Pune Tempreture पुणे शहराचा पारा मागील काही दिवसांपासून वाढत आहे. दुपारी उन्हाचे चटके जाणवत आहेत. दुपारी पुणेकरांना घराबाहेर पडणं कठीण झालं आहे. चांगल्याच उन्हाच्या झळा जाणवत आहे. सरासरी कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवलं जात आहे. सकाळी थंडी आणि दुपारी कडाक्याच्या उन्हाचा सामना सध्या पुणेकर करत आहे. दिवसभरात तापमानात तब्बल 20 अंशांचा फरक पडत असल्यामुळे अनेक पुणेकर हैराण झालं आहे. येत्या शनिवारनंतर तापमान वाढण्याची शक्यता आहे. 


नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी?


IMD अधिकार्‍यांनी लोकांना उष्माघात आणि इतर उष्णतेशी संबंधित आजार टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. वृद्ध आणि मुले विशेषतः उष्णतेशी संबंधित आजारांना बळी पडतात आणि दिवसाच्या सर्वात उष्ण भागात बाहेर जाणे टाळावे. लोकांनीही भरपूर पाणी प्यावे आणि शक्यतो थंड, सावलीच्या ठिकाणी राहावे. उष्णतेच्या लाटेत पिकांची आणि जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन करुन आयएमडीने शेतकऱ्यांना इशाराही दिला आहे. त्यांनी शेतकर्‍यांना दिवसाच्या उष्णतेच्या काळात त्यांच्या शेतात काम करणे टाळावे आणि त्यांच्या जनावरांना पुरेसे पाणी आणि सावली मिळेल याची खात्री करावी असा सल्ला दिला आहे.


तापमानात झालेली ही अचानक वाढ केवळ पुण्यापुरती मर्यादित नाही. कारण महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट आली आहे. या उष्णतेच्या लाटेत आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्या टाळण्यासाठी लोकांनी आवश्यक ती खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. IMD ने लोकांना हवामानाच्या परिस्थितीबद्दल माहिती ठेवण्याचा आणि सुरक्षित राहण्यासाठी अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. 


बदलत्या वातावरणामुळे निम्म पुणे आजारी


पुण्यात सध्या वातावरणात सातत्याने बदल होत आहे. याचा परिणाम अनेकांच्या आरोग्यावर होत आहे. अनेकांना ताप, सर्दी आणि खोकल्याच्या समस्या जाणवत आहेत. मात्र खोकला फार काळ टिकत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. शिवाय लहान मुलांनाही खोकल्याचा त्रास होत असल्याने पालकही त्रस्त झाले आहे. या सगळ्यांच नीट निरीक्षण करा आणि तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. त्यासोबतच शहरात H3N2 चे दोन बळी गेले आहेत. काही रुग्ण उपचार घेत आहेत. तर कोरोनानेदेखील डोकं वर काढलं राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. राज्यात मुंबई, पुणे आणि ठाण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. 


Nandurbar News : अवकाळीमुळं व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या मिरचीला मोठा फटका, नुकसान भरपाई देण्याची मागणी