Mumbai Traffic News : वाहतूक पोलिसांकडून मुंबईत सीटबेल्ट सक्तीची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत वाहतुकीचे नियम मोडले तर कठोर कारवाई होणार आहे. मोटर वाहन निरीक्षक भरतीतील उमेदरवारांना गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या (Eknath Shinde) सरकारी 'वर्षा' या निवास्थानी नियुक्तीपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी त्यांनी मोटार वाहन कायद्याची (Motor Vehicle Act) काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी अशा सूचना दिल्या आहेत. 


"मोटार वाहन कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, रस्त्यावरील अपघात कमी व्हावेत तसेच लायसन्स मिळण्याची प्रक्रिया अधिक कठोर करावी. रस्त्यावर गाडी चालवताना बेशिस्त वाहन चालवून अपघात करणाऱ्या वाहनचालकांचे वाहन परवाने रद्द करण्यासारख्या कठोर उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त केल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विरवरून दिली आहे.  






मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर मुंबईत पुन्हा वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियम मोडणारंवर कठोर कारवाई सुरू केली आहे. मुंबई शहरात अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कारमध्ये सर्वांना सीट बेल्ट लावणे आणि दुचाकी वाहनावर दोघांनाही हेल्मेट घालण्याची सक्ती केली आहे, त्यामुळे आता जर वाहन चालवताना मुंबईमध्ये वाहन चालकांनी वाहतूक नियम मोडले तर पोलिसांकडून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. वाहतूक पोलिसांच्या या कारवाई संदर्भांत सह पोलिस आयुक्त प्रवीण पडवळ यांनी माहिती दिली आहे.  
 
31 ऑक्टोबर 2022 पासून मागच्या आसनावर बसलेल्या प्रवाशांनाही सीटबेल्ट अनिवार्य करण्यात आला आहे. सक्तीच्या नियमानंतर मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागानं पहिले 14 दिवस या नियमाबाबत जनजागृती करण्यावर भर दिला होता. त्यानंतर त्यांनी प्रत्यक्षात कारवाई करण्यास सुरूवात केली.  15 नोव्हेंबर 202 पासून चार दिवसांत मुंबईत कारमध्ये सीटबेल्ट न लावणाऱ्या 12 हजारपेक्षा अधिक प्रवाशांवर कारवाई करण्यात आली होती. दोनवेळा मुदतवाढ दिल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई सुरू केली होती. त्यामुळे मुंबईत यापुढे चारचाकी वाहनातून प्रवास करताना मागच्या सीटवरील प्रवाशांना देखील सीटबेल्ट लावावा लागणार आहे. शिवाय दुचाकीवरील दोघांनाही हेल्मेट घालावे लागणार आहे. अन्यथा पोलिसांच्या कारवाईला सामोरं जावं लागणार आहे. 


महत्वाच्या बातम्या


Drink and Drive: ड्रिंक अॅण्ड ड्राइव्ह करणं भोवलं; मुंबई पोलिसांकडून 156 जणांवर कारवाई