= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
अचानक निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीचा राज्याला जोरदार फटका अचानक निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीचा राज्याला जोरदार फटका. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुरामुळे एकूण 13 मृत्यू झाले आहेत. त्यापैकी नाशिक 1, जालना 1, बीड 2, उस्मानाबाद 2, परभणी 2, लातूर 1, बुलढाणा 1, यवतमाळ 3 मृत्यू झाले आहेत. तर 4 जण जखमी झाले आहेत. 205 जनावरांचे या पुरात मृत्यू झाले आहेत. एनडीआरएफ एअर फोर्सची एक तुकडी कार्यरत आहे तर एका हेलिकॉप्टरच्या माध्यमातून मदत कार्य सुरु आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
नंदुरबार शहर आणि जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात नंदुरबार शहर आणि जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात. मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता. नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वीर चक्र धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस होत असल्याने पाण्याचा प्रश्न सुटण्याची शक्यता.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
वैजापूरच्या बोरसरच्या भिंगी गावात एक महिला पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलीय वैजापूरच्या बोरसरच्या भिंगी गावात एक महिला पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलीय. तलाव फुटल्याने बोरसरमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. याचं प्रवाहात एक मनोरुग्ण महिला वाहून गेली.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
उस्मानाबाद तालुक्यातील दाऊतपूर येथे आज हेलिकॉप्टरच्या मदतीने लोकांचे रस्क्यू उस्मानाबाद जिल्ह्यातल्या पूरसदृश्य परिस्थितीमुळे काही ठिकाणी लोक अडकले होते. आज सकाळपासून एकवीस लोकांना वेगवेगळ्या यंत्रणांनी रेस्क्यु ऑपरेशन करून त्यांचे सुटका केली. उस्मानाबाद तालुक्यातील दाऊतपूर येथेही आज हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला. या हेलिकॉप्टरचा वापर करून दावतपुर गावातून पाच सहा जणांची सुटका करण्यात आली. यासाठी संरक्षण विभागात हेलिकॉप्टर वापरण्यात आलं होतं. दाऊतपुरला चारही बाजूनं नदीपात्राच्या पाण्याने वेढल्यामुळे हे लोक शेतामध्ये अडकले होते.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मराठवाड्यात पुरामुळे हाहाःकार, 35 जणांचा मृत्यू, 4 ते 5 हजार जनावरं गेली वाहून मराठवाड्यात पुरामुळे हाहाःकार, 35 जणांचा मृत्यू, 4 ते 5 हजार जनावरं गेली वाहून, 20 लाख हेक्टरवरील शेतीचं नुकसान, मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पश्चिम विदर्भावरील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील 2 दिवस उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज पश्चिम विदर्भावरील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील 2 दिवस उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज. उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता, मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर अतिवृष्टीची शक्यता
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मांजरा नदी काठावर पुन्हा पावसाला सुरुवात.. मांजरा नदी काठावर पुन्हा पावसाला सुरुवात..
काल रात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर आता पुन्हा एकदा मांजरा काठावरच्या गावावर पावसाला सुरुवात झाली आहे. देवळा परिसरामध्ये पुन्हा पाऊस सुरू झाल्याने लोकांमध्ये दहशत पाहायला मिळतेय.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पुढील 24 तासांसाठी नाशिकमध्ये हाय अलर्ट! मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता पुढील 24 तासांसाठी नाशिकमध्ये हाय अलर्ट! मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
नवी मुंबई शहरात पावसाच्या सरी नवी मुंबई शहरात पावसाच्या सरी. संपुर्ण ढगाळ वातावरण असून आधीमधी मुसळधार पावसाची बरसात होत आहे. सलग मुसळधार पाऊस लागून राहिला नसल्याने पाणी तुंबले नाही. पूर्व उपनगरांमध्ये धो धो पाऊस सुरू आहे. मुलुंडपासून पुढे मध रेल्वेवर दृष्यता कमी असल्याने ट्रेन्स थोड्या हळू चालतायत पण थांबल्या नाहीत. ट्रॅकवर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. पुढील तासभर पाऊस असाच राहिल्यास रेल्वे वाहतूक विस्कळीत होऊ शकते. पश्चिम उपनगरात रिप रिप पाऊस सुरू आहे. सातरस्ता, भायखळा, परेल भागांत हलक्या सरी, कुठेही पाणी साचलेलं नाही.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पालघरमध्ये मुसळधार पाऊस पालघरमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात. मागील तासाभरापासून जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी. चक्रीवादळाचा तडाखा पालघरलाही बसणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज. बोईसर , डहाणू , कासा, पालघर, विक्रमगड आणि जव्हार भागात पावसाची दमदार हजेरी
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
जालन्यात गार्ड स्टोनवरुन पाणी वाहत असलेल्या पुलांवर पोलिसांची गस्त.. जालना जिल्ह्यातील भोकरदन जवळील केळना नदीला पूर आला आहे. भोकरदन जाफराबाद रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने विदर्भासह अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान पुलावरून वाहत असलेल्या पाण्यातून वाट काढणाऱ्या अतिउत्साही नागरिकांना आवर घालण्यासाठी पोलीसांनी गस्त सुरु केली आहे. सतत वाहणाऱ्या पाण्यामुळे पुलाला नुकसान होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून तेथील रस्ता पूर्ण पणे बंद करण्यात आला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मुंबई : पश्चिम उपनगरात तासाभरापासून मुसळधार मुंबईच्या पश्चिम उपनगरात तासाभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पश्चिम उपनगरात अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली आणि दहिसर या सर्व परिसरामध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. असाच काही वेळ जोरदार पाऊस सुरू राहिला तर पश्चिम उपनगरातील सखल भागामध्ये पाणी भरायला सुरुवात होऊ शकते.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Exclusive उस्मानाबाद : दावतपूरमध्ये पुरात अडकलेल्यांच्या सुटकेसाठी हेलिकॉप्टरद्वारे मदत पोहोचवणार.. उस्मानाबादमध्ये 17 जणांची सुटका करण्यात आली आहे
लातूरमध्ये चार ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे, रेणापूरमध्ये दोघेजण झाडावर अडकल्याची माहिती.. लातूर परिसरातील ऊस पूर्ण पाण्यात आहे, त्यामुळे बोटी चालत नाहीत त्यामुळे NDRF हवं आहे.. नांदेड मुदखेडमध्ये 4 जण पाण्यात अडकले आहेत.. त्यांची सुटका करण्याचं काम सुरू आहे ..
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याची गोडावून मधील साखर पावसाने भिजली इंदापूर (पुणे) तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याची गोडावून मधील साखर पावसाने भिजली आहे. जवळपास अडीच हजार साखरेची पोती पावसाने भिजल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गेल्या तीन दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यात छत्रपती सहकारी कारखान्याने साखर ठेवण्यासाठी बनवलेलं तात्पुरत गोडावून रात्री कोसळलं. त्यात अडीच हजार साखरेची पोती भिजली. छत्रपती सहकारी साखर कारखान्याने साखर ठेवण्यासाठी बांबूचा मंडप उभारून त्यावर पावसाळी कागद टाकून गोडावून बनवलं आहे.. याच गोडावूनमध्ये हजारो टन साखर ठेवण्यात आली होती. या गोडावून मधील साखर राम भरोसे आहे. कारण याआधी झालेल्या चक्रीवादळात पावसाने जवळपास 22000 साखरेची पोती भिजली होती..
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, लाखो हेक्टरवरील पिके पाण्याखाली, नांदेड शहरातील प्रमुख रस्त्यावरही गुडघाभर पाणी नांदेड जिल्ह्यात रात्री पासून सर्वत्र विक्रमी पाऊस होत आहे. अनेक महसूल मंडळात १०० मिलीमीटर पेक्षा आधिक पाऊस झाला आहे. धर्माबाद इथे १५५ मिलीमीटर पावसाची नोंद तर अर्धापूर तालुक्यात 130 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
तर सोनखेड परिसरात रात्री पासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे सोयाबीनसह इतर पिकांचे 100 टक्के नुकसान झालंय आणि अनेक घराच्या भिंती कोसळल्या आहेत. अर्धापूर तालुक्यातील लोणी खुर्द गाव हे या मुसळधार पावसामुळे पूर्ण जलमय झालंय. त्याच प्रमाणे नांदेड शहरातील आनंद नगर, भाग्यनगर, देगलूर नाका, हिंगोली गेट या प्रमुख रस्त्यावर व भावसार चौक, पौर्णिमा नगर, समर्थ नगर, बँक कॉलनी, वसंत नगर रहिवाशी परिसरातही पाणीच पाणी झालंय. तर नांदेड शहराची तहान भागवणारा विष्णू प्रकल्पही 100 टक्के भरल्याने 11 दरवाजे उघडण्यात आले आहेत. तसेच नांदेड शहरातील नावघाट पूल, गोवर्धन घाट स्मशानभूमी पूर्ण पाण्याखाली गेलीय त्यामुळे गोदकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
चाळीसगाव तालुक्यातील देवळी गाव परिसरातील भराव रास्ता वाहून गेला (जळगाव) चाळीसगाव मालेगाव रस्त्याच्या जवळ देवळी गावाजवळ भराव टाकलेला रास्ता पूर्णपणे वाहून गेला आहे. त्यामुळे चाळीसगाव मालेगाव वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली होती. आता ही वाहतूक अन्य मार्गाने आता वळविण्यात आली आहे. चाळीसगाव मालेगाव वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे
चाळीसगाव तालुक्यात अजूनही कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. या पावसाने तितूर आणि डोंगरी नदीला पूर आला आहे. शहरातून जाणाऱ्या तितूर नदीच्या पुलावर पाणी कायम असल्याने शहर दोन विभागात विभागले गेलं आहे. यामुळे जन जीवन विस्कळीत झालं आहे
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
तेरणा नदीचं पाणी उजनी गावात, 25 दुकाने पाण्यात लातूर-उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील उजनी गावाला लागून तेरणा नदी वाहते. दरवर्षी या नदीला पाण्याची टंचाई असते, पण काल संध्याकाळी आणि रात्रीच्या सुमारास झालेल्या पावसाने तेरणा नदीचं पाणी उजनी गावातील बाजारपेठेत शिरलं. या बाजारपेठेत असलेले हॉटेल्स, सलून, कृषी साहित्य विक्रीची दुकाने पानटपरी यासारख्या 20 ते 25 दुकानांमध्ये पाणी शिरलं आहे. या दुकानातील साहित्य पुराच्या पाण्यात भिजून नुकसान झालं आहे. गावाच्या मुख्य बाजारपेठेचा 50 टक्क्यांपर्यंत भाग हा पुराच्या पाण्यात बुडाला असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
जालना जिल्ह्यात ढगफुटीसदृश पाऊस, दोन-तीन दिवसात पंचनामे पूर्ण करा - राजेश टोपे (जालना) जिल्ह्यात जूनपासून आतापर्यंत तीन ते चार वेळा मुसळधार पाऊस झाला.. कालही जोरदार पाऊस झाला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. जालना जिल्ह्यातील अनेक तालुक्यात सर्वदूर जोरदार पाऊस आहे. पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. येत्या ५ ते ७ दिवसात शेतीच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण गेले जावेत अशा सूचना मदत आणि पुनर्वसन विभागाने दिल्या आहेत
कालच्या पावसात पिकाचे प्रचंड नुकसान झालं असल्याचंही राजेश टोपे यांनी सांगितलं. ढगफुटी झाली त्या ठिकाणी प्रत्यक्ष पंचनामे करण्याचे टाळून सरसकट पंचनामे गृहित धरावे लागतील असंही टोपे यांनी सांगितलं
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पावसाचे थैमान.. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, मोहोळ, अक्कलकोट, माढा, सांगोला, पंढरपूर तालुक्यात पावसाने मागच्या चार दिवसांपासून थैमान घातलं आहे. यामुळे जिल्ह्यातील सोयाबीन, कांदा पीकाचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतामध्ये गुढघाभर पाणी थांबल्याने सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे बंधाऱ्याचा भराव खचल्याने संपूर्ण शेतीच वाहून गेल्याची घटना घडलीय. बार्शी तालुक्यातील आगळगाव परिसरात गेल्या चार पाच दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसाने चांदणी नदीला पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
परळी अंबाजोगाई रस्त्यावरील वाहतूक बंद .. (बीड) परळी अंबाजोगाई रस्त्यावरील वाहतूक बंद ..
सध्या परळी-अंबाजोगाई या रस्त्याचे काम सुरू आहे. कण्हेरवाडी लगतच्या पुलाचे काम सुरू असून अश्या परिस्थितीत रहदारीला व्यत्यय येई नये म्हणून तात्पुरत्या स्वरूपाचा पूल उभारण्यात आला आहे. याच पुलावरून आता खूप मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. हा पूल कधीही पाण्याखाली जाऊ शकतो. त्यामुळे या मार्गावरून प्रवास न करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
अक्कलकोट-मैंदर्गी-गाणगापूर रस्ता पूर्णपणे बंद (सोलापूर) अक्कलकोट तालुक्यातील अक्कलकोट-मैंदर्गी-गाणगापूर रस्ता पूर्णपणे बंद
बोरी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने बोरी उमरगे गावाजवळील पूल पाण्याखाली
अक्कलकोट येथील कुरनूर धरणातून
रात्री 12.30 पासून 3 हजार क्यूसेकने विसर्ग सुरू
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
आडस - अंबेजोगाई वाहतूक बंद धारुर ते अंबाजोगाई रस्त्यावरील आवरगाव येथील वाण नदीला रात्री मोठा पूर आला असून अजूपही पुलावरुन पाणी वाहत आहे. रात्री बीडहून लातूरकडे जाणारी चारचाकी गाडी या पाण्यात 200 मीटर वाहून गेली. सुदैवाने गाडीतील तिघांना वाचवण्यात आले आहे. सध्या आडस, अंबाजोगाईचा संपर्क तुटलेला असून सर्व वाहतूक बंद आहे..
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
आपेगावमध्ये आपत्ती व्यवस्थापन पथक बोटीसह मदतीसाठी दाखल (बीड) मांजरा नदी काठावरील आपेगाव मध्ये रात्री अचानक वाढलेल्या पाण्यामध्ये लोक अडकले. त्यांना बाहेर काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून बोटीची व्यवस्था.. आपत्ती व्यवस्थापनाचे जवान त्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बोट घेऊन गावात दाखल
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
कळंब तालुक्यात पाण्यात अडकलेल्या 17 जणांची सुटका (उस्मानाबाद) कळंब तालुक्यातील वाकडी ई येथे 17 जण पाण्यात अडकले आहेत आणि सौंदणा आंबा येथे 8 जण अडकले. आपत्ती व्यवस्थापन पथक मदतीसाठी पोहोचलं आहे. अधिकच्या मदतीसाठी मंडल अधिकारी आणि तलाठी यांच्यासह येथे तहसीलदारही उपस्थित आहेत. जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाची टीम बोटीसह पोहोचली आहे. तीन कुटुंबातील लोकांना सुरक्षित स्थळी हवलण्यात आलं आहे.