Jitendra Awhad: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) कार्यकर्ते आक्रमक झाले असताना दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांची पत्नी ऋता आव्हाड यांनी कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तक्रारदार महिलेविरोधात गुन्हे दाखल असून त्या जामिनावर असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. आव्हाडांविरोधात तक्रार करणाऱ्या महिलेचा विशिष्ट हेतू  असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 


रविवारी कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या तिसऱ्या कळवा खाडी पुलाचे काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक नेते, राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी विनयभंग केला असल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला. त्यानंतर आव्हाड यांच्याविरोधात पोलिसांकडून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 


कारवाईविरोधात जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यांनी ट्वीट करत म्हटले की, ज्या महिलेने ही तक्रार दाखल केली आहे, त्यांच्याकडे मोटीव्ह आहे. छट पुजेवरून झालेल्या बाचाबाचीत त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्या जामिनावर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि आव्हाडांविरोधात आक्षेपार्ह बोलल्या आहेत. अंगावर धडकणाऱ्या व्यक्तिला बाजूला करणे गुन्हा असेल तर बाजारात, ट्रेन मध्ये, रेल्वे पुलावर, गर्दीमध्ये रोज शेकड्यांनी ‘विनयभंग’ होत असतील, असेही त्यांनी म्हटले. त्या महिला राजकारणी महत्वाकांक्षा बाळगतात आणि काल रात्री त्या कुणाला तरी भेटल्या. त्यांच्यावर पण अॅट्रोसिटी चा गुन्हा दाखल झाला आहे. जे काही घडलं ती spontaneous reaction होती. त्याला विनयभंग म्हणतां येत नाही असेही त्यांनी म्हटले.


 










ऋता आव्हाड यांनी 'एबीपी माझा' सोबत बोलताना म्हटले की, भादंविमधील सगळी कलमे ही जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात लावणार असल्याची संतप्त प्रतिक्रिया दिली. 


पाहा व्हिडिओ: जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांची पहिली प्रतिक्रिया