Pankaja Munde: विधानपरिषद निवडणुकीच्या (VidhanParishad Election) शपथविधीनंतर आमदार पंकजा मुंडे (Pankaja Munde) पहिल्यांदाच बीडमध्ये जाणार आहेत. दरम्यान राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना राज्यातील वंचित बाबत मी स्ट्रॉंग भूमिका घेईन यात वाद नसल्याचे आमदार पंकजा मुंडे म्हणाल्या. राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापल्याचे दिसत असताना मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) जातीयवाद थांबवावा अशी टीका केली होती त्यावर माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल आभार असे म्हणत मुद्दा काय आहे तिथे बोलले पाहिजे कोणी काहीही बोलेल त्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही असे म्हणत त्यांनी मनोज जरांगेना टोलावले.


2019 विधानसभा आणि 2024 लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करल्यानंतर विधान परिषदेत पंकजा मुंडे आमदार झाल्या आहेत. दरम्यान काल विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा शपथविधी झाल्यानंतर आज त्या बीडमध्ये जाणार आहेत. यावेळी सावरगाव भगवान भक्ती गडावर जाणार असून, गोपीनाथ गडासह परळीतील बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे दर्शन घेतील असेही त्यांनी सांगितले. लोकसभेनंतर माझा पहिला दौरा असून मला सत्कार सोहळे फारसे मान्य नाहीत. आपलं सरकार आणण्यासाठी आम्हाला कामाला लागायचं आहे, असेही त्या म्हणाल्या. 


प्रकाश आंबेडकरांना शुभेच्छा 


वंचितांचा आवाजासाठी जर कोणी कार्यक्रम घेत असेल आणि त्यात लोक सहभागी होत असतील तर ही स्वागत आहे गोष्ट आहे. राज्यातील वंचितांबाबत मी स्ट्रॉंग भूमिका घेईन यात वादन असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. यासोबत त्यांनी प्रकाश आंबेडकरांसह लक्ष्मण हाकेंनाही ओबीसी यात्रेला शुभेच्छा दिल्या. 


जरांगेंच्या टिकेवर पंकजा मुंडे म्हणाल्या...


पंकजा मुंडेंनी जातीयवाद थांबवावं असं जरंगे म्हटल्यानंतर त्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल आभार. मुद्दा काय आहे तिथे बोलले पाहिजे कोणी काहीही बोलेल त्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही असे म्हणत त्यांनी मनोज जरांगेना टोलावले. वंचीतांबाबत स्ट्राँग भूमिका घेणार असल्याचे सांगत कुठेही तोल जाऊ नये कुणाचाही यावर काम करण्याची गरज आहे , राज्यात असे कधी झाले नाही आताही होऊ नये, समाजात बॅलन्स साधला गेला पाहिजे असं माझं मत आहे. असे त्या म्हणाल्या.


शरद पवारांनी भूमिका मांडावी


नेत्यांनी विषयासाठी एकत्र येणे विचार मांडण्यासाठी गरजेचे आहेच, पक्षांची भूमिका  मात्र सगळ्यांनी मांडली पाहिजे, प्रदीर्घ अनुभव असलेले नेते आहेत शरद पवार त्यांची भूमिका महत्त्वाची आहे त्यांनी मांडायला हवी असे पंकजा मुंडे म्हणाल्या. यावेळी अनुयायी शांत करणे नेत्यांचे काम असते, आम्ही वेळोवेळी करतोच आहे.. लोकांच्या मनातील दरी दूर करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.स्ट्रॉंग मेसेज आम्ही राजकारण्यांनी देणे गरजेचे आहे असेही त्या म्हणाल्या.