= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मुंबईसह उपनगरात गेल्या तासाभरापासून पाऊस मुंबईसह उपनगरात गेल्या तासाभरापासून पाऊस कोसळत आहे. गेले काही दिवस मुंबईत पावसाने उसंत घेतली होती.मात्र आज मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई आणि आजू बाजूच्या परिसरात गेल्या तासाभरापासून जोरदार पाऊस कोसळतो आहे. यामुळे मुंबईमधील सखल भागात पाणी भरण्यास सुरवात झाली आहे.याचा परिणाम रस्त्यावरील वाहतुकीवर होताना दिसतो आहे.घाटकोपर अंधेरी लिंक रोड वर असल्फा मेट्रो स्थानक ते साकीनाका मेट्रो स्थानकच्या रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे.रस्त्यावर या ठिकाणी दोन ते तीन फूट पाणी आहे.या मुळे या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागात होत असलेल्या संतधार पावसामुळे मालेगाव-नांदगाव रस्त्यावरील वाखारी गावाजवळील पूल पाण्याखाली नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागात होत असलेल्या संतधार पावसामुळे मालेगाव-नांदगाव रस्त्यावरील वाखारी गावाजवळील पूल पाण्याखाली, दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प, वाखारी गावात संध्याकाळच्या सुमारास अनेक शेतात पाणी घुसले,
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मुंबईसह उपनगरात गेल्या तासाभरापासून जोरदार पावसाची हजेरी मुंबईसह उपनगरात गेल्या तासाभरापासून पाऊस कोसळत आहे. गेले काही दिवस मुंबईत पावसाने उसंत घेतली होती मात्र आज मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात जोरदार पाऊस कोसळतो आहे. यामुळे मुंबईमधील सखल भागात पाणी भरण्यास सुरवात झाली आहे. याचा परिणाम रस्त्यावरील वाहतुकीवर होताना दिसतो आहे. घाटकोपर अंधेरी लिंक रोडवर असल्फा मेट्रो स्थानक ते साकीनाका मेट्रो स्थानकच्या रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे. रस्त्यावर या ठिकाणी दोन ते तीन फूट पाणी आहे.या मुळे या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
लातूर जिल्ह्यातील मांजरा, रेणा तेरणा, तिरु यासह अनेक नद्या ओसंडून वाहू लागल्या लातूर जिल्ह्यातील मांजरा, रेणा तेरणा, तिरु यासह अनेक नद्या ओसंडून वाहू लागल्या. जिल्ह्यातून 145 किलोमीटर अंतर पार करणारी मांजरा नदी दुथडी भरून वाहू लागली. सततच्या पावसामुळे पिकाची मोठी हानी. जिल्ह्यात जवळपास 150 ते 200 एकरवरील ऊस आडवा. अहमदपूर तालुक्यातील चिखली शिवारातील दोन पाझर तलाव फुटले. गावात शिरले पाणी अनेक जनावरे वाहून गेली. तिरु नदीची पाणी पातळी वाढली जळकोट तालुक्यातील काही गावाचा संपर्क तुटला. रेणा मध्यम प्रकल्प तीन वर्षा नंतर 100 टक्के भरला सगळे सहा दरवाजे उघडे करावे लागले आहेत. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
नांदेड जिल्ह्यातील अनेक तालुक्यात मुसळधार पाऊस, राष्ट्रीय महामार्ग 361 गेल्या चार तासंपासून बंद असल्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगांच रांगा नांदेड जिल्ह्यातील नायगाव, हदगाव, धर्माबाद, बिलोली, उमरी ,कंधार ,लोहा ,अर्धापुर,मुखेड,नरसी,किनवट,माहूर,भोकर,मुदखेड तालुक्यात मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती. काल रात्रीपासून चालू असलेल्या पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला, राष्ट्रीय महामार्ग 361 गेल्या चार तासंपासून बंद असल्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगांच रांगा.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
कणकवलीतील शिवगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, देवघर मध्यम प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत्या दोन दिवसांत सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सध्या जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. कणकवली तालुक्यातील देवघर मध्यम प्रकल्पातून २९ घ. मी. प्रतिसेकंद इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्या अनुशंगाने कणकवलीतील घोणसरी, लोरे नं. १, लोरे नं. २, गडमट, पियाळी, वाघेरी या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होऊन तसेच धरण क्षेत्राबाहेरील पाणलोट क्षेत्रातील पाणी नदीपात्रात येऊन नदी पात्रातील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. अतिवृष्टी झाल्यास धरण सुरक्षेततेच्या दृष्टीने अतिरिक्त येणारे पाणी धरणातून नदीपात्रात सोडणे जाणार आहे. त्यामुळे नदीकाढच्या नागरिकांनी सतर्क रहावे अश्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
परभणी जिल्ह्यात पावसाचा कहर, अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद, कोणते रस्ते बंद? वाचा सविस्तर परभणी जिल्ह्यात पावसाचा कहर, अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद, कोणते रस्ते बंद? वाचा सविस्तर
- परभणी-पाथरी राष्ट्रीय महामार्ग बंद, किन्होळा आणि ताडबोरगाव येथील दोन्ही पूल वाहून गेले
- धानोरा काळे-पालम रस्ता बंद, धानोरा काळे येथील गोदावरी नदीवरील पुलावरून पाणी वाहत आहे.
- सेलु -पाथरी ,सेलु परभणी, सेलु जिंतुर रस्ते पाण्यामुळे बंद आहेत
- सेलु -परभणी रस्त्यांवरील निपानी टाकळी,ढेगळी पिपळगाव रस्ता वाहतुकीस बंद आहे दोन्ही पूलांवरून पाणी वाहत आहे
- सेलु -पाथरी रस्तावरील कसुरा पूलांवरून पाणी वाहत आहे .
- सेलु -जितुरमधील मोरेगाव पुलावर पाणी आल्याने वाहतुक बंद आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
रायगड जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा, अतिवृष्टी होण्याची शक्यता रायगड जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा, अतिवृष्टी होण्याची शक्यता, रायगड जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेला सतर्कतेचा इशारा, बचाव पथक आणि साहित्यासह मनुष्यबळ तत्पर ठेवण्याच्या सूचना, दरडप्रवण आणि पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या सूचना, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांचे आदेश...
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
लातूर : अहमदपूर तालुक्यात पावसाचा कहर, दोन पाझर तलाव फुटले लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यांमध्ये मागील दोन दिवसापासून पावसाची रिपरिप सुरू आहे. यातच पावसाने काही तास जोर धरला. या जोरदार पावसामुळे या भागातील सर्वच नदी नाले आणि ओढ्यांना पाणी आलं आहे. या भागातील अनेक पाझर तलाव अक्षरशः भरून ओसंडून वाहू लागले आहेत... अहमदपूर तालुक्यातील चिखली या गावाच्या शिवारात दोन पाझर तलाव आहेत. पाण्याचा प्रचंड वेगाने साठवण आणि सततचा पाऊस यामुळे हे दोन पाझर तलाव फुठले आहेत. या पाझर तलावातील सर्व पाणी वाहून गेल आहे. त्यामुळे चिखली गावात सगळीकडे पाणीच पाणी झालं
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
उस्मानाबाद : तुळजापूर तालुक्यांतील नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यातील नर-मादी धबधबा वाहू लागला उस्मानाबाद : तुळजापूर तालुक्यांतील नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यातील नर-मादी धबधबा वाहू लागला आहे. कुरनुर मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात कांही दिवसापासून दमदार पाऊस होत आहे. त्यामुळे बोरी धरण भरून पाणी सांडव्यातून वाहत आहे. सलग तीसर्या वर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने नर-मादी धबधबा वाहण्यास सुरुवात झाली आहे. मादी हा एकच धबधबा रविवारपासून वाहत होता. आज नर धबधब्यावा पाणी आले. तुळजापूर, नळदुर्ग शहराला पाणीपुरवठा करणारे बोरी धरण भरल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
लोकल ट्रेनमधनं प्रवासाची मुभा असणं हा मुलभूत अधिकार असू शकतो. मात्र, काही निर्बंध हे परिस्थितीनुसारच घातलेले आहेत : हायकोर्ट लोकल ट्रेनमधनं प्रवासाची मुभा असणं हा मुलभूत अधिकार असू शकतो. मात्र, काही निर्बंध हे परिस्थितीनुसारच घातलेले आहेत. काही निर्णय हे त्या क्षेत्रातील जाणकारांवरच सोपवायला हवेत. सध्या गरीब मजूर, भिकारी यांचं लसीकरण झालेलं नाही. त्यामुळे लोकलमध्ये सरसकट सर्वांना परवानगी नाही. लसीकरण सक्तीचं करून लोकल ट्रेन प्रवास नाकरण्याविरोधात हायकोर्टात याचिका. मुद्दे जनहित याचिकेचे असताना याप्रकरणी रिट याचिका कशी होऊ शकते? हायकोर्टाचा सवाल. याचिकेवर सुनावणी न घेण्यापूर्वी याचिकेबाबत हायकोर्ट रजिस्ट्रारला योग्य तो निर्णय घेण्याचे निर्देश.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
गेल्या चार दिवसात मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे वेगवेगळ्या घटनेत बारा जणांचा मृत्यू गेल्या चार दिवसात मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे वेगवेगळ्या घटनेत बारा जणांचा मृत्यू. नांदेडमध्ये 3, बीडमध्ये 4, औरंगाबाद जिल्ह्यात 2, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी एका व्यक्तीचा एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.664 लहान मोठ्या जनावरे दगवली आहेत. यात जालना जिल्यातील 598 कोंबड्यां पावसाने दगावल्या .41 घरांची पडझड झाली आहे . विभागीय आयुक्त कार्यलयाचा अहवाल ...
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यात पावसाची हजेरी. सिल्लोड तालुक्यातील खेळणा प्रकल्प ओहरफ्लो औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यात पावसाची हजेरी. सिल्लोड तालुक्यातील खेळणा प्रकल्प ओहरफ्लो
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
परभणी शहरासह जिल्हाभरात काल रात्रीपासून संततधार पाऊस सुरू परभणी शहरासह जिल्हाभरात काल रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. आज दुपारी एक वाजल्यापासून सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्याने ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. शेती पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. तर परभणी शहरातील वसमत रस्ता अष्टभुजा देवी मंदिर गांधी पार्क बेलेश्वर नगर प्रतापनगर परिसरातील भागात पाणीच पाणी झाले आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
नांदेड:जिल्ह्यात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे विष्णुपुरी जलाशय तुडुंब,गोदावरी नदी पत्रात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे विष्णुपुरी जलाशयात 11 दरवाजे उघडले. नांदेड:जिल्ह्यात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे विष्णुपुरी जलाशय तुडुंब,गोदावरी नदी पत्रात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे विष्णुपुरी जलाशयात 11 दरवाजे उघडले.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
बुलढाणा जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी दोन युवक वाहून गेले, आपत्ती व्यवस्थापन पथक घेत आहेत दोघांचा शोध बुलढाणा : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे आणि पुराच्या पाण्यात दोन युवक वाहून गेलेत. शेगाव तालुक्यातील जवळा संतोष गवई नाल्यात गेला वाहून तर दुसरा युवक नितीन गव्हांदे नांदुरा तालुक्यातील पतोंडा येथून पूर्णा नदीत गेला वाहून, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकातील जवान या दोघांचा शोध घेत आहे, दरम्यान जिल्ह्यात सकाळपासून विश्रांती घेतलेला पाऊस दुपारी 1 वाजेपासून पुन्हा सुरु झाला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
हिंगोली शहराला पाणीपुरवठा करणारे सिद्धेश्वर धरण पूर्ण क्षमतेने भरलं हिंगोली : हिंगोली शहराला पाणीपुरवठा करणारे सिद्धेश्वर धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असताना आणि मागील दोन दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढल्याने धरणाचे आठ दरवाजे एक फुट उंच उघडून सहा हजार दोनशे क्युसेकने पाण्याचा विसर्ग पूर्णा नदी पात्रात करण्यात आलेला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
अकोट मार्गावरील गांधीग्राम येथील पुर्णा नदीच्या पुलावरून पाणी, अकोला-अकोट वाहतूक बंद अकोला : अकोट मार्गावरील गांधीग्राम येथील पुर्णा नदीच्या पुलावरून पाणी. पुलावरून चार फुट पाणी असल्याने अकोट तालुक्याचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला. अकोला-अकोट वाहतूक बंद.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
बुलढाणा जिल्ह्यातिल नळगंगा धरणाचे दरवाजे उघडेच; आधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे लाखो लीटर पाणी वाया बुलढाणा : जिल्ह्यातिल सर्वात मोठा प्रकल्प नळगंगा धरणातील पानी साठ्यात वाढ झाली आहे. रात्रिपासून संततधार पाऊस सुरु असल्यानं जिल्ह्यातिल धरणातील जलसाठा वाढत आहे. मात्र धरणावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा झोपलेल्या अवस्थेत दिसून आली. जिल्ह्यातिल नळगंगा धरणाचे दरवाजे वर्षभरापासुन उघडेच ठेवलेल्या अवस्थेत होते रात्री झालेल्या मुसळधार पावसानं धरणातील पानी साठ्यात वाढ झाली आणि धरणातील पाणी गेट उघडेच असल्यानं लाखो लीटर वाहून जात आहे. केवळ पाटबंधारे विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष असल्याचे दिसून आले.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
बीडमध्ये कोसळधार, परळी- अंबाजोगाई महामार्ग वाहतुकीसाठी बंद बीड : जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील नदी नाले ओढे दुथडी भरून वाहत असतांना, परळी अंबाजोगाई महामार्गवरील कण्हेरवाडी परिसरातील नदीला आलेल्या पुरामुळे, हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी परळी- अंबाजोगाई मार्गावरील, कण्हेरवाडी शिवारात उभारण्यात येत असलेल्या पुलाजवळील वळण रस्ता व तात्पुरता पुलावरून पाणी वाहत असल्याने, परळी-अंबाजोगाई मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. जोपर्यंत पुर ओसरत नाही, तोपर्यंत महामार्ग सुरु होणार नाही.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
भारतीय हवामान विभागाकडून आज कोकण, गोव्यासाठी रेड अलर्ट जारी Monsoon Update : भारतीय हवामान विभागाकडून आज कोकण, गोव्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण, गोवा भागांत काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाड्याची देखील मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच अरबी समुद्रात वाऱ्यांचा वेग अधिक असणार असल्यानं मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
परभणीतील पुरात दोन तरुणांचं नसतं धाडस, पुराच्या पाण्यात पोहत गाव गाठलं परभणीत रात्रीपासून संततधार पाऊस , जिल्ह्यातील अनेक प्रकल्प ओव्हर फ्लो, कुपटा गावातील ओढ्याला पूर आला आहे. पुरात दोन तरुणांचं नसतं धाडस पाहायला मिळालं. या तरुणांनी पुराच्या पाण्यात पोहत गाव गाठलं.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
परभणीत रात्रीपासून संततधार पाऊस, पुराच्या पाण्यात बैलजोडी वाहून गेली परभणी : परभणी जिल्ह्याच्या सर्वच भागात मुसळधार पाऊस बरसत असल्याचे चित्र आहे. सोमवार अर्थात काल दुपारनंतर सुरु झालेला पाऊस सध्या जोरदार बॅटिंग करताना दिसतोय. तर रात्रीपासून पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान हवामान विभागानं जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुराच्या पाण्यात एक बैलजोडी वाहून जातानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
हिंगोली जिल्ह्यात 2 दिवसांपासून पावसाची जोरदार हजेरी, कयाधू नदीला पूर हिंगोली : हिंगोली जिल्ह्याच्या सर्वच भागात मुसळधार पाऊस बरसत असल्याचे चित्र आहे. गेल्या दोन दिवसापासून सुरु झालेला पाऊस सध्या जोरदार बॅटिंग करताना दिसतोय. तर रात्रीपासून पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान हवामान विभागानं जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात पुढच्या 36 तासांत अनेक ठिकाणी 'फ्लॅश फ्लड'चा इशारा Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात पुढच्या 36 तासांत अनेक ठिकाणी 'फ्लॅश फ्लड'चा इशारा, कोकण, मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अल्पावधीत अतिवृष्टीता इशारा देण्यात आला आहे. रात्रीपासून कोकणात सर्वदूर मुसळधारपाऊस पडतो आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडमध्ये अतिवृष्टी झाली आहे. अनेक भागात पाणी साचलं आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
नांदेड जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस; अनेक गावांचा संपर्क तुटला नांदेड : जिल्ह्यात सर्वत्र अतिमुसळधार पाऊस झाला असून अनेक शिवारात नदीकाठच्या जमिनी आणि पिकं खरडून गेली आहेत. अर्धापूर तालुक्यातील मुखेड, नायगाव, नरसी, बिलोली, हदगाव, अर्धापूर तालुक्यातील अनेक गावात पावसाचे पाणी शिरले असून लघुळ, उंद्री, तळणी, शेलगाव या गावांचा शहरांशी संपर्क तुटला आहे. पंधरा दिवसांनंतर काढणीला येणाऱ्या सोयाबीनचं पीक पाण्याखाली गेल्यामुळं हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतला आहे. इसापूर धरण 90 टक्के भरलं असून विष्णूपुरी प्रकल्पाचे नऊ दरवाजे उघडण्यात आले आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
नागपुरात जोरदार पाऊस नागपुरात जोरदार पाऊस सुरु आहे. कालपासून पाऊस सुरुच आहे.आज सकाळपासून खूप अंधारलेले होते. आता पावसाचा जोर वाढला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
रत्नागिरीत पावसाची मुसळधार, नद्यांच्या पाणी पातळीत वाढ रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्वच भागात मुसळधार पाऊस बरसत असल्याचे चित्र आहे. सोमवार अर्थात काल दुपारनंतर सुरु झालेला पाऊस सध्या जोरदार बॅटिंग करताना दिसतोय. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान हवामान विभागानं जिल्ह्यामध्ये नऊ सप्टेंबर पर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर आता जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातल्या नागरिकांना सतर्कतेचा आवाहन केले असून मच्छीमारांनी समुद्रात न जाण्यास सूचना केल्या आहेत. सध्या मंडणगड, दापोली, गुहागर, चिपळून, लांजा, राजापूर, रत्नागिरी संगमेश्वर या तालुक्यांमधील सर्वच भागांमध्ये चांगला पाऊस बरसत आहे. पण सुदैवानं कोणतीही दुर्घटना घडलेली नाही.