Maharashtra Mumbai Rain LIVE Updates : राडगड जिल्ह्यातील पोलादपूर येथील साडेतीनशे वर्षे पुरातन झाड कोसळले
राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसामुळं नदी नाल्यांना पूर आला आहे. तर काही ठिकाणी गावात पाणी शिरल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.
एबीपी माझा वेब टीमLast Updated: 11 Jul 2022 06:43 PM
पार्श्वभूमी
Maharashtra Mumbai Rain LIVE Updates : राज्याच्या काही भागात पावसानं कहर केला आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसामुळं नदी नाल्यांना पूर आला आहे. तर काही ठिकाणी गावात पाणी शिरल्याच्या घटना देखील...More
Maharashtra Mumbai Rain LIVE Updates : राज्याच्या काही भागात पावसानं कहर केला आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसामुळं नदी नाल्यांना पूर आला आहे. तर काही ठिकाणी गावात पाणी शिरल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. राज्यातील मुंबईसह, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे सातारा, कोल्हापुरात या भागात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. तसेच गडचिरोलीमध्ये देखील पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. तिथे अनेक नद्यांना पूर आला आहे. तसेच नागपूर, चंद्रपूर, वाशिम, वर्धा जिल्ह्यातही मोठा पाऊस कोसळताना दिसत आहे.गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा कहरराज्यात विविध ठिकाणी चांगलाच पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात पावसानं कहर केला आहे. भामरागड-आलापल्ली मार्गावरील अनेक छोट्या नाल्यांना पूर आला आहे. त्यापैकी तूमर्गुंडा नाल्यावर पर्यायी रस्ता वाहून गेल्यानं या परिसरातील लोकांना मोठा अडचणीचा सामना करावा लागत आहे. या नाल्यामुळे वाहतूक ठप्प झाली असून, या भागातील लोक आपला जीव मुठीत धरुन पुराच्या पाण्यातून मोटार सायकल खांद्यावर घेऊन या प्रवाहातून जीवघेणा प्रवास करत आहेत. तर दुसरीकडे चंद्रा गावाजवळील नाल्यावरुन देखील पाणी वाहत होते. दरम्यान, पुढील तीन दिवस जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. नागपूरमध्ये दमदार पाऊसनागपूरमध्येही दमदार पावसानं हजेरी लावली. त्यामुळं शहरातील अनेक भागात पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं. नागपूरच्या पडोळे चौकात रिंगरोडवर गुडघाभर पाणी साचल्यामुळं एका बाजूची वाहतूक पूर्णपणे बंद पडली. यावेळी वाहन चालक अडकून पडू नये, म्हणून स्थानिक नागरिक तसेच तरुण लोकांना मदत करण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यांनी एका बाजूची वाहतूक बंद करत येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांना रस्ता दाखवत मार्ग काढून देण्याचे काम केले.यवतमाळ जिल्ह्यातही जोरदार पावसाची हजेरी गेल्या तीन दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळं अनेक नदी नाले दुथडी भरुन ओसंडून वाहत आहे. राळेगाव तालुक्यातील लाडकी गावात मुसळधार पाऊस झाल्याने गावातून वाहणाऱ्या नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत आहे. चंद्रपूर पाऊसमुसळधार पावसाने चंद्रपूरला देखील झोडपले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक सखल भाग जलमय झाले आहेत. जिल्ह्यातील जीवती- पोंभूर्णा -गोंडपिपरी- वरोरा- मूल या तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याने जलमय स्थिती झाली आहे. चंद्रपूर शहरातील मुख्य मार्गांवर पाणीच पाणी आहे. महत्त्वाच्या वाहतूक शाखा टी पॉईंटवर नाल्यांचे पाणी रस्त्यावर आल्याने वाहतुकीला अडथळा आला आहे. हवामान खात्याने चंद्रपूर जिल्ह्याला 72 तासांचा रेड अलर्ट दिली आहे.वाशिम आणि वर्ध्यातही जोरदार पाऊसवाशिम जिल्ह्यातही सकाळपासून हलका ते मध्यम स्वरुपाचा पावसाला सुरुवात झाली आहे. तर वर्धा जिल्ह्यात 10 ते 14 जुलैपर्यंत जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होईल असा अंदाज सांगण्यात आला आहे. या काळात वर्धा जिल्हा प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केलं आहे.
दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा किनारी 12 ते 15 जुलै पर्यंत वादळी वाऱ्याचा इशारा, नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे प्रशासनाचे आवाहन
12 जुलै ते 15 जुलै या कालावधीत दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा किनाऱ्यावर ताशी 45-55 कि.मी ते 65 कि.मी. वेगाने वादळी वारे वाहण्याचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. याबरोबरच 12 जुलै ते 15 जुलै या कालावधीत रत्नागिरीत जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. नागरिकांनी सावधानता आणि सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जावू नये, असे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाने केले आहे.
Raigad News Update : राडगड जिल्ह्यातील पोलादपूर येथील साडेतीनशे वर्षे पुरातन झाड कोसळले
पोलादपूर येथील उमरठ मधील शिवकालीन ऐतिहासिक साक्ष असलेले साडेतीनशे वर्षे पुरातन आंब्याचे झाड कोसळे आहे. नरवीर तानाजी मालुसरे यांचा इतिहास सांगणारे हे झाड होते. परंतु, मुळधार पावसामुळे हे झाड कोसळले आहे. तानाजी मालुसरे यांच्या स्मारक परिसरातच हे आंब्याचे झाड होते.
पोलादपूर तालुक्यातील उमरठ येथील कर्मभूमीतील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मारक परिसरात सुमारे साडेतीनशे वर्षे पुरातन आंब्याचे झाड होते. परकियांचे हल्ले होत असत त्यावेळी या आंब्याच्या ढोलीमध्ये मावळे तलवारी आणि हत्यारे लपवित असल्याचे माहिती सांगितली जाते.
नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे ऐतिहासिक सहस्त्रकुंड धबधबा ओसंडून वाहतोय
नांदेड जिल्ह्यातील इस्लापूर येथील व आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि विदर्भ मराठवाडा सीमेवरून वाहणारा पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधबा रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे खळखळून प्रवाहित झालाय. गेल्या 4 महिण्यापासून पाणी नसल्याने बंद पडलेला हा प्रसिद्ध ऐतिहासिक धबधबा मुसळधार पावसामुळे ओसंडून वाहतो.
पूर परिस्थिती पाहणीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गडचिरोलीला रवाना
Nagpur : गडचिरोली जिल्ह्यातील पूर परिस्थितीची पाहणी करण्याकरिता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे आज दुपारी सव्वाचार वाजता नागपूर विमानतळावर आगमन झाले. नागपूर व परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने विमानतळावरून रस्ते मार्गाने गडचिरोलीकडे त्यांनी प्रयाण केले. विभागीय आयुक्त माधवी खोडे चवरे यांनी त्यांना विमानतळावर पूर्व विदर्भातील पूर परिस्थितीचा आढावा दिला. त्यानंतर खराब हवामानामुळे हेलिकॅप्टर ऐवजी रस्ते मार्गाने त्यांनी गडचिरोलीकडे प्रयाण केले.
Aurangabad: औरंगाबादसह जालना जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज
Aurangabad Rain Update:हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज आणि उद्या दोन दिवस औरंगाबादसह जालना जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर नांदेड जिल्ह्यात सुद्धा आज मुसळधार ते अतिमुसळधार पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि नदी काठच्या लोकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Chandrapur Rain : चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट, इरई नदीच्या क्षेत्रात राहणाऱ्यांना सावधतेचा इशारा
सततच्या पावसाने चंद्रपूर जिल्ह्यातील नलेश्वर, चंदई, चारगाव आणि आणि लभानसराड हे मध्यम प्रकल्प 100 टक्के भरले आहे आणि या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झालाय.
# चंदई आणि चारगाव मधून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने जिल्ह्यातील सर्वात मोठं धरण असलेल्या इरई धरणाच्या पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे. इरई धरण सध्या 95 टक्के भरलं आहे त्यामुळे इरई धरणाचे दरवाजे उघडल्या जाऊ शकतात. प्रशासनाकडून इरई नदीच्या क्षेत्रात राहणाऱ्या लोकांना सावधतेचा इशारा देण्यात आलाय.
# चंद्रपूर जिल्ह्यात अजूनही पावसाची संततधार सुरु असली तरी पावसाचा वेग अतिशय मंदावला आहे. हवामान खात्याने देखील चंद्रपूर जिल्ह्यासाठी 11 आणि 12 जुलै साठी दिलेला रेड अलर्ट आता ऑरेंज अलर्ट मध्ये बदलण्यात आलाय.
# पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नदी-नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
Ahmednagar Rain Alert: अहमदनगर जिल्ह्यात पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा
अहमदनगर जिल्ह्यात पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. जिल्ह्यात 11 ते 14 जूलै या कालावधीत जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप निचित यांची प्रसिध्दीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
यवतमाळ जिल्ह्यातील पाच तालुक्यातील अठरा मंडळात अतिवृष्टी; 500 हेक्टरवरील पिकांना फटका
Yavatmal Rain : यवतमाळ जिल्ह्यातील पाच तालुक्यातील अठरा मंडळात अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये 500 हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. या पाण्यामुळे शेतजमीन खरडून गेली आहे. गेल्या 24 तासात 100 मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. राळेगाव तालुक्यातील राळेगाव मंडळात पावसानं रेकॉर्ड मोडला असून, 24 तासात 175 मिमी पाऊस झाला आहे. तर त्यामुळे या भागातील शेतात पाणी साचले असून, शेकडे एकर वरील पिके पाण्याखाली गेली. कापूस आणि सोयाबीनचे पीक पाण्याखाली असल्यानं शेतकरी हैराण झाले आहेत.
धुळे जिल्ह्यात पावसाची संततधार, पांझरा आणि कान नदीला पूर
Dhule Rain : धुळे जिल्ह्यात पावसाची संततधार कायम असून साक्री तालुक्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळं पांझरा आणि कान नदीला पूर आला आहे. यामुळं नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सततच्या सुरु असलेल्या पावसामुळं अक्कलपाडा धरणातून 2 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. अक्कलपाडा मध्यम प्रकल्प धरण व पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यानं प्रकल्पाच्या पाणी पातळीत 24 तासात वाढ झाली असून सद्य:स्थितीत पाणीपातळी सतत वाढत आहे. हवामान खात्याने दिलेल्या सूचनेनुसार पुढील 72 तासात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असल्यानं पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रकल्पाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार असल्यानं पांझरा नदीच्या काठावरील गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे.
Navapur Rain : नवापूर शहरातील नाल्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालं आहे. त्यामुळं नाल्यातील पाणी बाहेर जाण्यासाठी जागा नसल्यानं पाणी घरात शिरत आहे. याकडं पालिकेने लक्ष देणं गरजेचं आहे. राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरु असून, या ठिकाणी नाल्यात माती असल्यानं पाणी वाहण्यासाठी जागा नसल्यानं सकल भागात पाणी तुंबल्याचे स्थानिकांनी म्हटलं आहे. या भागातील घरात पाणी शिरले असून तीन चार मोटरसायकली पाण्याखाली गेल्या आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु असल्यामुळे नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. मुसळधार पावसामुळं औद्योगिक जड वाहतुकीचा मार्ग असलेल्या चंद्रपूर-भोयगाव-गडचांदूर या मार्गावरील वर्धा नदीचा पूल पाण्याखाली आला आहे. यामुळं मार्गावरील वाहतूक पूर्ण बंद झाली आहे. सोबतच आदीलाबादकडे जाणाऱ्या याच नदीच्या पुलावरील वाहतूकही लवकरच बंद होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. चंद्रपूर-आदीलाबाद मार्गावरील पुलाखाली सध्या पाणी असले तरी वाढता पाऊस लक्षात घेता हाही पूल पाण्याखाली येण्याची शक्यता आहे.
Sindhudurg Rain : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले दोन दिवस संततधार पाऊस पडत असून आजपासून दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे मोसमी वाऱ्यांचा जोर कायम आहे. त्यामुळे किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. जिल्ह्यात पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील आनंतराज्य तिलारी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 1 हजार 525 मिलिमीटर पाऊस झाला आहे.
पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला, शेतीकामांना वेग
पालघर जिल्ह्यात रात्रीपासून पावसाने जोर पकडला असून सोसाट्याच्या वाऱ्यासह विविध भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळं नदी नाल्यांना पूर यायला सुरुवात झाली आहे. बळीराजाही आपल्या कामाला जोमाने लागला आहे.
12 ते 14 जुलै दरम्यान रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट, काही भागात मुसळधार पावसाची शक्यता,
रायगड जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आज रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील तीन दिवस रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 12 ते 14 जुलै दरम्यान रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे.
Pune Rain : गेल्या आठ दिवसापासून कोसळणाऱ्या पावसामुळं भिमाशंकर रस्त्यावरील पोखरी घाटात आज सकाळी दरड कोसळल्याची घटना घडली. यामुळं काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. पीडब्लूडीच्या कर्मचाऱ्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत एकेरी वाहतूक सुरु केली आहे. सध्या भिमाशंकर परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळं नदी नाले तुडूंब भरुन वाहत आहेत. सततच्या पावसामुळं रस्ते खचण्याची शक्यता आहे. त्यामुळं पर्यटकांनी व भाविकांनी वाहने सावकाश चालवावं असे आवाहन शासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
नाशिक जिल्ह्यात मुसळदार पाऊस, 20 हून अधिक गावांचा संपर्क तुटला
Nashik Rain : नाशिक जिल्ह्यातही जोरदार पाऊस सुरु आहे. जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात तीन दिवसांपासून अतिवृष्टी सुरु असून शिरसगाव-मुरंबी रस्त्यावरील घोडनदीला जोडणाऱ्या उपनदीवरील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाचा काही भाग पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. यामुळं जवळपास 20 हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे.
नंदूरबारमधील रंगवली नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदी काठावरील लोकांना घरे खाली करण्याच्या सूचना
नंदूरबार जिल्ह्यातील रंगवली नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळं नदी काठावरील लोकांना घरे खाली करण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या आहेत. पाणी पातळीत अचानक वाढ होत असल्याने नदी काठावरील नागरिकांना घरे खाली करण्याच्या प्रशासनाच्या सूचना दिल्या आहेत. खबरदारीचे उपाय म्हणून नदी काठावरील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येणार आहे.
Jayakwadi Dam Update: जायकवाडी धरणात येणारी पाण्याची आवक वाढली; पाणीसाठा पोहचला 35 टक्क्यांवर
Aurangabad: जायकवाडी धरण (Jaikwadi Dam) परिसरात झालेल्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढली आहे. जायकवाडी धरणात 5 हजार 553 क्यूसेकने आवक सुरू आहे. जायकवाडी धरणाची पाणीपातळी 35.21 टक्क्यांवर पोहचली आहे. जायकवाडी धरणात जिवंत पाणीसाठा 764.460 दलघमी असल्याची माहिती धरण प्रशासनाने दिली आहे. तर गेल्या 24 तासांत धरणाचा पाणीसाठा एक टक्क्यांनी वाढला आहे.
सिंधुदुर्गात संततधार पाऊस मात्र दोन दिवस ऑरेंज अलर्ट
Sindhudurg Rains : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले दोन दिवस संततधार पाऊस पडत असून आजपासून दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे मोसमी वाऱ्यांचा जोर कायम आहे. त्यामुळे किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. जिल्ह्यात पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील आनंतराज्य तिलारी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाढच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 1525 मिलिमीटर पाऊस झाला आहे.
Palghar rain: पालघर जिल्ह्याच्या विविध भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. पश्चिम किनारपट्टी भागात जोरदार तर पूर्व भागातही जोरदार पाऊस झाला आहे. धरण क्षेत्रात अजूनही पावसाची प्रतिक्षा कायम आहे. पालघर जिल्ह्याच्या प्रमुख शहरांना पाणी पुरवठा करणारं धामणी धरण अजूनही तीस टक्केच भरलं आहे.
नंदूरबारमधील निमदर्डा गावाजवळील पर्यायी रस्ता गेला वाहून, 10 गावांचा संपर्क तुटला
Nandurbar rain : नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील निमदर्डा गावाजवळील पर्यायी रस्ता वाहून गेल्याची घटना घडली आहे. यामुळं 10 गावांचा संपर्क तुटला आहे. नवापूर तालुक्यातील निमदर्डा गावाजवळ नागण नदीवर पुलाचे काम सुरु आहे. पुलाचे काम सुरु असल्यानं बाजूला पर्यायी रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र काल आलेल्या पुरात पर्यायी रस्ता वाहून गेल्याने परिसरातील 10 गावांचा संपर्क तुटला आहे. उन्हाळ्यात या पुलाच्या कामाला सुरुवात झाली होती. मात्र ठेकेदारानं काम अपूर्ण सोडल्यानं आता परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
Wardha Rain : वर्धा जिल्ह्यात बरसल्या धुवाधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळं नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन पुलावरुन प्रवास करावा लागत आहे. पुलगाव येथील पिपरी गावातही पूर आला आहे. या पुराच्या पाण्यात एक चारचाकी वाहन देखील अडकले होते. अजूनही परिस्थिती पूर्ववत झाली नसून, नागरिक पाणी ओसरण्याची वाट पाहत आहेत.
Wardha Rains : वर्धा जिल्ह्यात बरसत असलेल्या धुंवाधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन पुलावरुन आपलं घर गाठावं लागत आहे. आता पुलगाव येथील पिंपरी गावातील पुरात वाहून गेलेल्या पुलाचा व्हिडीओ समोर आला असून आहे. नागरिकांना पुराच्या पाण्यातून आपली वाटही शोधावी लागत असून त्यावरुन जीवघेणा प्रवास सुरु आहे. अजूनही परिस्थिती पूर्ववत झाली नसून नागरिकांना येथील पाणी ओसरण्याची प्रतीक्षा आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात अतिवृष्टी, नदी-नाल्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला
Nandurbar Rain : नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 36 तासापासून पावसाची सतत सुरू असून नदी नाल्यांना पूर आले असून काही गावांचा संपर्क तुटला आहे तर अनेक गावात पुरांचे पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे. सातपुड्याच्या डोंगर रांगामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अक्कलकुवा तालुक्यातील वरखेडी, देहली आणि देव नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे पूर स्थिती निर्माण झाली आहे. नवापूर तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. मात्र गेल्या 24 तासात जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात 65 मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली असून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे तर काही ठिकाणी घरांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील परिस्थिती पाहता जिल्हा प्रशासनाच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन पथके तहसील कार्यालयांना सज्ज ठेवण्यात आली आहेत. सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये उगम पावणाऱ्या नद्यांच्या उगम स्थळावर चांगला पाऊस होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीतही मोठ्या प्रमाणत वाढ होत असून धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यासाठी नदी काठावरील गावांना ही सावधानतेचा इशारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे
नाशिकमध्ये गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार, गंगापूर धरण 55 टक्के भरलं
नाशिक जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. या पावसामुळं नाशिक शहराची तहान भागवणारे गंगापूर धरण 55 टक्के भरलं आहे. पावसाचा जोर कायम असल्याने धरणातून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग होणार आहे. आज दुपारी दोन वाजता एक हजार क्यूसेक्सने गोदापात्रात पाणी सोडले जाणार आहे. सर्व यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.