मुंबई : उद्या मध्यरात्रीपासून अवजड वाहने, खासगी बस, शाळेच्या बस चालक, मालकांचा बेमुदत संप सुरु होणार आहे. यात मुंबईच्या 30 हजार शाळेच्या बसेसचा समावेश आहे. जेएनपीटी येथील 38 हजार कंटेनर वाहतूक चालकांचाही यामध्ये समावेश आहे. तसेच इतर देखील खासगी बस चालक, मालक यांचा समावेश आहे.
नेमक्या काय आहेत मागण्या?
एल पी जी वाहक, अत्यावश्यक सेवा देणारे ट्रॅक, पाणी वाहक टँकर अशा सर्वच अवजड वाहतूक करणाऱ्या चालक आणि मालक यांचा उद्या मध्यरात्री पासून बेमुदत संप होणार आहे. इ चलन कारवाई थांबवावी, आधी केलेल्या कारवाईचे दंड माफ करावा, क्लिनर अनिवार्य असल्याचा निर्णय मागे घ्यावा अशा मागण्यांसाठी सर्व अवजड वाहतूक करणाऱ्या संघटनांचा संप होणार आहे.
भारताची सर्वात मोठी वाहतूक संस्था ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट काँग्रेस नवी दिल्ली, बस अँड कार कॉन्फिडरेशन नवी दिल्ली, महाराष्ट्र, महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो टँकर बस वाहतूक महासंघ, स्कूलबस संघटना महाराष्ट्र राज्य, इंटरस्टेट कंटेनर असोसिएशन महाराष्ट्र, एलपीजी वाहतूक संघटना महाराष्ट्र राज्य, अशा जवळपास सगळ्याच संघटनांचा पाठिंबा आहे.
संपाचा सर्वात मोठा फटका हा वारकरी, शाळकरी मुलांना बसण्याची शक्यता
या संपाचा सर्वात मोठा फटका हा वारकरी, शाळकरी मुलांना बसण्याची शक्यता आहे. कारण मुलांच्या शाळा आता सुरु झाल्या आहेत. तर दुसरीकडे आषाढी वारी देखील जवळ आली आहे. त्यामुळं वारकरी पंढरीच्या दिशेनं प्रस्थान करत आहेत. अशा काळातच अवजड वाहनांसह खासगी बसचालकांनी संपाच हत्यार फरसलं आहे. त्यामुळं वारकरी आणि विद्यार्थ्यांना फटका बसणार असल्याचं बोललं जात आहे. यासंदर्भात मंत्रालयात काही दिवस आधी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. मात्र, त्यात तोडगा निघाला नाही, अखेर चक्का जाम आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, उद्या होणारा अवजड वाहन चालकांसह खासगी बस चालकांचा संप का विविध मागण्यांसाठी होणार आहे. यामध्ये इ चलन कारवाई थांबवावी असी पहिली मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर आधी केलेल्या कारवाईचे दंड माफ करावा, क्लिनर अनिवार्य असल्याचा निर्णय मागे घ्यावा अशा मागण्यांसाठी सर्व अवजड वाहतूक करणाऱ्या संघटनांचा संप होणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम