= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
बुलडाणा जिल्ह्यातील अनेक मार्ग दुसऱ्या दिवशीही ठप्प, जालना-खामगाव महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी जिल्ह्यात आज सकाळपासून पावासाने विश्रांती घेतली असली तरी मात्र खडकपूर्णा प्रकल्पातून 1 लाख 10 क्यूसेक्स चा विसर्ग सुरू असल्याने खामगाव - जालना महामार्गाच्या खडकपूर्णा नदीच्या पुलावरून 8 ते 10 फूट पाणी असल्याने हा महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी ही ठप्प आहे.या महामार्गावर वाहनांच्या जवळपास 10 - 10 किमीच्या रांगा लागलेल्या असून जड वाहनचालकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे , देऊळगाव मही गावातून पूर्णपणे वाहतूक ठप्प आहे व मोठ्या वाहनांच्या रांगा बघायला मिळत आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
बुलडाणा जिल्ह्यातील अनेक मार्ग दुसऱ्या दिवशीही ठप्प, जालना-खामगाव महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी जिल्ह्यात आज सकाळपासून पावासाने विश्रांती घेतली असली तरी मात्र खडकपूर्णा प्रकल्पातून 1 लाख 10 क्यूसेक्स चा विसर्ग सुरू असल्याने खामगाव - जालना महामार्गाच्या खडकपूर्णा नदीच्या पुलावरून 8 ते 10 फूट पाणी असल्याने हा महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी ही ठप्प आहे.या महामार्गावर वाहनांच्या जवळपास 10 - 10 किमीच्या रांगा लागलेल्या असून जड वाहनचालकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे , देऊळगाव मही गावातून पूर्णपणे वाहतूक ठप्प आहे व मोठ्या वाहनांच्या रांगा बघायला मिळत आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनचे 70 टक्के नुकसान, एकूण 2 लाख हेक्टर शेत जमिनीवरील सोयाबीनचे नुकसान मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनचे 70 टक्के नुकसान, एकूण 2 लाख हेक्टर शेत जमिनीवरील सोयाबीनचे नुकसान.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
वीजेच्या तारेला स्पर्श झाल्याने काका पुतण्याचा मृत्यू Maharashtra Rain LIVE Update : वीजेच्या तारेला स्पर्श झाल्याने काका पुतण्याचा मृत्यू, यवतमाळमधील पुसद तालुक्यातील ईसापूर धरण परिसरातील घटना
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने नदी किनारी रामकुंड परिसरात होणाऱ्या दशक्रिया विधींना फटका गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने नदी किनारी रामकुंड परिसरात होणाऱ्या दशक्रिया विधींना फटका बसलाय, पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने रस्त्यावर जिथे जागा मिळेल तिथे विधी उरकण्याची वेळ भाविकांवर आलीय. त्यामुळे एकाच ठिकाणी प्रचंड गर्दी होत आहे, परिसरातील धर्मशाळा, सभागृह आशा सुरक्षित ठिकाणी विधी करण्याची गरज आहे
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
परभणी जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीनमध्ये गुडघाभर पाणी, 1 लाख 75 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान परभणी जिल्ह्यात झालेल्या अति पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे जिल्ह्यात यंदा 1 लाख 75 हजार हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले काल झालेल्या पावसामुळे परभणी जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आलाय परभणीच्या इंद्रायणी नदी काठच्या वडगाव सुक्रे येथील शेतीमध्ये गुडघ्यावर पाणी साचलंय.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
उमरखेड बस अपघात, बस नाल्यातून काढली Maharashtra Rain LIVE Update : उमरखेड बस अपघात, बस नाल्यातून काढली, बेपत्ता असलेला एक मृतदेह नाल्यापासून दीड किलोमीटर अंतरावर आढळला, मृतदेह हा बस चालकाचा असल्याची महिती
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
आभाळ फाटलंय आता ठिगळ लावायचं कुठं, मुसळधार पावसानंतर आता शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न अंबाजोगाई तालुक्यातील हिवरा गावाला लागून असलेली ही होळणा नदी आणि याच होळणा नदीने पात्र सोडले आणि आजूबाजूची सगळी शेती उद्ध्वस्त झाली.. होळणा नदीच्या काठावर असलेले सोयाबीनचे मोठे मोठे ढीग पाण्यामध्ये वाहून याचा पुला मध्ये अडकले होते.. आज सूर्य दर्शन झाले त्यानंतर लोक आपल्या बांधावर पोहोचले..
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मुसळधार पावसामुळे सीईटी परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा परीक्षा घेणार, विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारचा ताण घेऊ नये, सीईटी सेलकडून माहिती मुसळधार पावसामुळे सीईटी परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा परिक्षा घेणार, विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारचा ताण घेऊ नये, सीईटी सेल कडून माहिती
ज्या विद्यार्थ्यांना काल आणि आज राज्यभरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सीईटी परीक्षा केंद्रावर पोहचण्यास उशीर झाला आहे, अश्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहे
ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही त्या विद्यार्थ्यांनी सीईटी सेलकडे मेल करावा, अशा विद्यार्थ्यांची परीक्षा लवकरच घेतली जाईल
विद्यार्थ्यांनी परीक्षा न देता आल्याने जास्तीचा ताण घेऊ नये, अशी माहिती सीईटी सेल कडून देण्यात आली आहे
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
यवतमाळच्या उमरखेडमधील गाळात फसलेली बस काढली, चालक अजूनही बेपत्ता यवतमाळ : उमरखेडच्या दहागाव येथे काल सकाळी एसटी बस नाल्याच्या पुरात वाहून गेली होती. गाळात फसलेली बस आता काढण्यात आली असून त्या एसटी बसचे चालक अजूनही बेपत्ता आहे त्यांचा शोध सुरू आहे पाण्याच्या प्रवाहात पुढे वाहून गेल्याची शक्यता आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गुलाबी वादळाचा मोठा फटका,हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली नांदेड जिल्ह्यात सर्वत्र अतिमूसळधार पाऊस झाला आहे. अतिवृष्टीमुळे अनेक छोट्या-मोठ्या नद्यांना महापूर आला आहे.
शेत-शिवारासह अनेक गावातही पाणी शिरले आहे. यामुळे अर्धापूर तालुक्यातील शेलगाव, पिंपळगाव, सांगवी, मेंढला, शेणी या गावांचा संपर्क तुटला आहे. तर काढणीस आलेल्या शेतकऱ्यांचे कापणीस आलेले सोयाबीन पुर्णपणे जमीनदोस्त झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. पैनगंगा नदीवरील इसापूर धरणाचे अकरा तर गोदावरी नदीवरील विष्णुपुरी प्रकल्पाचे नऊ दरवाजे उघडण्यात आले असून नदीपात्रात विसर्ग सुरू आहे.
:नांदेड जिल्ह्यात अतिमुसळधार पावसानं खरीप पिकासह बागायती पिकांना फटकाजिल्ह्यात गुलाबी वादळाचे काटे शेतकऱ्याच्या अंगाला रुतले आहेत. नदीकाठच्या शेतजमीनी खरडून गेल्या आहेत. तर सोयाबीन, कापूस खरीप पिकासह हळद, केळी, ऊस बागायती पिकांनाही मोठा फटका बसला आहे. सततच्या होणाऱ्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकरी पूर्णपणे हवालदील झाला आहे.जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीनांदेड जिल्ह्यात रात्रीपासून सर्वदूर अतिवृष्टी झाली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
गोदावरी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे जायकवाडी प्रकल्पाच्या खालील गोदावरी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात उतरू नये, गुरेढोरे, विदुयत साहित्य असल्यास काढून घ्यावे, अशा सूचना पूर नियंत्रण कक्षाने दिल्या आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
सारंगखेडा प्रकाशा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग नंदुरबार :- मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र मध्ये सुरू आसलेल्या मुसळधार पावसामुळं तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने हतनूर सारंगखेडा प्रकाशा या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आसल्याने तापी नदीवरील गुजरात राज्यातील सर्वात मोठ्या आसलेल्या उकाई धरणातून 189513 क्युरेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
लातूरमध्ये पुरात अडकून पडलेल्या तीन जणांची सुखरूप सुटका मांजरा नदीच्या पाण्यात पोहरेगाव येथील तीन जण अडकले होते. प्रशासनाला याची माहिती मिळाली. अडकलेल्या तिघांना एनडीआरएफच्या टीमने जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली आज हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढले.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मुंबईसह उपनगरांत पुढील 2-3 तासांत मुसळधार पावसाचा इशारा पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्यामूळे पाऊस लांबण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे मुंबईसह राज्यात पुढील ३ दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. त्यानुसार आज सकाळपासूनचं मुंबईसह उपनगरात अधूनमधून मुसळधार पाऊस कोसळत आहे. कुर्ला परिसरात मागील पाऊण तासांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यांना येलो अलर्ट जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेने देखील आपल्या सर्व विभागांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
नाशिकचं गंगापूर धरण 100 टक्के भरलं, विसर्ग वाढवल्यानं नाशिककरांना सतर्कतेचा इशारा Nashik Rain : नाशिकची तहान भागवणारं गंगापूर शहर 100 टक्के भरलं आहे. त्यामुळे दुपारी 12 वाजेपर्यंत गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात मोठा विसर्ग करण्यात येणार आहे. जवळपास 15 हजार क्यूसेकपेक्षा जास्त वेगानं हा विसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा आणि सावधानतेचा इशारा दिला जात आहे.
गंगापूर धरणातून टप्याटप्याने वाढवणार विसर्ग :
- सकाळी 8 वाजता एकूण 5000 क्युसेक
- सकाळी 9 वाजता एकूण 7000 क्युसेक करण्यात येणार आहे.
- सकाळी 10 वाजता एकूण 10000 क्युसेक करण्यात येणार आहे.
- दुपारी 12 वाजता 15 हजार क्युसेक
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये सुरु आसलेल्या मुसळधार पावसामुळं तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ नंदुरबार : मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये सुरु आसलेल्या मुसळधार पावसामुळं तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यानं हतनूर सारंगखेडा प्रकाशा या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे तापी नदीवरील गुजरात राज्यातील सर्वात मोठ्या आसलेल्या उकाई धरणातून 189513 क्युरेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
नाशिकमध्ये गुलाब चक्रीवादळाचा परिणाम, ग्रामीण भागाला मुसळधार पावसाने झोडले गुलाब चक्रीवादळाचा परिणाम नाशिक जिल्ह्यात दिसत असून जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे, काल दिवसभर शहरात संततधार सुरू होती, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ही मुसळधार पाऊस सुरू असल्याने तुडूंब भरलेल्या धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला जात आहे, सकाळ पासून 5 हजार क्युसेक वेगाने गंगापूर धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग दुपारी 12 नंतर 15 हजार केला जाणार आहे, त्यामुळे गोदावरी नदीला महापूर येण्याची शक्यता आहे,जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या sop नुसार पूर नियंत्रणाचे काम यंत्रणेच्या माध्यमातून केले जाणार आहे. पालखेड ,दारणासह सर्वच धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आलाय. लासलगाव, येवला नांदगाव या भागात ही जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं असून काही नागरिकांच्या घरात दुकानात देखील पाणी शिरल्याच्या घटना घडल्यात, घोटी, इगतपुरी, सुरगाणा या तालुक्यात ही पावसाची जोर असल्यानं जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना सतर्क करण्यात आलं आहे
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मराठवाड्यात पावसाचं थैमान, 700 पेक्षा अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं औरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचं थैमान पाहायला मिळत आहे. 700 पेक्षा अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. औरंगाबाद पुरामुळे 200 पेक्षा अधिक मुलं एमएससीईटी परीक्षेला पोहोचू शकले नाहीत. मराठवाड्यातील 10 धरणांतून 2 लाख 65 हजार क्यूकेस एवढा विसर्ग सोडण्यात आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील गोंदेगाव, पोहरी बु. निंभोरा येथील 20 घरांची पडझड झालीये. सोयगाव तालुक्यातील जरंडी तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. सिल्लोड तालुक्यात पूर्णा नदीला पूर आल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला. औरंगाबाद पैठण शहरात कहारवाड्यातील एका घराचे छत कोसळून सहा वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.