रविवारी(1 सप्टेंबर)ला सोलापुरात महाजनादेश यात्रेनिमित्त झालेल्या सभेत अमित शाह यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली होती. शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले ते सांगावे असा सवाल त्यांनी केला होता. त्याला रोहित पवारांनी उत्तर दिले आहे. 'गरज पडली की साहेबांचा सल्ला घ्यायचा, बारामतीत येऊन कौतुक करायचं आणि निवडणुकीची वेळ आली की साहेबांनी काय केलं असा प्रश्न विचारायचा', ही दुटप्पी भूमिका असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
तसेच राष्ट्रवादी सोडून जात असलेल्या नेत्यांवरही रोहित पवारांनी निशाणा साधला आहे. 'सामान्य माणूस साहेबांच्या सोबत आहे तर घरात आमदारकीपासून खासदारकी आलेले नेतेमंडळी कुंपणावरून उड्या मारण्यात आघाडीवर आहेत. मध्यंतरी पिठ बदलण्याची भाषा आपण केली होती, जाड भरडं पीठ पण दूसऱ्या पक्षात गेलं. आत्ता जमीनच नांगरायची वेळ आलीय. चांगली मशागत करुन ठेवुया. लवकरच ठरवुया', असं रोहित यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
रोहित पवार यांची फेसबुक पोस्ट :
राजा एकाकी पडला? शरद पवारांनी जे पेरलं, तेच उगवलं का?