मागच्या सरकारने केलेल्या चुकांमुळेच शेतकऱ्याची वाईट अवस्था झाली आहे. असा आरोप गडकरींनी केला. तसंच राज्यातील सिंचन क्षेत्रासाठी केंद्र सरकारने 36 हजार कोटी मंजूर केल्याची माहिती गडकरींनी यावेळी दिली.
पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्यावतीने राजर्षी शाहु पुरस्कार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वर्षीचा हा पुरस्कार राष्ट्रीय स्वयसेवक संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र यांना जलसंधारण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबददल त्यांना देण्यात आला. एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप होते.