वाल्हेकरवाडी इथे या विद्यार्थ्याचं कुटुंब भाड्याच्या घरात राहत होतं. कुटुंबीय गावाला गेल्यावर त्याने हे पाऊल उचललं. सकाळी पेपर टाकणाऱ्याने खिडकीतून पाहिलं तेव्हा आत्महत्येचा प्रकार समोर आला.
आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलेलं नाही. तो मूळचा सोलापूरच्या करमाळा इथला असून औंधमध्ये आयटीआयचं शिक्षण घेत होता. तसंच तो सकाळी घरोघरी पेपर टाकायचंही काम करायचा.