Maharashtra Rain Live Updates: मुंबईसह परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस, जाणून घ्या पावसासंदर्भातील प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर...
सध्या राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसानं उघडीप दिली आहे.
एबीपी माझा वेब टीमLast Updated: 26 Aug 2022 09:13 AM

पार्श्वभूमी
Maharashtra Rain Live Updates : सध्या राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसानं उघडीप दिली आहे. काही ठिकाणी मात्र, हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे....More
Maharashtra Rain Live Updates : सध्या राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसानं उघडीप दिली आहे. काही ठिकाणी मात्र, हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. मुंबईसह (Mumbai) ठाणे (Thane) परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. अन्य ठिकाणी मात्र, पावसानं उघडीप दिली आहे. दरम्यान, पुढच्या काही दिवस राज्यात पावसाची विश्रांती असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर दुसरीकडं पुढील दोन दिवस विदर्भात पावासाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. अतिवृष्टीचा मोठा फटका विदर्भ आणि मराठवाड्याला बसला आहे. अशातच आता पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे.राज्यात आत्तापर्यंत पावसाचे प्रमाण समाधनाकारक राहिले आहे. जूनपासून आत्तापर्यंत राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. नदी आणि धरणांच्या पाणी साठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. जून महिन्यात पावसानं दडी मारली होती. मात्र, जुलै आणि ऑगस्टमध्ये राज्यात सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावली होती. दरम्यान, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात मुसळधार पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं होतं. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आल्यानं वाहतुकीवरही परिणाम झाला होता. तसेच शेतीचंही मोठं नुकसान झालं आहे.
नंदूरबार जिल्ह्यातील दरा प्रकल्प ओव्हर फ्लो
Nandurbar Rain : नंदूरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील वाकी नदीवर बांधण्यात आलेला दरा प्रकल्प ओव्हर फ्लो झाला आहे. सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. तसेच परिसरात असलेली हिरवळ आणि वनीकरण विभागाने जगवलेलं जंगल यासह विविध नैसर्गिक सौंदर्याचे उधान करणाऱ्या बाबी या परिसरात असल्यानं मोठ्या प्रमाणात शहादा तालुक्यासह जिल्हाभरातील पर्यटक दरा प्रकल्पाला भेट देत आहेत. मात्र, या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे संरक्षण यंत्रणा नसल्यानं या ठिकाणी येणारे पर्यटक जीव धोक्यात घालून सेल्फी काढत असल्याचे दिसून येत आहे. धरण परिसरात सुरक्षारक्षक नेमण्यात यावेत अशी मागणी जोर धरत आहे.