= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
शाळेत शिक्षक किंवा विद्यार्थी पॉझिटिव्ह निघाला तरी यापुढे ग्रामीण भागातल्या शाळा बंद करणार नाही : जिल्हाधिकारी सुनील चव्हाण औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आठवी ते बारावी पर्यंतच्या शाळा उद्यापासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पुढील एक आठवड्याची परिस्थिती पाहून पुन्हा पाचवी ते आठवी आणि त्यानंतर पहिली ते पाचवीच्याही शाळा सुरू करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे. यानंतर शाळेमध्ये शिक्षक किंवा विद्यार्थी पॉझिटिव्ह निघाला तर शाळा बंद करणार नसल्याचे देखील त्यांनी सांगितले. जो विद्यार्थी किंवा शिक्षकांना कोरोनाची लागण होईल त्यांना आसोलेट केला जाईल मात्र, शाळा यापुढे बंद करणार नाही असं देखील जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हटले आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा सुरू करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी राज्यातील अनेक ठिकाणी आजपासून शाळा सुरू झाल्या आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा धोका कमी झाला आहे अशा जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याबाबत अध्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे ज्या भागात कोरोनाच्या प्रादुर्भाव नाही अश्या भागात शाळा सुरू करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती आग्रही आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील काही शाळा व्यवस्थापन समितीनी जिल्हाधिकाऱ्याना निवेदन देत शाळा लवकर सुरू करण्याची विनंती केली आहे. ग्रामीण भागात अध्याप कोरोनाचा प्रादुर्भाव नाही आहे. अश्या ठिकाणी शाळा सुरू करण्याची मागणी या निवेदनाद्वारे केली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Pre Primary School :शिशुवर्ग, बालवाडी वर्ग दोन वर्षानंतर सुरू, पालकांच्या-मुलांच्या चेहऱ्यावर आनंद = liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पारधी मुलांनं शिक्षण देण्यासाठी दोन तरुणांची धडपड, माळरानावर उभारली 'अक्षरभूमी' शाळा गावातील पारधी मुलांनं शिक्षण मिळावं म्हणून दोन तरुणांनी टिटवा पारधी वस्तीवर तीन वर्षांपूर्वी शाळा सुरु केली. मात्र सभागृहात वर्ग सुरु ठेवण्यास काही लोेकांनी विरोध केला. या दोन तरुणांनी ज्ञानयज्ञ न थांबवता गावातल्या माळरानावर विद्यार्थ्यांसह श्रमदान करत वेगळीच शाळा उभी केलीय.. तर पाहुयात कशी आहे ही 'अक्षरभूमी' शाळा...
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra School Reopen : राज्यात शाळांची घंटा वाजणार मात्र 14 जिल्ह्यांमध्ये शाळा बंदच = liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
जळगावात विद्यार्थ्यांचंही ढोल ताशांच्या गजरात स्वागत जळगावमध्येही शाळा सुरु झाल्यात. जळगावच्या शिरसोली गावातील शाळेत विद्यार्थ्यांचा उत्साह पाहायला मिळाला. यावेळी विद्यार्थ्यांचंही ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आलं.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
शाळांमध्ये पुन्हा एकदा किलबिलाट! ओमायक्रॉनच्या प्रादुर्भावामुळे बंद झालेल्या राज्यातील शाळा सुरु करण्याची परवानगी राज्य सरकारनं दिली आहे. मात्र ठराविक शहरं सोडली तर जवळपास 14 जिल्ह्यांमध्ये शाळा सुरु न करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनानं घेतलाय. मुंबई, ठाणे, जळगाव, नाशिक, नंदुरबारमध्ये पहिली ते बारावीचे वर्ग भरणार आहेत. तर धुळ्यात नववी ते बारावी, बीडमध्ये अकरावी ते बारावी, जालन्यात आठवी ते बारावी, नांदेडमध्ये नववी ते बारावीचे असे टप्प्याटप्प्यानं वर्ग सुरू होतील. मुलांना शाळेत पाठवण्याची सक्तीन नसल्यानं पालकवर्ग काय भूमिका घेतो हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
राज्यातील शाळा आजपासून सुरु, मात्र महाविद्यालयांबाबत अद्याप कुठलाही निर्णय नाही राज्यातील शाळा आजपासून सुरु झाल्या आहेत. मात्र महाविद्यालयांबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाहीये, उच्च आणि तंत्र शिक्षण विभागानं मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेला प्रस्ताव अजूनही प्रलंबित आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
कुठे शाळा सुरु, कुठे शाळा बंद? मुंबई, ठाणे, जळगाव, नाशिक, अकोला, नंदुरबारमध्ये आजपासून पहिली ते बारावीचे वर्ग सुरु होणार आहेत. तर पुणे, नागपूर अहमदनगर, यवतमाळ, वाशिम, अमरावतीमध्ये शाळा बंद राहणार आहेत
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
राज्यात आजपासून पुन्हा शाळेची घंटा वाजणार राज्यात आजपासून पुन्हा शाळेची घंटा वाजणार आहे. वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे साधारण 20 दिवसांपासून बंद असलेल्या शाळा आजपासून सुरू होणार आहेत.