सरकारविरोधी मोर्चाचं निवेदन सरकारला का? नितेश राणेंचा सवाल
एबीपी माझा वेब टीम | 08 Oct 2016 05:32 PM (IST)
मुंबई : मराठा मोर्चाचं निवेदन स्वीकारण्यासाठी सरकारनं जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांना पाठवू नये, सरकारविरोधी मोर्चाचं निवेदन सरकारला का द्यायचं? असा सवाल काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी विचारला आहे. मराठा मोर्चा सरकारविरोधी आहे. त्यामुळे सरकारविरोधी मोर्चाचं निवेदन सरकारलाच का द्यायचं, मराठा मोर्चाचं निवेदन स्वीकारण्यासाठी सरकारनं जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांना पाठवू नये, असा सल्ला नितेश राणे यांनी दिला. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. कोल्हापूर मोर्चादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत. तसंच प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्री जिल्हाधिकारी कार्यालयात असतील असा निर्णयही घेण्यात आला आहे. या निर्णयाला आता काँग्रेसनं विरोध केला आहे.