Maharashtra News Updates 5th January 2023 : यवतमाळ: दोन निवासी डॉक्टरांना एका रुग्णाच्या नातेवाईकांकडून चाकू हल्ला, जखमी डॉक्टरांवर उपचार सुरु; निवासी डॉक्टर संपावर

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 05 Jan 2023 10:57 PM
महाविद्यालयीन युवकाचा खून केल्याच्या आरोपावरुन तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
इंदापूरमध्ये पुर्व वैमनस्यातून वीस वर्षीय महाविद्यालयीन युवकाचा खून केल्याच्या आरोपावरुन तिघांविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रणव करे असे मयताचे नाव आहे. प्रणव हा इंदापूर तालुक्यातील करेवाडी गावचा रहिवासी आहे. राजकुमार पवार, इरफान शेख ,फरदिन मुलाणी अशी आरोपींची नावे आहेत. प्रणवचा भाऊ प्रतिक नानासाहेब करे याने या प्रकरणी फिर्याद दिली आहे.मयत प्रणव यास आरोपी जीवे ठार मारण्याची धमकी देत होते. फिर्यादी त्यांना विचारणा करण्यास गेला. त्यावेळी त्याला ही धमकावण्यात आले होते. आरोपींनी प्रणव याचा पाठलाग करून कशाने तरी मारहाण करून त्याला जीवे ठार मारले आहेअसे दिलेल्या फिर्यादीत प्रतिक करे याने म्हटले आहे. इंदापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
यवतमाळ: दोन निवासी डॉक्टरांना एका रुग्णाच्या नातेवाईकांकडून चाकू हल्ला, जखमी डॉक्टरांवर उपचार सुरु; निवासी डॉक्टर संपावर

यवतमाळमध्ये दोन निवासी डाॅक्टरांना एका रुग्णाकडून चाकूनं गंभीर जखमी केल्यानंतर डाॅक्टर आक्रमक


हल्ला केल्यानंतर दोन्ही निवासी डाॅक्टरांवर उपचार सुरु 


यवतमाळमधील शासकीय रुग्णालयातील संध्याकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारासची घटना 


यवतमाळमधील निवासी डाॅक्टर हल्ल्यामुळे संपावर 


उद्यापासून पुन्हा महाराष्ट्रातील निवासी डाॅक्टर संपावर जाण्याच्या तयारीत

राज्यात एकूण नऊ कोटी दोन लाख 85 हजार 801 मतदार - - मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

भारत निवडणूक आयोगामार्फत दि. १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. यानुसार राज्यात एकूण नऊ कोटी दोन लाख ८५ हजार ८०१ मतदारांची नोंदणी झाली असल्याची माहिती अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यावेळी उपस्थित होते.

Nanded News: नांदेड जिल्हा परिषदेमधील धक्कादायक प्रकार,संचिका गायब केल्या प्रकरणी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

Nanded News: नांदेड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता सिद्धगोंडा बिरगे यांनी अर्धापूर येथील एका संस्थेला नियमबाह्य नैसर्गिक वर्ग वाढ करण्याची मान्यता दिलीय. एवढेच नाहीतर ती फाईलच गहाळ केल्याने शासनाची फसवणूक करण्यात आली. हा धक्कादायक प्रकार लातूरच्या उपविभागीय कार्यालयाला समजताच त्यांनी पुणे येथील मुख्य कार्यालयाला तशी माहिती कळविल्यानंतर त्या कार्यालयाच्या आदेशावरून अखेर वजिराबाद पोलीस ठाण्यात डॉ. सविता बिर्गे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

१४ वर्षाच्या मुलीने सोसायटीच्या टॅरेसवरुन उडी मारण्याचा प्रयत्न

विरार :  मावशीने मोबाईल खेचल्याने रागाच्या भरात एका १४ वर्षाच्या मुलीने सोसायटीच्या टॅरेसवरुन उडी मारण्याचा प्रयत्न केला. माञ विरार पोलीस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने त्या मुलीचे प्राण वाचवण्यात यश मिळालं आहे. 


आज सायंकाळी साढे सहा च्या सुमारास विरारच्या मनवेल पाडा येथे आपली मावशी कडे राहायला आलेली १४ वर्षाची मुलगी ही मोबाईल वर बोलत होती. मावशीने मोबाईलवर जास्त बोलू नको म्हणत, खेचून घेतला. आणि रागाच्या भरात त्या अल्पवयीन मुलीने आत्महत्येचा पाउल उचळलं. सोसायटीच्या पाचव्या मजल्याच्या टॅरेसवरील कठड्यावर चढून आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.  माञ आजूबाजूच्या नागरीकांनी बघितल्यानंतर मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला. स्थानिक पोलीसांनी मुलीचे आई वडिलांना बोलावून तिच काउन्सलिंग केलं आणि तिला खाली उतरवलं. मुलगी नालासोपारा पूर्वेला राहते. ती आपल्या मावशीकडे राहायला आली होती. मुलीची समजूत काढण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण भोसले, पोलीस हवालदार नरेंद्र गायकवाड, पोलीस शिपाई सुधीर सापते यांनी जवळपास दिड तास प्रयत्न केले.

Mumbai News: वरळीस्थित नॅशनल इन्शुरन्सची इमारत पाडण्यास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

वरळीस्थित नॅशनल इन्शुरन्सची इमारत पाडण्यास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी


वरळीतील 114 वर्ष जुनी इमारत पाडण्याचे निर्देश देणार्‍या हायकोर्टाच्या साल 2019 मधील आदेशात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार दिला


सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाचे आदेश


इमारतीतील सामान काढण्यासाठी सुप्रीम कोर्टानं याचिकाकर्त्यांना दिली आठवड्याभराची मुदत

आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्यांना पेन्शन सुरू करण्याचा निर्णय; मविआ सरकारच्या काळात पेन्शन बंद करण्याचा झाला होता निर्णय

आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्यांना पेन्शन सुरू करण्याचा निर्णय; मविआ सरकारच्या काळात पेन्शन बंद करण्याचा झाला होता निर्णय

कल्याण खडकापाडा पोलिसांची कारवाई, तब्बल 41 गुन्हे दाखल असलेला सराईत चोरटा अखेर पोलिसांच्या जाळ्यात

तब्बल ४१ गुन्हे दाखल असलेल्या व गेली अनेक महिने फरार असलेल्या एका सराईत चोरट्याला अटक करण्यात कल्याण खडकपाडा पोलिसांना यश आलंय.अटक करण्यात आलेल्या सराईत चोरटय़ाचे नाव  गुलाम अली सरताज अली जाफरी उर्फ नादर असे आहे. कल्याण जवळील आंबिवली परिसरातील इराणी वस्तीतून  नादर ला सापळा रचत केली आहे .नादर विरोधात वसई, विरार, नाशिक,  पुणो, गुजरात, ठाणे, नवी मुंबई, दादर याठिकाणी चोरी आणि फसवणूकीचे गुन्हे दाखल आहेत


नादर हा सराईत गुन्हेगार असून तो बतावणी करण्यात पटाईत आहे. बतावणी करुन तो कोणालीही फशी पाडतो. गेल्या दोन वर्षात त्याने विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत ४१ चोरी आणि फसवणूकीचे प्रकार केले आहेत. कल्याणच्या खडकपाडा पाेलिस ठाण्यातही या चाेरट्याच्या विराेधात गुन्हा दाखल आहे. कल्याण जवळील आंबिवली येथील इराणी वस्तीत नादर येणार असल्याची खबर पाेलिसांना मिळाली हाेती. पाेलिसांनी माेठ्या शिताफीने सापळा  रचून त्याला पकडले आहे. आंबिवली येथील इराणी वस्ती ही कुप्रसिद्ध आहे. या वस्तीतून अनेक सराईत चोरटय़ांना पोलिसांनी अटक केलेली आहे. यापूर्वीही पोलिसांनी या वस्तीत कोंबिंग ऑपरेशन करुन चोरटय़ांचा बंदोबस्त केला आहे. काही वेळेस चोरटय़ांना जेरबंद करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या गाडय़ांवर दगडफेकीचे प्रकार घडले आहे. या दगडफेकीत चोरटे पसार झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. याशिवाय काही चोरटय़ांनी आत्मदहन करन्याचा प्रयत्न करत  पोलिसांना चावा घेतल्याचा आणि मारहाण केल्याचा प्रकारही या वस्तीत  घडला आहे.

वरळीस्थित नॅशनल इन्शुरन्सची इमारत पाडण्यास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

वरळीस्थित नॅशनल इन्शुरन्सची इमारत पाडण्यास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी


वरळीतील 114 वर्ष जुनी इमारत पाडण्याचे निर्देश देणार्‍या हायकोर्टाच्या साल 2019 मधील आदेशात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार दिला


सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाचे आदेश


इमारतीतील सामान काढण्यासाठी सुप्रीम कोर्टानं याचिकाकर्त्यांना दिली आठवड्याभराची मुदत

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उद्योगपती मुकेश अंबानी यांची भेट घेतली

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उद्योगपती मुकेश अंबानी यांची भेट घेतली

अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना घड्याळ दाखवलं अन नंतर उपमुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अजित पवार 'विराजमान' झाले.

अजित पवार हे देवेंद्र फडणवीस आणि विभागीय आयुक्त सौरव राव यांना घड्याळ दाखवत आहेत. महाराष्ट्र ओपन एटीपी चॅम्पियनशीप स्पर्धेचं पारितोषिक सहा वाजता होणार आहे. मात्र महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धेचा शुभारंभ अद्याप ही सुरूच आहे. अजित पवार वारंवार घड्याळाकडे बोट दाखवून तेच सूचित करावेत, अशी चर्चा सभागृहात रंगली होती. म्हणूनच स्वागत गीत होताच सूत्रसंचालक जितेंद्र जोशी यांनी प्रस्तावना होईल असं सूचित केलं. तेंव्हा अजित पवार क्रीडा सचिव सुहास दिवसेंवर खडसावले आणि आधी स्पर्धेची मशाल पेटवून शुभारंभ करायला सांगितलं. मग दिवसे यांनी सूत्रसंचालकांना तसं सूचित केले. मग मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, क्रीडामंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धेचे अध्यक्ष अजित पवार खुर्चीवरून उठले आणि या सर्वांनी राज्य ऑलिम्पिक स्पर्धेची मशाल पेटवून उद्घाटन केलं. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुढच्या दौऱ्यासाठी जायचं असल्यानं ते पुढं रवाना झाले. त्यानंतर मात्र अजित पवार हे उपमुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर विराजमान झाले.

Beed News: रस्त्याच्या कामाच्या लेखी आश्वासनानंतर महिला सरपंचाने स्वीकारला सरपंच पदाचा पदभार

Beed News: बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील गांजपूर गावच्या नवनिर्वाचित सरपंच कस्तुरबाई पवार यांनी गांजपूर्व तांबवा या दोन गावाला जोडणारा रस्ता जोपर्यंत प्रशासनाच्या वतीने होणार नाही तोपर्यंत सरपंच पदाचा पदभार स्वीकारणार नसल्याचे एक निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले होते. आता, त्यानंतर एक महिन्यांनी  प्रशासनाकडून थांबवा ते गांजपूर या रस्त्याचे लेखी आश्वासन देण्यात आले आहे. त्यानंतर आता कस्तुरभाई पवार यांनी सरपंच पदाचा पदभार स्वीकारला आहे.

उजनी धरण पाणी संघर्ष समितीच्या सदस्यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट

उजनी धरण पाणी संघर्ष समितीच्या सदस्यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट


पाणी बचाव संघर्ष समितीने उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन लाकडी निंबोडी योजनेच्या माध्यमातून उजनीचे पाणी बारामती इंदापूरला देऊ नये अशी विनंती केली


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक थेंबही पाणी जाऊ देणार नाही आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही  असे आश्वासन दिल्याचा समितीचा दावा


याचबरोबर लवकरच एक बैठक लावून यावर निर्णय करू असे आश्वासनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची संघर्ष समितीची माहिती


उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे सदस्य मुबीना मुलाणी यांची माहिती


उजनी धरणातून इंदापूर-बारामती तालुक्याला पाणी 5 टीएमसी पाणी देण्याबाबतची ही योजना आहे


महाविकास आघाडी सरकारने ही योजना रद्द केल्याचे सांगितले होते


दरम्यान विरोधी पक्षात असताना भाजपने या योजनेला विरोध केला होता मात्र शिंदे-भाजपा सरकारने सत्तेत येताचbपुन्हा त्याचे टेंडर काढल्याने संघर्ष समिती आक्रमक


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने तुळशीचा हार घालत केला सत्कार

भंडारा : देशी कट्ट्यासह दोघांना अटक....दोन मॅगझीन, 12 जिवंत काडतुस जप्त

भंडारा : देशी कट्टा स्वतः जवळ बाळगणाऱ्या आरोपीच्या हाताने मिस फायर झाल्याने तो जखमी झाल्याचे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणी प्राणघातक देशी कट्ट्यासह जिवंत काडतुस बळगणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन मॅगझीन, 12 जिवंत काडतुस पोलिसांनी जप्त केली आहे. तर, जखमी आरोपीवर भंडाऱ्यात उपचार सुरू आहे. ही कारवाई भंडाऱ्यातील अड्याळ पोलिसांनी केली. या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे.


आशुतोष प्रदीप गेडाम (25) रा. बेला असे मिस फायर मध्ये जखमी झालेल्या आरोपीचे नाव आहे. तर, विपीन सुधीर रामटेके (25) रा. बोरगाव, मिथुन आसाराम दहिकर (32), बोरगाव या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. जखमी आशुतोष वर भंडाऱ्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. जखमी आणि पोलिसांच्या अटकेतील आरोपी हे मित्र असून मिथुन इंजिनिअरिंग आणि आशुतोष व विपीन हे दोघे एमएससी असे उच्च शिक्षित आहेत. 3 जानेवारीला तिघेही पवनी तालुक्यातील बोरगाव ते खापा जाणाऱ्या मार्गावर उभे असताना आशुतोष गेडाम याच्या जवळील देशी कट्ट्यातून अचानक गोळी चालली. त्यामुळे गोळी त्याच्या पायाला लागल्याने तो स्वतः जखमी झाल्याने त्याला भंडारा येथील रुग्णालयात दाखल केले असता प्रकरण समोर आले. याप्रकरणी अड्याळ पोलिसांनी तिघांवर गुन्हे दाखल केले असून दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून देशी कट्टा, दोन मॅगझीन, 12 जिवंत काडतुस असा 40 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर जखमीवर उपचार सुरू आहे. घटनेचा अधिक तपास अड्याळ पोलीस करीत आहे.

सोलापूर शहरात स्मार्ट सिटीच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांच्या जीविताला धोका

सोलापूर शहरात स्मार्ट सिटीच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झालाय. शहरातील रंगभवन चौकामध्ये करण्यात आलेल्या आधुनिक पद्धतीच्या ड्रेनेजवर पूर्णपणे जाळी न लावल्याने नागरिक ड्रेनेमध्ये पडत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. त्यामुळे नागरिकांचे पाय फ्रॅक्चर होणे हात फ्रॅक्चर होणे अशा घटना घडल्या आहेत. अक्कलकोट येथील रहिवासी असलेले अब्दुल उस्मान मुल्ला या 65 वर्षीय वृद्ध व्यक्तीला देखील या कारभाराचा फटका बसला. बसमधून उतरल्यानंतर मुल्ला यांचे पाय या उघड्या ड्रेनेज मध्ये गेल्याने त्यांच्या घुडघ्याचे हाड अक्षरशः तुटले आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना तात्काळ ऑपरेशनचा सल्ला दिलंय. रंगभवन चौकामध्ये अक्कलकोटला जाण्यासाठीचा थांबा असलेल्या ठिकाणी हे प्रकार घडत आहेत. त्यामुळे नागरिकांमधून संतापाची लाट उसळलेली पाहायला मिळते. महापालिका प्रशासन याबाबत जागृत होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बीडमध्ये राष्ट्रवादीच्या गटाकडून भाजप उपसरपंचावर जीवघेणा हल्ला..
ग्रामपंचायत निवडणूक वादातुन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी लिंबागणेश येथील भाजपच्या उपसरपंचावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना पाटोद्याजवळ घडली आहे..या लिंबागणेश येथील उपसरपंच शंकर वाणी हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मारहाण करणारे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असल्याची माहिती समोर येतेय. दरम्यान पाटोदा पोलीस घटनास्थळी पोहचले असून अधिक तपास करीत आहेत.

 

ग्रामपंचायत निवडणुकीतील कुरापत काढून वीस जणांच्या जमावाने मिरची पावडर अंगावर टाकून हॉकी स्टिक, बेल्ट आणि लोखंडी गजाने मारहाण केली.. मारहाणीनंतर वाणी यांच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र या वेळी परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेतल्यानंतर मारेकरी घटनास्थळावरून पळून गेले आहेत. 

 
बीड जिल्ह्यातील रुग्णवाहिका चालकांवर उपासमारीची वेळ
बीड मध्ये जिल्हा रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालयात 102 क्रमांकाची हेल्पलाइन असलेल्या रुग्णवाहिका चालकांचे वेतन 11 महिन्यापासून मिळाले नसल्यान रुग्णवाहिका चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काम बंद आंदोलन करून बेमुदत उपोषण सुरू केल आहे..
भिवंडीत अग्नितांडव; लेदर बॅग कारखानाला भीषण आग
भिवंडी  ग्रामीण  मधील  गोदाम  पट्ट्यासह  शहरी   भागातील   कारखान्यांसह गोदामना  आगी  लागण्याचे   सत्र  सुरु  असून  आज  पुन्हा   लेदर बॅग तयार करणाऱ्या कारखानाला  भीषण  आग  लागून  अग्नितांडव  घडले  आहे.  ही  घटना  भिवंडी  तालुक्यातील  ओवळे   गावातील   सागर   कॉम्प्लेक्स  गोदाम  संकुलात  बॅग तयार करणाऱ्या   कारखान्यात   घडली  असून   भीषण   आगीवर   नियंत्रण  मिळवण्यासाठी  अग्निशमन  दलाच्या  तीन  गाड्या  घटनास्थळी  दाखल झाल्या आहेत. मात्र या आगीच्या घटनेत कुणालाही दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात आले.

 

ही  भीषण  आज   साधारण  आज  सकाळी १०  वाजल्याच्या सुमारास   लागल्याची  माहिती  अग्निशमन  दलाच्या  अधिकाऱ्याने  दिली  आहे.  या  आगीवर  गेल्या  एक   तासापासून   नियंत्रण  मिळविण्याचे  शर्थीचे  प्रयत्न  अग्निशमन  दलाच्या  जवानांकडून  सुरु  असल्याची  माहिती  देण्यात  आली .  ही  आग  आटोक्यात  आणण्यासाठी कारखान्याची मागील भिंत तोडून त्यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरु आहे.   या  भीषण  आगीत  आतापर्यत  लाखो  रुपयांचे  लेदर बॅगसह मशीनरी  जळून खाक झाले आहे.  मात्र   आगीचे  कारण  अद्यापही  अस्पष्ट  आहे. आग नियंत्रण आली आहे. मात्र पहिल्या मजल्यावरील कारखान्याचे चार गाळे आगीच्या भक्षस्थानी पडले आहे. तर परिसरातील वीजपुरवठा आगीच्या घटनेत नंतर खंडित करण्यात आला आहे.
पोलिस अधिकाऱ्यांसाठी आणखी एक खूशखबर, गणवेश भत्त्यात वाढ

 



पोलिस अधिकाऱ्यांसाठी खूशखबर, गणवेश भत्त्यात वाढ, गृह विभागाचा निर्णय


आधी ५ हजार रुपये मिळत होता भत्ता, आता प्रति वर्षी ६ हजार रुपये मिळणार


पोलीस उप निरीक्षक ते अपर पोलीस अधिक्षक या अधिकाऱ्यांना मिळणार लाभ


संत सेवालाल महाराजांच्या जीवनावर आधारित 'संत मारो सेवालाल' चित्रपट 13 जानेवारीला प्रदर्शित होणार

Washim News : बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांच्या जीवनपटावर आधारित 'संत मारो सेवालाल' हा बंजारा भाषेतील चित्रपट येत्या 13 जानेवारीला विदर्भातील काही जिल्ह्यात प्रदर्शित होणार आहे. संत सेवालाल महाराजांनी 300 वर्षापूर्वी पर्यावरणसह विविध विषयांवर विशेषत: पाण्याविषयी केलेली भविष्यवाणी यामध्ये दाखवण्यात येणार आहे. चित्रपटाचे निर्माते आणि पोहरादेवीच्या महंतांनी याविषयी वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली

गोंदिया गारठला... 12.5 सेल्सिअस तापमानाची नोंद

Gondia Cold News : मागील दोन दिवसांपासून तापमान खालावल्याने विदर्भ गारठला आहे. मंगळवारी रात्री आणि बुधवारी सकाळी अवकाळी रिमझिम पावसाने हजेरी लावली होती. तर, बुधवारी दिवसभर दाट धुक्याची चादर होती. अशात गुरुवारीही शीतलहर सुरु असल्याने सर्वत्र कडाक्याची थंडी जाणून लागली आहे. विदर्भात सर्वात कमी 12.5 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद गोंदियात झाली आहे. अगदी सकाळपासून ही शीतलहर सुरु असल्याने दिसून येत आहे. गारव्यामुळे हुडहुडी भरली असून अनेक ठिकाणी नागरिकांनी दिवसभर शेकोट्यांचा आधार घेतल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

महाराष्ट्रातील मतदारांची अंतिम यादी निवडणूक आयोगाकडून जाहीर; महाराष्ट्रात 9 कोटी दोन लाख 85 हजार 801 मतदार

महाराष्ट्रातील मतदारांची अंतिम यादी निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रात 9 कोटी दोन लाख 85 हजार 801 मतदार आहेत. तर, 40 लाखांहून अधिक डुप्लिकेट मतदार आढळले. यापैकी 16 लाख मतदारांवर निवडणूक आयोगाने कारवाई करून यादी रद्द केली. राज्यात पुरुष मतदारांची संख्या 4 कोटी 71 लाख 35 हजार 999 इतकी आहे. तर, महिला मतदारांची संख्या 4 कोटी 31 लाख 25 हजार 67 इतकी आहे. राज्यात 15 हजार 332 दिव्यांग मतदारांची नोंद करण्यात आली आहे. तर, ट्रान्सजेंडर मतदारांची संख्या 4735 इतकी आहे. 

Nanded News: नांदेड येथील पोलीस अधिकाऱ्याची गोदावरी नदी पात्रात उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न

Nanded News: नांदेड शहरातील गोदावरी नदी पात्रावरील पुलावरून उडी घेऊन पोलीस अधिकाऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान बलजीतसिंग बावरी या व्यक्तीने तत्परता दाखवत सदर अधिकाऱ्याचे प्राण वाचवले आहेत. नांदेड पोलीस मुख्यालयात कार्यरत असणाऱ्या  ASI शेषेराव राठोड असे अधिकाऱ्याचे नाव असल्याची माहिती आहे. 

Thane Ulhasnagar News: उल्हासनगर महापालिकेच्या लाचखोर मुकादमांना अटक; घर दुरुस्ती करणाऱ्यांकडून लाच घेताना रंगेहाथ पकडले

Thane Ulhasnagar News: उल्हासनगर महापालिकेच्या दोन लाचखोर मुकादमांना अँटी करप्शन ब्युरोने अटक केली आहे. घर दुरुस्ती करणाऱ्यांकडून चार हजारांची लाच घेताना या दोघांना ठाणे अँटी करप्शन ब्युरोने रंगेहाथ अटक केली होती.

बुलढाणा जिल्ह्यातील चोरपांगरा इथं तुरीच्या सुडीला अज्ञाताकडून आग, शेतकऱ्याच तीन लाखांचं नुकसान

Buldana News : आज सकाळी धुक्याचा फायदा घेऊन बुलढाणा जिल्ह्यातील चोरपांगरा गावातील शेतकरी विठोबा जायभाये यांच्या शेतातील कापून ठेवलेल्या तुरीच्या सुडीला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची घटना घडली. त्यामुळं शेतातील संपूर्ण तुरीच पीक जळून खाक झालं आहे. यामध्ये शेतकरी विठोबा जायभाये यांचं जवळपास तीन लाखांचं नुकसान झालं आहे. या घटनेने परिसरातील तूर उत्पादक शेतकरी धास्तवले आहेत.

घाटकोपरमध्ये शौचालय मागणीसाठी शिवसेनेचे आंदोलन
मुंबई मनपाने एलबीएस मार्गाच्या रुंदीकरणात घाटकोपरच्या सर्वोदय येथील शौचालय तोडले होते. मात्र हे शौचालय पुन्हा या ठिकाणी बांधण्यात यावे ही मागणी करीत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. शिवसेनेचे माजी स्थानिक नगरसेवक दीपक हांडे आणि विभागातील शिवसेनेचे पदाधिकारी यात सहभागी झाले आहेत. एलबीएस मार्गावर सुमारे दोन किमी अंतराच्या दरम्यान सर्वोदय रुग्णालय जवळ मनपाचे एक शौचालय होते. मात्र हे शौचालय काही वर्षांपूर्वी रस्ता रुंदीकरणं मध्ये तोडण्यात आलं. हे पुन्हा बांधून देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र तीन ते चार वर्षे उलटून हे शौचालय पालिकेने बांधून दिले नाही. लोकप्रतिनिधी आणि नागरिक हे वारंवार या बाबत पाठपुरावा करण्यास गेले असता पालिका अधिकारी टोलवा टोलवी करीत असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे.या मुळे आता पालिका जो पर्यंत हे शौचालय बांधून देणार नाही तो पर्यंत हे उपोषण सुरू ठेवणार असल्याचा पवित्रा शिवसैनिकांनी घेतला आहे.
लोहगडावरील उरुसाला परवानगी नाहीच, पोलिसांकडून कलम 144 लागू

पुण्याच्या लोहगड किल्ल्यावर तीन दिवसांसाठी कलम 144 लागू करण्यात आलंय. गडावरील दर्ग्याच्या उरुसला नाकारलेली परवानगी आणि ही दर्गा अनधिकृत असल्याने इथं उरूस भरू देणार नाही, यासाठी बजरंग दलसह इतर संघटनांनी दिलेला आंदोलनाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर ही खबरदारी जिल्हा प्रशासनाने घेतलेली आहे. 6 जानेवारीला लोहगडावरील हाजी हजरत उमरशावली बाबाचा उरूस भरणार होता. त्यासाठी आयोजकांनी पुरातत्व विभागाकडे परवानगी मागितली होती मात्र ती नाकारण्यात आलेली आहे. लोहगडावरील दर्गा आणि मजारी यांचा कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही. त्यामुळं प्रतापगडाप्रमाणे इथलं ही अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करावं असा आदेश न्यायालयाने दिलेला आहे. असं कलम 144 ची नोटीस काढताना उपविभागीय दंडाधिकारी संदेश शिर्केनी नमूद केलेले आहे.

जयकुमार गोरे यांना आज डिस्चार्ज

भाजपचे माण- खटाव मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांना आज पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधुन डिस्चार्ज देण्यात आला.  त्यानंतर ते हेलीकॉप्टरने त्यांच्या गावी रवाना झाले. नागपूरमधे हिवाळी अधिवेशन सुरु असताना आमदार जयकुमार गोरे हे रात्री उशीरा नागपूरहून विमानाने पुण्यात आले होते आणि पुण्यातून त्यांच्या गावी जात असताना रात्री साडेतीन वाजता फलटणजवळ त्यांच्या गडीला अपघात झाला होता. पुलाचा कठडा तोडून त्यांची गाडी तीस फुट खोल खाली कोसळली होती. त्यानंतर आमदार गोरे यांना उपचारासाठी पुण्यात हलवण्यात आलं होतं.

मुंबईच्या अंधेरीतील डीएननगरमधील न्यूरो सर्जन डॉक्टरकडे कोट्यवधी रुपयांची खंडणी मागणाऱ्या चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल

Mumbai News : मुंबईच्या अंधेरी पश्चिम डीएननगर येथे न्यूरो सर्जन डाॅक्टरकडे कोट्यवधी रुपयांची खंडणी मागणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार डाॅक्टरकडे आरोपींमधील महिलेचा पती हा उपचारासाठी येत होता. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी महिला मिनाक्षी वेलणकर, संदीप मोहिते, केतन नारंगे, अंकुश कदम यांनी डाॅक्टरांकडे पतीच्या मृत्यूबाबत 2 कोटी 50 लाख रुपयांसाठी तगादा लावला. पैसे न दिल्यास मुंबईत प्रॅक्टिस करु देणार नाही तसंच मारहाण करु अशी धमकी आरोपींकडून डाॅक्टरला वारंवार धमकी दिली जात होती. अखेर रोजच्या या त्रासाला कंटाळून डाॅक्टरने डीएननगर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींविरोधात भादंविच्या कलम 385, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवलेला आहे. या प्रकरणी अधिक तपास डीएननगर पोलीस करत आहेत.

खासदार नवनीत राणा बनावट जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरण, शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयातील सुनावणी 20 जानेवारीपर्यंत तहकूब

खासदार नवनीत राणा बनावट जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरण 


शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयातील सुनावणी 20 जानेवारीपर्यंत तहकूब


राणा यांच्या वकिलांनी शिवडी कोर्टासमोर सांगितलं की जाति  प्रमाणपत्र याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात 17 जानेवारी रोजी सुनावणी होणार असून तूर्तास यावर स्थगिती दिल्याची राणांच्या वकिलांची माहिती


पुढील सुनावणीत शिवडी कोर्टातील प्रकरणावर स्थगिती देण्यासाठीच्या  अर्जावर युक्तिवाद होणार


शिवडी महानगर दंडाधिकारी कोर्टानं याप्रकरणी नवनीत राणा आणि त्यांचे वडिलांविरोधात आजामीन पात्र वॉरंट जारी केलेला आहे

टिटवाळा मधील धक्कादायक प्रकार; प्रियकराने मित्राच्या मदतीने 35 वार करत केली प्रेयसीची हत्या

प्रेमसंबंधातून लग्नासाठी तगादा लावल्याने प्रियकराने आपल्या एका मित्रासोबत विविहित महिलेची 35 वार करत  हत्या केल्याची धक्कादायक घटना टिटवाळा येथे उघडकीस आली आहे. मयत महिला रुपांजली जाधव ही पुणे येथे राहत होती. टिटवाळ्यात तिचा मृतदेह आढळून आल्यानंतर आधार कार्डच्या सहाय्यानं तिची पोलिसांनी ओळख पटवली व तिची हत्या करणारा प्रियकर जयराज चौरेसह त्याचा मित्र सूरज घाटे या दोघांना अटक केली.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांच्यासोबत चर्चा 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांच्यासोबत चर्चा 


हिरानंदानी समूहाचे सहसंस्थापक डॉ. निरंजन हिरानंदानी आणि 
जेएसडब्ल्यू समूहाचे एमडी आणि अध्यक्ष सज्जन जिंदाल यांच्यासोबत देखील बैठक संपन्न 


पिरामल ग्रूपचे अध्यक्ष अजय पिरामल यांची योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा 


विविध समूहांच्या उद्योजकांसोबत योगी आदित्यनाथ करतायत मॅरेथाॅन बैठका 


अदानी समूहांचे करण अदानी, अंबानी समूहाचे मुकेश अंबानी यांची देखील भेट घेणार

Ahmadnagar News : पोलीस मुख्यालयात पोलिस शिपाई भरती सुरू





Ahmadnagar News : अहमदनगर (Ahmadnagar News Updates) शहरातील पोलीस मुख्यालयात पोलिस शिपाई पदासाठीची भरती प्रक्रिया सुरू असून पहिल्या दिवशी एक हजार उमेदवारांना बोलावण्यात आले होते. पोलीस शिपाई पदासाठी 129 जागांसाठी 13 हजार प्राप्त झाले होते त्यापैकी 602 उमेदवारांनी मैदानी चाचणी दिली त्यापैकी 83 उमेदवार ठरले बाद तर 396 उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी दांडी मारली. या भरती प्रक्रियेच्या बंदोस्तासाठी 500 पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. 14 जानेवारीपर्यंत दररोज 1 हजार उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. 100 मीटरच्या धावण्याची चाचणी तसेच गोळाफेक आणि इतर  चाचण्या अहमदनगर येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर घेण्यात येत आहेत.





योगी आदित्यनाथ यांनी घेतली राज्यपालांची भेट; राजभवन येथील भूमिगत संग्रहालयाला भेट; छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन; श्रीगुंडी देवीची आरती

मुंबई भेटीवर आलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी (दि. 5) सकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे राज्यपालांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. 


राज्यपालांच्या विनंतीवरून योगी आदित्यनाथ यांनी राजभवनातील  ब्रिटिश कालीन भुयारात निर्माण करण्यात आलेल्या 'क्रांतिगाथा' या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांच्या संग्रहालयाला भेट दिली. यावेळी  त्यांनी संग्रहालयातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीपुढे नतमस्तक होऊन शिवरायांना अभिवादन केले. उपस्थित अधिकाऱ्यांकडून त्यांनी संग्रहालयातील सर्व क्रांतिकारकांची माहिती जाणून घेतली. 


आदित्यनाथ यांनी भूमिगत संग्रहालयाबाहेर समुद्रकिनारी असलेल्या श्रीगुंडी देवीचे दर्शन घेतले व उपस्थितांसोबत देवीची आरती केली. यावेळी त्यांनी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या ध्यानमग्न भगवान शिवाच्या मूर्तीचे दर्शन घेतले.

Navi Mumbai: कार्यक्रमाला माजी नगरसेवकांनी दांडी मारल्यानं जितेंद्र आव्हाड यांच्याकडून नाराजी व्यक्त

Navi Mumbai: नवी मुंबईतील नेरूळ येथे आगरी कोळी महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या उदघाटनासाठी जितेंद्र आव्हाड आले असता येथे पक्षातील माजी नगरसेवकांची उपस्थिती कमी असल्याचे दिसून आले. यावरून आव्हाड यांनी पक्षातील नेत्यांना कानपिचक्या देत नाराजी व्यक्त केली. यामुळे नवी मुंबई राष्ट्रवादी सर्व काही असबेल नसल्याचे आव्हाडांच्या समोर आले. येतील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, माजी नगरसेवकांनी एकत्र येत पक्षाची घट्ट मोट बांधून कामाला लागा. कुणीही इतर पक्षात जाता कामा नये.  जे माजी नगरसेवक कार्यक्रमाला येत नाही त्यांना निरोप द्या. निवडणूकीत प्रचाराला आमची गरज पडणार आहे.

Dhule News : पोलीस भरतीसाठी जळगाव येथून तृतीयपंथी उमेदवार पोलीस मुख्यालयात हजर

Dhule News : राज्यात होणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तृतीय पंथीयांना स्थान दिल्यानंतर विविध जिल्ह्यांमध्ये तृतीयपंथी उमेदवार पोलीस भरतीची मैदानी चाचणी देत आहेत, धुळे शहरातील पोलीस मुख्यालयात आलेल्या तृतीयपंथी उमेदवाराने शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. 


धुळे शहरातील पोलीस मुख्यालय या सध्या पोलीस भरतीची मैदानी चाचणी प्रक्रिया सुरू आहे, आज मुलींची मैदानी चाचणी प्रक्रिया पार पडली यावेळी जळगाव येथून आलेल्या एका तृतीयपंथी उमेदवाराची देखील कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. जळगाव येथून आलेल्या बेबूजोगी पार्वती जोगी ह्या पोलीस भरतीची तयारी करीत आहेत एक वर्षापासून त्यांची तयारी सुरू असून शासनाने आम्हाला समाजाच्या मुख्य घटकात तसेच प्रशासकीय सेवेत सामावून घ्यावेत अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

 
Sunil Deshmukh : महाराष्ट्रातून अमेरिकेत कर्तृत्व गाजवणारे सुनील देशमुख हरपले

Sunil Deshmukh Passes Away: महाराष्ट्र फाऊंडेशनचे संस्थापक सुनील देशमुख यांचं अमेरिकेत निधन झाले आहे. अमेरिकेत राहून मराठी संस्कृतीसाठी मोठं योगदान दिले आहे. 

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात मुसळधार अवकाळी पाऊस, पिकांना फटका बसण्याची शक्यता

Amravati Rain : हवामान खात्याने दोन दिवसांपूर्वी सांगितले की, विदर्भात काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडेल. त्यानुसार अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली. काल दिवसभर आणि आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. सकाळपासूनच कुठं कुठं धुक्याची चादर पाहायला मिळाली. या अवकाळी पावसानं हरभरा आणि गहू पिकांना फटका बसण्याची दाट शक्यता आहे.

Pune MHADA News : पुणे, पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील म्हाडाच्या 5915 सदनिकांच्या सोडतीसाठी नोंदणीची सुरुवात आजपासून

Pune News : पुणे, पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील म्हाडाच्या 5915 सदनिकांच्या सोडतीसाठी नोंदणीची सुरुवात आजपासून सुरु होणार आहे. ऑनलाईन पद्धतीने ही नोंदणी करता येणार आहे.  त्यासाठी म्हाडाच्या बवेबसाईटवर जाऊन किंवा मोबाईल ॲपच्या माध्यमातून नोंदणी करता येणार आहे. सकाळी अकरा वाजल्यापासून ही नोंदणी करता येणार आहे. पुढील एक महिना म्हणजे 5 फेब्रुवारीपर्यंत ही ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. तर नोंदणी केलेल्या या सदनिकाची सोडत 17 फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जाहीर होणार आहे.

Vasai News : वसईत वीज महावितरणाच्या रस्त्यातील छोट्या डी.पी. बॉक्सला काल रात्री भीषण आग

Vasai News : वसईत वीज महावितरणाच्या रस्त्यातील छोट्या डी.पी. बॉक्सला काल रात्री भीषण आग लागली होती. या आगीत  डी.पी.  बॉक्स जळून खाक झाला आहे.


वसई पश्चिम स्टेला परिसरात काल रात्री साडे दहाच्या सुमारास  मुख्य रस्त्यावर ही घटना घडली होती. शॉर्टसर्किट होऊन ही आग लागली होती. स्थानिक दुकानदारांनी ही आग विझवली होती. याच परिसरात डी.पी. बॉक्स ला आग लागण्याची ही दुसरी घटना घडली आहे. या घटनेत स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र रस्त्यावरील उघडे डी.पी. बॉक्स दुरुस्त करावे अशी मागणी आता होत आहे.

Aurangabad News: मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलाच्या लग्नात 700 जणांना विषबाधा

Aurangabad News:  मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलाच्या लग्नात 700 जणांना विषबाधा. औरंगाबाद येथील राष्ट्रवादीचे नेते कदीर मौलाना यांच्या मुलाचं रात्री लग्न समारंभ झाला.

Agriculture News : बदलत्या वातावरणाचा आंबा पिकावर परिणाम

Agriculture News : बदलत्या वातावरणाचा आंबा पिकावर परिणाम, तुडतुडा रोगासह मोठ्या प्रमाणात फळगळ 


Agriculture News : सध्या वातावरणात सातत्यानं बदल (climate change) होत आहे. कधी थंडीचा जोर (Cold Weather) तर कधी ढगाळ वातावरण जाणवत आहे. तर काही ठिकाणी पावसानं (Rain) देखील हजेरी लावली आहे. मात्र, या बदलत्या वातावरणाचा शेती पिकांवर (Agricultural crops) मोठा परिणाम होत असल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. बदलत्या वातावरणामुळं रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील आंब्यावर (Mango) तुडतुडा, फळगळ होत आहे. त्यामुळे यंदाच्या आंबा हंगामाची सुरुवात दमदार होणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.

Mumbai News : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज मुंबईतून देशांतर्गत रोड शोची सुरुवात करणार

Mumbai News : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज मुंबईतून देशांतर्गत रोड शोची सुरुवात करणार. यूपीत गुंतवणुकीसाठी उद्योगजकांना ग्लोबल इन्वेस्टर्स समिटमध्ये आमंत्रित करण्याची जबाबदारी योगींवर. यावेळी उद्योजक, बँकर्स, फिनटेक उद्योजक आणि चित्रपट क्षेत्रातील अनेक व्यक्तींशी ते चर्चा करणार.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांची नार्को टेस्ट करा या मागणीसाठी वरुडमध्ये आजपासून सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचा उपोषण सुरू झालं आहे.   यासह आज दिवसभरातील घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत. आदित्य ठाकरेंनी सिनेट निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक बोलवली आहे. आदित्य ठाकरेंनी जिंकायची सिनेट निवडणुक त्यासाठी सर्व पक्षातल्या कार्यकर्त्यांना ॲक्टिव्ह मोडवर आणण्याचं काम सुरू केलंय.  योगी आदित्यनाथ दोन दिवसांच्या मुबंई दौऱ्यावर आहेत.    


अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांच्या नार्को टेस्टच्या मागणीसाठी अमरावतीत सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचे उपोषण


अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांची नार्को टेस्ट करा या मागणीसाठी वरुडमध्ये आजपासून सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचा उपोषण सुरू झालं आहे. 2019 च्या विधानसभा प्रचार दरम्यान 19 ऑक्टोबर 2019 रोजी सकाळी 5.30 वाजता देवेंद्र भुयार यांच वाहन अडवून सहा अज्ञातांनी वाहन अडवून तीन गोळ्या झाडल्या आणि वाहनाची जाळपोळ केली अशी तक्रार देवेंद्र भुयार यांचे ड्रायव्हर आकाश नागापुरे यांनी शेंदूरजना घाट पोलिसात तक्रार दिली होती. पोलिसांनी याप्रकरणी तपास केला पण अज्ञात 6 जण आणि इंहोव्हा वाहनाचा शोध लागला नाही. अखेर 10 डिसेंबर 2020 रोजी पोलिसांनी हे प्रकरण कायमस्वरूपी तपासात ठेवून क्लोझर रिपोर्ट दिला. आता नेमकं ते वाहन जाळलं कोणी आणि गोळ्या खरच झाडल्या होत्या का हा मुद्दा घेत वरुड मधील सर्वपक्ष पदाधिकारी आक्रमक झाले आणि त्यांनी आरोप केलाय. काहीजण या विरोधात उपोषणाला बसणार आहेत. 
 
अनिल परबांची संपत्ती ताब्यात घेण्यात येणार     
अनिल परबांच्या प्रॉपर्टीवर ईडीने कारवाई केले. त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील मुरुड समुद्रकिनारा येथे असलेले साई रिसॉर्ट सुद्धा आहे. त्यावर ईडीकडून नोटीस लावण्यात आलीये. आजपासून ती प्रॉपर्टी ईडी आपल्या ताब्यात घेण्यास सुरुवात करणार आहे. 
 
मुंबईत आदित्य ठाकरे यांनी बोलवली पदाधिकाऱ्यांची बैठक
आदित्य ठाकरेंनी सिनेट निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक बोलवली आहे. आदित्य ठाकरेंनी जिंकायची सिनेट निवडणुक त्यासाठी सर्व पक्षातल्या कार्यकर्त्यांना ॲक्टिव्ह मोडवर आणण्याचं काम सुरू केलंय. 
 
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी मुंबईच्या दौऱ्यावर
योगी आदित्यनाथ दोन दिवसांच्या मुबंई दौऱ्यावर आहेत.  सकाळी 9 ते 10 वाजेपर्यंत विविध बॅंकांच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करतील.  दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत जीआयएस रोड शोमध्ये सहभाही होतील. संध्याकाळी 6 वाजता बॉलिवूड अभिनेते आणि दिग्जांची भेट घेतील.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.