Prashna Maharashtrache : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड देणार राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांना उत्तरं

Prashna Maharashtrache : Maharashtra Minister Jitendra Awhad : एबीपी माझावर 'प्रश्न महाराष्ट्राचे' हा विशेष कार्यक्रम घेतला जात आहे. यात राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी संवाद साधला आहे.

स्नेहा कदम, एबीपी माझा वेब टीम Last Updated: 27 May 2022 02:49 PM
Prashna Maharashtrache : धारावीचा प्रश्न गुंतागुंतीचा झाला आहे. धारावी विकसित केलं तर दुसरं बीकेसी उभं राहिल : जितेंद्र आव्हाड  

Prashna Maharashtrache : धारावीचा प्रश्न गुंतागुंतीचा झाला आहे. धारावी विकसित केलं तर दुसरं बीकेसी उभं राहिल : जितेंद्र आव्हाड  

Prashna Maharashtrache : पोलिसांना फुकटात घर देणं अव्यवहारिक : जितेंद्र आव्हाड  

Prashna Maharashtrache : पोलिसांच्या क्वॉर्टर्स या क्वॉर्टर्स राहिल्या पाहिजे. पोलिसांना क्वॉर्टर्स द्या पण फुकटात घर नको. पोलिसांना फुकटात घर देणं अव्यवहारिक : जितेंद्र आव्हाड  

Prashna Maharashtrache : कोरोना महामारीच्या दोन वर्षांच्या काळातही मुंबई घरांची विक्री जास्त : जितेंद्र आव्हाड

Prashna Maharashtrache : कोरोना महामारीच्या दोन वर्षांच्या काळातही मुंबई घरांची विक्री जास्त झाली, जी मागील दहा वर्षात झाली नव्हती : जितेंद्र आव्हाड

Prashna Maharashtrache : मुंबईला पुढे न्यायचं असेल तर मुंबई झोपडपट्टी मुक्त करावी लागेल : जितेंद्र आव्हाड

Prashna Maharashtrache :  मुंबईला पुढे न्यायचं असेल तर मुंबई झोपडपट्टी मुक्त करावी लागेल. सध्याची मुंबई ही रिडेव्हलपमेंटची आहे. : जितेंद्र आव्हाड

पार्श्वभूमी

Prashna Maharashtrache : Maharashtra Minister Jitendra Awhad : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार (Maha Vikas Aghadi) येऊन जवळपास अडीच वर्ष पूर्ण झाली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील हे सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक घोषणा केल्या. सोबतच विकासकामांचे दावे देखील करण्यात आले. परंतु, सामान्य माणसांचे प्रश्न कुठेतरी मागे राहिल्याचं चित्र आहे. महागाई, रोजगार, शेतीसमोरील आव्हानं, उद्योगातील समस्या असे अनेक सवाल सामान्य माणसांसमोर उभे ठाकले आहेत. याच निमित्ताने आज एबीपी माझाने 'प्रश्न महाराष्ट्राचे' हा कार्यक्रम आयोजित केला. यात मुंबई, विदर्भ, मराठवाडा, कोकण, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्र अशा सर्व भागांतून सामान्य नागरिकांचे सवाल उत्तरदायी असलेल्या नेत्यांना आणि मंत्र्यांना विचारण्यात येणार आहेत. 


राज्यातील दिग्गज नेते आणि मंत्र्यांचा सहभाग


या कार्यक्रमात सकाळी 10 वाजता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सहभाग घेतला. त्यांच्याशी कायदा सुव्यवस्था विषयावर संवाद होणार आहे. तर 11 वाजता शालेय शिक्षण व्यवस्थेवर राज्यमंत्री बच्चू कडू हे सहभाग झाले होते. 12 वाजता कृषीसंदर्भातील प्रश्नांवर राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांच्याशी संवाद साधण्यात आला.


दुपारी एक वाजता भाजप नेते आमदार आशिष शेलार यांच्याशी संवाद साधला. तर दुपारी 2 वाजता मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी गृहनिर्माण संबंधी प्रश्नावर चर्चा होणार आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ दुपारी तीन वाजता या कार्यक्रमात भाग घेतील तर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे सायंकाळी 4 वाजता प्रश्नांची उत्तरं देतील. 


भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील 4.30 वाजता या कार्यक्रमात सहभागी होतील तर महसूल संबंधी प्रश्नांवर बोलण्यासाठी मंत्री  बाळासाहेब थोरात हे 5 वाजता कार्यक्रमात सहभागी होतील.


कुठे पाहाल कार्यक्रम?


हा सर्व कार्यक्रम आपण आज दिवसभर एबीपी माझा चॅनलवर पाहू शकणार आहोत. तसेच एबीपी माझाच्या यू ट्यूब चॅनेलवर दिवसभर या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण होईल. सोबतच एबीपी माझाच्या वेबसाईट, फेसबुक, ट्विटरवरही कार्यक्रमाचे अपडेट्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.