आमदार आशिष देशमुख यांनी पत्रक काढून राज ठाकरेंना आव्हान दिलं आहे. राज ठाकरेंना काटोलमधून निवडणूक लढवता यावी यासाठी आपण राजीनामा देऊ आणि पोटनिवडणुकीसाठी उभा राहू असंही देशमुख यांनी म्हटलं आहे.
गोंधळ घालणे म्हणजे कोणताही पराक्रम गाजवला नसल्याचंही देखमुख यांनी पत्रकातून म्हटलं आहे. दरम्यान, आमदार आशिष देशमुख यांच्या आव्हानावर मनसेच्या गोठातून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.