अहमदनगरः भगवान गड दसरा मेळाव्याच्या वादाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरचे पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांनी भगवान गडाला भेट दिली. पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी आणि जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी गडावरील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. गडावर सुरक्षेसाठी 600 पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय.

पंकजांचं भाषण होणारच, शास्त्रींना 25 ग्रामपंचायतींचं आव्हान

यावेळी दोघांनीही भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींशी चर्चा करुन सुरक्षेचा आढावा घेतला. तसंच यावेळी हेलिपॅडच्या कामाचीही पाहणी करण्यात आली. दरम्यान दसरा मेळाव्याला आणि पंकजा मुडेंच्या भाषणाला महंत नामदेव शास्त्रींचा विरोध कायम आहे.

नामदेव शास्त्री आणि पत्रकारातील संभाषण जसेच्या तसे

एकिक़डे भगवान गडावर दसरा मेळाव्याची तयारी पंकजा मुंडे समर्थकांनी सुरु केली आहे. भगवान गडावर पंकजा मुंडेंच्या आगमनासाठी हेलिपॅडही बनविण्यात आला आहे. त्यामुळे पंकजांचं भाषण आणि नामदेव शास्त्रींच्या भूमिकेकडं सर्वांचं लक्ष लागलंय. संबंधित बातम्याः

एखाद्याला फाडून खाईन इतकी ताकद आहे माझीः नामदेव शास्त्री

भगवान गड वादः नामदेव शास्त्रींचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

पंकजा खरं बोलल्या, हा घ्या पुरावा : धनंजय मुंडे

पंकजा मुंडे यांची कथित ऑडिओ क्लिप जशीच्या तशी

ती क्लीप ऐकून धक्का बसला, पंकजांनी सत्तेचा दुरुपयोग करु नये: नामदेवशास्त्री