'भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याच्या भूमिकेवर भाजप ठाम असेल तर त्यांना तातडीने सरकारमधून काढून टाकून त्यांच्या आरोपांची सखोल चौकशी करावी.' अशी मागणी विखे पाटील यांनी केली आहे.
'पुणे येथील एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणात खडसेंनी मंत्रिप्रदाचा दुरूपयोग करून आपल्या कुटुंबाला लाभ मिळवून दिल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेणे निरर्थक असून त्यांना मंत्रिमंडळातून तातडीने बडतर्फ करणं आवश्यक आहे.' असे विखे-पाटील म्हणाले.