पुणे :  महाराष्ट्राच्या राजकारणात शिळेपणा आला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती (MP SambhajiRaje Chhatrapati) यांनी पुढाकार घेतला तर हा शिळेपणा दूर होईल, असं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी म्हटलं आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी आज मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation)मुद्द्यावरुन प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 


प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आरक्षणासाठी परिस्थिती खूप प्रतिकूल आहे.  पण आम्ही प्रयत्न करणार आहोत. खासदार छत्रपती संभाजीराजे यांची भूमिका राजकीय नाही. भारतीय जनता पक्षाचा आरक्षणालाच विरोध आहे, असं ते म्हणाले.


"सहा जूनपर्यंत आरक्षणासंदर्भात भूमिका घ्या,अन्यथा रायगडावरुन आंदोलन करू", खासदार संभाजीराजेंचा इशारा


ते म्हणाले की, चर्चेच्या दरम्यान असं ठरलं की आरक्षणाचा प्रश्न पुढं घेऊन जायचा असेल सत्तेचा गाभा असायला हवा. आरक्षणाचे पुरावलोकन करायचं असेल तर पुनर्विचार याचिका करता येते पण राज्यसत्ता असेल तर राज्यपालांच्या माध्यमातून देखील आपण पुनरावलोकन करु शकतो. त्यासाठी राज्यसत्ता हवी. राज्यसत्तेशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. आरक्षणासाठी परिस्थिती खूप प्रतिकूल आहे.  पण आम्ही प्रयत्न करणार आहोत, असं ते म्हणाले. 


प्रकाश आंबेडकर म्हणाले की,  शरद पवारांचे राजकारण नेहमी नरो वा कुंजरोवा अशाप्रकारचे राहिले आहे. पण शरद पवार इथून पुढे स्पष्ट भूमिका घेतील अशी अपेक्षा आहे. ओबीसी आरक्षण रद्द करण्याचा आज आलेला निर्णय कायदेशीर आहे असं मी मानत नाही, असं ते म्हणाले.  ओबीसी आरक्षण अझम्शन बेस्ड आहे, असंही ते म्हणाले.