रसिलाच्या हत्येमागे वरिष्ठांचा हात असू शकतो : वडिलांचा दावा
एबीपी माझा वेब टीम | 31 Jan 2017 08:46 AM (IST)
पुणे : रसिलाच्या हत्येमागे एकट्या सुरक्षारक्षकाचा हात असू शकत नाही. वरिष्ठ कर्मचाऱ्यांचाही रसिलाच्या खुनात हात असू शकतो, असा दावा तिच्या वडिलांनी केला आहे. मूळची केरळची असणारी 23 वर्षीय रसिला राजू ओपीची हिंजवडीमधील इन्फोसिसच्या आवारातच रविवारी गळा आवळून हत्या झाली होती. ‘एक टक का बघतोस,’असा जाब विचारल्याच्या रागातून रसिलाची हत्या झाल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.