हणाले, “काँग्रेस राष्ट्रवादीने सिंचनाचे उपाय केले नाहीत. ज्याप्रकारे पाणी अडवलं पाहिजे होतं, तसं अडवलं नाही. आघाडीच्या चुकीच्या धोरणांचा परिणाम म्हणजे आजचा दुष्काळ आहे. किंबहुना म्हणूनच आघाडी सरकारला जनतेनं बाजूला सारलं आहे.”