पुणे : एमआयएमसाठी वंचित बहुजन आघाडीचे दरवाजे कधीच बंद केलेले नाहीत, दरवाजे अद्यापही खुले आहेत असं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे. पुण्यातल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


एमआयएम संविधानाची शपथ घेऊन काम करतं त्यामुळे आम्ही एमआयएमला धर्मनिरपेक्ष मानतो. एमआयएमसाठी आम्ही दरवाजे कधीच बंद केलेले नाहीत. त्यांनी दरवाजे बंद केलेत आणि त्यांनीच दरवाज्याला टाळे लावले आहेत. त्याची चावी त्यांच्याकडेच आहे. एमआयएमसोबत आमच्या समितीची बोलणी सुरु आहेत. ती व्यवस्थित झाली तर सगळं व्यवस्थित होईल, अशी माहिती प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

VIDEO | काडीमोडानंतर वंचित आणि एमआयएम पुन्हा एकत्र येणार? | एबीपी माझा



दरम्यान 10 सप्टेंबरला एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनीवंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्यात युती होणार नसल्याचे स्पष्ट केलं होतं. इम्तियाज जलील यांनी घेतलेली भूमिका पक्षाची अधिकृत भूमिका असल्याचं असदुद्दीन ओवेसी यांनी जाहीर केलं आहे.

एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी एमआयएम आणि वंचितच्या युतीबाबत भाष्य करत नाहीत, तोपर्यंत आमची युती कायम असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं होतं. मात्र आता ओवेसी यांनीच पक्षाची भूमिका स्पष्ट केल्याने वंचित आणि एमआयएम विधानसभा निवडणूक वेगवेगळे लढणार यावर शिक्कामोर्तब झालं होतं.

VIDEO | वंचित आघाडी कोणी बिघडवली? ओवेसी-आंबेडकर विधानसभेला दूर जाणार? | माझा विशेष | ABP Majha



समाधानकारक जागावाटप होत नसल्याने वेगळं होण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांपैकी केवळ 8 जागा एमआयएमसाठी सोडण्यास वंचित आघाडीने तयारी दर्शवली होती, ती आम्हाला मान्य नव्हती, असं एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलं होतं.

संबंधित बातम्या