औरंगाबादजवळ निजामकालीन पूल कोसळला, 4 जण जखमी
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद | 05 Sep 2016 12:48 PM (IST)
औरंगाबादः औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड-कन्नड रस्त्यावरील निजामकालीन पूल कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. दुपारी साडे चार वाजता ही घटना घडली. यामध्ये दोन जण गंभीर झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सिल्लोड शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर हा पूल आहे. सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी या पुलाच्या दुरुस्तीसाठी एक महिन्यापूर्वीच संबंधित विभागाला पत्र लिहिलं होतं, अशी माहिती त्यांनी दुर्घटनेनंतर दली. दरम्यान प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पुन्हा एकदा महाड दुर्घटनेची पुनरावृत्ती झाली.