Lok Sabha Election 2024 : वंचित बहुजन आघाडीला (Vanchit Bahujan Aghadi) पाहिजे असलेल्या दोन जागा देण्यास तयार असून, अजूनही आम्ही तुमच्याकडे दोस्तीचा हात पुढं करायला तयार असल्याचे वक्तव्य नाना पटोले (Nana Patole) यांनी केले आहेत. महाविकास आघाडीशी जागावाटपाची ( Maha Vikas Aghadi Seat Sharing) चर्चा सुरु असतानाच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) बाहेर पडण्याची घोषणा केली. त्यानंतर आंबेडकर यांनी वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघातील (Lok Sabha Constituency) आपले उमेदवारांच्या नावाची घोषणा देखील केली. मात्र, अजूनही वेळ गेली नसून, उमेदवारी मागे घेण्याच्या तारखेपर्यंत आम्ही दोस्तीचा हात पुढं करायला तयार असल्याचे म्हणत नाना पटोले यांनी एक पाऊल मागे घेतल्याचे पाहायला मिळत आहे. पटोले हे भंडाऱ्यात (Bhandara) बोलत होते. 


यावेळी बोलतांना नाना पटोले म्हणाले की, "मी स्वतः अकोल्यात गेलो, प्रकाश आंबेडकर यांना मी सांगितलं की, अजूनही आम्ही तुमच्याकडे दोस्तीचा हात पुढं करायला तयार आहे. तुम्हाला जागा पाहिजेत तर त्या जागा पण द्यायला तयार आहोत. हैद्राबादच्या ओवेसींनी मुस्लिमांच्या मतांचं विभाजन केलं, यांनी मागासवर्गीयांचं मतं कमी केलं. कालपण सांगून आलो अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्हाला ज्या दोन जागा पाहिजे त्या द्यायला तयार आहोत. उमेदवारी मागे घेण्याच्या तारखेपर्यंत आम्ही तयार आहोत. मतांचं विभाजन नको," असेही पटोले म्हणाले. 


पुढे बोलतांना नाना म्हणाले की, "त्यांनी तर माझा खूप अपमान केला. वाटाघाटीच्या बैठकीसाठी जेव्हा मी बसायचो तेव्हा माझा अपमान केला जात होता. मी काल अकोल्यात सांगितलं की, माझ्या अपमानापेक्षा माझ्या देशाचं संविधान माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. माझ्या देशाची लोकशाही वाचली पाहिजे, हे नाना पटोलेसाठी महत्वाचं आहे. म्हणून मी काल खुल्या मनानं अकोल्यात त्यांना आवाहन केलं. पण, त्यांच्या मनात मत विभाजनाचं, भाजपलाचं जिंकवायचं असेल तर ते त्यांच्या मनातील गोष्ट असल्याचे" नाना पटोले म्हणाले.


अन्यथा संविधानाला ठेच पोहचेल...


अजूनही या भंडाऱ्याच्या भूमीतून आवाहन करतोय, हे पाप होऊ देवू नका. हे पाप झालं तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान, लोकशाही जी आमच्या मागासवर्गीयांसाठी किंवा बहुजनांसाठी जो एक ग्रंथ आहे. त्या संविधानाला ठेच पोहचेल. कारण की हे 400 पार म्हणजेच चारसो बिसी करायला तयार आहे. चारसो बिसी यांनी केली तर तुम्ही आम्ही मनासारखं जीवन जगण्याचे अधिकार राहणार नाही, असेही पटोले म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Kalyan Loksabha: कल्याणची जागा श्रीकांत शिंदेंना दिल्यास भाजपचा एकही कार्यकर्ता प्रचारात उतरणार नाही; गणपत गायकवाडांच्या कार्यालयात ठराव मंजूर