काही वर्षांपूर्वी याच पहाडीजवळ नक्षलवाद्यांन लायड कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांची हत्या केली होती. त्यानंतर 2016 ला भाजप सरकारने हा प्रकल्प पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आणि गेल्या तीन ते चार महिन्यांपूर्वी लायड या कंपनीने सुरजागड पहाडीवर उत्खनन सुरु केले होते.
लायड कंपनीने सुरु केलेल्या उत्खननाचा स्थानिक नागरिकांनी विरोध केला होता आणि नक्षलवाद्यांनीही या प्रकल्पाचा विरोध केला होता. त्यानंतर आज दुपारी 12 वाजण्याच्या दरम्यान गणवेशधारी नक्षलवाद्यांनी लोह खनिजाची वाहतूक करणाऱ्या तब्बल 40 ते 50 ट्रक जाळले.