कोणत्याही जागेच्या मालकाने वीज जोडणीसाठी अर्ज केल्यास त्या जागेसाठी वीज वितरण परवानाधारकाकडून वीज पुरवठा करण्याची तरतूद विद्युत अधिनियमात आहे. काही वीज वितरण कंपन्या ना हरकत प्रमाणपत्राची मागणी वीज जोडणीसाठी करतात.
एनओसीशिवाय आतापर्यंत वीज जोडणी दिली जात नव्हती. मात्र शासनाच्या या नव्या नियमाने सर्वसामान्यांना सरकारी कार्यालयात फेऱ्या मारण्याचा त्रास वाचणार आहे.