यासंदर्भात बीएसएनएलच्या स्थानिक अधिकऱ्यानी आपल्या वरिष्ठांना विद्युत पुरवठा खंडित झाला असल्याची माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठांनी सांगितले की राज्यभर बीएसएनएलची हीच परिस्थिती आहे. टप्प्या-टप्प्याने सर्व कार्यालयांचे थकित पैसे भरले जातील.
दरम्यान वीज खंडित केल्यानंतर बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी जनरेटरवर कार्यालयाचे काम सुरु ठेवले. परंतु दोन दिवसांनंतर डिझेल संपल्यामुळे जनरेटर बंद पडले. त्यानंतर जनरेटरसाठी डिझेलकरिता निधी नसल्याने बीएसएनएलची सेवा संपूर्ण जिल्ह्यात पूर्णतः ठप्प झाली आहे. त्यामुळे बीएसएनएलच्या ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.