नागपूर मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाचे (Mumbai goa highway) काम गेली बारा वर्षांपासून रखडले आहे. या महामार्गावरील रस्त्याची अवस्था आणि त्यावरील खड्डे याची वारंवार चर्चा होत असते. या मार्गावरुन प्रवास करणारे नागरिक या रस्त्याच्या अवस्थेबद्दल वारंवार प्रश्न उपस्थित करत असतात. या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचं देखील पाहायला मिळतं. पण तरीही या महामर्गाची अवस्था ही जैसे थे असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. मुंबई गोवा महामार्गावरील अपघाती मृत्यूंचा आकडा दोन हजार पार  गेल्याची  धक्कादायक माहिती समोर आली आहे.  सरकारनेच लेखी उत्तरात कबुली दिली आहे. 


मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाचे (Mumbai goa highway) काम गेली बारा वर्षांपासून रखडले आहे. या महामार्गावरील रस्त्याची अवस्था आणि त्यावरील खड्डे याची वारंवार चर्चा होत असते. या मार्गावरुन प्रवास करणारे नागरिक या रस्त्याच्या अवस्थेबद्दल वारंवार प्रश्न उपस्थित करत असतात. आज सरकारने विधानसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील अपघाती मृत्यूंचा आकडा दोन हजार पार गेला आहे. गेल्या 10 वर्षांत 1 हजार 685 अपघात झाले. या अपघातात आतापर्यंत  दोन हजार दहा (2010)  नागरिकांचा मृत्यू झाला आहे.  


महामार्गाचं काम दीड दशक जैसे थे


मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्ग कायमच चर्चेत आहे. या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचं देखील पाहायला मिळतं. दरवर्षी गणेशोत्सव जवळ आला की मुंबई-गोवा  महामार्गाचा मुद्दा ठसठशीतपणे समोर येतो. मग आंदोलने सुरू होतात,  पाहणी दौरे होतात, आश्वासने दिली जातात. न्यायलये सरकारला खडसावतात  मग सरकार एक नवी डेडलाईन देतं. गणपती बाप्पा गावाला जातात आणि महामार्गाचं काम मात्र जैसे थेच राहतं. दीड दशक उलटलंय पण यात तसूभरही फरक पडलेला नाही. पनवेलच्या मेळाव्यात तर राज ठाकरे यांनी खड्ड्यांच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार टीका केली 


मुंबई गोवा महामार्गावर भाष्य करताना नितीन गडकरी यांनी म्हटलं की, 'हा मार्ग झाला नाही त्याला मी जबाबदार असून यासाठी मी इतर कोणालाही जबाबदार धरणार नाही.  मात्र हा रस्ता महाराष्ट्र सरकारला दिला होता. या रस्त्यासाठी मी 75 ते 80 मिटिंग घेतल्या. मात्र त्यात यश मिळालं नाही.' पण या वर्षातच डिसेंबर पर्यंत हा रस्ता पूर्ण होईल