Maharashtra weather Update: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या तापामात चढउतार दिसून उन्हाच्या तीव्र झळांनी नागरिक हैराण झाले आहेत. किमान व कमाल तापमानाचा पारा वाढला असून फेब्रुवारीतच तापमान 40 अंश सेल्सियसपर्यंत नोंदवले जात आहे.हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, येत्या दोन दिवसात 1-2 अंशांनी तापमान कमी होणार असून त्यानंतर पुन्हा वाढण्याचा अंदाज देण्यात आलाय.महाराष्ट्रात पुढील दोन दिवसांमध्ये कमाल तापमानात 1 ते 2 अंश सेल्सियसने घट होणार असून, त्यानंतर पुन्हा 1 ते 2 अंशाने वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, किमान तापमानात पुढील तीन दिवसांमध्ये 2 ते 3 अंशांनी घट होईल आणि त्यानंतर त्यामध्ये मोठा बदल होणार नाही. विदर्भात मात्र पुढील 72 तासांत किमान तापमानात 2 ते 3 अंशांनी घट होईल आणि त्यानंतर त्यात पुन्हा वाढ होईल, असे हवामान विभागाने (IMD) अंदाज वर्तवला आहे.
राज्यात तापमानाचा पारा कसा?
गेल्या 24 तासांमध्ये महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये कोरडे हवामान राहिले. कोठेही पाऊस झाल्याची नोंद नाही. राज्यात अनेक ठिकाणी तापमान 35अंशांच्या पुढे गेल्याचे पाहायला मिळाले. विदर्भातील चंद्रपूर येथे 36.6 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली, तर सोलापूर आणि वर्धा येथेही कमाल तापमान 36.9अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले. पुण्यात काही ठिकाणी तापमान 37अंश सेल्सियसपर्यंत वाढले होते. महाबळेश्वरमध्ये सर्वात कमी कमाल तापमान 27अंश सेल्सियस नोंदवले गेले.
बुधवारी (12 फेब्रुवारी) ला कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत तापमान तुलनेने उष्ण राहिले, तर उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात थोडीशी गारठा जाणवला. सर्वात कमी तापमान शाहदा (नंदुरबार) येथे 12.5अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले, तर लोनिकांलबोर (पुणे) येथे 12.6अंश सेल्सियस तापमान राहिले. कोकण किनारपट्टीवरील शहरांमध्ये किमान तापमान तुलनेने जास्त होते. मुंबई कोलाबा येथे 21.1अंश, तर रत्नागिरी येथे 21.1अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले.
पहाटे गारवा वाढला
गेल्या दोन दिवसांपासून मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पहाटे गारठा जाणवत होता. मात्र, दुपारी उष्णतेच्या झळा कायम होत्या. येत्या दोन दिवसात राज्यात बहुतांश ठिकाणी तापमान साधारण असेच राहणार असून पहाटे गारवा जाणवणार आहे. काही भागात हलक्या धुक्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. दुपारी उन्हाचा चटका बसणार असून कमाल तापमान चढेच राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा: