दरड कोसळल्यानं नाशिककडे जाणारी वाहतूक शहापूर कसारामार्गे वळवण्यात आली आहे. मुंबईकडे भाजीपाला घेऊन येणारी वाहनं घाटात अजूनही उभी आहेत.
मुसळधार पाऊस आणि धुक्यामुळं दरड हटवण्याच्या कामात अडथळे येत आहेत. त्यामुळं माळशेज घाट आणखी 24 तास बंद राहणार असल्याची माहिती मुरबाडच्या तहसीलदारांनी दिली आहे.