उद्धव ठाकरेंनी फक्त मराठा समाजाच्या महिलांची माफी मागितली आहे. त्यांनी संपूर्ण मराठा समाजाची माफी मागावी अशी मागणी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांनी केली आहे.
'उद्धव ठाकरेंचा माफीनामा हे उशीरा सुचलेलं शहाणपण आहे. दसरा मेळावा जवळ आला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी माफी मागितली आहे पण यावेळी त्यांनी फक्त मराठा समाजातील महिलांची माफी मागितली. संपूर्ण मराठा समाजाची माफी मागितलेली नाही.' असं विखे-पाटील म्हणाले.