राजभर उत्तर प्रदेशमधून विमानाने मुंबई किंवा पुण्यात यायचा, आलिशान हॉटेलमध्ये तीन ते चार दिवस रहायचा. मग रेकी करून तो बंद घरांवर डल्ला मारायचा, दागिन्यांची तिथेच विल्हेवाट लावून (विकून)तो विमानानेच घरी परतायचा.
मुंबई आणि पुण्यात यापूर्वी असे चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पिंपरी चिंचवडमधील एका घरफोडीवेळी तो सीसीटीव्हीत कैद झाला, अन् त्याचं बिंग फुटलं. वाकड पोलिसांनी तीन पथकं तैनात करुन त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.