Sambhajiraje Chhatrapati : आज राष्ट्रीय शेतकरी दिवस (National Farmers Day) आहे. दरवर्षी 23 डिसेंबरला राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा केला जातो. या दिवसानिमित्त संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी थेट बांधावर जाऊन संभाजीराजे छत्रपती यांनी शेतकरी दिनाच्या शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. संभाजीराजे छत्रपती हे नांदेड (Nanded) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शेतात जात बळीराजाला शुभेच्छा दिल्या. शेतकरी हा आपला केंद्रबिंदू आहे. शेतकरी जगला तर आपण जगणार असल्याचे संभाजीराजे यावेळी म्हणाले. 


संभाजीराजे तीन दिवसांच्या विदर्भ आणि मराठवाडा दौऱ्यावर आहेत. आज नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात तालंग गावात संभाजीराजेंनी शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी शेतकरी दिनानिमित्त त्यांनी बळीराजाशी संवाद साधला. कष्टाच्या मानाने मिळणाऱ्या मोबदल्याचा विचार केला असता आजही बळीराजा त्रासात असल्याचे मत संभाजीराजेंनी व्यक्त केले. शेतकरी दिनाच्या निमित्ताने संभाजीराजे यांनी त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. स्वराज्य संघटनेच्या पंचसूत्रीमध्ये शेतकरी महत्वाचा घटक  असल्याचे ते म्हणाले. स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास मी कटिबद्ध असल्याचेही ते म्हणाले. 


उत्पादन खर्च मोठा, मात्र, योग्य दर मिळत नाही


अतिवृष्टीचा शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. सोयाबीन पीक या अतिवृष्टीत वाहून गेल्याचे संभाजीराजे म्हणाले. संभाजीराजे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याच्या शेतात गेले होते. यावेळी त्यांनी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या त्यांनी समस्या जाणून घेतल्या. 1 हजार रुपयाला विकलं जाणारं टोमॅटोचे एक कॅरेट सध्या 50 रुपयाला जात असल्याचे संभाजीराजे यावेळी म्हणाले. शेतकऱ्यांना पीक पिकवण्यासाठी मोठ्या प्रमाणात उत्पादन खर्च येतो, मात्र शेतमालाला योग्य तो मोबदला मिळत नसल्याचे मत संभाजीराजेंनी व्यक्त केले. त्यामुळं सरकारनं याकडे लक्ष घालण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.  


शेतकरी हा आपला केंद्रबिंदू 


शेतकरी हा आपला केंद्रबिंदू आहे. शेतकरी जगला तर आपण जगणार असल्याचे संभाजीराजे यावेळी म्हणाले. म्हणून बाकीची सगळी कामं बाजूला ठेऊन आपल्या शेतकऱ्याला कशी ताकद मिळेल याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे संभाजीराजे म्हणाले. यावेळी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी संभाजीराजे यांच्यासमोर विविध समस्या मांडल्या. आमचा उत्पादन खर्च मोठा आहे. मात्र, शेतमालाला योग्य तो दर मिळत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. आधीच अतिवृष्टीमुळं आमच्या शेती पिकांचे खूप मोठे नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी संभाजीराजेंना दिला. यावेळी संभाजीराजेंनी शेतकऱ्यांच्या समस्या एकूण घेतल्या. तसेच सरकारनं शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष घालण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं.  


महत्त्वाच्या बातम्या:


Farmers Day : शेतकऱ्यांसमोर असणारी 10 संकटे कोणती? वाचा सविस्तर