राष्ट्रवादीची दुसऱ्या टप्प्यातील हल्लाबोल यात्रा मराठवाड्यात सुरु होती. आज शनिवारी या यात्रेची सांगता करण्यात आली. यावेळी शरद पवारांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. तसंच ट्रिपल तलाकवरुनही सरकारला खडे बोल सुनावले आहेत.
शरद पवारांच्या आजच्या सभेला आधी पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र आज अखेर शरद पवारांनी हल्लाबोल यात्रेच्या समारोपावेळी सरकारच्या धोरणांवर निशाणा साधला आहे.
दरम्यान जर अशीच प्रथा पाडणार असाल तर भाजपची राज्यात एकही सभा होऊ देणार नाही असा इशाराच धनंजय मुंडेंनी दिला आहे.