Maharashtra News LIVE Updates: शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला पोलिसांनी मुसक्या बांधून कोल्हापूरात आणलं, कोर्टात सुनावणीला सुरुवात
Maharashtra News LIVE Updates: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates: छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकराला तेलंगणातून अटक करण्यात आली आहे. कोरटकरला घेऊन पोलीस कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले असून आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे....More
मुंबई मध्ये अनधिकृत फेरीवाल्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. एकीकडे मनसे मुंबई शहरात आक्रमक झालेली असताना भाजप ने ही मुंबई उपनगरात या मुद्द्यावर प्रशासनाला धारेवर धरायला सुरुवात केली आहे. घाटकोपर च्या एमजी रोड वर दोन दिवसांपूर्वी एक दुकानदाराला फेरीवाल्यांनी बेदम मारहाण केली होती.या दुकानदाराची आज भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भेट घेतली. या वेळी त्यांनी या रस्त्यावर फेरफटका मारीत पालिका आणि पोलीस प्रशासनाला धारेवर धरले. हा मार्ग घाटकोपर चा महत्त्वाचा रस्ता असताना ही इथे मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे, तसेच मोठ्या प्रमाणांत दादागिरी ही वाढली आहे. इथे मोठ्या प्रमाणात बांगलादेशी फेरीवाले मुंबईत असून नशेचा व्यवसाय ही सुरू आहे. या बाबत मोहीम सुरू केली असून हा प्रश्न निकाली काढणार असल्याचे किरीट सोमय्या या वेळी म्हणाले.
धारावी पुनर्विकासासाठी करण्यात येत असलेल्या सर्वेक्षणाने नवा टप्पा गाठत वरच्या मजल्यावरील घरांसह ६३ हजार झोपड्पट्टीधारकांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. यापूर्वी तळ मजला आणि व्यावसायिक गाळ्यांसह करण्यात आलेल्या ६० हजार सर्वेक्षणाचा टप्पाही आता ओलांडला गेला आहे.
मुंबई, मार्च २५: धारावी पुनर्विकास प्रकल्पात एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा सध्या गाठण्यात यश आले आहे. आतापर्यंत ६३ हजारहून अधिक गाळ्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे आणि हे आकडे वाढतच आहेत.
धारावीत २००७-०८ मध्ये निवासी घरे आणि व्यावसायिक गाळ्यांचे दस्तऐवजीकरणाचे काम पार पडले होते. मात्र, सध्या पार पडलेल्या सर्वेक्षणाने, हा सुमारे ६० हजार तळ मजल्यावरील भाडेकरूंसह गाळ्यांच्या झालेल्या सर्वेक्षणाचा आकडा ओलांडला गेला आहे. साधारणतः झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, फक्त तळ मजल्यावरील भाडेकरूंना गाळ्यांना मोफत घरांसाठी पात्र मानले जाते.
धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे (डीआरपी) मुख्य कार्यकारी अधिकारी एस. व्ही. आर. श्रीनिवास याबद्दल म्हणाले की, "आमच्या सर्वेक्षणाने एक महत्त्वाचा आणि निर्णायक टप्पा ओलांडला आहे. ही सरकारसाठी निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे. हा पुनर्विकास प्रकल्प केवळ तळ मजल्यावरील भाडेकरूंपुरता मर्यादित नसून, वरच्या मजल्यांवरील बांधकामांचाही या समावेश होतो. यातून हे दिसते की, सरकार सर्वांसाठी घरे देण्यासाठी वचनबद्ध आहे. धारावीत कोणीही वंचित राहणार नाही."
नवीन सर्वेक्षणानुसार, ९५ हजारांहून अधिक गाळ्यांचे गल्लीबोळात जाऊन सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. ८९ हजारांहून अधिक गाळ्यांना क्रमांक देण्यात आला आहे. तसेच ६३ हजारांहून अधिक गाळ्यांचे घराघरात जाऊन सर्वेक्षण पूर्ण झाले. मागील सर्वेक्षणाच्या तुलनेत सध्याच्या सर्वेक्षणात तळ मजल्यावरील भाडेकरूंची घरे, वरच्या मजल्यांवरील बांधकामे, सध्याच्या अस्तित्वातील एसआरए इमारती, आरएलडीए जमिनीवरील झोपडपट्टीवासी नागरिक, तसेच सर्व धार्मिक स्थळांचा समावेश आहे.
श्रीनिवास याबद्दल पुढे अधिक बोलताना म्हणाले की, "आपण येथे प्रचंड संख्येतील भाडेकरूंबद्दल बोलत आहोत. तसेच, आता आम्ही सर्वेक्षणाच्या शेवटच्या टप्प्यात प्रवेश केला आहे. या आकड्यांतून स्पष्टपणे कळते की धारावीकर पुनर्विकासाच्या बाजूने आहेत. त्याचबरोबर ते सर्वेक्षणात सक्रियपणे सहभागी होत आहेत. तरीही, आम्ही सर्व रहिवाशांना लवकरात लवकर सर्वेक्षणात सहभाग घेण्याचे आवाहन करतो आहोत. जेणेकरून पुढील टप्पे सुरू करता येतील. ज्या रहिवाशांनी सर्वेक्षणात भाग घेतलेला नाही, त्यांनी लवकरात लवकरात लवकर स्वेच्छेने या प्रक्रियेत सहभाग घ्यावा. ज्या भाडेकरूंनी किंवा रहिवाशांनी सहभाग नाकार दिला आहे किंवा वारंवार विनंती करूनही आवश्यक कागदपत्रे सादर केलेली नाहीत. त्या भाडेकरूंच्या घरांचे इथून पुढे सर्वेक्षण पुन्हा केले जाण्याची शक्यता कमी आहे."
या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या (एनएमडीपीएल), विशेष उद्देश कंपनी तर्फे सुमारे 1 लाख ५० हजार घरांच्या सर्वेक्षणाची तयारी केली गेली आहे. कारण बहुतेक झोपड्या या तळमजला अधिक दुसऱ्या मजल्यापर्यंत वाढल्या आहेत. ज्यामुळे पुनर्वसनासाठी आवश्यक घरांची संख्या वाढली आहे.
या प्रकल्पाच्या प्रगतीबाबत भाष्य करताना, एनएमडीपीएलच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, "आम्ही सर्वेक्षणाच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलो आहोत आणि याचा आम्हाला आनंद आहे. अद्याप सर्वेक्षणात भाग न घेतलेल्या रहिवाशांना लवकरात लवकर पुढे येण्याचे आम्ही आवाहन करतो. धारावीकरांकडून आम्हाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. त्यांची सकारात्मकता आणि सन्मानपूर्वक जीवन जगण्याची इच्छा या पुनर्विकास प्रकल्पाला पुढे नेण्यास नक्कीच कारणीभूत ठरेल. आम्ही त्यांच्या या जिद्दीला सलाम करतो. त्यांचा स्वतःच्या तसेच भविष्यातील पिढ्यांच्या उज्ज्वल आयुष्यासाठी त्यांनी पाहिलेल्या स्वप्नांचा आम्ही निश्चितच आदर करतो."
सर्व पात्र धारावीकरांचे पुनर्वसन धारावीतच केले जाणार आहे. जे रहिवासी अपात्र ठरतील, त्यांना धारावीच्या बाहेरील आधुनिक वसाहतीत स्थलांतरित केले जाईल. या वसाहतीत चांगल्या सुविधा आणि आधुनिक पायाभूत सोयी उपलब्ध असतील. या नव्या वसाहती मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) तयार होतील. त्यामध्ये मेट्रोसह इतर चांगल्या सार्वजनिक वाहतुकीच्या सोयी उपलब्ध असतील.
प्रतापराव जाधवः केंद्रीय मंत्री
ड्रग्जच्या व्यवसायात यापूर्वी सेलिब्रिटी असल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणाची चौकशी करावी. यात आदित्य ठाकरे असो की कोणी त्यांच्यावर कारवाई करावी.
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव नवीन आले नाही. मृत्यू झाल्याबरोबर आदित्यचे नाव पुढे आले होते. तेंव्हा मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा दुरूपयोग करत प्रकरण दडपले. आता दिशा सालियाचे वडीलांनी अटक करण्याची मागणी होती.
..
ॲान आदित्य ठाकरे यांनी शिंदेच्या बैठकीत एकटक पाहणं
एकनाथ राव शिंदे यांचे नेतृत्व सामान्य कुटुंबातून संघर्ष केलेले नेतृत्व आहे. आदित्य ठाकरे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले. त्यांचा ॲटड्यूड दिसून येतो. कोणत्याही व्यक्तीची सन्मान हिंदू धर्मात केला जातो पण काल आदित्यनं तसं केलं नाही.
प्रतापराव जाधव ॲान कुणाल कामरा
कुणाल कामरा यानं उपहासात्मक गाणं गायलं ते योग्य नाही.
काही लोकांनी बापाचा विचार सोडला होता. तो विचार पुढे नेणा-याचं काम शिंदे साहेबांनी केलें
सुपारी घेऊन कामरानं गाणं गायलं.
अनेक पक्षात अनेक खासदार असे आहेत जे गरीब कुटुंबातून आले आहेत. त्यांना प्रत्येकाचं आदरातिथ्य करावं लागतं. - प्रतापराव जाधव
ऑन जयकुमार गोरे
हनीट्रॅप चे प्रकारही मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत
बाळासाहेब दोडतले पॉइंटर
- छत्रपती संभाजी महाराज यांनी प्रतिष्टा पणाला लावून काढायला कां लागले.
- वाघ्या कुत्र्याचे इतिहासात खूप मोठे योगदान.
- होळकर यांनी जिर्णोद्धार केला म्हणुन हा मुद्दा पुढे घेवून आलात कां.
- श्री क्षेत्र माहुली येथे खंड्या नावाच्या कुत्र्याचा पुतळा कसा चालतो.
- रायगडावर तुमची मक्तेदारी नाहीं. इतीहस संपवण्याच पाप आपण करू नये.
- 31 मे ची तारीख कां निवडली.. अहिल्या देवीची जयंतीची तारीख.. महाराष्ट्रात दंगल घडवायची कां?
- राज्यात असंतोष पसरवण्याचे काम करु नका.
- वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याला हात लावाल तर गाठ आमच्याशी आहे.. थेट इशारा
-हां मुद्दा वाढलं तर जशास तस उत्तर देवू
- छत्रपती महाराज यांना राजकिय पोळी भाजायची आणि महाराष्ट्र अशांत करायचा आहे.
- स्मारकाला हात लावताच सोडा नजर ही तिथं पर्यन्त पोहचू देणारं नाहीं.
- राजे हे मागणं बर नव्हं..
- मुख्यमंत्री यांची भेट घेण्यासाठी शिष्ट मंडळ जाणारं आहे. विनंती करु की चुकीच्या गोष्टीला थारा देवू नका..
- - होळकरांनी, महात्मा फुलेंनी आणि टिळकांनी काम केलें म्हणुन पाडायचे का?
महिला बालविकास मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये 15000 लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र
तर 61 महिलांनी स्वतःहून अर्ज घेतले मागे.
Anchor - सध्या लाडकी बहिण योजनेत नव्यानं करण्यात आलेल्या फेरबदलात अनेक महिलांचा अर्ज बाद होताना दिसतोय. अशातच आता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या जिल्ह्यातच एकूण 15000 लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत. अनेक महिलांचे कागदपत्रांच्या त्रुटीमुळे फॉर्म अपात्र झाले आहेत अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालयातून देण्यात आली आहे.तर 61 महिलांनी लाभात बसत नसल्याने स्वतःहून आपले अर्ज मागे घेतल्याची माहिती देण्यात आली आहे.
अँकर - अंध व्यक्तींना चालताना कुठल्याही अडथळ्याची पूर्वकल्पना मिळावी यासाठी विद्यार्थ्यांनी स्मार्ट शूज तयार केलेत. नांदेड शहरातील महात्मा फुले शाळेतील विद्यार्थ्यांनी हे स्मार्ट शूज तयार केले आहेत. या स्मार्ट शूज पुढे कुठलाही कडथळा आला तर हे स्मार्ट शूज लगेच बझर वाजवून अंध व्यक्तींना पूर्वकल्पना देतात. अर्डीनो युनो (Ardiuno uno) अल्ट्रासॉनिक सेन्सर (ultrasonic sensor) आणि बझर (buzzer) यांचा उपयोग करून हे स्मार्ट शूज बनवन्यात आले आहेत. बुटाच्या समोरच्या बाजूस अल्ट्रासॉनिक सेन्सर लावण्यात आलाय. हे सेन्सर अर्डीनो युनो आणि बझर शी जोडण्यात आले आहे. अर्डीनो युनो एखाद्या मदर बोर्ड प्रमाणे काम करते. बुटासमोर कुठलाही अडथळा आला तर अल्ट्रासॉनिक सेन्सर लगेच अर्डीनोयुनो ला माहिती कळवते आणि अर्डीनो युनो बझर ला कमांड देते. बुटासमोर अडथळा आल्यास क्षणार्धात बझर वाजने सुरु होते. सध्या अल्ट्रासॉनिक सेन्सर ची मर्यादा १० सेंटी मिटर पर्यंत ठेवण्यात आली आहे. ही मर्यादा सहज वाढवली जाऊ शकते.
अँकर:
नाशिकच्या पंचवटीतील श्रीकृष्ण नगर येथील गार्डनमध्ये दोन मुलांच्या खेळण्या वरून वाद झाल्याने एका अल्पवयीन मुलास बेदम मारहाण ....
बेदम मारहाणीचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल..
ह्या अल्पवयीन मुलाला केवळ एकच व्यक्ती नाही इतर तीन चार जण येऊन लाथा बुक्क्यांनी तुडवताना दिसून येत आहेत.
मार लागलेल्या अल्पवयीन मुलाला नाशिकच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले असून
मुलाच्या वडिलांनी पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये केला सदर घटनेचा गुन्हा दाखल..
नाशकातील उद्यान मध्ये कर्मचारी , सिक्युरिटी गार्ड नसल्यामुळे शहरातील सर्वच गार्डन देखील धोक्यात आले आहेत
या प्रकरणाचा सीसीटीव्ही प्राप्त झाला असून सीसीटीव्ही मध्ये ह्या अल्पवयीन मुलाला चार ते पाच जण लाथा बुक्क्यांनी तुडवताना दिसत आहे .
या घटनेविषयी अल्पवयीन मुलाचे वडील अरुण पवार यांनी अधिक माहिती दिली..
- नागपूर मधील हिंसाचाराच्या घटने नंतर youtube वर लोकांना माहिती देताना चुकीचे व्हिडिओ पोस्ट करू नये... जेणेकरून दोन समाजात तेढ निर्माण होईल असे व्हिडिओ post करू नये. कोणाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल असे व्हिडिओ पोस्ट करू नये.
- युट्यूबअर वर आमची नजर असणार आहे. यापुढे अशा पद्धतीचे काही आढळल्यास कारवाई केली जाणार आहे.
- हिंसाचाराच्या सर्व प्रकरणात आतापर्यंत 114 जणांना ताब्यात घेतले आहे..13 FIR दाखल झालेल्या आहे. त्यामध्ये आणखी लोकांना अटक करण्यात येत आहे. सोशल माध्यमातून वेगळे गुन्हे दाखल केले आहे.
- सोशल माध्यमांवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांची वेगळी टीम नजर ठेवून आहे. काही युट्युबर वर कारवाई केली आहे.
- ज्या गुन्हेगारांवर कडक कारवाई झाली पाहिजे, त्यासाठी आम्ही गुन्हे दाखल केले आहे.. अवैध बांधकाम असल्यास नियमितपणे कारवाई करत असतो. गुन्हेगाराची जात किंवा धर्म नसते. ज्या लोकाचे नाव निष्पन्न होईल त्यावरही अशाच पद्धतीची कडक कारवाई केली जाईल
On PM Tour
- पंतप्रधानाच्या दौऱ्याच्या अनुषंगाने आम्ही तयारी सुरू केली आहे. नागपुरात हिंसाचार घटनेला सात दिवस लोटलेले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आणि शांततेत आहे. पंतप्रधान यांच्या दौऱ्यात यांच्या सुरक्षेत कुठलीही तडजोड होत नाही. नागपूर पोलीस दौऱ्यात सुरक्षा पुरवण्यासाठी तयार आहे... पुढील काळात येणाऱ्या धार्मिक सण आहे. त्यावरही आम्ही लक्ष ठेवून आहे.
On pm दौरा बैठक.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने एसपीजी टीम अजून आलेली नाही.. स्थानिक पातळीवर ज्या बैठका आहे. त्या अनुषंगाने बैठक सुरू झालेल्या आहे.
फ्लॅश:- मुंबईच्या साकीनाका परिसरात हॉटेल लॉजिंग बोर्डिंग तोडक कारवाईच्या विरोधात मुंबई महानगरपालिका एल/वॉर्ड कार्यालयावर हॉटेल मालकांच्या मोर्चा.
मुंबई महानगरपालिका एल/ वॉर्ड कार्यालय कडून साकीनाका परिसरात अनाधिकृत लॉजिंग बोर्डिंग वर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे.
साकीनाका 90 फीट रोड परिसरात 108 अनधिकृत हॉटेल लॉजिंग बोर्डिंग वर पालिकेकडून कारवाई करण्याची तयारी सुरू आहे.
पालिकेच्या याच कारवाईचा विरोधात हॉटेल लॉजिंग बोर्डिंग असोसिएशन कडून आज मुंबई महानगर पालिकेचा एल/वॉर्ड कार्यालय वर मोर्चा काढण्यात आला.
यावेळी हॉटेल मालकांकडून पालिकेवर आरोप करण्यात आला आहे की साकीनाका चांदीवली परिसरात 60 ते 70 टक्के अनधिकृत बांधकाम असून मात्र हॉटेल लॉजिंग बोर्डिंग वर कारवाई करत असल्यामुळे पालिकेच्या विरोध करण्यात आले....
अभिनेता सोनू सूद यांच्या पत्नीच्या कारचे काल रात्री नागपुरात सोनेगाव पोलीस स्टेशन जवळ उड्डाणपूलावर अपघात झाले...
सोनू सूद यांची पत्नी सोनाली सूद त्यांच्या दोन नातेवाईकांसह कार ने नागपूरच्या दिशेने येत असताना सोनेगाव पोलीस स्टेशन समोरील उड्डाणपुलावर कार एका ट्रक सोबत धडकली...
यावेळी सोनाली सूद वाहन चालकाच्या बाजूच्या सीटवर समोर बसल्या होत्या.. मात्र अपघातानंतर एअर बॅग उघडले गेले आणि त्यामुळे सोनाली सूद आणि त्यांचे दोन्ही नातेवाईक जास्त जखमी झाले नाही...
दक्षता म्हणून सोनाली सूद यांना नागपूरच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे...
अकोल्याचे भाजप खासदार अनुप धोत्रे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्लीतील शासकीय निवासस्थानी सहकुटुंब भेट घेतलीय. या भेटीच्या वेळी खासदार अनुप धोत्रे, पत्नी समिक्षा आणि तिन्ही मुलांसमवेत पंतप्रधानांची भेट घेतलीय. यावेळी मोदी यांनी अनुप धोत्रे यांचे वडील आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या प्रकृतीबद्दल विचारणा केलीय. यावेळी पंतप्रधानांनी अनुप धोत्रे यांच्या मुलांशी संवाद साधलाय. यावेळी अनुप धोत्रे यांनी पंतप्रधानांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट दिलीय.
जालना -
रावसाहेब दानवे यांनी बनवले पोहे..
भोकरदन तालुक्यातील फत्तेपूर येथील आपल्या कार्यकर्त्याच्या (समाधान गायकवाड )यांच्या मुलाच्या लग्नाचं निमित्त साधून सकाळी रावसाहेब पाटील दानवे हे उपस्थितीत राहिले , यावेळी त्यांनी आचाऱ्यांकडे जाऊन स्वतः त्यांनी पोहे बनवन्याचा इच्छा व्यक्त केली, आणि काही पाहुणे मंडळी साठी त्यांनी पोहे बनवण्याचा आनंद घेतला.
अनिल परब
घटनेने दिलेले अधिकार आपल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचले आहेत कि नाही हे पाहाव लागेल.
सभागृहातील कायदे नियम घटनेच्या आधारावर बसले आहे.
आपल्याला जगायचं कसं बोलायचं काय राहायचे कसं यावर घटना भाष्य करते. मला बोलण्याच स्वातंत्र्य मिळाल आहे हे स्वातंत्र्य मिळाल म्हणून मी काहीही बोलू शकत नाही. सध्या असं होतं नाही. आता कोणीही उठतय देवाची विटंबना कर महापुरुषांची विटंबना करण सुरु आहे.
हल्ली काय झालं आहे की मी मांसाहार खायचा नाही. असं कोणीतरी म्हणत त्यांना हा अधिकार कुणी दिला? मटण कोणत खायचं झटका मटण खायचं की हलाल खायचं हे तुम्ही सांगणार का? एक मंत्री सांगतो आपण काय खायचं आणि काय खायचं नाही. राज्यात हिंदू मुस्लिम वाद होतील असं वातावरण आहे. माझ्या सोसायटीत नेपाळी वॉचमन आहे तो रात्रभर ओरडत असतो जागते राहतो. त्याला वाटत त्याच्या मुळे आम्ही सुरक्षित आहे. पण तसं नाही. सध्या असंच एक नेपाळी शाल अंगावर घेऊन फिरतोय आणि मीच हिंदू धर्म वाचवूशकतो असं सांगत आहे
महिला व बालकल्याण विभागानं केलेल्या अंगणवाडी मदतनीस पदभरतीत घोळ
तीन तासानंतर जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि भाजप गटनेत्यांचं ठिय्या आंदोलन मागं
दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाईचं अधिकाऱ्यांनी दिलं आश्वासन
Anchor : दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून भंडाऱ्यात अंगणवाडी मदतनीस आणि सेविकांच्या रिक्त जागांची पदभरती करण्यात आली. या पदभरती मोठ्या प्रमाणात आर्थिक घोळ करून पात्र उमेदवारांना डावलण्यात आल्याचा आरोप जिल्हा परिषदचे भाजपचे गटनेते विनोद बांते यांनी केला. ही पदभरती रद्द करून पात्र महिला उमेदवारांना संधी देण्यात यावी आणि पदभरती प्रक्रियेची संपूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ फेंडर, भाजपचे जिल्हा परिषद गटनेते विनोद बांते, पंचायत समिती सभापती प्रशांत खोब्रागडे यांनी जिल्हा परिषदेतचं ठिय्या आंदोलन केलं. यावेळी महिला व बालकल्याण अधिकाऱ्यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करीत झालेली पदभरती रद्द करावी आणि अन्यायग्रस्तांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी परब यांनी ठिय्या आंदोलनस्थळी येतं, प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाई करू आणि पात्र महिला उमेदवारांवर अन्याय होणार नाही, असं आश्वासन दिल्यानंतर तब्बल तीन तासानंतर हे आंदोलन मागं घेण्यात आलं.
बुलढाणा ब्रेकिंग
भरधाव दुचाकी झाडावर आदळून अपघात.
अपघातात तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू
चिखली जाफराबाद महामार्गावर भरधाव दुचाकी चे नियंत्रण सुटून दुचाकी झाडावर आदळून झालेल्या अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. चिखली - जाफराबाद मार्गावर भोकरवाडी जवळ हा अपघात झाला. अपघातात रोहित चाबुकस्वार, शुभम चाबुकस्वार, सोनू उसरे हे तीन तरुण ठार झाले. अपघातानंतर तात्काळ चिखली पोलिसांनी तिघांचे मृतदेह चिखली येथील रुग्णालयात आणलेत.
सदर बाजार येथील नागरिकांचे सातारा नगपालिका मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना निवेदन....
सातारा शहरातील सदर बाजार परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे सदर बाजार परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. गेल्या दोन - तीन दिवसांपूर्वी सदर बाजार येथील लहान मुलांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला सुदैवाने मुलांचे प्राण वाचले मात्र मुले गंभीर जखमी झाले आहेत..या घटनेचा CCTV देखील उपलब्ध आहे...स्थानिक नागरिकांनी सातारा नगरपालिका प्रशासनाला पत्राद्वारे तक्रार दिली परंतू कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे आज सदर बाजार येथील नागरिकांनी सातारा नगरपालिका मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना निवेदन देऊन लवकरात लवकर भटक्या कुत्र्यांची व्हीलेवाट लावण्यात यावी अशी मागणी केली आहे...
वाशिम
वाशिमच्या किंनखेडा शेतशिवार आणि डोंगर परिसरात भर दुपारी आग लागल्याची घटना घडली ..आग झपाट्याने डोंगरा सह शेतशिवार परीसरात पसरल्याने काही जनावरांचे गोठ्याला आग लागल्याने शेती उपयोगी साहित्यासह जनावरांचा चारा जळून राख झाला.. तर काही शेतकऱ्याने गोठ्यातून आपली जनावरे बाहेर काढण्यात यशस्वी झाले. तर काही शेतकऱ्यां सह गावातील नागरिक आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला मात्र उन्हाचा पारा आणि हवेचा वेग असल्याने आगीवर नियंत्रण मिळवणं शक्य झालं नव्हतं..या घटने नेमकी काय जीवितहाणी झाली या बद्दल माहिती कळू शकली नाही..
नालेसफाईसाठी २३ कंत्राटदार नियुक्त, मंगळवारपासून काम सुरू
महानगरपालिकेने छोट्या व मोठ्या नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी निविदा प्रक्रियेची छाननी पूर्ण केली असून, २३ कंत्राटदारांना नालेसफाईचे आदेश देण्यात आले आहेत. मंगळवारपासून या कामांना प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.
पालिकेने यंदा नालेसफाई अधिक प्रभावी करण्यासाठी नवा नियम लागू केला आहे. कंत्राटदारांना गाळ काढतानाचे छायाचित्र आणि ३० सेकंदांचे चित्रीकरण करणे बंधनकारक असेल. हे चित्रीकरण कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीद्वारे विश्लेषित केले जाणार आहे.
पालिकेने दोन महिन्यांत ८० टक्के नालेसफाई पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
दौंड शहरालगत असणाऱ्या बोरावके नगरमध्ये प्राईम टाऊन च्या पाठीमागे कचऱ्याच्या ढिगार्यात अर्भक आणि मानवी शरीराचे काही अवशेष आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रथमदर्शनी ही अर्भक आणि मानवी शरीराचे अवशेष हे प्रयोगशाळेतील नमुने असल्याची माहिती मिळत असली तरी हा गर्भपाताचा प्रकार आहे का या दृष्टीने देखील पोलीस तपास करीत आहेत.
स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी पोलिसांच्या 112 क्रमांकाला फोन करून या संदर्भातील माहिती दिली. यानंतर या ठिकाणी दौंड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पाहणी अंती पंचनामा करून डॉक्टरांचे वैद्यकीय पथक या ठिकाणी बोलावण्यात आले. हे अर्भक आणि अवशेष ताब्यात घेण्यात आले असून हे या ठिकाणी कसे आले याचा शोध आता घेतला जात आहे. वैद्यकीय तज्ञांच्या अहवालानुसार यानंतर पोलीस पुढील कारवाई करणार आहेत.
बाईट- बापूराव दडस, उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड
वकील निलेश ओझा, सतिश सालियनचे वकील
एफआयआरची कॉपी लेखी स्वरूपात आणण्यासाठी आम्ही आलो होतो
जेव्हा पोलीस अधिकारी आरोपी असतो तेव्हा लेखी तक्रार पोलीस कमिशनरला द्यावे लागते... त्यालाच FIR म्हणतात
आम्ही आमची बाब पूर्ण केली आहे, आता जबाबदारी पोलिसांची
आदित्य ठाकरे, दिनो मौर्य, सूरज पांचोली, त्यांचे बॉडीगार्ड रिया चक्रवर्ती, परमबीर सिंह, सचिन वाझे आणि उद्धव ठाकरे हे सर्व यात आरोपी आहेत
परमवीर सिंह यांनी आदित्य ठाकरे यांना कव्हर करण्यासाठी प्रेस घेतली
त्या ठिकाणी कुठलाही राजकीय पक्षाचा नेता उपस्थित नव्हता असे त्यांनी म्हटले... मोबाईल टॉवर पासून सर्वच गोष्टी यांना खोट्या म्हणताय
आदित्य ठाकरे ड्रग्स बिजनेस मध्ये आहेत हे आमच्या इन्वेस्टीगेशन मध्ये दिसलं., समीर खान यांनी कंपनी आहे त्याच्याशी कनेक्टिंग लोक आहेत...
आणखी काही नावे आहेत... मी आता घेत नाही..
आदित्य ठाकरे याला अटक करायला कोणी थांबवले..
आम्हाला सांगितले आहे तुमच्याकडून सर्व झाले आहे.. आता ते आपली प्रोसेस करतील...
पुरावा काय असतो हे समजून घ्यायला हवे.. ही लोक नरेतिव चालवतात... पाच वर्षाने जाग का आली असे विचारले...
११ मार्च ला सतीश सालियान यांनी SIT ला सांगितले दोन वर्षापूर्वी की हो आम्हाला केस ओपन करायलची आहे.
दिशा मृत्यू वेळी आदित्य तिथे होता की नाही? आणि त्या त्यांना कोणी वाचवले...
आजोबा वारल्याचे त्यांनी सांगितले होते... पण त्यांचे आजोबा त्या वेळी जिवंत होते..
दिशा सालियान स्टीव पिंटो यांनी त्यांच्या ट्विट मध्ये काही महत्त्वाचे लिहिले होते.. एकता कपूरच्या घरी ६ जून ला party झाली.... त्या दिवसापासून तो गायब आहे... त्याची पण चौकशी करावी..
आमची तक्रार खोटी निघाली तर आमच्यावर कारवाई करा आणि फाशी द्या.. पण FIR इन्वेस्टीगेशन करा त्यापासून का पळतात...
छत्रपती शिवाजी महाराजांचा हा देश आहे आणि एका मुलीच्या वडिलांना पाच वर्षे पळावे लागतात....
त्या आरोपीने छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणे सोडून द्यावं..
उद्धव ठाकरे यांनाही आरोपी केलेला आहे
समीर वानखेडे यांची ट्रान्सफर झाली होती... त्यांचा वकील कोर्टात एफिडेविट देत आहे....
समीर वानखेडे यांना मॅनेज नाही केला तर त्यांचे बदली केली...CAT मी ही बदली बेकायदा दाखवली...
त्यांना रोखण्यात आले होते... त्यांना कोणी रोखले ही ते सांगतील
उद्धव ठाकरे देखील आरोपी आहेत
आदित्य ठाकरे याचा गुन्हा रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा दुरुपयोग केला
सस्पेंड असलेल्या सचिन वाचायला मुख्यमंत्री झाल्यावर पदावर घेतलं आणि मोठी पोझिशन दिली
याचा मर्डर कर त्याचा मर्डर कर मनसुख हिरेन ला मार.. यासारहिबट्यांचा दबाव आहे
सतीश सालियान
मला शंभर टक्के न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे
पाच वर्षापासून दडपणात होतो
अभिनेता सोनू सूद यांच्या पत्नी सोनाली सूद या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात जखमी झाल्या आहेत. सध्या त्यांच्या प्रकृतीबाबत काळजीचं कारण नाही, अशी माहिती जवळच्या सूत्रांनी दिली आहे.
ही घटना काल नागपूरमध्ये घडली. सोनाली सूद यांच्या कारसोबत त्यांच्या बहिणीचा मुलगा आणि एक महिला प्रवासी होते. कारला ट्रकची जोरदार धडक बसली. मात्र, सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.
सोनाली सूद सध्या नागपूरमध्ये आहेत. अपघाताची माहिती मिळताच सोनू सूद आज सकाळी नागपूरला पोहोचले आहेत. अपघाताबाबत अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.
कुणाल कामरा याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही; चेहऱ्याला काळ घासून नग्न धिंड काढणार; शिंदेसेना आक्रमक....
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यावर कवितेच्या माध्यमातून आक्षेपार्ह टीका करणारे स्टॅंड अप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या विरोधात आता महाराष्ट्रामध्ये शिंदेसेना चांगलीच आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे. आज धुळ्यात कुणाल कामरा याच्या विरोधात शिंदेसेनेच्या मुख्य कार्यालयापासून ते संतोषी माता चौकापर्यंत प्रतिकात्मक पुतळ्याची अंतयात्रा काढत जोरदार निदर्शने केली. येणाऱ्या काळात कुणाल कामरा यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही आणि कुणाल कामरा याला महाराष्ट्रात आढळल्यास त्यांच्या तोंडाला काळे पासून त्याची नग्न दिंड काढू इशारा शिंदे शिवसेनेने दिला आहे...
धाराशिव ब्रेकिंग
..........
धाराशिवमध्ये शिक्षकाकडून आत्मदहनाचा प्रयत्न, शिक्षकाने ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतून घेतला
आंदोलनादरम्यान पोलिस आणि शिक्षकांमध्ये गोंधळ
पगारवाढीसह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रमक मोर्चा
सरकारने वाढीव टप्प्याचं आश्वासन दिल मात्र अधिवेशनात तरतूद नाही
अर्थमंत्र्यांनी शिक्षकांसाठी तरतूद केली नाही उलट आमदारांना दाब टाकला जातो, अजित पवारांविरोधात शिक्षकांचा रोष
शिक्षकाचे काही बरं वाईट झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार असेल शिक्षक आंदोलकांचा इशारा
आंदोलनादरम्यान शिक्षकाला अश्रू अनावर
प्रशांत कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी
कोर्टाच्या आवारात प्रशांत कोरटकर चप्पल फेकले...
कोर्टातून पोलीस ठाण्याला घेऊन जात असताना फेकले चप्पल
जयदीप शेळके यांनी फेकले कोरटकरवर चप्पल
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून नागपूरच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे आंदोलन करत गंभीर आरोप करण्यात आले आहे...
महाविद्यालयातील काही शिक्षकाकडून विद्यार्थ्यांचा खासकरून विद्यार्थिनींचा छळ होत असल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला आहे....
महाविद्यालयात प्राध्यापकाकडून इंटरनल मार्क देण्याकरिता विद्यार्थ्यांना धमक्या दिल्या जातात.. तसेच विद्यार्थ्यांसोबत द्वियर्थीय संवादांसह बोललं जातं, विद्यार्थिनींकडे वाईट नजरेने पाहिलं जातं असा गंभीर आरोप ही एबीव्हीपी ने केला आहे..
पुणे
पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर पाण्यासाठी महिलांचा हंडा मोर्चा
फुरसुंगी कचरा डेपो बाधित भागात गेले कित्येक वर्षी पाणी प्रश्न सुटत नाही म्हणून ग्रामस्थांनी काढला मोर्चा
मोर्चात मोठ्या संख्येने महिला हंडा घेऊन सहभागी
हंडा वाजवत केलं आंदोलन
गेले अनेक दिवस टॅंकरने पाणीपुरवठा केला जातोय पंधरा-पंधरा दिवस पाणी मिळत नाही,त्याच बरोबर रस्ता लाईट समस्या मोठ्या प्रमाणात आहेत.
या वेळेला आम्ही अनेक समस्या पत्र उपजिल्हाधिकारी यांना दिलेले आहेत त्यावर त्यांनी लवकरच तोडगा काढू असं सांगितलं आहे.
जर आमच्या प्रश्नावर तोडगा नाही निघाला तर आम्ही यापेक्षा उग्र आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय
बाईट संतोष हरपळे,ग्रामस्थ
भारतीय पुरातत्व विभागातील किल्ले देखभालीसाठी राज्याकडे द्या अशी विनंती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना पत्राद्वारे केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याच्या इतिहासाची साक्ष देणारे महाराष्ट्रात ५४ गडकिल्ले हे केंद्र संरक्षित तर ६२ गडकिल्ले राज्य संरक्षित या किल्ल्यांचे संरक्षण आणि जतन तसेच देखभाल आणि दुरूस्तीसाठी राज्य शासनाचे प्रयत्न आहेत. सगळे किल्ले राज्य शासनाच्या अखत्यारित दिल्यास त्यांची डागडूजी आणि देखभाल अत्यंत प्रभावीपणे करता येईल अशी पत्राद्वारे विनंती करण्यात आली आहे.
दिशा सालियनचे वडील सतीश सालियन मुंबई पोलीस आयुक्तालयात दाखल झाले आहेत. सतीश सालियन मुंबई पोलीस आयुक्तांना भेटून लेखी तक्रार देणार आहेत.
ज्या प्रकारे कुंभमेळ्याचा समावेश झाला. त्याच प्रमाणे युनेस्को साईटमध्ये पंढरपूरची वारीचं अमूर्त विरासती यादीमध्ये समावेश व्हावा, अशी मागणी भाजपचे राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील यांनी केली आहे.
भाजप आमदार नारायण कुचेंना अर्थमंत्री अजित पवारांनी भरला दम
आश्रमशाळांच्या आठवी, नववी, दहावीच्या वर्गांना मान्यता द्यावी, यासाठीच्या फाईल अर्थ विभागात पडून आहेत. तर अजित पवारांनी यावर उत्तर देण्याची मागणी केली.
ही काय प्रश्न विचारायची पद्धत नाही. अचानक असा कसा काय प्रश्न विचारत म्हणत अजित पवारांचा पारा चढला
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप ?
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात बोराडे नावाच्या व्यक्तीला चटके देण्याचा प्रकार समोर आला या प्रकरणात उद्धव ठाकरे गटाच्या तालुकाध्यक्षावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला
ज्याला चटके देण्यात आले तो स्वत सांगत होता की नवनाथ दौड याचा सहभाग नाही तरी सुद्धा स्थानिक नेत्याचा दबावामुळे गुन्हा दाखल करण्यात आला
स्थानिक भाजप नेत्याने पीआय माने यांच्यावर दबाव टाकून नवनाथ दौड याच्यावर गुन्हा दाखल केला
ज्यावेळी गुन्हा दाखल झाला त्यावेळी दौड हा आपल्या कुटुंबासोबत प्रयागराज येथे होता मात्र स्थानिक नेत्याचा दबावामुळे दौडवर गुन्हा दाखल करण्यात आला
भोकरदन येथे काम करणारे पीआय माने आणि डीवायएसपी हे दोघे स्थानिक भाजप नेत्याचा इतक्या जवळचे आहेत की त्यांनी केवळ भाजप नेत्याचा घरी पाणी भरण बाकी असल्याचा आरोप
सध्या या तालुक्यात जो कोणी भाजप विरोधी काम करतोय त्याला गुन्ह्यांत अडकवून अडचणीत आणतात आणि भाजप मधे घेतात असा सर्रास प्रकार सुरू आहे- दानवे
पुण्यात शाळेत निघालेल्या मुलीवर लैंगिक अत्याचार
खाऊच्या आमिषाने नराधमाने केलं चौथीच्या विद्यार्थ्यानीवर कृत्य
पुण्याजवळील वाघोलीत सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला
२७ वर्षीय नराधम तरुणाला अटक करण्यात आली आहे
कोयना विभागातील अतिदुर्गम व चांदोली अभयारण्याच्या कोअर झोनमधील कोळणे गावात एका वृध्दावर अस्वलाने हल्ला करून त्यांना गंभीररित्या जखमी केल्याची घटना घडली असून त्याच्यांवर कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. अर्जुन मानू डांगरे (वय - ८०) असे जखमी वृद्धाचे नाव आहे. आता 5G नेटवर्क मिळत असताना पाटण तालुक्यात नेटवर्क मिळत नसल्याने रेंजच्या शोधात असलेल्या वृध्दावर अस्वलाने जीवघेणा हल्ला केला.
दरम्यान, वन्यप्राण्यांच्या ग्रामस्थांवरील वाढत्या हल्ल्यामुळे नागरीकांमध्ये चांगलेच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या हेळवाक वनपरिक्षेत्रातील अतिदुर्गम ठिकाणी वसलेल्या कोळणे येथील अर्जुन डांगरे हे मोबाईलला रेंज येत नसल्या कारणाने मोबाईलला नेटवर्क असलेल्या ठिकाणी फोन करण्यासाठी गेले होते. त्याठिकाणी त्यांच्यावर अचानक अस्वलाने हल्ला चढवत त्यांना गंभीररित्या जखमी केले. या हल्ल्यात डांगरे यांच्यावर हातावर व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. यावेळी ग्रामस्थांनी आरडाओरडा केल्यानंतर अस्वलाने तेथून धूम ठोकली.
या घटनेची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागाला दिल्यानंतर ग्रामस्थ व वन्यजीव विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी अर्जुन डांगरे यांना तात्काळ उपचारासाठी हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले.
हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी कराड येथील कृष्णा रुग्णालयात हलविण्यात आले. अस्वलाच्या हल्ल्यात अर्जुन डांगरे यांच्या हातावर व डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांची प्रकृती नाजूक असल्याचे समजत आहे.
वैराग आणि परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे द्राक्ष बागांचे नुकसान
वैराग परिसरातील मालेगाव शिवारात अचानक आलेल्या पावसामुळे द्राक्षबागा झाल्या आडव्या
मालेगावचे शेतकरी सुभाष घोडके यांच्या 1 हेक्टर द्राक्ष बागेला बसला फटका
ऐन काढणीला आलेले द्राक्ष जमीनदोस्त झाल्यामुळे 15 ते 20 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा शेतकऱ्यांने केला दावा
त्यामुळे झालेल्या नुकसानाची पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
Mumbai News : शासकीय जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून अनधिकृत पणे बांधकाम करण्यात आली आहे. यातील काही ठिकाणी धार्मिक स्थळे तयार करण्यात आली आहे, यावर कधी कारवाई करण्यात येईल? असा सवाल संजय उपाध्याय यांनी केला होता. यावर उत्तर देत मंत्री उदय सामंत म्हणाले की, 20 वर्ष अगोदर अनधिकृत बांधकाम झाली आहेत. ती कोणाच्या आशीर्वादामुळे बांधकाम झाले याची चौकशी केली जाणार. म्हाडासोबत बैठक झाली आहे. त्यावर कारवाई करण्यात येईल असेही ते म्हणाले. भोसले समिती सर्व कागद पत्र ठेवण्यात येईल आणि त्याची तपासणी केली जाईल. किंबहुना कारवाई देखील करण्यात येईल. असेही मंत्री मंत्री उदय सामंत म्हणाले.
नाशिक शहरात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून अघोषित पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून नाशिक शहरातील सिडको, सातपूर, अंबड या परिसरात पाणीपुरवठा होत नाही त्यामुळे शहरवासीयांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाण्याचे टँकर बोलवत आणि इतर ठिकाणी बोरवेल वरून पाण्याची व्यवस्था नागरिकांना करावी लागत आहे. तर टँकरचे भाव देखील दुप्पट झाल्याने आर्थिक फटका देखील नागरिकांना बसत आहे.
- अन्न औषध प्रशासन विभागाची नाशिक मध्ये मोठी कारवाई
- नाशिक मध्ये शेकडो किलो बनावट पनीर अन्न औषध प्रशासन कडून जप्त
- गुढीपाडवा आणि रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर राबवलेल्या सर्च मोहिमेत अन्न औषध प्रशासनाकडून कारवाई
- नाशिकच्या अंबड येथील साई इंटरप्राईजेस या कारखान्यावर छापा टाकत जप्त केला पनीर साठा
- जप्त केलेले पनीर निळी शाई टाकून नष्ट करत थेट महापालिकेच्या घंटागाडीत टाकण्यात आले
- 47 हजार 800 रुपयांच 239 किलो बनावट पनीर जप्त करत केले नष्ट.
Satara : साताऱ्यातील अत्यंत रहदारीचा व वर्दळीचा असलेल्या गोडोली नाक्यावर प्रचंड अतिक्रमणे वाढत आहेत. या नाक्यावर अजिंक्यतारा किल्ला, पोवईनाका, जिल्हा परिषद, रहिमतपूर तसेच कराडकडे येणारे रस्ते आहेत. त्यामुळे वाहनांसह नागरिकांची प्रचंड गर्दी या चौकात असते. अशातच सातारा पालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे हटवली.काही विक्रेते वशिल्याने अतिक्रमणे करून वाहतुकीच्या कोंडीस कारणीभूत ठरत असतात. वाहतुकीस अडथळा ठरणारी गोडोली नाक्यावरील अतिक्रमणे काढावीत, अशा तक्रारी नगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाकडे आल्या होत्या. त्यामुळे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे आदेश अतिक्रमण विभागाला दिले होते. दरम्यान अतिक्रमण विभाग प्रमुख प्रशांत निकम यांनी अतिक्रमण विभागाच्या टीमला सोबत घेऊन ८ टपऱ्या व २ खोकी हटवली. या कारवाईमुळे गोडोली नाक्याने मोकळा श्वास घेतला.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता
महात्मा फुले कृषी विद्यापीठाची पुण्यातील हेरिटेज इमारतीत तोडफोड करून नवीन लक्झरी कार्यालय तयार करण्याचा कोकाटेंचा घाट
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पुणे शहराध्यक्षाची कोकटेंवर टीका
फडणवीस आपल्या मंत्र्याचे प्रताप थांबवा म्हणून प्रशांत जगतापांची टीका
काम थांबवलं नाही तर हाय कोर्टात जाण्याचा इशारा
ट्वीटमध्ये नेमकं काय?
देवेंद्रजी फडणवीस... आपल्या मंत्र्यांचे प्रताप थांबवा !
गरिबांचे फ्लॅट्स हडपूनही मंत्री पदाला चिकटून असलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा नवीन प्रताप आज उघडकीस आला. या मंत्रिमहोदयांना मुंबईतील मंत्रालयात प्रशस्त दालन आहे, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कृषी खात्याचे कार्यालय आहे, तरीही या मंत्र्यांची मौज मजेची लालसा काही शमली नाही. म्हणूनच, महात्मा फुले कृषी विद्यापीठाची पुण्यातील हेरिटेज इमारतीत तोडफोड करून नवीन लक्झरी कार्यालय तयार करण्याचा घाट कोकाटे यांनी घातला.
अशा प्रतापी मंत्र्यांवर महायुतीची विशेष मर्जी असते, म्हणूनच सरकारकडून त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता शून्य आहे. त्यांच्या या कृत्याचा विरोध करण्यासाठी लवकरच आम्ही माननीय उच्च न्यायालयात जाणार आहोत.
वाघाची शिकार तस्करी करणाऱ्याला दिसता क्षणी ठोका, आसामच्या धर्तीवर राज्यात कठोर कायदा करा,आमदार मिलिंद नार्वेकर यांची सभागृहात लक्षवेधी
शिंदे साहेब तुम्ही सुद्धा हे ऐका, आपल्या दोघाना यामध्ये मिळून काहीतर करावं लागेल
येथेच आपण कितीतरी वाघ बसले आहोत असं म्हणतो... आता याच आपल्या वाघानी एकत्र येऊन या वाघाना वाचण्यासाठी काहीतरी करावं, असं म्हणत आपला प्रश्न मिलिंद नार्वेकर यांनी मांडला
याप्रकारे आसाम मध्ये गेंड्याच्या तस्करी करणाऱ्या टोळी विरोधात कठोर कायदा करण्यात आला आणि दिसताक्षणी गोळ्या घालायचा हा कायदा करण्यात आला...
अगदी तसंच कायदा राज्यात सुद्धा करावा लागेल, राज्यात सुद्धा वाघाची तस्करी आणि शिकार करणाऱ्यांची टोळी कार्यरत असल्याची माहिती मिलिंद नार्वेकर यांनी दिली
राज्यात वाघाची तस्करी सुरू असून टिपेश्वर अभयारण्यातील पीसी वाघिणीची तस्करी करण्यासाठी तिच्या गळ्यात तारेचा फा अडकल्याची घटना ताजी असताना पवणार येथे पिकेडी टी- ३३ च्या वाघिणीच्या गळ्यातही असाच फास आढळला
त्यामुळे राज्यात अशा प्रकारचा कायदा करता येईल का? याचा आढावा घेऊन निर्णय घेऊ असं उत्तर वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले
चीज अॅनालॉग अर्थात बनावट पनीर संदर्भात आज महत्त्वाची बैठक
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलावली बैठक
भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या लक्षवेधीनंतर बैठक
राज्यात सर्रास वापरल्या जाणाऱ्या या पदार्थाने आरोग्यास धोका
विक्रमसिंह पाचपुतेंनी सभागृहात दाखवले होते बनावट पनीर
नियोजन, वित्त, गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिव बैठकीस लावणार हजेरी
कराडचे कार्यमुक्त मुख्याधिकारी शंकर खंदारे लाच घेताना सापडले
दहा लाख रुपयाची लाचेची मागणी
पाच लाख रुपये स्वीकारताना रंगेहात सापडले
खाजगी इसमासह सहाय्यक नगररचनाकार, कनिष्ठ लिपिक ही लाचलुचपतच्या जाळ्यात
पाच दिवसांपूर्वी राज्यपालांच्या आदेशाने कार्यमुक्त केले होते शंकर खंदारेंना
बसचालकाचा विद्यार्थीनीवर अत्याचार,आरोपीला उमरखेड पोलीसांनी केलीय अटक
यवतमाळच्या उमरखेड येथील शासकीय वस्तीगृहात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीवर एसटी बसचालकाने केला अत्याचार
उमरखेड वरून नागपूर इथे नेऊन बस चालकाने विद्यार्थीनीवर केला अत्याचार,या प्रकरणी आरोपी बस चालकाला पोलीसांनी अटक केलीय
संदीप कदम असे बस चालक आरोपीचे नाव आहे,नागपूर बस डेपोमध्ये कार्यरत असून वस्तीगृहातील पिडीत विद्यार्थीनीवर नेहमी अत्याचार करित असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
खोक्याची बीड पोलिसांकडून शाही बडदास्त...
बीडच्या जेल बाहेर खोक्याला बिर्याणी च जेवण.?,
जेलबाहेर खोक्या बिनधास्त मोबाईल वर बोलतानाचाही व्हिडिओ समोर. काल दुपारचा हा व्हिडिओ असल्याची माहिती.
कोणत्याही परवानगी शिवाय परिवारा सोबत भेट...
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरात महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील लोककलावंत कृष्णाई प्रभाकर उळेकर यांचा रंग भारुडाचे वारी लोककलेची हा रंगतदार लोककलेवर आधारित कार्यक्रम पार पडला शहरातील श्रीराम मंगल कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी उमरगा- लोहारा तालुक्यातील आजी माजी लोकप्रतिनिधी सह विद्यार्थी,विद्यार्थिनी, कला प्रेमी,पोलीस अधिकारी,व्यापारी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
होळी सण संपला की मच्छिमार बांधव पुन्हा आपल्या मासेमारीकडे वळतात.. यंदा मच्छिमारी करणाऱ्या कोळी बांधवांना माकूळ ही मासळी जास्त प्रमाणात सापडली आहे. या मासळीला बाजारात देखील चांगला भाव मिळत असल्याने मच्छिमार बांधव खुश आहेत. प्रति किलो या मासळीचा सध्याचा बाजार भाव 300 ते 400 रुपये किलो असा मिळत असून ही मासळी परदेशात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाठविली जाते. अलिबाग मधील मच्छिमारी करणाऱ्या कोळी बांधवांना यंदाच्या होळीच्या हंगामानंतर मोठ्या प्रमाणात ही मासळी सापडली आहे. त्यामुळे अनेक मच्छिमार बांधव खुश असल्याच पाहायला मिळतय. आवक वाढल्याने सामान्य माणसानं देखील होलसेल दरात ही मासळी विकण्यासाठी आवाक्यात आल्याने अलीबागच्या कोळीवाडा परिसरात ही मासळी घेण्यासाठी गर्दी होत आहे.
वर्ग सुरू असताना विद्यार्थिनीने मागे वळून पाहिल्याने संतप्त शिक्षिकेने तिला जबर मारहाण केल्याची घटना चेंबूर परिसरात घडली आहे.
चेंबूरच्या सिंधी कॉलनी परिसरातील एका खाजगी शाळेत तीन दिवसांपूर्वी ही घटना घडली आहे.
याच शाळेत पाचवी इयत्तेत शिकणारी मुलगी शाळेत वर्ग सुरू असताना मागे पाहत होती.
सीसीटीव्ही फुटेज आणि सोशल मीडियावरील फूटप्रिंटसच्या आधारे नागपूर पोलिसांनी नागपूर मध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी आणखी तीन आरोपींना अटक केली आहे.. त्यामुळे अटक करण्यात आलेल्या एकूण आरोपींची संख्या 113 वर पोहोचली आहे.
मोहम्मद शारिक रजा, मोमीन मोहम्मद फिरोज खान आणि शोएब मोहम्मद बेग अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. हिंसाचार घडला त्या दिवशी रात्रीचे विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तसेच सोशल मीडियावरील फुटप्रिंट्स च्या आधारावर सध्या नागपूर पोलीस आरोपींचा शोध घेत आहे आणि त्या आधारावरच पोलिसांनी या तिघांना अटक केली आहे..
पंधरा मिनिटांमध्ये जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये प्रशांत कोरटकरला आणलं जाणार आहे.
सध्या उन्हाळा सुरू आहे. तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागलेली आहे, असे असताना जिल्ह्यातील जलसाठ्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात घट होताना पाहायला मिळत आहे. पूर्ण पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार हिंगोली जिल्ह्यांमध्ये एकूण 27 लघु मध्यम आणि मोठे सिंचन प्रकल्प आहेत. यापैकी आठ तलावामध्ये 25% हून जास्त पाणी आहे. तर दहा तलावात त्यापेक्षाही कमी आहे. दोन तलाव कोरडे आहेत. तर सात तलावाची पाणी पातळी ही ज्योत्याखाली गेल्याच साप्ताहिक पाणी पातळी अहवालामध्ये समोर आला आहे. याचा याचा परिणाम शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्यावरही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मेहुणीचा विवाह असल्यानं हळदीच्या कार्यक्रमाकरिता आलेल्या जावयाचा अज्ञात वाहनानं दिलेल्या जबर धडकेत मृत्यू झाला. ही घटना भंडाऱ्याच्या लाखांदूर इथं रात्री घडली. राहुल मिसार (३८) असं मृतकाचं नावं असून ते चंद्रपूर जिल्ह्यातील पिंपळगाव भोसले येथील रहिवासी आहेत. मृतक राहुल मिसार यांची भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील आतली या गावची सासुरवाडी आहे.
जालन्यातील परतूर तहसील कार्यालयाच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. रात्री साडे नऊच्या सुमारास लागलेल्या या आगीत जुने साहित्य आणि महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि तब्बल अडीच तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.
नेमकी ही आग कशामुळे लागली याबाबत मात्र अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्राच्या गोडाऊनला भीषण आग
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या डहाणू तालुक्यातील भराड येथील धान गोडाऊनला पहाटे भीषण आग
आगीत शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेले भात मोठ्या प्रमाणात जळून खाक
शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा अंदाज
अग्निशमन दलाच्या सहाय्याने आग विझवण्याचे प्रयत्न
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra News LIVE Updates: शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला पोलिसांनी मुसक्या बांधून कोल्हापूरात आणलं, कोर्टात सुनावणीला सुरुवात