म्हणून राजकारण सोडायची इच्छा होते, पंकजा मुंडेंची उद्विग्नता
एबीपी माझा वेब टीम | 04 Aug 2016 01:22 PM (IST)
मुंबई : सातत्यानं होणाऱ्या आरोपांमुळे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे उद्विग्न झाल्या आहेत. भ्रष्टाचाराबद्दल बिनबुडाचे होणारे आरोप ऐकून कधी कधी राजकारण सोडायची इच्छा होते, अशा शब्दात पंकजा मुंडेंनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. पंकजा मुंडेंचं रस्ते घोटाळ्यात नाव आल्यानंतर आज विधानसभेत काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न विचारला. जून 2012 मध्ये पंकजा यांच्या सुप्रा मीडिया कंपनीसोबत आरपीएस कंपनीनं भागीदार केलं.