- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- निवडणूक
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र Maharashtra Rains Live Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस्, एका क्लिकवर
Maharashtra Rains Live Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस्, एका क्लिकवर
Maharashtra Rains Live Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
नाशिक : कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तृतीय पंथीयांच्या छबीना मिरवणुकीला विशेष महत्व असल्याने नाशिकच्या सप्तशृंगी गडावर देशभरातील तृतीय पंथीयांनी हजेरी लावली. गेली ८० वर्षांपासून उत्सवाचे खास आकर्षण आकर्षण ठरते ते छबीना मिरवणूक. किन्नर व त्यांचे गुरु त्यांच्या देव्हाऱ्यातील देवीच्या प्रतिमा व मृर्ती घेवून येतात. सप्तशृंगी गडावरील शिवालय तळ्यावर शाही स्नान घालून साडी, चोळी, अंतर, वेणी व शृंगाराचे साहित्याने देवीला सजवित देवीचा छबिना पारंपरिक वाद्य असलेल्या ढोल ताशा या वाद्याचा गजरात मिरवणूक काढतात. हा छबीना शिवालय तळ्यावरून तर गडाच्या पहिल्या पायरी पर्यंत निघते. हा सोहळा पहाण्यासाठी लाखो भाविक सप्तशृंगी गडावर आवर्जून उपस्थित राहतात.
प्रांजल खेवलकर प्रकरणात पुणे पोलिसांची रोहिणी खडसेंनाही नोटीस
रोहिणी खडसेंची दीड तास अमली पदार्थ विरोधी विभागाकडून चौकशी
प्रांजल खेवलकर यांचा फॉरेन्सिक रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर पोलिसांकडून रोहिणी खडसेंना नोटीस जारी
दीड तासाच्या चौकशीनंतर रोहिणी खडसेंचा जबाब नोंदवला
नालासोपारा : नालासोपारा पूर्व येथील तुळिंज नाका परिसरात मोबाईल चोरी करणाऱ्या एका तरुणाला नागरिकांनी रंगेहात पकडत चांगलाच धडा शिकवला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, परिसरातील वाढत्या चोऱ्यांबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुळिंज नाका परिसरात एका दुकानात मोबाईल चोरी करण्याचा प्रयत्न एका व्यसनी तरुणाने केला. मात्र, सतर्क नागरिकांनी त्याला रंगेहात पकडले आणि पोलिस येईपर्यंत त्याला चांगलाच चोप दिला. हा संपूर्ण प्रकार उपस्थितांनी मोबाईल कॅमेरात कैद केला असून, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून या परिसरात काही व्यसनी आणि नशेबाज तरुणांकडून चोरी, मारामारी आणि उपद्रवाच्या घटना वाढल्या आहेत. हे तरुण चरस-गांजा सारख्या अमली पदार्थांचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी थैमान घालत आहेत. एवढेच नव्हे, तर काही जण देहविक्रीसारख्या बेकायदेशीर कारवायांमध्येही गुंतले असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
नालासोपारा : नालासोपारा पूर्व येथील तुळिंज नाका परिसरात मोबाईल चोरी करणाऱ्या एका तरुणाला नागरिकांनी रंगेहात पकडत चांगलाच धडा शिकवला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, परिसरातील वाढत्या चोऱ्यांबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुळिंज नाका परिसरात एका दुकानात मोबाईल चोरी करण्याचा प्रयत्न एका व्यसनी तरुणाने केला. मात्र, सतर्क नागरिकांनी त्याला रंगेहात पकडले आणि पोलिस येईपर्यंत त्याला चांगलाच चोप दिला.
हा संपूर्ण प्रकार उपस्थितांनी मोबाईल कॅमेरात कैद केला असून, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून या परिसरात काही व्यसनी आणि नशेबाज तरुणांकडून चोरी, मारामारी आणि उपद्रवाच्या घटना वाढल्या आहेत. हे तरुण चरस-गांजा सारख्या अमली पदार्थांचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी थैमान घालत आहेत. एवढेच नव्हे, तर काही जण देहविक्रीसारख्या बेकायदेशीर कारवायांमध्येही गुंतले असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
Nagarpalika and Nagarparishad Reservation: राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी राज्यातील 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची घोषणा करण्यात आली. त्यानुसार 33 नगरपरिषदांपैकी 17 नगरपरिषदांमध्ये अनुसूचित जातीच्या महिलांना आरक्षण जाहीर झाले आहे. यामध्ये मोहोळ, ओझर, भुसावळ, शिर्डी, दिग्रस, अकलूज, बीड नगरपरिषदांचा समावेश आहे. पूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
बुलढाण्याच्या खामगाव शहरातील 31 वर्षीय तरुणाने दिवठाना येथील नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आकाश उमेश दळवी असे 31 वर्षीय तरुणाचे नाव असून त्याने बेरोजगारीमुळे आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे, याप्रकरणी हिवरखेड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करत पुढील तपास सुरू केला आहे.
रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील ऐतिहासिक जंजिरा किल्ला अखेर पाच महिन्यांनंतर पर्यटकांसाठी खुला झाला आहे. पावसाळ्यात सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवलेले दरवाजे पुरातत्त्व विभागा द्वारे पुन्हा उघडण्यात आले आहेत. त्यामुळे स्थानिक व्यावसायिक आणि पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोल्हापूर: कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील मोहरे इथल्या शेतकरी महिलेनं पाऊण एकर उभ्या सोयाबीन पिकावर ट्रॅक्टर फिरवला..भारती बाबूराव पवार या महिलेनं जूनमध्ये तीस गुंठ्यात सोयाबीन पीक घेतलं होतं..पिकही चांगल्याप्रकारे जोमात आलं होतं..मात्र वारणा नदीला आलेल्या महापुरामुळे सोयाबीन पीक पाण्याखाली गेल्याने मोठं नुकसान झालं होतं..त्यामुळे हातातोंडाशी आलेलं पिक खराब झाल्याने भारती पवार यांनी सोयाबीन पिकावर ट्रॅक्टर फिरवण्याचा निर्णय घेतला..दरम्यान सरकारने आर्थिक मदत करण्याची मागणी देखील त्यांनी केलीये....
65 लाखांची खंडणी मागणाऱ्या कोल्हापुरातला सहायक फौजदार मिलिंद बळवंत नलावडे याचे निलंबन
सोलापुरातल्या अकलूज येथील सराईत गुन्हेगारांच्या टोळीवरील मोक्काची कारवाई रद्द करण्याचे आमिष दाखवून मागितली होती खंडणी
खंडणी प्रकरणी पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांची कारवाई
कारवाईची चाहूल लागताच वैद्यकीय रजा घेऊन नलावडे पसार झाला असून अकलूज पोलिसांकडून त्याचा शोध सुरू
या खंडणी प्रकरणी एकूण 5 जणांवर दाखल आहे गुन्हा
अमरावतीत अभिजात मराठी भाषा सप्ताह..
शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन..
सुरुवातीला विद्यापीठ परिसरात ग्रंथदिंडी काढण्यात आली
अमरावती गाडगेबाबा विद्यापीठात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्ताने भारतीय अभिजात भाषा परिषदेचे आयोजन करण्यात आले..
या परिषदेचे उद्घाटन शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.. यावेळी विद्यापीठ परिसरातून ग्रंथ दिंडी काढून करण्यात आली.. दरम्यान आदिवासी बांधवांनी आदिवासी वेशभूषा परिधान करीत सहभाग नोंदविला.. विद्यार्थ्यांनी बासरीचा निनादात मंत्री चंद्रकांत पाटलांचे स्वागत केले.. भारतीय अभिजात भाषा परिषद गाडगेबाबा विद्यापीठात 3 दिवस 14 भाषावार चर्चासत्र होणार आहे..
मंत्री माणिकराव कोकाटे हे विधिमंडळामध्ये ऑनलाइन रम्मी (पत्ते) खेळत असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला होता आणि यानंतर मंत्री कोकाटे यांनी या संदर्भात आमदार रोहित पवार यांना नोटीस पाठवली होती या नोटीस वर आज नाशिक कोर्टात सुनावणी होणार असून मंत्री माणिकराव कोकाटे हे नाशिक कोर्टामध्ये हजर राहणार असल्याची माहिती मिळत आहे. अब्रू नुकसानीच्या दाव्यानंतर माणिकराव कोकाटे आज कोर्टात त्यांची बाजू मांडणार आहेत. या सुनावणी मध्ये नेमक काय होणार हे देखील बघ न महत्त्वाचं असणार आहे.
गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील पुराडा येथे एका शेततळ्यामध्ये तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.. काल सायंकाळच्या सुमारास हे तिघेही तरुण पुराडा येथील शेतशिवारात असलेल्या शेततळ्यामध्ये पोहायला गेले होते... दरम्यान या तिन्ही तरुणांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.. रात्री उशिरा तिघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले व शवविच्छेदनासाठी देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत...
अभिषेक आचले (20), आदित्य बैस (16), तुषार राऊत (18)
अशी तीनही मृतकांची नावे असून तिघेही देवरी तालुक्यातील पुराडा येथील रहिवासी आहेत... घटनेची नोंद सालेकसा पोलिसांनी घेतली आहे...
गुहागरसह लाडघर समुद्र किनाऱ्याला मिळाला ब्लू फ्लॅग पायलटचा दर्जा.....
आंतरराष्ट्रीय ब्लू फ्लॅग पायलट दर्जासाठी राज्यातील पाच समुद्र किनाऱ्यांची घोषणा.
शासनाच्या पर्यावरण आणि पर्यटन संचालनालय विभागाकडून घोषणा.
डहाणू मधील पारनाका,रायगड मधील श्रीवर्धन व नागाव तर रत्नागिरीतील लाडघर आणि गुहागर समुद्र किनाऱ्याचा समावेश.
ब्लू फ्लॅग पायलटचा दर्जा मिळाल्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटक वाढीसाठी होणार विशेष फायदा.
पर्यटकांसाठी चांगल्या दर्जाच्या पायाभूत सुविधा विकसित केल्यास हा दर्जा कायमस्वरूपी मिळणार..
डेन्मार्कच्या ब्लू फ्लॅग इंटरनॅशनल या संस्थेकडून प्रत्येक समुद्र किनाऱ्याला देण्यात आली होती भेट..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वकांक्षी प्रकल्पांपैकी एक प्रकल्प असल्याची माहिती.....
मातोश्री वरील ठाकरे बंधू भेटी नंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोलावली बैठक
मनसेचे नेते आणि सरचिटणीस यांची आज शिवतीर्थ निवास्थानी बैठक
सकाळी ११ वाजता या बैठकीला सुरूवात होणार
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि संघटनात्मक बांधणीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक
रविवारी संजय राऊत यांच्या नातवाच्या बारश्याच्या कार्यक्रमाला ठाकरे बंधू उपस्थित होते
कार्यक्रम आटपून राज ठाकरे हे थेट मातोश्रीवर दाखल झालेले पाह्यला मिळाले
या भेटीनंतर आज राज ठाकरे पक्षातील नेते आणि सरचिटणीस यांच्यासोबत चर्चा करणार
नांदेडच्या नायगांव तालुक्यातील किन्हाळा गावातील दोन मुली ह्या एमबीबीएससाठी पात्र ठरल्या आहेत. गावातील अल्पभूधारक शेतकरी हणमंत भोसले यांच्या ह्या मुली आहेत. हनुमंत भोसले यांना साक्षी आणि दिव्या अशा दोन मुली आहेत, मात्र या जोडप्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मुलींना शिक्षण दिलंय. आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवत मुलींनी रात्रंदिवस अभ्यास केला. त्यातून ह्या दोघी आता एमबीबीएससाठी पात्र ठरल्या आहेत. गरिबीची जाणीव ठेवत मुलींनी केलेल्या या कष्टाचे सर्वत्र कौतुक होतंय.
भिवंडी तालुक्यातील लोनाड येथील पॅरामाउंट वेअरहाऊस संकुलात रविवारी रात्री लागलेली भीषण आग अखेर जवळपास नियंत्रणात आली आहे. तब्बल दहा तासांच्या प्रयत्नांनंतर ज्वाळा शांत करण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. मात्र अजूनही धुराचे लोट निघत आहेत. सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तैनात असून कुलिंगचे काम सुरू आहे.
या आगीत संकुलातील केमिकल गोदाम, ‘शॅडो फॅक्स’ व ‘बर्ड व्हिव’ कुरिअर गोदाम पूर्णपणे जळून खाक झाले. लाखो रुपयांचे साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. भिवंडी, कल्याण, ठाणे, उल्हासनगर व जिंदाल स्टीलच्या पथकांनी मिळून शर्थीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली.
सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून अधिकाऱ्यांकडून तपास सुरू आहे.
पुराच्या पाण्यात बुडालेल्या 6 वर्षीय चिमुकल्याला वाचवताना वडिलांचा दुर्दैवी मृत्यू
बार्शी तालुक्यातील धामणगाव दुमाला येथे काल दुपारी 2 च्या सुमारास घडली हृदयद्रवक घटना
अरुण उर्फ डेव्हीड सतीश बनसोडे असे 42 वर्षीय मृत व्यक्तीचे नाव
डेव्हीड आणि त्यांचा 6 वर्षीय मुलगा अनुग्रह हे धामणगाव दुमाला येथील नागझरी नदीवर असलेल्या कोल्हापूर बंधाऱ्याजवळ नदी पाहण्यासाठी गेले होते
मात्र यावेळी चिमुकल्या अनुग्रहचा पाय घसरून पाण्यात पडला, यावेळी क्षणाचा ही विलंब न करता वडील डेव्हीड बनसोडे यांनी पाण्यात उडी मारली
अनुग्रहला पाण्याच्या बाहेर ढकलले मात्र स्वतःला पाण्याच्या प्रवाहात पोहता न आल्याने गटांगळ्या खात पाण्यात बुडाले
यावेळी घटनास्थळी उपस्थित लोकांनी डेव्हीड याना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात त्यांना अपयश आलं
डेव्हीड याना पाण्यातून बाहेर काढल्यानंतर बार्शीतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले
दरम्यान पाण्यात बुडालेल्या चिमुकल्या अनुग्रहला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत
बार्शीत घडलेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जातेय
दादरच्या प्लाझा येथे टेम्पोने बेस्टबसला दिलेल्या धडकेत ४ जण जखमी तर एकाचा मृत्यू
रविवारी रात्री प्रतिक्षानगरहून ही बस वरळी डेपोचया दिशेने जात असताना, प्लाझा सिनेमा जवळ टेम्पो चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले
नियंत्रण सुटलेला टेम्पो चालकाने बेस्ट बसला जोरदार धडक दिली. पुढे जाऊन टेम्पो ट्रॅव्हलरने १ टॅक्सी आणि १ कारलाही धडक दिली
ही धडक इतकी जोरदार होती की पुढे बेस्ट बसने पुढे बेस्टस्टाॅपवर उभे असलेल्या प्रवाशांना धडक दिली
या अपघातात ४ जण जखमी झाले, यात शाहबुद्दीन नावाचा ३७ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला जखमींमध्ये असून ३ पुरूष आणि १ महिलेचा समावेश आहे
शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत
परभणी : परभणी जिल्ह्यात पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे चित्र पाहायला मिळतय परभणीच्या पूर्णा तालुक्यातील गोळेगाव मध्ये शेत शिवार अक्षरशः गुडघ्या एवढ्या पाण्याखाली गेले आहेत मोठ्या प्रमाणावर पाणी झाल्यामुळे जे सोयाबीन कापूस हे जे उरले सुरले पीक होते त्या पिकांवरही मोठ संकट आलंय पाऊस थांबायचं नाव घेतल्यामुळे घेत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातून पूर्णता खरीप हंगाम गेल्याचे चित्र आहे.
परभणी : परभणी जिल्ह्यात पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे चित्र पाहायला मिळतय परभणीच्या पूर्णा तालुक्यातील गोळेगाव मध्ये शेत शिवार अक्षरशः गुडघ्या एवढ्या पाण्याखाली गेले आहेत मोठ्या प्रमाणावर पाणी झाल्यामुळे जे सोयाबीन कापूस हे जे उरले सुरले पीक होते त्या पिकांवरही मोठ संकट आलंय पाऊस थांबायचं नाव घेतल्यामुळे घेत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातून पूर्णता खरीप हंगाम गेल्याचे चित्र आहे.
यंदाच्या दिवाळीत आनंदाचा शिधा नाही?
आनंदाचा शिधा योजना आर्थिक चणचणीमुळे लवकरच बंद होण्याची शक्यता
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सरकारने शिवजयंती, गुढीपाडवा, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती, गणेशोत्सव आणि दसरा-दिवाळीला आनंदाचा शिधा देण्यास सुरुवात केली होती
यंदा गणेशोत्सवात आनंदाचा शिधा मिळाला नाही आणि आता दिवाळीला देखील आर्थिक अडचणींमुळे देता येणार नसल्याची सूत्रांची माहिती
यंदाच्या दिवाळीत आनंदाचा शिधा नाही?
आनंदाचा शिधा योजना आर्थिक चणचणीमुळे लवकरच बंद होण्याची शक्यता
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सरकारने शिवजयंती, गुढीपाडवा, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती, गणेशोत्सव आणि दसरा-दिवाळीला आनंदाचा शिधा देण्यास सुरुवात केली होती
यंदा गणेशोत्सवात आनंदाचा शिधा मिळाला नाही आणि आता दिवाळीला देखील आर्थिक अडचणींमुळे देता येणार नसल्याची सूत्रांची माहिती
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील नोकरभरतीसह अन्य घोटाळ्याची चौकशी सुरु असतानाच सहकार विभागाने बँकेला आणखी ५६१ जणांच्या नोकरभरतीला परवानगी दिल्याने यावर टीका होत आहे. आमदार सदाभाऊ खोत यांनी यावरून सहकार मंत्र्यांसह बँकेचे अध्यक्ष, संचालक यांच्यावर गंभीर टीका केलीय. बँकेत लिपिक आणि शिपाई श्रेणीतील जागांची भरती निघाली असून यातील एका एका जागेसाठी 25ते 30 लाख रुपये घेऊन या जागा भरल्या जाणार असल्याचा आरोप आमदार सदाभाऊ खोत यांनी केलाय. दरम्यान आज आमदार सदाभाऊ खोत या विषयाबाबत मुंबईत सहकारमंत्र्याची भेट घेणार असून ही बँकेची परीक्षा पारदर्शकपणे व्हावी ही मागणी ते सहकार मंत्र्यासमोर करणार आहेत. जर याबाबत काही निर्णय झाला नाही तर सहकार मंत्र्याच्या घरासमोर उपोषण करण्याचा इशारा दिलाय.
हैदराबाद गॅझेटियरच्या शासन निर्णयाविरोधातील याचिकांवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी, २ सप्टेंबरचा जीआर निर्णय रद्द करण्याची मागणी...
नागपुरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढण्याची शक्यता, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा एकला चलोचा नारा...
राज ठाकरेंनी बोलावली मनसे नेते आणि सरचिटणीस यांची बैठक, सकाळी ११ वाजता शिवतीर्थवर बैठक होणार, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं नियोजन..
पार्श्वभूमी
Maharashtra Rains Live Updates: आषाढी झाल्यानंतर आता कार्तिकी एकादशीची तयारी सुरू आहे. मात्र यंदाच्या कार्तिकी एकादशीला दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी कोणते उपमुख्यमंत्री पंढरीच्या पांडुरंगाची पूजा करणार ह्या प्रश्नाचं कोडं विठ्ठलाला म्हणजेच मंदिर समितीला पडलंय. आषाढी एकादशीची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि कार्तिकी एकादशीची महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याची परंपरा विठ्ठल मंदिरात आहे. मात्र राज्यात दोन उपमुख्यमंत्री असल्याने कार्तिकीची पूजा शिवसेनेचे एकनाथ शिंदे की राष्ट्रवादीचे अजित पवार? यापैकी कोणत्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करायची याची विचारणा आता मंदिर समिती विधी व न्याय विभागाकडे करणार आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री दोन, पण पुजेचा मानकरी कोण? अशी चर्चा पंढरीत होत आहे. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...