Prakash Ambedkar on Pm Narendra Modi :  पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी काल आणि आज काँग्रेसवर जोरदार टीका केली. महाराष्ट्र काँग्रेसने कोरोना वाढवला असा अरोप  नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केला होता. नरेंद्र मोदी यांच्या या आरोपांवर आज वंचित बुहजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे. "पंतप्रधान सभागृहात खोटं बोलले, हे सुद्धा काँग्रेसचे विरोधीपक्ष नेते सभागृहात बोलू शकले नाहीत, अशी टीका करत पंतप्रधान मोदींनी देशात कोरोना  आणला, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. 


प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत विविध मुद्यांवर आपलं म्हणणं मांडलं. "केंद्र सरकारकडून विरोधकांना  ईडी आणि सीबीआयची भीती दाखवली जात आहे. 2024 मध्ये भाजपची सत्ता आली तर ते संविधान बदलू शकतात, असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला. 


प्रकाश आंबेडकर म्हणाले, "उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत जी लढाई दिसत आहे, ती समाजवादी पक्ष आणि भाजपमध्ये दिसत आहे. उत्तर प्रदेशमध्ये आम्ही सपाला समर्थन देत आहोत. मी सर्व आंबेडकरवादी जनतेला देखील सांगत आहे, की उत्तर प्रदेशमध्ये सपाला मदत करा. केंद्रातील सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशमधून जातो. त्यामुळे आम्ही सपाला मदत करायचा निर्णय घेतला आहे."


आगामी मुंबई महानरपालिकेच्या निवडणुकीवरही प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका मांडली. मुंबई महापालिकेची निवणूक यावेळी आम्ही गांभीर्याने लढणार आहोत. युतीसाठी आम्ही सर्वांना दरवाजे उघडे ठेवले आहेत. फक्त भाजप आणि आरएसएस सोडून इतर कोणत्याही पक्षासोबत युती करण्याची आमची तयारी आहे, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी दिली. 
 
मुंबईतील शिवाजी पार्कवर दिवंगत गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे स्मारक व्हावे अशी मागणी काल भाजप आमदार राम कदम यांनी केली आहे. यावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, "काल मी भूमिका मांडल्यानंतर आता सर्व जण बोलायला लागले आहेत. या विषयावर बोलणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो."


महत्वाच्या बातम्या


Pm Narendra Modi : काँग्रेस नसती तर... ; राज्यसभेतील भाषणात पंतप्रधानांचा हल्लाबोल


PM Modi in Rajyasabha : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राज्यसभेत विरोधकांवर निशाणा, जाणून घ्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे


PM Modi : पंतप्रधान मोदी यांच्या 'त्या' वक्तव्याविरोधात महाराष्ट्रात संताप; सोशल मीडियावर पडसाद