राज्य सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरल्यामुळे ‘हे न्हवं माझं सरकार’ अशी टॅगलाईन वापरत विरोधी पक्षांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसंच राज्यातील विविध प्रश्नांवर पोस्टरमधून खडे सवाल विचारले आहेत.
सरकारने केलेली जाहिरातबाजी, घोषित केलेली आणि न मिळालेली कर्जमाफी, मंत्र्यांना मिळणारी क्लीनचिट, राज्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती याबाबत विरोधकांनी सरकार बाबत प्रश्न उपस्थित करत सरकारला धारेवर धरले आहे.
आज विरोधकांच्या पत्रकार परिषदेच्या वेळी ‘हे न्हवं माझं सरकार’ ही थीम विरोधकांनी मांडली आहे.