रामदास आठवले भारत भीम यात्रा घेऊन नागपूरला आले होते. त्यावेळी बाबासाहेबांच्या प्रतिमेला हार घालण्यासाठी ते आरबीआय चौकात पोहोचले. पण समता सैनिकांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध केला.
या प्रकारानंतर नागपुरच्या आरबीआय चौकात एकच गोंधळ उडाला होता. पोलिसांनी या प्रकरणी विरोध करणाऱ्या समता सैनिक दलाच्या 5 ते 6 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.