Maharashtra Rain Update : आठवडाभराच्या विश्रांतीनंतर गोंदियात रात्रीपासून दमदार पावसाची हजेरी
Maharashtra Rain Live updates : हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या काही भागात हलक्या पावसानं हजेरी लावली आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra Rain Live Updates: राज्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात आजपासून (23 जून) पाऊस (Rain) पडण्याची शक्यता हवामान विभागानं (IMD) वर्तवली आहे. आजपासून कोकणासह मध्य महाराष्ट्रात पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज...More
साक्री तालुक्यातील पिंपळनेर सह परिसरामध्ये वरून राजाने पाठ फिरवली होती मात्र गेल्या काही दिवसांपासून पिंपळनेर सह परिसरातील अनेक गावांमध्ये पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली असून यामुळे या भागातील धरण क्षेत्रात पाणी वाढले असून साक्री तालुक्यातील अतिशय महत्त्वाचा समजला जाणारा पांझरा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला आहे....
जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने विविध जलप्रकल्पांमधील जलसाठा घटला असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे मात्र पश्चिम पट्ट्यात पाऊस होऊ लागला असून यामुळे लाटीपाडा धरण सांडव्यावरून ओसंडून वाहू लागला आहे, गेल्या वर्षी 12 जुलै रोजी लाटीपाडा धरण पूर्ण क्षमतेने भरले होते मात्र यंदा तब्बल 20 ते 22 दिवस उशिरा हे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून लाटीपाडा धरण ओव्हर फ्लो होऊन वाहू लागल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये समाधान पसरले आहे....
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमध्ये मिळून सद्यस्थितीत एकूण 77.96 टक्के पाणीसाठा
Gondia Rain : आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर गोंदिया जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात झालेली आहे. हवामान विभागाने गोंदिया जिल्ह्याला काल ऑरेंज अलर्ट दिला होता. मात्र काल दिवसभर ढगाळ वातावरण होते, त्यानंतर काल रात्रीपासून दमदार पावसाला सुरुवात झालेली आहे. आज सकाळी देखील पावसाचा जोर कायम आहे. तर या दमदार पावसाने खोळंबलेल्या धान रोवनीच्या कामांना वेग येणार आहे.
नाशिकच्या कळवण, सटाणा ,मालेगाव व देवळा परिसरात अत्यल्प पावसामुळे शेतकरी चिंतेत असताना बागलाणच्या मोसम खोऱ्याला वरदान ठरलेल्या हरणबारी धरण ' ओव्हर फ्लो ' झाले आहे..धरण भरल्याने मोसम खोऱ्यातील शेतकरी आनंदला असून धरणातून मोसम नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे..मोसम नदी दुथडी भरून वाहू लागल्याने परिसरात समाधान पसरले आहे.यंदा हरणबारी धरण ओव्हरफ्लो होण्यास एक महिन्यापेक्षा जास्त दिवस विलंब झाला आहे.मागील वर्षी पावसाळा सुरू झाल्यानंतर अवघ्या आठ दिवसांतच धरण भरले होते.
पालघर जिल्हा पावसाची तालुका निहाय आकडेवारी दिनांक 30/07/2023 (Yesterday 8am to today 8 am)
1)वसई:- 17 मी मी
2)जव्हार:- 17.66 मी मी
3) विक्रमगड:- 29 मी मी
4) मोखाडा:- 21 मी मी
5) वाडा :- 14.25 मी मी
6)डहाणू :- 11.6 मी मी
7) पालघर:- 10.3 मी मी
8) तलासरी :- 3 मी मी
एकूण पाऊस :- 123.81 मी मी
एकुण सरासरी :- 15.4 मी मी
संपूर्ण आंबेनळी घाट उद्यापासून 15 दिवसांसाठी बंद
सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सर्व वाहतूक राहणार बंद
रायगड प्रशासनाचा निर्णय
अनेक ठिकाणच्या कोसळलेला दरडीचा आढावा घेऊन आंबेनळी घाट बंद
माजी खासदार राजू शेट्टी पोहचले बुलढाण्यातील अतिवृष्टीग्रस्त भागात.
जळगाव जामोद व संग्रामपूर परिसरात आज करणार शेतीची पाहणी.
दुपारी संग्रामपूर तहसील कार्यालयावर काढणार शेतकऱ्यांसह मोर्चा.
सरकारने ने शेतकऱ्यांच्या तोंडाला मदतीच्या नावावर पाने पुसली -
Rain : कोकणात यावर्षी उशिराने पाऊस पडूनही गेले दहा दिवस सुरू असलेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणीसाठा ८० टक्क्यांवर पोचला आहे. जिल्ह्यातील ४१ छोट्या मोठ्या धरणांमधील पाणीसाठा आतापर्यंत ८० टक्क्यांपर्यंत पोचला आहे. ४१ पैकी १९ धरणांमध्ये १०० टक्के पाणीसाठा झाला असून अतिरिक्त पाणी सोडण्यात आले आहे. गत दोन वर्षात झालेल्या पाणीसाठ्याच्या टक्केवारीपर्यंत यावर्षीच्या पाणीसाठ्याची टक्केवारी पोचली आहे. गेल्यावर्षी पेक्षा यंदा ११ टक्क्यांनी पाणीसाठा वाढला आहे.
Nandurbar rain : अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर नंदुरबार शहर आणि तालुक्यात पावसाला सुरुवात
पेरणीनंतर पिकांसाठी दमदार पावसाची होती आवश्यकता आज झालेल्या पावसामुळे पिकांना मिळणारी जीवदान
जुलै अखेर पर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या अवघा 34 टक्के पाऊस जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा कायम
यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या बेंबळा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यास सुरूवात झाली.
बेंबळा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या पर्ज्यमान झाल्याने प्रकल्पाच्या जलाशय पातळी मध्ये वाढ होत आहे. त्यामुळे प्रकल्पाचे 10 दरवाजे 50 सेंटिमटरने उघडन्यात आले यातून 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाण्याचा वीसर्ग होते असल्याने बाभुळगाव, कळंब, राळेगाव, मारेगाव वणी या तालुक्यातील नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.
विदर्भातील जलसाठा (प्रकल्पनिहाय माहिती)
विभाग मोठे माध्यम लघु एकूण
नागपूर 64.19%. 75.57%. 54.38%. 64.78%
अमरावती 61.16%. 66.52%. 61.07%. 70.52%
जिल्हा प्रकल्प जलसाठा स्थिती
अकोला काटेपूर्णा 59.29%.
अकोला वाण 70.52%
अमरावती उप्पर वर्धा 78.27%
बुलढाणा खडकपूर्णा 3.58%
बुलढाणा नळगंगा 26%
बुलढाणा पेणटाकळी 46.10%
यवतमाळ अरुणावती 78.90%
यवतमाळ बेंबळा 33.73%
यवतमाळ इसापूर. 60.44%
यवतमाळ पूस 73.83%
भंडारा बावनथडी 30.69%
भंडारा गोसेखुर्द 38.58%
गडचिरोली दीना 100%
चंद्रपूर असोलामेंढा 100%
नागपूर कामठीखैरी 73.26%
नागपूर खिंडसी 71.83%
नागपूर नांद 17.64%
नागपूर तोतलाडोह 82%
नागपूर वाढेगाव 69.26%
वर्धा बोर 70.83%
वर्धा लोवर वर्धा 72.37
Nashik Rain : गंगापूर धरणातून यंदाच्या पावसाळ्यातील पहिलाच विसर्ग.. पाच क्रमांकाचा दरवाजा दिड फुटांनी उघडला.. 539 क्यूसेस वेगाने गोदावरी नदीत सोडण्यात आले पाणी..
शहापूर तालुक्यातील मोडकसागर धरण परिसरातील पाणलोट क्षेञात संततधारेमुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.
मोडकसागर धरणाची ५३५ टी.एचडी क्षमता आहे, सद्या धरण पुर्ण भरले असून ८ पैकी २ दरवाजातुन पाण्याचा विसर्ग मोठ्याप्रमाणात सुरु आहे.त्यामुळे वैतरणा नदीला पुर आला असुन नदीकाठील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
यवतमाळच्या वणी तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे आणि बेंबळा धरणाचे दरवाजे उघडल्याने मुंगोली येथील वर्धा नदीला पुर आला असून या पुलावरून पाणी वाहत असल्याने काल रात्री पासून या मार्गावरची वाहतूक बंद झाली आहे
दहिसर - २३८ मिमी
मिरा रोड - २१२.५ मिमी
नांदेड - १८७ मिमी
भाईंदर - १४७ मिमी
तोंडापूर (हिंगोली) - १२२ मिमी
पालघर - ११८ मिमी
राम मंदिर - १२२.५ मिमी
रत्नागिरी - संगमेश्वर तालुक्यातील देवरुख कोंढरणमध्ये भुस्खलन
सततच्या पडणा-या मुसळधार पावसामुळे भुस्खलन
कोंढरण गावातील 50 घरातील 80 नागरिकांचे स्थलांतर
एका घरावर दरड कोसळली मात्र जीवित हानी नाही
जमिनीला आणि इथल्या घरांना पडल्यात भेगा
तुलसणी हायस्कुलमध्ये नागरीकांच स्थलांतर
जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर
पालघरमधील सूर्या नदीला मोठा पूर आला आहे. मासवनजवळ पालघर पोलिसांनी पुरात अडकलेली कार टॅम्पोला बांधून बाहेर काढली.
यंदाच्या पावसाळ्यात गंगापूर धरणातून पहिल्यांदाच होणार पाण्याचा विसर्ग
- गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने धरण 68 टक्के भरले
- दुपारी 12 वाजता 539 क्यूसेसने गोदापात्रात पाणी सोडण्यात येणार
- पावसाचा जोर वाढल्यास विसर्गात टप्या टप्याने होणार वाढ
- एकीकडे नाशिक शहरात पावसाने फिरवली पाठ तर दुसरीकडे गंगापूर धरणातून होणार पाण्याचा विसर्ग
- जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा येऊनही जिल्ह्यातील 23 पैकी 13 धरणात अजूनही 50 टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा
हिंगोली जिल्ह्यात 200 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी माहिती दिली आहे. तलाव फुटला आहे त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली आहे
चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ... वर्धा जिल्ह्यातील निम्न वर्धा धरण, बेंबाळ प्रकल्प आणि वेण्णा नदीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचे वर्धा नदीच्या पात्रात होत आहे मोठी वाढ, वर्धा नदीचं पाणी पुलावरून जात असल्यामुळे कालपासून धानोरा-भोयेगाव-गडचांदूर हा मार्ग बंद आहे आणि आज सकाळ पासून बल्लारपूर-बामनी-राजुरा हा मार्ग देखील बंद करण्यात आला आहे, विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात आज पहाटे पासून पाऊस सुरू झाल्याने चंद्रपूर जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे
वर्ध्यातील निम्न वर्धा धरणाचे 25 दरवाजे उघडले
आज सकाळी 7 वाजता 25 दरवाजे उघडण्यात आले.
30 सेमी ने उघडले दरवाजे
नदीकाठच्या गावकऱ्यांना सतर्कतेचा ईशारा
Rain : मागील दोन दिवसांपासून गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि गोसेखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रणात राहावी, यासाठी गोसीखुर्द धरणाचे 23 दरवाजे अर्धा मीटरनं उघडले आहे. या 23 गेटमधून 94 हजार 495 क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. मागील आठवडाभरापासून पावसानं विश्रांती घेतल्यानं धरणाचे गेट कमी केले होते, मात्र कालपासून पावसाचा जोर वाढल्यानं गेटची संख्या वाढविण्यात आलेली आहे. आज भंडाऱ्याला ऑरेंज अलर्ट घोषित केला असल्यानं प्रशासनानं नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Palghar Rain : पालघर जिल्ह्यात आजही पावसाचा जोर कायम असून जिल्ह्यातील काही रस्त्यांवर पाणी साचल्याने ते रस्ते वाहतुकीसाठी बंद आहेत.
पालघर मनोर रोडवर मासवन पासून सूर्या नदीच्या ब्रिज पर्यंत पुराचं पाणी रस्त्यावर असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे तसेच डहाणू तालुक्यातील सारणी उर्से ऐना या रस्त्यावर सूर्या नदीच्या पुराचे पाणी म्हसाड,सारणी आणि आंबिवली येथील साकवांवर आल्याने ह्या रस्त्यावर असलेल्या दहा गावांचा संपर्क काल पासूनच तुटलेला आहे. तर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात अजूनही पाऊस सुरू असल्याने ठिकठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे . जिल्ह्यातील सूर्या वैतरणा पिंजाळ या नद्या सध्या धोक्याच्या पातळीवर असून जनजीवन विस्कळीत होण्याची पाळी निर्माण झाली आहे
Ratnagiri Rains : रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर थोड्याफार प्रमाणात ओसरला आहे. हवामान खात्याकडून रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. काजळी नदीसह बहुतेक नद्यांच्या पाणीपात्रात घट झाली आहे. जिल्ह्यातील आठ पैकी दोन नद्या आजही इशारा पातळीवर वाहत आहेत. खेडची जगबुडी आणि राजापुरातील कोदावली नदी इशारा पातळीवर आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना आजही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Kolhapur Rains : पंचगंगा नदीची पाणी पातळी 41 फुटांवर पोहोचली आहे. गेल्या बारा तासांमध्ये नदीची पाणी पातळी केवळ 4 इंचाने वाढली आहे. आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसंच राधानगरी धरणातील पाण्याच्या विसर्गाचा फारसा परिणाम झालेला नाही.
Hingoli Rains : हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात काल मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. पाऊस मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले होते. वसमत शहरालगत आसलेला तलाव फुटल्याने शुक्रवार पेठ तथागत नगर जुना गुरुद्वारा इडगाह मैदान या भागातील नागरिकांच्या घरात मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले होते. त्यामुळे घरात असलेले संसार उपयोगी साहित्य त्याचबरोबर अन्नधान्य संपूर्णपणे भिजले आहे. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ झाली होती. प्रशासनाच्या वतीने सत्तर नागरिकांचं नजीकच्या एका शाळेमध्ये स्थलांतर करण्यात आलं होतं तर तलावातील पाण्याचा अजूनही विसर्ग सुरु असल्याने अजूनही अनेकांच्या घरात पाणी आहे.
Gadchiroli Rains : तेलंगणा राज्यात ढगफुटीसारखा 600 मिमी इतका पाऊस पडला आहे. त्यामुळे महाराष्ट्रच्या सीमेवर असलेल्या भूपालपल्ली जिल्ह्यात गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. हजारो घरे पाण्याखाली आली आहेत. तेलंगाणा राज्यातील कडेम आणि श्रीपदा एल्लमपल्ली धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला आहे. त्याचा फटका हा थेट गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्याला बसणार आहे. सिरोंचा तालुक्याच्या सीमेवर गोदावरी नदी आहे आणि या पुराचे पाणी आता गोदावरीला येऊन मिळणार आहे. त्यामुळे सीमावर्ती भागात जिल्हाधिकारी संजय मीना यांनी संपूर्ण यंत्रणा सज्ज केली आहे. वॉर रुममधून याकडे लक्ष ठेवून आहे. काल मध्यरात्रीच्या दरम्यान गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. सिरोंचा तालुक्यातील असरल्लीमध्ये 164.8 मिमी इतका पाऊस पडला. तालुक्यातील 4 गावांतील 330 लोकांना सुरक्षित स्थळी हवण्यात आले आहे.
Ulhasnagar Rains : सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने उल्हासनगरच्या अनेक भागात पाणी साचले असून हिराघाट तसेच शांतिनगर परिसरात पूर आला आहे. पुराचे पाणी नागरिकांच्या घरात घुसले असून खूप मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. दरम्यान जीवितहानी टाळण्यासाठी उल्हासनगर महानगरपालिकेकडून ज्या नागरिकांच्या घरात पाणी शिरले त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. तसेच त्यांच्या राहण्याची आणि खाण्याची सोयही पालिकेकडून करण्यात आली आहे. ज्या नागरिकांच्या घरात पाणी शिरले त्या नागरिकांना पलीकेकडून नियोजित केलेली वेदांत स्कूलमध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच या पुरामुळे ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांची तहसीलदार कार्यालयातून चौकशी करण्यात येणार असून नुकसान भरपाई दिली जाईल, अशी माहिती उल्हासनगर महानगर पालिकेचे आयुक्त अजीज शेख यांनी दिली आहे.
Bhandara Rains : हवामान विभागाने भंडारा जिल्ह्याला गुरुवारी ऑरेंज अलर्ट जाहीर केला होता. मात्र, दिवसभर प्रखर ऊन आणि उकाडा असल्याने नागरिक हैराण झाले होते. गुरुवारी रात्री ढगांचा गडगडाट आणि विजांच्या प्रचंड कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर कमी झाला असून पहाटेपर्यंत कुठे हलका तर कुठे रिमझिम सुरु आहे. रात्रीच्या जोरदार पावसाने भंडाऱ्यातील बैरागी वाडा परिसरातील सखल भाग जलमय झाला होता. पाऊस कमी झाल्याने आता पाणी ओसरलं आहे.
पालघर जिल्ह्याला झालेल्या मुसळधार पावसाने अनेक भागात काही वेळातच पूरस्थिती निर्माण केली. ठिकठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने सकल भागामध्ये पाणी साचलं तर नदी नाल्यांनाही मोठा पूर आला त्यामुळे काही रस्त्यांवरील छोटे-मोठे पूल पाण्याखाली गेल्याने अनेक रस्ते बंद झाले होते. आणि काही गावांचा संपर्कही तुटला होता.तर मुसळधार पावसामुळे जव्हार मोखाडा विक्रमगड डहाणू तालुक्यातील अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरलं होतं त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं तर पालघर जिल्ह्यात आत्ताच जवळपास 70 टक्के भात रोपन्या पूर्ण झाल्या होत्या परंतु आज झालेल्या पावसामुळे या भात रोपन्या झाल्या होत्या त्याचं मोठ्या प्रमाणात पुरामुळे नुकसान झाला आहे. तर काही गावातील घरांमध्ये पाणी शिरल्याने त्यांचंही मोठ्या नुकसान झाला आहे एकूणच पाहायला गेलं तर ह्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना मोठा पूर होता त्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं होतं. सध्या पावसाने काहीशी उसंत घेतली असली तरी पावसाचा जोर कायम असून उद्याही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे पालघर जिल्ह्यातील शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आले आहे.
Buldhana Rains : बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात रात्री पुन्हा अतिवृषटीमुळे अनेक नदी ओढ्याना पूर आल्याने नागरिकांनी जीव मुठी धरुन रात्र काढल्याच चित्र आहे. संग्रामपूर परिसरात सातपुडा डोंगर परिसरात काल सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने कहर केला. तालुक्यातील पांडव नदीसह अनेक ओढ्यांना पूर आल्याने शेगाव जळगाव जामोद मार्ग काही काळ बंद होता तर आलेवडी गावात पुराचं पाणी शिरल्याने अनेक घर जलमय झाले होते. आलवाडी ग्रामपंचायत इमारतीत दोन ते तीन फूट पाणी शिरल्याने मोठ नुकसान झालं आहे. तर काही कुटुंबांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं आहे.
नांदेडमध्ये पावसाने कहर केला .. जिल्हाभरात मुसळधार पाऊस झाला .. शहरात तर पावसाने हाहाकार माजवला .. जोरदार पावसामुळे शहरात अनेक भागात पाणी साचले .. श्राववस्तीनगर , तेहरा नगर , नोबेल कॉलनी , खडकपुरा , सादतनगर यासह अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले .. घरा घरात पाणी साचून लोकांचे संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले .. अजुनही अनेकांच्या घरात मोठया प्रमाणात पाणी साचले आहे .. अशी भीषण अवस्था निर्माण झाली असताना देखील प्रशासनाची कुठलीच यंत्रणा या भागा पर्यन्त पोहचली नाही .. परिणामी अश्याच पावसात लोकांना रात्र काढावी लागली ...
Maharashtra Rain Updates: मुंबई - गोवा महामार्ग पावसामुळे बंद करण्यात आला आहे. लांजा तालुक्यातील काजळी नदीला पूर आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
वर्ध्यात झालेल्या पावसाचा फटका कान्होली भागाला देखील बसला आहे. येथे यशोदा नदीला आलेल्या पुरामुळे शेकडो हेकटर शेती पाण्याखाली आली आहे. यशोदा नदी दुथळी भरून वाहते आहे. येथे मार्ग बंद करण्यात आला आहे. तर अल्लीपूर मार्गावर पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे. याशिवाय वर्धा जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्ते बंद झाल्याने गावाचा सम्पर्क तुटला होता, तर कुंभी या गावात देखील पाणी शिरल्याने पुर परिस्थिती निर्माण झाली होती.
वर्धा : समुद्रपूर तालुक्यातील गव्हा येथे तब्बल बारा तासापासून पाण्याच्या टाकीवर तिघे जण अडकले होते. तिघांनीही रात्र टाकीवर काढली. दरम्यान सकाळी त्यांचा शोधाधोध करीत त्यांचे बचावकार्य राबण्यात आले. दुपारच्या सुमारास रेस्क्यू ऑपरेशन राबवत तिघांचीही सुरक्षितरित्या सुटका करण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील तोंडवळी किनारपट्टी भागात समुला उधाण आला आहे. याचा फटका बसल्याने नवीनच बांधलेली जेटी ही वाहून जाण्याच्या स्थितीत आहे. सततचा पडणारा पाऊस आणि समुद्राला आलेल्या उधाणाचा जोर वाढल्याने त्याचा फटका मधली तोंडवळीला बसला आहे. मधली तोंडवळी किनारी बंधारा नसलेल्या भागात मोठया प्रमाणात धूप होऊन समुद्राने भूभाग गिळंकृत केला आहे. याच भागात दोन वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या जेटीचा पाया उध्वस्त झाला असून जेटी वाहून जाण्याच्या मार्गावर आहे. येणाऱ्या पौर्णिमे पर्यंत उधाणाचा जोर अजून वाढणार आहे त्यामुळे समुद्राचे पाणीही वस्तीच्या दिशेन मार्गक्रमण करत आहे. उधाणाचा जोर कायम राहिल्यास मोठी धूप होण्याची शक्यता ग्रामस्थांनी वर्तवली.
राज्यात सध्या होत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफ तैनात
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये १३ एनडीआरएफच्या टीम पाचारण
विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात होत असलेल्या तुफान पावसाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफच्या टीम तैनात
रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाने रेड अलर्ट जाहीर केलेला आहे.आज सकाळपासूनच जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाने सुरुवात केलेली आहे..जिल्ह्यातील संगमेश्वर येथील शास्त्री नदी,लांजा येथील काजळी नदी,राजापूर येथील कोदवली,संगमेश्वर तळकांटे येथील बावनदी या चार नद्या सध्या इशारापातीवर वाहत असून उत्तर रत्नागिरीतील मुंबई - गोवा महामार्गावरील खेड भरणे नाक्यातील जगबुडी नदी सध्या धोका पातळीवर वाहते.. त्यामुळे या पाचही नदीकिनार्यावरील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देणायात आला आहे..
यवतमाळ जिल्ह्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस
24 तासात चार तालुक्यात अतिवृष्टी
कळंब मध्ये 113 मिलीमीटर पाऊस
राळेगाव तालुक्यात 85 मिली
वणी तालुक्यात 78 मिली
तर पांढरकवडा तालुक्यात 72 मिलीमीटर पावसाची नोंद
नदीनाल्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
या तालुक्यातील छोट्या मोठ्या नाल्याना पूर अंतर्गत
रस्ते बंद
मध्यरात्रीपासून लातूर शहर आणि परिसरात पावसाची रिपरिप सुरूच आहे .. मागील पाच दिवसांपासून सतत पावसाची रिपरिप सुरू आहे .. लातूर जिल्ह्यात काही भागात जोरदार पावसाची हजेरी लागली असली तरीही जिल्हाभरात अजून ही मोठा पावसू झालाच नाही .. हा पाऊस पिका साठी चांगला आहे.. मोठा पाऊस अद्याप झाला नसल्यामुळं अनेक प्रकल्पात अद्याप पाणी आलेच नाही. ज्या भागात मोठा पाऊस झाला आहे त्या भागात मोठ्या पावसामुळे शेत जमिनी खरवडून गेल्या आहेत. त्यात जलकोट तालुक्यातील ४०० एकर पेक्षा अधिक शेतजमिनीवरील पिके आणि माती खरवडून गेली आहे ..
सतत पाच दिवसापेक्षा अधिक काळ सूर्यदर्शन झाले नसल्यामुळे अनेक ठिकाणी कोवळी पिके मान टाकत आहे ...
मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मारेगाव तालुक्यातील कोसारा पुलावरून 4 फूट पाणी
वर्धा नदीला पूर
यवतमाळ-वरोरा मार्ग बंद
पोलिसानी वाहतूक केली बंद
रायगडात पावसाचा जोर वाढला, गावांना पुराच्या पाण्याचा वेढा
अलिबाग तालुक्यातील मिळखतखार गावाला पाण्याचा वेढा
रायगड जिल्ह्यात सलग दहा दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय.हवामान खात्याने रेड अलर्ट जाहीर केलाय,पाऊसाची संततधार सुरुच आहे.पेण आणि रोहा मध्ये पावसाचा जोर वाढल्याने नद्या नाले तुडूंम्ब वाहतायेत,जनजीवन विस्कळीत झालेय,नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय.रोहातील कुंडलीका नदी सध्या इशारा पातळीवर वाहते..तर जिल्ह्यातील पाताळगंगा,सावित्री,अंबानदी या प्रमुख नद्या इशारापातळीजवळ येउन वाहतायत..
गेले दोन दिवस खेडमध्ये पावसाची संततधार सुरू आहे.यामुळे खेड तालुक्यातील तांबेडी अंतर्गत मार्गावरती दरड कोसळली आहे. त्यामुळे तांबेडी आणि परीसरातील गावांत जाणारा रस्ता बंद झाला आहे.
तेलंगाणातील मुलुगू आणि जयशंकर भूपालपल्ली जिल्ह्यांमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस
देशात यंदाच्या हंगामातील तेलंगाणामध्ये मागील २४ तासात सर्वाधिक पावसाची नोंद
मुलुगू जिल्ह्यातील लक्ष्मीदेवीपेटा परिसरात मागील २४ तासात तब्बल ६५० मिमी पाऊस
सोबतच तेलंगाणातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि ढगफुटीसदृश्य पाऊस
आलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग आणखी वाढणार
सकाळी 11 वाजल्यापासून धरणातून तब्बल दीड लाख क्यूसेक वेगाने केला जाणार विसर्ग
कालपासून 1 लाख 25 हजार क्यूसेक वेगाने सुरु आहे विसर्ग
मात्र कोल्हापूर, सांगली भागतील पावसामुळे आलमट्टी धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात इनफ्लो सुरु आहे
त्या पार्श्वभूमीवर आलमट्टी धरण क्षेत्रातून केला जातोय विसर्ग
विदर्भात चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात प्रशासनाकडून सर्वच माध्यमांना शाळांना सुट्टी देण्यात आली आहे... तर नागपूर शहरात ही अनेक खाजगी शाळांनी सुट्टी जाहीर केली आहे...
चांदोली धरणातून वारणा नदीत 10 वाजता विसर्ग वाढवला जाणार
5150 क्युसेक व विद्युत जनित्र मधून 1630 क्यूसेक असे एकुण 6780 क्युसेक पाणी नदी पात्रात सोडण्यात येणार
नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा कायम
यवतमाळ जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात कमी अधिक प्रमाणात मुसळधार पाऊस सुरू आहे. तसेच हवामान विभागाने आज ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे कोणतीही आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होवू नये याकरीता सर्वच शाळा बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी शिक्षण विभागाला दिले आहे
रत्नागिरी - मुंबई गोवा महामार्गावर निवळी घाटात दरड
कोसळली
मुंबई गोवा महामार्गवरच्या वाहतुकीवर परिणाम
कुलाब्यात मागील 24 तासात अतिवृष्टी
मागील 24 तासात कुलाब्यात 223.2 मिमी पावसाची नोंद
सांताक्रुज वेधशाळेत मागील २४ तासात १४५.१ मिमी पाऊस
मुंबईत आज आॅरेंज अलर्ट जारी, प्रादेशिक हवामान केंद्राची माहिती
रात्रभर आलेल्या मुसळधार पावसाने नागपूरचा अंबाझरी तलाव ओहरफ्लो झाला ...
त्यामुळे पर्यटकांनी अंबाझरी ओहरफ्लो बघायला गर्दी केली
वसई विरार नालासोपाऱ्यात पावसाची रिपरिप सुरू
अधूनमधून जोरदार पाऊस पडत आहे.
पालघर जिल्ह्याला आज हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट आहे.
वसई विरार परिसरातील सर्व शाळा, महाविद्यालय सह लोकल रेल्वे सेवा सुरळीत सुरू आहे.
आभाळ पूर्ण भरलेले असून, दिवसभरात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे
नालासोपारा पूर्व स्टेशन परिसरातील दृश्य
वर्धा जिल्ह्यात रेड अलर्ट
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी
सर्व माध्यमाच्या शाळा बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश
-आज सर्वच माध्यमांच्या शाळा राहणार बंद
- शाळेला सुट्टी जाहीर झाल्याची शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या मुख्याध्यापकाना सूचना
यवतमाळ जिल्ह्यात तीन दिवसांच्या उघडीपनंतर पुन्हा पावसाला सुरुवात
विजेच्या कडकडाटात पहाटेपासून मुसळधार पावसाळा सुरुवात
वर्ध्यात रात्रीपासून ढगफुटी सदृश्य पाऊस
तब्बल 12 तासापासून पडतोय मुसळधार पाऊस
वर्ध्यातील यशोदा, भदाडी, वर्धा नदीला पूर
यशोदा नदीवरील वर्धा - राळेगाव, अल्लीपूर - अलमडोह मार्ग वाहतुकीसाठी झाला बंद
पाऊस असाच सुरू राहिल्यास नदी काठावरील गावात पाणी शिरण्याची भिती
Nagpur rain : नागपूर मध्ये रात्रभर मुसळधार पाऊस कोसळला
अनॆक सखल भागात पाणी साचले ..
आजचा दिवस पूर्व विदर्भासाठी अत्यंत महत्वाचा आहे ....
आज गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला तर नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला
बांगाच्या उप सागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने नागपूर वेध शाळेने हा अलर्ट दिला आहे.
ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या शहरांमध्ये प्रचंड पाऊस पडतोय. मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला पूरसदृश्य परिस्थिती आहे.
असे असताना आता अंबरनाथ-बदलापूर जवळील बारवी धरण देखील जवळपास धोक्याच्या पातळीपर्यंत भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणी पातळी धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचल्यानंतर धरणाचे स्वयंचलित दरवाजे आपोआप उघडणार आहेत आणि बारवी नदीत पाण्याचा विसर्ग होणार आहे.
बारवी धरण विभागाचे कार्यकारी अभियंता दुशांत उईके यांनी अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, भिवंडी तालुक्याच्या तहसीलदारांना पत्र पाठवले आहे. या पत्रा मध्ये बारवी धरणातून बारवी नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गाबाबत माहिती देण्यात आली आहे.
मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा धरण आज पहाटेच्या सुमारास ओवर फ्लो झाला आहे . त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने तानसा धरणाच्या खाली व तानसा नदीच्या काठावर वसलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच तहसीलदार पोलीस व महानगरपालिका यांना सतर्क राहण्याचे देखील सांगण्यात आला आहे. तानसाच्या पाण्यामुळे वतीने तानसा शहापूर भिवंडी वसई तालुक्यातील अनेक गावांना फटका बसतो त्यामुळे या भागात देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तानसा धरणातून सध्या1100 क्यूसेकने पाणी सोडण्यात येत आहे.
सिंदुधुर्ग जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. उत्तर पश्चिम बंगालच्या उपसागरात उत्तर आंध्र प्रदेश ते दक्षिण ओरिसाच्या किनारपट्टीजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने येत्या 24 तासांत त्याची तीव्रता आणखी वाढणार आहे. पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हय़ांला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
अमरावतीच्या मेळघाट मधील चिखलदरा ते घटांग मार्गावर आमझरी गावाजवळ दरड कोसळली...
दरड कोसळल्याने चिखलदरा ते घटांग मार्ग बंद, मार्ग बंद असल्याने स्थानिकांना मोठा फटका....
दरड कोसळल्याने आले रस्त्यांवर दगड, वाहतूक थांबली...
रस्त्यावरील मलबा हटवण्याचे काम सुरू होणार...
जळगाव जामोद तालुक्यातील वडशिंगी गावातील अतिवृष्टी ग्रस्त नागरिक शासनाची कुठलीही मदत न मिळाल्याने आक्रमक.
वडशिंगी गावातील संतप्त नागरिकांचा खामगाव जळगाव जामोद मार्गावर ठिय्या.
गेल्या एक तासांपासून नागरिकांचा रस्त्यावर ठिय्या.
जळगाव जामोद पोलिस आंदोलनस्थळी पोहचले.
पाच दिवसा नंतर ही अपत्तिग्रस्त भागात अद्याप शासनाचा कुठलाही प्रतिनिधी व अधिकारी न पोहचल्याने गावकरी आक्रमक.
मुंबईला पाणी पुरवठा करणारे तानसा धरण भरले
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांपैकी तुळसी आणि आता तानसा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे
काल तानसा धरणात 94.27 टक्के पाणीसाठा होता मात्र धरणक्षेत्रात पडत असलेल्या जोरदार पावसामुळे हे धरण सुद्धा आता पूर्ण क्षमतेने पहाटेच्या वेळी भरल्याची माहिती देण्यात आली आहे
सद्यस्थितीत सातही धरणांमध्ये मिळून 55 टक्के पेक्षा अधिक पाणीसाठा उपलब्द झाला आहे
त्यामुळे मुंबईकरांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे
ठाकरे गटाकडून पाणीसाठ्यात वाढ झाल्याने 10 टक्के सुरू असलेली पाणी कपात रद्द करावी अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे
sangli rain : चांदोली धरणांतून पाणी आज वारणा नदी पात्रात सोडण्यात येणार,
धरणाची सांडवा पातळी ओलांडली, ८१ टक्के धरण भरले
नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा
आज ११ वाजता १ ते २ हजार क्यूसेसने पाणी सोडण्यात येणार
कृष्णा नदीची पाणी पातळी १८ फुटांवर स्थिर
Rain News : हवामान विभागाने ठाणे जिल्ह्यासाठी पुढील 2 दिवस ऑरेंज अलर्ट दिलेला आहे.
पंचगंगा नदीची पाणी पातळी रात्री बारा वाजल्यापासून स्थिर आहे. सध्या पंचगंगा ही 40 फूट 4 इंचावरून वाहत आहे. काल सकाळपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचे चित्र दिसतंय... त्यामुळे नदीकाठच्या गावांना तसेच कोल्हापूर शहरातील सकल भागातील रहिवाशांना हा दिलासा म्हणावा लागेल... ज्या पद्धतीने हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला होता... त्यापेक्षा खूप कमी पाऊस जिल्ह्यामध्ये झाला... त्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी स्थिर झाली आहे...मात्र जिल्ह्यातील 83 बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत...शिवाय राधानगरी धरणामध्ये देखील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात आहे... त्यामुळे पुढच्या दोन दिवसात राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे खुले होऊ शकतात....
सातारा जिल्ह्यातील येवतेश्वर कास रस्ता पुन्हा सुरु झाला आहे.
घाटातील धोकादायक दरडी काढण्याचे काम झाले पुर्ण
दरडी काढतानामात्र रस्त्यांचे झाले नुकसान
महाबळेश्वर कोयनेत पावसाचा जोर पुन्हा वाढला
महाबळेश्वरमध्ये 158 मिलिमीटर पावसाची नोंद
तर कोयनेत 126 मिलिमीटर पावसाची नोंद
जोर गावातही 188 मिलिमीटर पावसाची नोंद
कोयना धऱणात 56.47 टीएमसी पाणीसाठा
धरणात प्रतिसेकंद 53 हजार क्युसेक्सने पाण्याची आवक
कास धरण ओवरफ्लो
सातारा शहराला पाणीपुरवठा करणारे कास 100 टक्के भरले
सांडव्यावरुन पाणी वाहण्यास सुरवात
पाटणच्या मुख्यबाजारपेठेत चार दुकाने चोरट्यांनी फोडली
सुमारे एक लाखाचे साहित्य चोरीला
बाजारपेठेतील चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण
Maharashtra Rain Update : पावसाळा (Rain) सुरु झाल्यापासून आत्तापर्यंत महाराष्ट्रात (Maharashtra) सरासरीच्या 106 टक्के पावसाची नोंद झाली आहे. 1 जून ते 24 जुलैपर्यंत राज्यात सरासरी 458.4 मिमी पावसाची नोंद होत असते, मात्र प्रत्यक्षात 485.10. मिमी पाऊस कोसळला आहे. यामध्ये कोकणात (Konkan) सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. याबाबतची माहिती हवामान विभागानं (imd) दिली आहे.
Palghar Rain : पालघर जिल्ह्यातील मोखाड्यातील कुर्लोद ग्रामपंचायत हद्दीतील चार पाड्यातील नागरिकांचा पूराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास
शेंड्याचा पाडा, आंबे पाडा, रायपाडा, जांभूळपाडा या जवळपास 500 लोक वस्ती असलेल्या चार पाड्यांसाठी पावसाळ्यात रस्ताच नसल्याने नदीच्या बंधाऱ्यावरून पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागतो.
पावसाळ्यात या नदीला पूर आल्यानंतर येथील नागरिकांचे बाहेर जाण्याची वाटच बंद होते तर या काळात येथील शाळा ही बंद राहते त्यामुळे नागरिकांबरोबर विद्यार्थ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होतं अनेक वेळा शासनाकडे पाठपुरावा करूनही येथे कोणत्याही उपायोजना केल्या जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
मुंबई गोवा महामार्गावरील खेड भरण्या नाका येथील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे सध्या ती 7.40 मी. वाहत असून नदीकिनाराच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे..
मुंबईत पावसाची संततधार सुरु आहे आणि त्यामुळे ठिकठिकाणी रस्त्यांवर खड्ड्यांचं चित्र पाहायला मिळत आहे. एल ॲंड टी लगतच्या फ्लायओव्हरवर खड्डे पडल्याचं चित्र आहे. त्यामुळे वाहतूक अतिशय धीम्या गतीनं होत असल्याचं दिसतेय. विक्रोळीकडून जोगेश्वरीकडे जाणाऱ्या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे उड्डाणपूल उतरताच पुढे वाहतूक मंदावत असल्याचं चित्र आहे. सोबतच, मेट्रोच्या कामामुळे देखील वाहतुकीला अडचण निर्माण झाली आहे. सोबतच काही ठिकाणी खड्ड्यांमध्ये पेव्हर ब्लॉक टाकण्यात आल्याने वाहतूक मंदावली आहे.
वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे चंद्रपूर शहरात देखील पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. चंद्रपूर शहरातल्या रहमतनगर, सिस्टर कॉलनी, तिमांडे ले-आउट मधल्या हजारो घरांना पुराच्या पाण्याचा विळखा पडलाय. चंद्रपूर शहर हे इरई आणि झरपट नद्यांच्या किनाऱ्यावर आहे आणि या नद्यांचं पाणी हे वर्धा नदीला जाऊन मिळतं. मात्र वर्धा नदीचं पात्र फुगल्याने इरई आणि झरपट नद्यांचं पाणी वर्धा नदीत जात नसल्याने ते चंद्रपूर शहरात शिरायला सुरुवात झाली आहे. पुराचं हे पाणी वाढण्याच्या भीतीने अनेक लोकांनी आपलं सामान स्थानांतरित करण्यास सुरुवात केली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यात काल झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे सर्वच नदी नाले दुथडी भरून वाहत होते. इतकच काय तर छोट्या छोट्या नद्या आणि नाले सुद्धा प्रवाह बदलून वाहत होते. संग्रामपूर शहराच्या बाजूने जाणाऱ्या एका नाल्याला मोठा पूर आल्याने 200 नागरिकांच्या घरात पाणी शिरलं.... तर रहिवासी भागात चार ते पाच फूट पाणी आल्याने नागरिकांनी आपल्या कपड्यांचे इकडे तिकडे आसरा घेण्यासाठी सुरुवात केली... मुसळधार पावसात जवळच असलेल्या संग्रामपूर येथील उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या ग्रामीण रुग्णालयात नागरिकांनी आपल्या लहान मुलांसह , परिवारासह व पशुधनासह ग्रामीण रुग्णालय इमारतीत आश्रय घेतला. मात्र या ठिकाणी त्यांना कुठल्याही प्रशासनाने मदत न केल्याची तक्रारही या नागरिकांनी केली
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यवतमाळ जिल्ह्यातील पुर प्रस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान पुरात अडकलेल्या सुखरूप बाहेर काढणाऱ्या NDRF आणि SDRF च्या टिमचं मंत्री पाटील यांनी कौतुक केले. दरम्यान नुकसानग्रस्तांना लवकर मदत होईल असे पाटील म्हणाले.
पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस होत असून जिल्ह्यातील नदी नाले प्रवाहित होऊन वाहत आहेत तर जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा निर्माण झाला आहे सूर्या प्रकल्पाचे महत्त्वाचे असलेलं धामणी धरण ८१.६४ टक्के भरले असून कवडास धरण ओव्हर फ्लो झाला आहे. धरण क्षेत्रामध्ये 2284 मिलिमीटर पावसाची नोंद आत्तापर्यंत झाले आहे. तर जिल्ह्यातील सूर्या वैतरणा पिंजाळ या नद्यांच्या पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख शहरांसह वसई विरार आणि मीरा-भाईंदर महानगरपालिकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागात पंचनाम्यास सुरुवात झाली आहे. प्रशासन कामाला लागलं आहे. शेतकऱ्यांनी पिक विण्यासाठी तात्काळ आपल नुकसान ऑनलाईन नोदणी करावी असे आवाहन करण्यात आलं आहे. बुलढाण्यातील संग्रामपूर, जळगाव जामोद आणि शेगाव तालुक्यात काल झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीच खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा मिळावा त्यासाठी महसूल विभागाने व प्रशासनाने रस्त्यावर उतरत पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. एकट्या संग्रामपूर तालुक्यात ४०००० हेक्टर वरील पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. आणि त्यामुळे आज रविवार असूनही तहसीलदार गटविकास अधिकारी कृषी अधिकारी पशुधन अधिकारी इत्यादी सर्व अतिवृष्टी ग्रस्त भागातील नागरिकांना दिलासा देण्याच्या कामासाठी जमिनीवर उतरले आहेत. या सर्वांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी डॉ. संजय महाजन यांनी...
गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस हजेरी लावत आहे. आजही अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.आज राज्यातील 8 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे, ठाणे, पालघर, सातारा, रत्नागिरी, रायगड, सिंधुदूर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज आहेतर मुंबईमध्ये यलो अलर्ट देण्यात आला असून जोरदार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.विदर्भातील सर्व जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.सोमवारपासून पुण्यात पावसाचा जोर थोडा कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मुंबईमध्येही 26 जुलैपर्यंत पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.
Palghar Rain : पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस होत असून जिल्ह्यातील नदी नाले प्रवाहित होऊन वाहत आहेत तर जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा निर्माण झाला आहे सूर्या प्रकल्पाचे महत्त्वाचे असलेलं धामणी धरण ८१.६४ टक्के भरले असून कवडास धरण ओव्हर फ्लो झाला आहे. धरण क्षेत्रामध्ये 2284 मिलिमीटर पावसाची नोंद आत्तापर्यंत झाले आहे. तर जिल्ह्यातील सूर्या वैतरणा पिंजाळ या नद्यांच्या पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख शहरांसह वसई विरार आणि मीरा-भाईंदर महानगरपालिकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
वर्धा नदीने ओलांडली इशारा पातळी... यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि निम्न वर्धा आणि बेंबाळ धरणातून पाणी सोडल्याने पैनगंगा आणि वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ
# वर्धा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने राजुरा-बल्लारपूर, लाठी-विरुर, हडस्ती-चारवट आणि भोयगाव-धानोरा मार्ग बंद
# पैनगंगा नदीचं पाणी वाढल्याने कोरपना तालुक्यातील अंतरगाव येथे गावात शिरले नाल्याचे पाणी तर वनसडी-अंतरगाव आणि कोडशी-पिपरी मार्ग बंद
# पैनगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने परसोडा, रायपुर, अकोला, पारडी, कोडशी, जेवरा, पिपरी, वनोजा, सांगोडा, भोयगाव आदी गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय
महाबळेश्वरात पावसाचा जोर पुन्हा वाढला
कोयनेत 158 मिलिमीटर पावसाची नोंद तर
महाबळेश्वर 146 मिलिमीटर पावासाची नोंद
नवजा परिसरातही 194 मिलिमीटर पाऊस
कोयना धरणात प्रतिसेकंद 41 हजार क्युसेक्सने आवक सुरू
कोयना धरणात 46.76 टीएमसी पाणीसाठा
शुक्रवार आणि शनिवारी 24 तासात मुंबई उपनगरात 203.7 मिलिलिटर पावसाची नोंद करण्यात आलीये तर मुंबई शहरात 103.3 मिलीलिटर पाऊस झाल्याचे मागील 24 तासात समोर आलाय. या पावसाळ्यातील 24 तासात पडलेल्या पावसाची ही सर्वाधिक नोंद आहे. तर मागील 9 वर्षात जुलै महिन्यात पडलेल्या पावसाचा विचार केला तर ही 24 तासात सर्वाधिक पडलेल्या पावसाची आकडेवारी तिसऱ्या क्रमांकावर आहे. रविवारी सुद्धा अश्याच प्रकारच्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे
वाशिम जिल्ह्यात गेल्या 48 तासात झालेल्या पावसाने कारंजा आणि मानोरा तालुक्यातील नदी काठच्या गावासह सखल भागातील नागरिकांचा जनजीवन विस्कळीत झालं होतं कारंजा तालुक्यातील22 गावाला पुराचा फटका बसला तर मानोरा तालुक्यातील 25 गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसला या मध्ये शेतीच मोठया प्रमाणात नुकसान झालं असून शेकडो एकर शेती ही पीक पेरणी योग्य राहिली नसल्याचं चित्र आहे मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील हे आणि पालकमंत्री संजय राठोड हे आज वाशिम जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा आढावा घेन्यासाठी जिल्हा दौऱ्यावर आहेत
पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीला
कल्याण रेल्वे स्थानकातील रुळावर पाणी साचण्यास सुरुवात
रेल्वे वाहतुक मंदावली... रेल्वे वाहतूक पंधरा ते वीस मिनिटे उशिराने
कल्याण रेल्वे स्थानक परिसरात ९० मिमी पाऊस
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात दोन व्यक्ती पुराच्या पाण्याठवाहून गेल्यात.
एकलारा बानोदा गावाजवळून वाहणाऱ्या नदीत दोन व्यक्ती वाहून गेल्यात.
संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्याचा संपर्क तुटला.
संग्रामपूर तालुक्यात 26 गावात पाणी शिरलं
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात सकाळपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे केदार नदीचं पाणी बावनबिरजवळ असलेल्या इंदिरा गांधी विद्यालयात शिरल्याने शाळकरी विद्यार्थ्यांना गावातील नागरिकांनी सुरक्षित काढल. सध्याही या परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे तर शेतीच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे
वसई : मुसळधार पावसात वसई विरार शहरात तीन जणांचा पाण्यात बुडून, तर एकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे.
गुरुवारी दोन आणि शुक्रवारी दोन घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.
मिळलेल्या माहितीनुसार, वसई विरार शहरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील रस्ते पूर्णपणे जलमय झाले आहेत.
वसई : मुसळधार पावसात वसई विरार शहरात तीन जणांचा पाण्यात बुडून, तर एकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे.
गुरुवारी दोन आणि शुक्रवारी दोन घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.
मिळलेल्या माहितीनुसार, वसई विरार शहरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील रस्ते पूर्णपणे जलमय झाले आहेत.
मुसळधार पावसामुळे भिवंडीत पाणीच पाणी
भिवंडी शहरातील भाजी मार्केट मध्ये चार फुटापर्यंत साचले पाणी
अनेकांची भाजी गेली वाहून तर अनेक जण भाजी वाचवण्यात व्यस्त
परिसरातील शेकडो दुकानात शिरले पाणी
दरवर्षी असाच चित्र असल्याने प्रशासनावर संताप
Goa Rain : गोव्यात देखील मागील २४ तासात धुवांधार पाऊस
सॅनक्युलिम परिसरात अतिमुसळधार पाऊस, मागील २४ तासात १७१.६ मिमी पावसाची नोंद
मापुसात १३३ मिमी तर पणजी देखील ९८ मिमी पाऊस
Rain News : वसई विरार आणि नालासोपारा आज चौथ्या दिवशी ही मुख्य रस्ते पाण्याखाली गेले आहेत.
पूर्ण शहरात साचलेल्या पाण्याने नागरिकांची दयनीय अवस्था झाली आहे.
नालासोपारा पूर्व सेन्ट्रल पार्क, तुलिंज,आचोळे रोड, निलेमोरे गाव, छेडा नगर, सोपारा, विरार आगाशी, बोलींज स्टेशन रस्ता, वसई मुख्य रस्ता, समता नगर हे सर्व रस्ते आजही पाण्याखाली गेले आहेत.
नागरिक हैराण झाले आहेत. आजही रेड अलर्ट असल्याने आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीला आजही ऑरेंज अर्लट देण्यात आलाय. मुंबई सकाळपासून पावसानं उसंत घेतली असली तरी दुपारी 2:47 मिनिटांनी 4.21 मीटरची भरती अपेक्षित आहे. त्यामुळे किनापट्टीपासून दूर राहण्याच्या सूचना जारी करण्यात आल्यात. त्याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईच्या सर्व समुद्र किना-यांनर पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय. मुंबईतील सर्वात प्रसिद्ध गेट वे ऑफ इंडिया परिसरातही एरव्हीपेक्षा थोडा जास्त बंदोबस्त लावण्यात आला आहे. पर्यटकांसाठी बंद करण्यात आलाय. जेणेकरून दिवसा भरतीच्यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये.
सह्याद्रीच्या खोऱ्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील दोन पुल पाण्याखाली. वसोली पुलावरून पाणी जात आल्याने वसोली, शिवापूर, उपवडे, साकीर्डे गावचा संपर्क तुटला तर फुटब्रिज हळदीचे नेरुर पुलावर पाणी आल्याने फुटब्रिज गावाशी संपर्क तुटला
मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे यवतमाळ शहरातील पिंपळगाव, लोहारा, अंजनीय, सोसायटी, वडगाव, तलाव फाईल, महानंदा नगर या भागामध्ये पावसाचे पाणी साचून अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले
Bhiwandi Rain : भिवंडी शहरात पावसाचा हाहाकार
भिवंडीतील शेकडो दुकानं पुन्हा पाण्यात
भिवंडी शहरातील भाजी मार्केट मंडई तीन बत्ती परिसरातील दीडशे ते दोनशे दुकान पाण्यात
चार ते पाच फुटांपर्यंत परिसरात साचले पाणी
दुकानदारांचे साहित्य नुकसान
परिसरातील अनेक वाहन पाण्याखाली
Satara Rain : कोयना, महाबळेश्वर परिसरातील पाऊस मंदावला
कोयनेत 113 मिलिमीटर पावसाची नोंद तर
महाबळेश्वर परिसरात 127 मिलिमीटर पावसाची नोंद
कोयना धरणात 27 हजार प्रतिसेकंद पाण्याची आवक सुरु
105 टीएमसी पाणी साठा असलेल्या धरणात 43.14 टीएमसी पाणीसाठा
अतिवृष्टीचा धोका लक्षात घेता विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यात आज शाळा-महाविद्यालयांना सुट्टी प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली ... चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ , वाशीम आणि गोंदिया जिल्ह्याला हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे ... सर्वच जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहत आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे .. आपत्कालीन परिस्थिती व अनुचित घटना टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एसडीआरफ च्या सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कुर्ला हार्बर मार्ग सुरळीत सुरु आहे, मात्र लोकल 15 ते 20 मिनिटं उशिराने धावत आहेत.
कुर्ल्यापुढे पाणी भरल्याने वाहतूक दुपारी 3 ते 4 या वेळेत बंद होती . कुर्ला रेल्वे स्थानकावरचं गर्दीचं चित्र देखील ओसरलं आहे.
Andheri Subway: अंधेरी सबवे येथे तीन फूट पाणी साचल्यामुळे सबवे वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
Gadchiroli Rain : दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आणि सिरोंचा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. 11 लहान मार्ग बंद झाले आहेत. काही तासांच्या विश्रांतीनंतर परत जिल्ह्यात पावसाचा जोर वाढायला सुरुवात.. हवामान खात्याने जिल्ह्यात आज हेलो अलर्ट जारी केला होता
बंद झालेल्या रस्त्यांची माहिती
---
1. सिडकोंडा -झिंगानूर (स्थानिक नाला)
2. कोत्तापल्ली र. - पोचमपल्ली (स्थानिक नाला)
3. आसरली - मुतापुर- सोमणूर (स्थानिक नाला)
4. मौशीखांब - अमीर्झा (स्थानिक नाला)
5. साखरा - चूरचूरा (स्थानिक नाला)
6. कूंभी - चांदाळा (स्थानिक नाला)
7. रानमूल - माडेमूल (स्थानिक नाला)
8. आलापल्ली- सिरोंचा रा.म.मा (कासरपल्ली नाला)
9. कान्होली -बोरी-गणपूर (कळमगाव नाला)
10. चामोर्शी- कळमगांव (स्थानिक नाला)
11. चांभार्डा- अमिर्झा (पाल नाला)
पंचगंगा नदीची वाटचाल इशारा पातळीकडे सुरू झाली आहे. सध्या पंचगंगा नदी ही 35 फुटांवरून वाहत आहे. तर जिल्ह्यातील 70 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला असून धरणांमध्ये देखील पाण्याची आवक वाढली आहे.
vasai virar Rain : सलग दोन दिवस पावसाने धुवाधार बॅटिंग वसई विरार क्षेञात केल्यानंतर संपूर्ण शहरातील मुख्य रस्ते, मोकळे भुखंड, तलाव क्षेञ ओव्हरफ्लो झाले होते. यात लोकांनी टाकलेला कचरा परत निसर्गाने मानवाला साभार परत केलेला दिसून आला आहे. वसईच्या एव्हरशाईन सिटी रस्त्याच्या कडेला कच-याचा खच पडलेला दिसून येत आहे. या मोकळ्या भुखंडावर वर्षभरात नागरीकांनी मोठ्या प्रमाणात घरातील कचरा टाकला होता. यंदाच्या दोन दिवसाच्या या पावसात हा मोकळा भुखंड तुडुंब भरल्याने पावसाच्या त्या प्रवाहात सर्व कचरा परत रस्त्याच्या कडेला आला आहे. यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक, चप्पल, थरमाकॉल इत्यादी टाकावू वस्तू आहेत. आता हा कचरा उचळण्याच मोठं आहवान पालिकेतील सफाई कर्मचा-यासमोर असणार आहे.
Nanded Rain : नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात पावसाने थैमान घातलंय, तालुक्यातील तारदरवाडी येथील तलाव फुटला असून त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील येवती , पाळा आणि तुपदाळ गावाचा संपर्क तुटला असून अनेक घरांसह दुकानात पाणी शिरलंय. त्यामुळे मुखेड तालुक्यात मोठे नुकसान झालंय.
वसईहून वसई फाटा महामार्गाकडे जाणारा एव्हरशाईन रोड हा मुख्य रस्ता तिसऱ्या दिवशी ही पाण्याखालीच आहे.
रात्रभर रिमझिम पावसासह अधूनमधून जोरदार पाऊस पडला आहे.
गुडगाभर पाणी साचल्याने रस्त्याला तलावाचे स्वरूप आले आहे.
गुडगाभर पाण्यातून मार्ग काढताना वाहनधारक हैराण झाले असून, वाहन ही रस्त्यात बंद पडले जात आहेत
हीच परिस्थिती वसई, विरार, नालासोपाऱ्यात आहे. विरार पश्चिम विवा कॉलेज रस्ता, आगाशी स्टेशन रोड रस्ता, नालासोपारा सेन्ट्रल पार्क, स्टेशन रोड, आचोळा, वसई सनसिटी, वसई मुख्य रस्ता, एव्हरसाईन रस्ता हे तिसऱ्या दिवशी ही पाण्याखालीच गेलेले आहे
समुद्राला तीन दिवसांपासून भरती असल्याने शहरातील नाले तुडुंब भरले आहेत, समुद्राला जाणारे पाणी रिव्हर्स मारत असल्याने पाणी उतरत नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
संपुर्ण कोकणात आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नद्या दुथडी भरुन वाहत असून तेरेखोल नदी, गदनदी आणि कर्ली नदी इशारा पातळीच्या वर वाहत असल्याने नदिकाढच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर काल मुसळधार पावसामुळे अनेकांना प्रशासनाने रेस्क्यू केलं. रात्री तेरेखोल नदीला पूर आल्याने बांदा बाजारपेठेत पाणी गेल्याने व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली तर कर्ली नदीला पूर आल्याने कुडाळ शहरात रात्री 3 फूट पाणी होत. आता जिल्यातील पाणी ओसरायला सूरावात झाली असली तरी देखील जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Nagpur Rain : नागपुरात सकाळपासूनच दमदार पावसाला सुरुवात झाली आहे.... हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने आधीच नागपूर आणि भंडारा जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट जारी केले आहे... त्यामुळे दमदार पावसाची शक्यता व्यक्त केली जात होती... सकाळपासूनच नागपूर शहरावर काळे ढग दाटून आले असताना साडेसातच्या सुमारास दमदार पावसाला सुरुवात झाली आहे....
Rain : मुसळधार पावसामुळे ब्रम्हपुरी शहरातील अनेक रस्ते जलमय... जवळपास एक तास बरसला मुसळधार पाऊस, अनेक नागरिकांच्या घरात शिरले पावसाचे पाणी, पावसामुळे शेष नगर, विद्या नगर, रविदास चौक, प्रिय दर्शनी इंदिरा गांधी चौक, पटेल नगर, डॉ.गणवीर हॉस्पिटल आदी भागातील रस्ते झाले जलमय, नगर परिषदेच्या ढिसाळ नियोजनामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा स्थानिकांचा आरोप
कोकणासाठी पुढील दोन दिवस धोक्याचे *
पालघर, ठाणे आणि रायगडसाठी पुढील ४८ तासासाठी रेड अलर्ट जारी, पुन्हा काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता
मुंबईसाठी देखील ऑरेंज अलर्ट जारी, काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain : मुंबईसह उपनगरात आज जोरदार पाऊस बरसतो आहे.पावसाची उघडझाप सकाळ पासून सुरु आहे.मात्र अजून मुंबईत कुठे ही सखल भागात पाणी भरलेले नाही.मात्र लोकल व्यवस्थेवर याचा परिणाम दिसून येत आहे.लोकल दहा ते पंधरा मिनिट उशिराने धावत आहे.पावसामुळे काही ऑफिसना सुट्टी देण्यात आली आहे तर काही चाकरमाने कामावर आलेले आहेत.पाऊस असाच सुरु राहिला तर या चाकरमान्यना मोठ्या त्रासाला सामोरे जाऊ लागू शकते
Nagpur Rain : नागपुरातील खापरखेडा औष्णिक वीज केंद्राचा राखेचा बंधारा फुटल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.. बंधाऱ्यातून बाहेर निघालेली राख आणि चिखल अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पसरले.. नुकतंच पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान.. मध्यम पावसातही बंधारा फुटला.. मोठा पाऊस झाला तर काठोकाठ भरलेला आणि लाखो टन राख साठवलेला बंधारा अनेक गावांना उध्वस्त करेल अशी भीती गावकऱ्यांना वाटत आहे.
मुंबईसह कोकण किनारपट्टीला आज अतिदक्षतेचा इशारा देण्यात आलाय. खबरदारीचा उपाय म्हणून शाळांना आज सुट्टी देण्यात आलीय. तसेच गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याच्या सूचनाही करण्यात आल्यात. सध्या मुंबईत पावसानं विश्रांती घेतली असली तरी, दुपारी 1 वाजून 50 मिनिटांनी 4.36 मीटरची भरती असल्यानं किना-यावर मोठ्या लाटा धडकण्याची शक्यता आहे. तसेच त्यावेळी जर पावसानं जोर पकडला तर परिस्थिती बिकट होऊ शकते. त्यामुळे प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून सर्वत्र पोलीस बंदोबस्त लावला आहे.
रायगडच्या इर्शाळवाडी येथे झालेल्या दुर्घटनास्थळी मोफत शीवभोजन थाळी चे पॅकेट वाटप करण्यात येणार राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचा निर्णय
आजूबाजूच्या शिवभोजन केंद्रावरून हे पॅकेट देण्यात येणारे, त्याच बरोबर ५ लिटर रॉकेल देण्यात येणार
१० किलो तांदूळ, १० किलो गहू किंवा त्याचे पीठ, तूरडाळ, तेल, साखर देखील देण्यात येणार
जो पर्यंत परिस्थिती पूर्व पदावर येत नाही तो पर्यंत हा पुरवठा सुरूच राहणार
जिल्हाधिकारी यांना याबाबतचे आदेश तातडीने दिले आहेत.
Rain : वसई विरार नालासोपारा शहरात काल दिवसभर पावसाने हाहाकार माजवला होता. आजही सकाळपासून वसई विरार क्षेञात पावसाने आपली दमदार इनिंग सुरु ठेवली आहे. सखल भागात पाणी साचलेलं आहे. काल शहरातील मुख्य रस्ते जलमय झाले होते. आज ही बहुतेक सखल भागात पाणी साचलेले आहे. तसेच मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक खड्ड्यामुळे संत गतीने सुरु आहे. वसई विरार आणि नालासोपारा येथील पश्चिम रेल्वे सध्या सुरळीत सुरु आहे.
आजही पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट असल्याने, जिल्हाधिका-यांनी येथील सर्व शाळा आणि कॉलेजला सुट्टी दिली आहे.
नालासोपारा पूर्वकेडील स्टेशन रोडवरुन आढावा घेतलाय आमचे प्रतिनीधी प्रभाकर कुडाळकर यांनी
Rain : मुसळधार पावसामुळं ठाण्यातील घोडबंदर रोड पाण्यात बुडाला आहे. दोन्ही बाजूकडून वाहतूक कोंडी आहे.
पालघर जिल्हा पावसाची तालुका निहाय अहवाल दिनांक 20/07/2023 (Yesterday 8am to today 8 am)
1)वसई:- 193 मी मी
2)जव्हार:- 43.66 मी मी
3) विक्रमगड:- 57 मी मी
4) मोखाडा:- 25.10 मी मी
5) वाडा :- 65.5 मी मी
6)डहाणू :- 157.6 मी मी
7) पालघर:- 201.8 मी मी
8) तलासरी :- 119 मी मी
एकूण पाऊस :- 862.76 मी मी
एकुण सरासरी :- 107.84 मी मी
पालघर
पालघर जिल्ह्यात काल मुसळधार पाऊस झाला. पालघर तालुक्यात सर्वाधिक 201 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून वसई तालुक्यात 193 मिलीमीटर तर डहाणू तालुक्यात 157 मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला आहे. जिल्ह्यात सरासरी 107.84 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आले आहे.
पालघर जिल्ह्याला आजही हवामान खात्याने ऑरेंज ॲलर्ट जाहीर केला असून सध्या थोडीशी पावसाने विश्रांती घेतली असली तरीही पावसाचा जोर कायम आहे.
खोपोलीतून 1500 बिस्किटांचे पॅक, 1800 पाण्याच्या बाटल्या, 50 ब्लँकेट, 35 टॉर्च, 25 अधिकारी आणि कर्मचारी, फर्स्ट किट, हातमोजे, बँडेज पाठवण्यात आले आहेत.
मुसळधार पावसाने काही तासापासून विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा ठाण्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे..
-ठाण्यातील मासुंदा तलाव पूर्णपणे जलमय झालेला दिसून येत आहे.
-मासुंदा तलाव परिसरात उड्डाणपुलाखाली सकल भागात पाणी साचलेलं चित्र देखील दिसून येत आहे.
- चाकरमान्यांना पावसामुळे मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
लोणावळ्यात सलग तिसऱ्या दिवशी विक्रमी पाऊस कोसळलाय
-थंड हवेचं ठिकाण असलेल्या लोणावळ्यात यंदाच्या मोसमातील सलग तिसऱ्या दिवशी विक्रमी पाऊस कोसळलाय
-गेल्या 24 तासांत इथं तब्बल 273 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर तीन दिवसांत तब्बल 705 मिमी पाऊस कोसळला आहे
-असं असलं तरी यंदा आत्तापर्यंत झालेला पाऊल हा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमीच आहे
-गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत 2622 मिमी पाऊस बरसला होता, यंदा मात्र केवळ 2017 मिमी इतकाच पाऊस कोसळला आहे.
-ह्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यात शाळेना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे
Palghar Rain : पालघर जिल्ह्यात काल सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली असून जिल्ह्यात विविध ठिकाणी पावसामुळे जनजीवन हे विस्कळीत झाले होते तर याच पावसामुळे जिल्ह्यात आपत्ती जनक परिस्थिती निर्माण झाली असून कंक्राडी नदीला पूर आल्याने डहाणू स्टेशन परिसरामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली तर चिंचणी वाणगाव रोडवर चालकाला वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्याने कार वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली असून या घटनेमध्ये दोघांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले तर एक मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे
Sindhudurg News: सिंधुदुर्ग: जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आल्या आहेत. उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात यल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Palghar News: डहाणूतील इराणी रोड परिसरात पाणी शिरले असून कंक्राडी पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे डहाणू कोसबाड रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे
यंदाच्या मोसमात पहिल्यांदाच हतनूर धरणाचे 41 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले आहेत.
गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे जळगाव जिल्ह्याला झोडपून काढलं आहे. तर दुसरीकडे मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आलेल्या तापी आणि पूर्णा नद्यांना पूर आल्याने हतनूर धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे यंदाच्या मोसमात पहिल्यांदाच हतनूर धरणाचे संपूर्ण 41 दरवाजे हे पूर्णपने उघडण्यात आले आहे.
सद्यस्थितीत हतनुर धरणातून एक लाख 37 हजार 93 क्युसेस एवढा पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तापी नदीच्या काठावरील गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मेळघाटच्या चिखलदरा तालुक्यातील मोरगड येथील दुर्दैवी घटना.
निंबाच्या झाडाचा आश्रय घ्यायला गेले अन झाला घात.
चिखलदरा तालुक्यातील मोरगड येथील एका शेतात शेतकरी आणि शेतमजूर शेतीचे काम करत असताना, विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसात काम करत असताना मोरगड येथील शेतकरी सुनिल मोती भास्कर (वय 32), निलेश बजरंग भास्कर (वय 20) या दोघा काका- पुतण्याच्या अंगावर वीज पडल्याने मृत्यू झाला.
शेतात काम करत असतांना अचानक पाऊस सुरु झाल्याने शेतातील मजूर शेतातच असलेल्या निंबाच्या झाडाचा आश्रय घेण्याकरता गेले असता अचानक वीज पडल्याने सुनिल मोती भास्कर यांचा जागेवरच मृत्यू झाला तर निलेश बजरंग भास्कर यांना उपचारासाठी टेम्बुरसोंडा येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला तर या शेतातच काम करणारे ललीता राजाराम जाम्बेकर (45) आरती सोमेश जम्बेकर (20) पार्वती राजाराम भारकर (45) जानकी किशोर कास्टेकर (24) सविता चान्डेकर (28) होमपती मेटकर (55) बजरंग भास्कर (55) मिना बजरंग भास्कर (45) हे जखमी झाले आहे.
चिपळूणमध्ये गेल्या तासाभरापासून पावसाचा जोर आहे. तो कमी झालेला नाही यासाठी चिपळूण नगर परिषद आपत्ती व्यवस्थापन अलर्ट मोडवरती आलेला आहे.
भिवंडीत रात्रीपासून होत असलेला पावसामुळे कामवारी नदीची पातळी वाढली
कामारी नदीने धोक्याची पातळी ओलांडली
नदीकाठी असलेल्या वस्त्यांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
नदी प्रवाहात जाण्यास सक्त मनाई
जागोजागी महापालिका कर्मचारी व पोलीस तसेच आपत्कालीन व्यवस्था तैनात
पावसाचा जोर कायम राहिल्यास परिस्थिती अजूनही बिकट होण्याची शक्यता
बदलापुरात पडणाऱ्या मुसळधार पावसाचा दणका मध्य रेल्वेला बसला असून, बदलापूर रेल्वे स्थानकातून एकही रेल्वे मुंबईच्या दिशेने रवाना होणार नाही अशी सूचना प्राप्त झाल्या नंतर, फलाट क्रमांक एक वर मुंबई साठी जाणाऱ्या लोकल मध्ये, उपचारासाठी सायन रुग्णालयात जाणाऱ्या महिलेला याचा फटका बसला असून, रुग्णालयात दाखल होण्यासाठी निघालेल्या या महिलेला आता पुन्हा घरी माघारी फिरावं लागत आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय शर्मा यांनी
पुण्यात मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर वाहतुक ठप्प. तीन किलोमीटर वाहनांच्या रांगा
- राष्ट्रीय महामार्गावर वाहतुक ठप्प, तीन ते चार किलोमीटर लागल्या, वाहनांच्या रांगा,मुठा नदी पुल परिसरात पडले मोठं मोठे खड्डे
- मुंबई बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर वडगाव बुद्रुक येथील मुठा नदी पुल परिसरात रस्त्यावर पडलेल्या मोठं मोठ्या खड्ड्यांमुळे वाहतुक व्यवस्था ठप्प झालेली आहे. नदी पुला पासून नविन कात्रज बोगद्या पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. यामुळे वाहन चालक,नागरिक,कामगार,हैराण झाले आहेत.
- वडगाव, धायरी, नऱ्हे,आंबेगाव परिसरातील सर्व सेवा रस्ते वाहतुक कोंडी मुळे ठप्प झाले आहेत.
Rain Updates: मागील 3 तासांत कल्याण, डोंबिवली परिसरात धुंवाधार पाऊस
विठ्ठलवाडी परिसरात मागील 3 तासांत 57 मिमी पाऊस तर कल्याण शहरात 35 मिमी पावसाची नोंद
तिकडे, डोंबिवली परिसरात देखील मागील 3 तासांत 49 मिमी पावसाची नोंद
आज दिवसभर पावसाचा जोर कायम राहणार, ठाणे जिल्ह्यासाठी आॅरेंज अलर्ट, काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा
Thane News: ठाणे शहरात मध्यरात्री पासून मुसळधार पाऊस, मुसळधार पावसामुळे ठाण्यातील सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात.
वंदना बस डेपो भागांत साचले पाणी
पालिकेच्या माध्यमातून पाण्याचा निचरा करण्याचे प्रयत्न सुरू
ठाण्यात पावसाचा जोर कायम, वादळी वाऱ्यासह येणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोलमडून पडण्याच्या घटना
पोखरण रोडवरील वसंत विहार, कोकणी पाडा, लोकमान्य नगर आणि तीन हात नाका येथे झाड पडून दुचाकी आणि चार चाकी गाड्यांवर झाड पडल्यानं गाड्यांच मोठं नुकसान
सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही, सकाळपासून देखील संततधार सुरूच, चाकरमान्यांची होतेय तारांबळ
बदलापूर रेल्वे स्थानकावर रेल्वे ट्रकवर साचला पाणी, मध्ये रेल्वे ची वाहतूक विस्कळीत, मध्य रेल्वेची वाहतूक साधारण अर्धा तास उशिराने
Breaking News : मध्य रेल्वेची वाहतूक बंद...
अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान रेल्वे रुळांवर पाणी आल्याने वाहतूक बंद...
पनवेल-बेलापूर दरम्यान वाहतूक ठप्प
पावसाचा मध्य आणि हार्बर रेल्वेला मोठा फटका
अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात काही गावात ढगफुटी सारखं संततदार पावसाच्या हजेरीने शेतीचे मोठे नुकसान..
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाघोडा, बेलोरा, धामक, येवती, सुलतानपूर, शेलू खंडाळा, रोहना, जावरा, मुंडवाडा, पळसमंडळ, गोळेगाव, खानापूर येथे मंगळवारी रात्री सुरू झालेल्या संततदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले असून यामुळे शेतातील पिके वाहून गेली तर काही शेतातील खरडून गेल्याने शेतकरी पूर्णतः हवालदिल झाला आहे. जमीननिवरील पिके पाण्याखाली आली असून यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे..
भिवंडीत रात्रीपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे भिवंडी पुन्हा बुडाली
भिवंडी शहरातील तीन बत्ती, मंडई ,बाजारपेठ, भाजी मार्केट परिसरात तीन ते चार फुटांपर्यंत पाणी
दीडशे ते दोनशे दुकान पाण्यात बुडाले
भाजी विक्रेत्यांची भाजी गेली वाहून
दुकानात पाणी शिरल्याने दुकानदाराचा साहित्य वाचवण्याचा प्रयत्न
नागरिकांचा महानगरपालिका वर संताप
वाशीमच्या कारंजा तालुक्यात रात्री झालेल्या मुसळधार पावसाने पोहा गावालगत असलेल्या केदार नदी सह उमा नदीला पूर आलाय तर गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रा जवळ आणि गावातील सखल भागात पुराचं पाणी शिरलय अद्याप नुकसानी बाबत माहिती समोर आली नाही.
बदलापूरमध्ये पुन्हा पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता
पावसाचा जोर कायम राहिल्यास पूर परिस्थिती
उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ
सकाळी 9 वाजता पाणी पातळी 16.50 मीटर
नदीची इशारा पातळी 16.5 मीटर धोक्याची पातळी 17.5 मीटर
नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज
हेंद्रपाडा, मांजर्ली, वालीवली सोनिवली परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पूर परिस्थितीसाठी प्रशासन सज्ज
Nashik Rain Update : गेल्या आठ ते दहा दिवसांपासून नाशिकसह जिल्ह्यात रिमझिम पाऊस बरसतो आहे, मात्र दमदार पाऊस नसल्याने अनेक नद्या आज दुथडी भरून वाहत नसल्याचे चित्र आहे. ढगाळ हवामानासह रिमझिम पाऊस असल्याने दमदार पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. आजही सकाळपासूनच ढगाळ हवामान असून पावसाची रिपरिप सुरु आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्याला दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणुन ओळख असलेल्या आंबोली घाटात दरड कोसळली आहे. आंबोली घाटात पावसाळ्यापूर्वी दरड कोसळू नये म्हणुन जाळी बसवल्यात आल्या होत्या. तरी देखील मुसळधार पावसामुळे आंबोली घाटात दरड कोसळली आहे. दरड कोसळलेल्या ठिकाणी घाटातील वाहतूक संथ गतीने सुरू असून वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही. मात्र वाहन चालकांनी वाहने सावकाश चालवावी असं आव्हाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
वाशीमच्या मंगरुळपीर तालुक्यात काल रात्रीपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे वनोजा येथील लेंडी नाल्याला पुर आल्याने वनोजा गाव आणि तांडा, महाविद्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, वनोजा ते पिंजर मार्गाचा संपर्क तुटला आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांचे शेतीचे ही नुकसान होण्याची शक्यता आहे
जळगाव जामोद तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर.
झाडेगाव गावात अनेकांच्या घरात शिरल पाणी.
गावात दोन ते तीन फूट पाणी.
झाडेगाव जवळ असलेल्या नाल्याला पुर आल्याने नांदुरा जळगाव जामोद बुऱ्हाणपूर मार्ग पाण्याखाली.
तीन तासांपासून वाहतूक ठप्प
जळगाव जामोद तालुक्यात रात्री झालेल्या मुसळधार पावसाने जळगाव जामोद नांदुरा मार्गावरील झाडेगाव नजिक असलेल्या नाल्याला मोठा पूर आल्याने पुलावरून पाणी असल्याने नांदुरा - जळगाव जामोद - बुऱ्हाणपूर मार्ग ठप्प. परिसरात सध्याही मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या तीन तासांपासून नांदुरा - जळगाव जामोद - बुऱ्हाणपूर मार्ग ठप्प.
Ratangiri rain : चिपळूण शहरातील वाहणारे वशिष्ठी नदीचे पाणी नदी पात्र बाहेर येऊन काही सखल भागामध्ये शिरले आहे. त्यामुळे तेथील जीवन विस्कळीत झालेला आहे.चिपळूण दोन दिवस पावसाने चांगलाच जोर धरला आहे.त्यामुळे वाशिष्टी नदीचे पात्र भरून ओसंडून वाहत आहे.या नदीपत्राचे पाणी चिपळूणच्या काही सकल भागामध्ये शिरले आहे.त्यामुळे तेथील प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे..तर तालुक्यातील शिरगाव मधीलनदी वशिष्ठीला मिळणारी नदी हीसुद्धा सध्या ओसांडून वाहत आहे.ही चिपळूण-कराड रस्त्याच्या बाजूला असल्याने तेथील पाणी रस्त्यावर आल्यामुळे तेथील वाहतूक काही काळ ठप्प झाली आहे.
Parbhani : तब्बल दीड महिना परभणी जिल्हा कोरडा राहिल्यानंतर मागच्या तीन दिवसांपासून परभणी जिल्ह्यामध्ये दमदार पावसाने हजेरी लावलीय.संतातधार पडत असलेल्या या पावसाने एकीकडे शेतकऱ्यांना समाधानी केलंय ज्याने जिल्ह्यातील रखडलेल्या पेरण्या मार्गी लागल्या असुन पेरणीची टक्केवारी 82% पर्यंत गेलीय.दुसरीकडे आता प्रकल्पांमधील पाणी साठ्यात ही वाढ होताना दिसत आहे..जिल्ह्यात 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने येलदरीत 1.70% तर लोअर दुधनात 1.43% पाणी वाढ झालीय..मागच्या 24 तासात जिल्ह्यात 63 मिमी पाऊस झालाय..एकुणच दीड महिना वाट पाहायला लावणाऱ्या पावसाने मागच्या 3 दिवसात सगळी कसर भरून काढलीय..
सतत पडत असलेल्या पावसामुळे नेरळ जवळ उल्हास नदीवरचा पूल पाण्याखाली
नेरळ कळंब रोड वरिल उल्हास नदीवरचा पूल गेला पाण्याखाली
नेरळ ते कळंब जाणारी वाहतूक बंद
साधारण 25 ते 30 गावांचा संपर्क तुटला
सतत पडत असलेल्या पावसामुळे बदलापूर पश्चिम स्टेशन रस्ता पाण्याखाली
स्टेशन रस्त्यावर वाहनांची मोठी वाहतूक कोंडी
सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रचंड हाल
बदलापूर शहराच्या अनेक सखल भागात साचला पाणी
Buldhana Rain : पश्चिम विदर्भातील जीवन वहिनी समजल्या जाणाऱ्या पूर्णा नदीला अकोला आणि अमरावती जिल्ह्यात झालेल्या पावसाने मोठा पूर आला आहे. पुर्णा नदीच्या खोऱ्यात गेल्या तीन दिवसंपासून होत असलेल्या पावसाने पुर्णा नदी आता दुथडी भरून वाहत असल्याने परिसरात आनंदाचं वातावरण बघायला मिळत आहे.
Buldhana Rain : पश्चिम विदर्भातील जीवन वहिनी समजल्या जाणाऱ्या पूर्णा नदीला अकोला आणि अमरावती जिल्ह्यात झालेल्या पावसाने मोठा पूर आला आहे. पुर्णा नदीच्या खोऱ्यात गेल्या तीन दिवसंपासून होत असलेल्या पावसाने पुर्णा नदी आता दुथडी भरून वाहत असल्याने परिसरात आनंदाचं वातावरण बघायला मिळत आहे.
Bhandara Rain : हवामान विभागानं भंडाऱ्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट घोषित केला असून पहाटेपासून जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. विजांच्या कडकडाटासह हजेरी लावलेल्या पावसात वीज पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज आपत्ती व्यवस्थापनानं वर्तविला आहे. तर, नदी काठावरील नागरिकांनी सतर्क राहावे, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
Hingoli Rain : रात्रभर हिंगोली जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मागील दीड महिन्यापासून शेतकरी अशाच जोरदार पावसाची वाट पाहत होते. काल दिवसभर पावसाने हजेरी लावल्यानंतर सायंकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात वाढला होता हिंगोली जिल्ह्यातील सर्व भागांमध्ये या जोरदार पावसाने हजेरी लावली आहे जोरदार झालेल्या पावसामुळे हिंगोली च्या गोरेगाव येथील अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले. हे पाणी बाहेर काढताना नागरिकांची वाताहात झाली तर रस्त्यावरही पाणीच पाणी झाले होते.
मुंबई आणि ठाण्यात आज आणि उद्या अतिमुसळधार पावसाचा इशारा
मुंबईसाठी आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट जारी, पुढील दोन्ही दिवस १०० मिमीहून अधिक पावसाचा अंदाज
तळ कोकणात देखील अतिमुसळधार पावसाचा इशारा, सोबतच मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता
विदर्भात देखील विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज, तर चंद्रपूर आणि गडचिरोलीसाठी ऑरेंज अलर्ट जारी
विदर्भात पुढील दोन दिवसांसाठी इम्पॅक्ट वॉर्निंग जारी
गडचिरोली पुलावरून पाणी वाहताना गाडी घेऊन जाणं पडलं महागात, चालकासह इतर दोन जनासह गाडी गेली पाण्यात...सुदैवाने तिघांचा जीव वाचला.. सुरजागड लोह प्रकल्प भागात असलेल्या एका छोट्या नाल्यावरून पाणी वाहत होते त्यामुळे दोन्ही बाजूला गाड्या उभ्या आहेत मात्र महिंद्रा पीकअप गाडी त्या पुराच्या पाण्याच्या प्रवाहातून गाडी काढण्याचा प्रयत्न करत होता आणि मध्य भागी गेल्यावर पाण्याचा प्रचंड प्रवाह त्या वाहनाला पुढे जाऊ दिल नाही आणि गाडी सरळ पाण्यात गेली ... गाडीत असणारे प्रसंग साधत गाडीतून उडी मारून बाहेर पडले त्यामुळे तिघांचा ही जीव वाचला... नेमकी ही गाडी कुणाची आहे हे कळू शकेल नाही मात्र सुदैवाने तिघांचाही जीव वाचला..हा मार्ग सुरजागड लोह प्रकल्पाकडे ही जातो त्यामुळे ह्या मार्गावर प्रकल्पातून कच्चा माल वाहतूक करणाऱ्या ट्रक देखील वाहतूक करत असतात हा मार्ग बंद पडल्याने प्रकल्पातून कच्चा माल वाहतूक करण्यासाठी ठप्प झाली आहे
Chandrapur Rain : चंद्रपुर शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. दीड महिना उलटून गेल्यावर देखील चंद्रपूर जिल्ह्यात आहे पावसाचा बॅकलॉग, जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ 25 टक्के पावसाची नोंद, मागील वर्षी आजच्या दिवशी जिल्ह्यात 46% पडला होता पाऊस, आजचा पाऊस जिल्ह्यात सर्व दूर पडत असल्याने पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता, खोळंबलेल्या पेरण्यांना देखील मिळू शकेल गती
Palghar Rain : पालघर जिल्ह्यात सर्वदूर पावसाने पहाटेपासून जोरदार हजेरी लावली असून ह्याच्याच परिणाम म्हणून ठीक ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आहे. मुंबई आमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर नायगाव जवळ रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे आणि पाणी निचरा होण्यासाठी कोणतेही उपाय योजना न केल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून वाहतूक कोंडी व्हायला सुरुवात झाली आहे.
Gadchiroli Rain : गडचिरोली जिल्ह्यात रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे पर्लकोटा नदीला पूर आला आहे. त्यामुळं आलपल्ली- भामरागड मार्ग बंद झाला आहे तर काही छोट्या नाल्यांना पूर आल्याने इतर 7 छोटे मार्ग बंद. जिल्ह्यात एकूण 8 मार्ग बंद झाले आहेत. दक्षिण गडचिरोली भागात पाऊसाचा जोर अधिक आल्याने या भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे..
पूरामुळे बंद झालेल्या मार्गांची स्थिती
1. अहेरी ते मुलचेरा मार्ग (गोमनी नाला)
2. खुदरामपल्ली आणि कोपरअल्ली मार्ग
3. एटापल्ली नाक्या समोरील मार्ग
4. बोलेपल्ली मार्ग (गेदा जवळ)
5. पाविमुरंडा च्या जवळील नाल्यावरील मार्ग
6. चामोर्शी ते माक्केपाली मार्ग (मछली नाला)
7. पोटेगाव च्या समोरील मार्ग
8. आलापल्ली ते भामरागड राष्ट्रिय महामार्ग (पर्लकोटा नदी)
कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक विस्कळित. आटगाव स्थानकात मालगाडीचे इंजिन फेल.
कसाराकडे जाणारी लोकल आसनगाव स्थानकांत रद्द
मध्य रेल्वेची वाहतूक 20 ते 25 मिनिट उशिराने
Thane Rain : ठाण्यातील वंदना डेपो परिसरात पुन्हा सकल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे.
पुण्यातील थंड हवेचं ठिकाण असलेल्या लोणावळ्यात यंदाच्या मोसमातील विक्रमी पाऊस कोसळला आहे. गेल्या 24 तासांत इथं तब्बल 214 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. असं असलं तर यंदा आत्तापर्यंत झालेला पाऊल हा गेल्या वर्षीच्या तुलनेत खूपच कमी आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत 2515 मिमी पाऊस बरसला होता, यंदा मात्र केवळ 1524 मिमी इतकाच पाऊस कोसळला आहे. जी चिंतेची बाब आहे.
Thane Rain : आज पहाटे पासून शहरात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.गेल्या दोन दिवसांपासून गायब असलेल्या पावसाने आज पुन्हा एकदा हजेरी लावलेली आहे. आणि पाऊस रिमझिम सुरूच आहे.आज दिवसभर पावसाची संततधार सुरूच राहणार आहे.दुपार नंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
Mumbai Rain : मुंबईत मध्य रात्रीपासून अधून-मधून सुरू असलेल्या मुसळाधार पावसामुळं सांताक्रूझ मुंबई विमानतळाच्या बाहेर एक ते दीड फूट पाणी भरले आहे.
उल्हासनगर अंबरनाथ बदलापूरमध्ये मुसळधार पाऊस
रात्रीपासूनच शहरात पावसाची जोरदार बॅटिंग
काही दिवसांपासून पावसाने मारली होती दांडी
अनेक सकल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात
Gondia Rain : गेल्या 24 तासांत गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेत. गोंदिया शहराच्या जवळून वाहणाऱ्या पांगोली नदीच्या पाणीपत्रात देखील वाढ झाली आहे. या नदीवर बारब्रिक्स कंपनीच्या वतीने पुलाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे पर्यायी पूल तयार करण्यात आला आहे. मात्र हा पर्यायी पूल कमी उंचीचा असल्याने कुठल्याही क्षणी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती, त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून या मार्गावरून होणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. विशेष म्हणजे यावर्षी दुसऱ्यांदा हा पूल बंद करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 47 मिलिमीटर पावसाची नोंद... जिल्ह्यातील 5 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी ची नोंद, सावली तालुक्यात 143 मिमी, नागभीड तालुक्यात 123 मिमी, ब्रम्हपुरी 85 मिमी, सिंदेवाही तालुक्यात 70 मिमी तर पोंभूरणा तालुक्यात 66 मिमी पावसाची नोंद, जिल्ह्यातील अनेक भागात नदी-नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ. शंकरपूर येथून जवळच असलेले पांजरेपार गावामध्ये पूर
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील पांजरेपार गावात शिरलं पुराचं पाणी. काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे गावाशेजारी असलेल्या नाल्याला आला पूर, त्यामुळे आज पहाटे गावाला पडला पुराचा वेढा, गावातील 3-4 घरांमध्ये शिरलं पाणी, पावसाचा जोर उतरल्याने पुराचं पाणी उतरायला सुरुवात, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश वारजूरकर यांनी गावाची पाहणी केली.
Rain : वसई विरार नालासोपाऱ्यात आज सकाळपासून जोरदार पाऊस पडत आहे.
सकाळी 8 वाजता अचानक जोरदार पाऊस सुरू झाल्याने चाकरमण्याची चांगलीच तारांमबाल उडाली.
रात्रीपासूनच रिमझिम पाऊस असून, आज दिवसभर जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आज सकाळ च्या वेळेत विरार ते चर्चगेट आणि चर्चगेट ते विरार चालणारी लोकल व्यवस्था सुरळीत सुरू आहे
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडत असलेल्या पावसामुळे वेंगुर्ले कोल्हापूर राज्य मार्गावरील होडावडा पुल पाण्याखाली गेला आहे. पुलावरून पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक सुमारे दोन तास ठप्प झाली होती. त्यामुळे होडावडा आणि तळवडा या गावाचा संपर्क तुटला होता. आता पाणी ओसरल असून वाहतूक सुरळीत सुरू आहे. जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून पुढील पाच दिवस सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची हावामन विभागाने शक्यता वर्तवली आहे.
विरार : वसई विरार नालासोपाऱ्यात रिमझिम पाऊस सुरू
आज सकाळ पासूनच रिमझिम पावसाला सुरवात झाली आहे
काही दिवसांच्या उघाडी नंतर आज पुन्हा पाऊस सुरू झाल्याने हवेत गारवा पसरला आहे
ग्रामीण भागात भात पेरणीला सुरवात झाली आहे
वसई विरार शहरात कुठेही पाणी साचले नसून सर्व वाहतूक सुरळीत सुरू आहे
Mumbai Rain : मुंबईसह पश्चिम उपनगरात आज सकाळपासून मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे. पश्चिम उपनगरात अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव,मालाड, कांदिवली,बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रुज, वांद्रे या परिसरात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. तसेच सायन परिसरातही पाऊस सुरु आहे. जर काही वेळा असा जोरदार पाऊस सुरु राहिला तर पश्चिम उपनगरात सखल भागच ठिकाणी पाणी भरायला सुरुवात होईल. दरम्यान, अंधेरी सबवे हा सखल भाग असल्यामुळे सबवे खाली दीड ते दोन फूट पाणी भरल्यामुळे अंधेरी सबवे पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
Mumbai Rain : मुंबईत सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. सखल भागात ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
Rain : जून महिन्याच्या सुरुवातीला बारवी धरणात अवघा 25 टक्के पाणीसाठा होता. जून महिन्याच्या शेवटी पावसाला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत बारवी धरणाच्या पाणी साठ्यात जवळपास 14 टक्के वाढ झाली असून हा पाणीसाठा 39 टक्के इतका झाला आहे. गेल्या वर्षी बारावी धरणात10 जूनपर्यंत 43 टक्के पाणीसाठा होता. यंदा मात्र हा पाणीसाठा 39 टक्के इतकाच आहे.ठाणे जिल्ह्याला रोज पाणीपुरवठा करताना पाटबंधारे विभागाकडून पाण्याची असलेली मागणी सध्या पावसामुळे बंद झाल्याने पाणी साठ्यात वाढ होत आहे.पाऊस असाच पडत राहिल्यास जुलैच्या शेवटी किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात बारावी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची अपेक्षा एमआयडीसीचे अधिकारी व्यक्त करत आहेत.
Bhandra Rain : मागील दोन दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. जुलै महिना सुरु झाल्यानंतरही पावसाने पाहिजे त्या प्रमाणात हजेरी न लावल्याने शेतकरी चिंतातूर झाले होते. मात्र, आता या पावसानं शेती हंगाम जोमानं सुरू झाला आहे. गोंदिया जिल्ह्यातील पुजारीटोला आणि धापेवाडा धरणातून पाण्याचा सातत्याने विसर्ग होत असल्यानं आणि सुरू असलेल्या पावसानं भंडाऱ्याची जीवनदाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैनगंगा नदीचं पात्र आता दुथडी भरून वाहू लागलं आहे. तर वैनगंगेच्या कारधा नदी पात्राच्या छोट्या पुलावरुन वाहतुकीसाठी हा मार्ग भंडारा जिल्हा प्रशासनाने 2016 मध्ये बंद केलेला असतानाही येथून नागरिक प्रवास करीत आहेत.
गोवळकोट रोड ता -चिपळूण येथील आठ मुले तीन बाईक वरून फिरण्यासाठी कुंभार्ली गावातील आशरकोंडा या नदीच्या ठिकाणी आले होते. पैकी दोन मुले पाण्यात उतरली होती. वरच्या बाजूला पाऊस आल्यामुळे झोपडी मध्ये उभी होती उतरलेल्या मुलांचा बचाव बचाव असा आवाज आल्याने ते खाली आले. त्यावेळी दोन्ही मुलं जी पाण्यात होती ती बुडाल्याची त्यांच्या लक्षात आले.
पाण्यात बुडालेली मुलांची नावे
1) आतिक इरफान बेबल वय 16 ते 17 च्या दरम्यान
2) अब्दुल कादिर नौशाद लसाने वय 17 ते 18
दोघे राहणार चिपळूण शहर
स्थानिक पोहणाऱ्या मुलांची टीम आहे. फ्लड लाईट व रशीची व्यवस्था केली आहे.कुंभारली डोहात मुलांचे शोधकार्य चालू आहे
चिपळूण गोवळकोट येथील शालेय आठ विद्यार्थी पोहण्यासाठी कुंभार्लीतील वाशिष्टीच्या वजर नदीत उतरले असता दोघेजण बुडाले.
नदीतील पाण्याच्या भोवऱ्यात आले असता पाण्यात बुडले गेल्याची माहिती.
प्रशासनाकडून शोधकार्य सुरु.
Rain : महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणुन ओळख असलेल्या आंबोलीत विकेंडची सुट्टी असल्यामुळे पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. वर्षा पर्यटनाला पर्यटकांची आंबोलीला नेहमीच पसंती असते. त्यामुळे मोठ्या संख्येने राज्यासहित परराज्यातील पर्यटक आंबोलीत दाखल झाले आहेत. आंबोलीत मुख्य धबधबा, कावळेसाद पॉइंट, हिरण्यकेशी नदीचा उगम, महादेगड पॉइंट, नागरतास धबधबा याठिकाणी पर्यटक गर्दी करू लागले आहेत. आंबोली घाटात लहान मोठे सर्वच धबधबे प्रवाहित झाले असून पर्यटक ठिकठिकाणी थांबून पर्यटनाचा आनंद लुटत आहेत. सध्या आंबोलीत दाट धुक्याची चादर पसरली असून निसर्गाचं वेगळचं रूप पाहायला मिळत असून पर्यटकाना स्वर्गसुख मिळाल्याचा आनंद मिळत आहे.
Ahmednagar : भंडारदरा , मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात धो - धो पाऊस कोसळतोय..पावसाचा जोर कायम असल्याने भंडारदरा धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाली असून धरण ६० टक्के भरलय... तर वाकी तलाव ओव्हरफ्लो झालाय...काही दिवसाच्या विश्रांतीनंतर गेल्या तिन दिवसांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने भंडारदरा , मुळा आणि निळवंडे धरणात पाण्याची मोठी आवक होत आहे.
मुंबई गोवा महामार्गावरच्या परशुराम घाटामध्ये दरड कोसळण्याचे सत्र सुरूच..
दोन दिवस पडत असलेल्या संततदार पावसामुळे चिपळूणजीच्या परशुराम घाटामध्ये आज अर्धा डोंगर खाली आलेला आहे..
या डोंगरासोबत मोठमोठे दगड महामार्गाच्या बाजूला आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात सध्या जेसीबीच्या साह्याने या दगडी बाजूला करण्याचं काम सुरू आहे..
Agriculture News : राज्याच्या काही भागात चांगला पाऊस (Rain) पडत आहे. या पावसामुळं बळीराजाला दिलासा मिळाला आहे. त्यामुळं शेती कामांना वेग आला आहे. खोळंबलेल्या पेरण्या सुरु झाल्या आहेत. नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातही सर्वत्र दमदार पाऊस झाला आहे. समाधानकारक पावसामुळं जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक नदी-नाले प्रवाहित झाले आहेत. त्यामुळं पेरणीच्या कामांना वेगल आला आहे.
Bhandra Rain : गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील काही दिवसांपासून जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. यामुळं गोसीखुर्द धरणाच्या ऊर्ध्व भागातील धापेवाडा बॅरेजचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. परिणामी गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता पुढील काही तासात धरणाचा विसर्ग टप्प्याटप्प्यानं वाढविण्यात येणार आहे. त्यासाठी रात्रीपासून गोसीखुर्द धरणाचे तीन वक्रद्वार अर्धा मिटरनं उघडण्यात आली असून त्यातून सध्या 11656 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. या वर्षीच्या पावसाळ्यात पहिल्यांदा 30 जूनला गोसीखुर्द धरणाचे तीन वक्रद्वार अर्धा मिटरनं उघडून त्यातून 17 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता, त्यानंत आता रात्रीपासून पुन्हा एकदा पाणी सोडण्यात येत आहे. पावसाच्या परिस्थितीनुसार आणखी गेट उघडण्याची शक्यता आहे. त्यामुळं नदी काठांवर राहणारे आणि नदी पात्रातून आवागमन करणाऱ्यांनी काळजी घ्यावी व सतर्क रहावं, असं आवाहन धरण प्रशासनानं केलं आहे.
Rain : राज्यात सर्वत्र मान्सून सक्रिय झाला असला तरी पूर्व विदर्भात अनेक ठिकाणी पावसाने दडी मारलेली आहे. जुलै महिन्याचा पहिला आठवडा उलटला तरी पूर्व विदर्भात म्हणावं तसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात सरासरीपेक्षा 45 टक्के कमी पाऊस झाला आहे. परिणामी विदर्भातील सर्वात मोठ्या वैनगंगा नदीचा गडचिरोली जिल्ह्यातील पात्र अजूनही रिकामाच दिसतो आहे. नदीपात्रात सर्वत्र वाळू साठा दिसत असून पाण्याचे मोजके प्रवाह दिसून येत आहेत.
सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये पावसाची संततधार सुरुये. परिणामी इथला निसर्ग आणखी बहरून गेलाय. तोच निसर्ग धुक्यांमध्ये हरवून जातोय. लोणावळ्यातील टाटा धरण, भुशी धरण, लायन्स पॉईंट ते ऍम्बी व्हॅली हा परिसर पर्यटकांच्या डोळ्याचं पारणं फेडतोय. पर्यटक ही याचा मनसोक्त आनंद घेताना दिसतोय. पण याच धुक्यातून वाट काढताना पर्यटकांना तितकीच कसरत घ्यावी लागत आहे.
satara Rain : महाबळेश्वर पाचगणी वासियांसाठी आनंदाची बातमी
महाबळेश्वर - पाचगणीला पाणी पुरवठा करणारे वेण्णालेक भरले
दोन दिवसाच्या सतत पडणाऱ्या पावसामुळे वेण्णालेक भरले
Pune Rain : पुण्यातील लोणावळ्यात पावसाने पुन्हा एकदा जोर धरलाय. गेल्या चोवीस तासांत इथं तब्बल 108 मिलिमीटर पावसाची नोंद झालीये. गेली चार दिवस लोणावळ्यात पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र कालपासून पावसाने पुन्हा एकदा बॅटिंग करायला सुरुवात केलीये. गेल्या वर्षी पेक्षा यंदा पावसाने उशिरा हजेरी लावलीये. पण आजच्या दिवसापर्यंत 907 मिमी इतका तर यंदा 1067 मिमी इतका पाऊस कोसळला आहे. पावसाने हा जोर धरल्यानं इथल्या वर्षाविहाराचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची ही गर्दी होताना दिसते.
Nashik News : महाराष्ट्रातील राजकारणाला सर्वसामान्य नागरिक वैतागले असून गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहून नागरिक आपल्या भावना व्यक्त करत आहेत. अशातच नाशिकच्या सर्वसामान्य नागरिकाने थेट राष्ट्रपतींना पत्र लिहून पक्षांतर बंदी कायदा कठोर करण्याची विनंती केली आहे. मतदारांच्या मताला काही किंमत आहे का? असा सवाल करत सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, महागाई, मतदारसंघातील अडचणी बाबत आमदारांनी पक्ष सोडल्याचे दिसत नाही नसल्याचा उल्लेखही या पत्रात करण्यात आला आहे.
यवतमाळ शहराला वर्षभर पाणी पुरवठा करणारे निळोणा धरण शंभर टक्के भरले असून यवतमाळकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. हे धरण त्यांच्या क्षमतेच्या 100 टक्के भरून ओव्हर फ्लो झाले आहे. मागील 4 दिवसापासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे हे धरण भरल्याने यवतमाळकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जीवन प्राधिकरनाचे यवतमाळ शहरात 41 हजारावर ग्राहक असून त्यांना दोन दिवस आड पाणी पुरवठा या धरणातून करण्यात येतो. हे धरण ओव्हर फ्लो झाल्याने या यवतमाळकराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
Nashik Rain Update : तीन दिवसांच्या उपडझापनंतर आज पावसाने सकाळपासून हजेरी लावली आहे. नाशिकसह जिल्ह्यातील विविध भागात पावसाचे कमबॅक झाले असून आज सकाळपासून रिपरिप सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिलत असून यंदा काहीअंशी दुबार पेरणीचे संकट टळले आहे. तर दुसरीकडे नाशिककरांच्या पाणी कपातीचे संकटही टळले आहे. राज्यभरात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. मुंबईपासून ते राज्यातील सर्वच भागात पाऊस जोरदार कोसळत असून अनेक भागातील शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा मिळाला आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यातही मागील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांसह नागरिक प्रतीक्षेत होते, अखेर लांबणीवर पडलेल्या पावसाने जोरदार आगमन केले. जूनच्या शेवटच्या आठवड्यात मान्सूनने जोरदार आगमन करत सर्वाना ओलेचिंब केले. त्याचबरोबर अनेक भागातील पेरण्या खोळंबल्या होतंय, त्या पेरण्यांना देखील वेग येऊन आता अनेक भागातील पेरण्यां संपुष्ठात आल्या आहेत.
Mumbai Rain : मुंबईसह उपनगरात सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक पाच ते दहा मिनिटं उशिराने सुरु आहे. तर पश्चिम रेल्वेची वाहतूक दोन ते पाच मिनिटं उशिराने सुरु आहे. दक्षिण मुंबईत सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. दोन्ही बाजूकडील म्हणजे पश्चिम द्रुतगती आणि पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतूक सध्या सुरळीत आहे
Nanded: हिमायतनगरमध्ये पावसाने दिलेल्या हुलकावनीमुळे वरूण राजाला साकड घातले आहे. सरसम येथील महिलांनी ग्रामदेवता असलेल्या महादेवाचा पाण्यात बुडेपर्यंत जलाभिषेक केला.
Nanded: हिमायतनगरमध्ये पावसाने दिलेल्या हुलकावनीमुळे वरूण राजाला साकड घातले आहे. सरसम येथील महिलांनी ग्रामदेवता असलेल्या महादेवाचा पाण्यात बुडेपर्यंत जलाभिषेक केला.
मुंबईतील सुमननगर प्रियदर्शनी पार्कजवळ जमीन खचली आहे. 40 ते 50 मोटरसायकलसह काही कार या खचलेल्या खड्डयात कोसळल्या आहेत.
ही घटना वसंत दादा पाटील इंजिनियर समोरील राहूल नगर दोन येथील SRA बिल्डिंग समोर झाली आहे.
जागा खचल्याने आजूबाजूलाचे बिल्डिंग नागरिकांनी आप आपले घरातून बाहेर आहे.
संपूर्ण बिल्डिंग खाली करण्यात आले आहे व SRA मधील नागरिकांचे काही वाहने खचलेल्या खड्डयात कोसळले आहे.
घटनास्थळीत मुंबई अग्निशामक दल पोलिस कर्मचारीवर्ग उपस्थित आहेत
Mumbai Rain : सकळापासूनच मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस (Rain) सुरु आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी सखोल भागात पाणी साचलं आहे. याचा वाहतुकीवर परिणाम होत आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार मुंबईत (Mumbai) आज पावसाचा ऑरेंज अलर्ट (Orange alert) जारी करण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
Mumbai Rain : अंधेरी सबवे वरील पाणी ओसरलं आहे. त्यानंतर याठिकाणची वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.
Washim Rain : वाशिम जिल्ह्यातला अनेक भागांमध्ये मध्य रात्रीपर्यंत अनेक भागात रिमझिम स्वरूपाचा पाऊस बरसला आहे. त्यामुळं खोळंबलेल्या पेरण्यांना वेग येणार आहे
Mumbai Rain : मुंबईत गेल्या एक तासापासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. अंधेरी सबवेमध्ये गुडघाभर पाणी साचले आहे. सबवे खालून येणारी जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.
Rain : सिंधुदुर्गात दमदार पावसामुळे सावंतवाडीमधील माडखोल धरण भरून वाहत आहे. जिल्ह्यातील लघु धरण प्रकल्प असलेल्या माडखोल धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे. सद्यस्थितीत 1.69 दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा आहे. जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मांडखोल धरण पूर्ण क्षमतेने भरून पाणी धरणाच्या सांडव्यावरून ओसंडून वाहत आहे. अशावेळी सांडव्याच्या तसेच धरण क्षेत्रामध्ये जाऊ नये असे आवाहन सिंधुदुर्ग पाटबंधारे विभागाने केले आहे.
Raigad Rain : तळीये येथील दिलेल्या नवीन घरांचा पाया पहिल्याच पावसात ढासळला आहे. त्यामुळं तेथईल सुरक्षीततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ताबा घेण्यास दरडग्रस्तांचा नकार. रायगड जिल्ह्यात सात जुलैपर्यंत पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र | maharashtra news
- Maharashtra Rain Update : आठवडाभराच्या विश्रांतीनंतर गोंदियात रात्रीपासून दमदार पावसाची हजेरी