महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
एबीपी माझा वेब टीम | 03 Feb 2017 07:41 AM (IST)
मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख आहे. 21 फेब्रुवारीला 10 महानगर पालिकांसाठी मतदान होणार आहे. पालिका निवडणुकीसाठी उमेदावारी भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. मुंबई, पुणे, नाशिक, सोलापूर, नागपूरसह महत्वाच्या 10 महापालिकांसाठी 21 तारखेला मतदान होणार आहे. 27 जानेवारीपासून 3 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी होता. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आली तरी कोणत्याही राजकीय पक्षानं आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. त्यामुळं आज शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कार्यालयात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. गेल्या आठवडाभरात बंडोखोरी रोखण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षानं उमेदवारी जाहीर केली नाही. त्यामुळं शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळणार आहे. संबंधित बातम्या : निवडणुकीत नात्यागोत्यांना तिलांजली, आईविरोधात मुलाचा शड्डू पत्नी, मुलगा, भाऊ... कुणा-कुणाला तिकीट देऊ? आता डाव्यांमध्ये घराणेशाही, आडम मास्तरांकडून पत्नी, मुलीला उमेदवारी मी महापालिका निवडणूक लढवणार नाही : शुभा राऊळ शिवसैनिकांची बंडाळी मोडीत, किशोरी पेडणेकर यांना उमेदवारी मुंबई महापालिकेसाठी शिवसेनेची पहिली यादी जाहीर मुंबई महापालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर