Breaking News LIVE Updates : माजी मुख्य सचिव कुंटे यांच्या खुलाशावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

abp majha web team Last Updated: 29 Jan 2022 07:42 PM
विरोधी पक्षाकडे कोणतेही मुद्दे राहिलेले नाहीत म्हणून वाईन विक्रीला विरोध- थोरात
अहमदनगर - वाईन आणि दारू यात फरक आहे, विरोधी पक्षाकडे कोणतेही मुद्दे राहिलेले नाहीत म्हणून ते वाईन विक्रीला विरोध करत आहेत असं राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे...नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी वाईनचे कारखाने सुरू केलेत, त्यांच्या मालाला बाजारपेठ मिळावी अशी आमची भावना आहे...त्यामुळे विरोध करायचा म्हणून करू नये असं थोरात म्हणाले...

तर, मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्क मुक्त महाराष्ट्र विषयावर चर्चा झाली की नाही याबाबत राज्य सरकारमधील दोन मंत्र्यांची वेगवेगळी प्रतिक्रिया आल्याबद्दल विचारले असता त्यांनी म्हटलंय की, मंत्रीमंडळ बैठकीत सर्वच विषयांवर चर्चा होत असते...परदेशात काही ठिकाणी मास्क वापरला नाही तरी चालेल असं सांगितलं जातं , त्यांचं ऐकुन आपल्या जीविताला धोका निर्माण करून घेऊ नका असं माझं मतं आहे असं म्हणत थोरात यांनी मुख्य प्रश्नाला बगल दिली...
जळगाव - गिरीश महाजन यांच्य सह चारशे कार्यकर्त्यांच्या विरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा
कोरोनाचा पार्श्वभूमीवर विविध निर्बंध लागू असतांना ही शेतकरी प्रश्नावर भाजप तर्फे गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात मोर्च्या काढण्यात आला होता,जमाव बंदी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशच उल्लंघन केल्या प्रकरणी गिरीश महाजन यांच्या सह चारशे कार्यकर्त्यांच्या विरोधात जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

 शेतकरी वीज कनेक्शन पूर्ववत करण्यात यावे या मागणी साठी भाजप तर्फे जळगाव जिल्ह्यतील जामनेर येथे भव्य मोरच्याचे आयोजन करण्यात आले होते

विविध निर्बंध लागू असतांना,जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाच उलनघन करीत  विना परवानगी मोर्च्या काढल्या प्रकरणी  भाजप नेते गिरीश महाजन यांच्या सह चारशे आंदोकाच्या विरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजी मुख्य सचिव कुंटे यांच्या खुलाशावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया
माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी अनिल देशमुख प्रकरणी केलेल्या खुलाशावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सत्य केव्हा तरी बाहेर येतेच हे त्यांनी स्पष्ट केले. न्यायाधीश या सर्व पुराव्यांवर आधारलेला निर्णय देतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 
पेंग्विनवरुन पुन्हा राजकारण तापणार...

मुंबईत राणी बागेतील कंत्राटे आणि पेंग्विनकरता होणा-या खर्तावरुन भाजपनं टीकेची झोड उठवली होती...मात्र, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्वत: अहमदाबादेतील सायन्स सेंटरच्या पेंग्विन कक्षाला भेट देऊन अनेक महत्वाचे मुद्दे समोर आणलेत. राणीबागेतील पेंग्विन पहाण्याचा  तिकीटदर २५ ते ५० रुपये तर अहमदाबादेतील पेंग्विन पहाण्याकरता ३०० रुपये मोजावे लागतात. त्यामुळे आता राणीबागेचे पेंग्विन आणि अहमदाबादेचे पेंग्विन अशी तुलना सुरु झाली आहे. 





आमदार ऋतुराज पाटील यांना कोरोनाची लागण

आमदार ऋतुराज पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. नुकतीच माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. सध्या मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच उपचार घेत आहे. माझी प्रकृती चांगली आहे. कोरोनावर मात करून मी लवकरच आपल्या सेवेत रुजू होईन. काळजी घ्या, सुरक्षित रहा, असे ट्वीट आमदार ऋतुराज पाटील यांनी केलेय. 

सुशील खोडवेकर याला 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

टीईटी परीक्षा घोटाळ्यात अटक करण्यात आलेला उपसचिव दर्जाच्या सुशील खोडवेकर याला 31 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी


शिवाजीनगर न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी

ऊस बिलातून थकीत वीजबिल वसूल करणे हे अत्यंत चुकीचं - फडणवीस

ऊस बिलातून थकीत वीजबिल वसूल करणे हे अत्यंत चुकीचं असल्याचे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. महावितरण सावकारी झाली आहे. महाराष्ट्र सरकारकडून पठाणी वसुली सुरु आहे. वसुली करून शेतकऱ्यांना नगवण्याचा प्रयत्न केला जातोय. ही पद्धत तात्काळ बंद करा, असा इशारा माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

पेगॅसेस प्रकरणावर सोमवारी होणाऱ्या अधिवेशनात आवाज उठणार - खासदार सुनील तटकरे

पेगॅसेस प्रकरणावर सोमवारी होणाऱ्या अधिवेशनात आवाज उठणार असल्याची माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे. ते पंढरपूरमध्ये बोलत होते. सर्व विरोधीपक्ष जी भूमिका घेणार तीच आमची असेल, असेही ते म्हणाले.  

कोल्हापुरात शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून शेती पंपाच्या थकीत बिलाची वसुली सुरू

कोल्हापुरात शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून शेती पंपाच्या थकीत बिलाची वसुली सुरू, हुपरीतील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्यांनी वीज बिलाची वसुली करत उत्पादकाला दिलं बिल


परस्पर वीज बिल वसुली केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, 


स्वाभिमानी शेतकरी संघटना जवाहर शेतकरी साखर कारखान्याचा दारात आंदोलन करणार

 गांधीधाम पुरी एक्सप्रेस गाडीला नंदुरबार स्थानकाजवळ अचानक आग लागली, आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही

 गांधीधाम पुरी एक्सप्रेस गाडीला नंदुरबार स्थानकाजवळ अचानक आग लागली या आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही आहे मात्र रेल्वे स्टेशनच्या आत येण्याआधीच गाडीला अचानक आग लागल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळाला आहे.

1 फेब्रुवारीपासून पुण्यातील शाळा सुरु होणार : अजित पवार 

येत्या 1 फेब्रुवारीपासून पुण्यातील शाळा सुरु होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. पहिली ते आठवीची  शाळा हाफ डे असेल. म्हणजे अर्धा दिवस शाळा असेल. दुपारच्या सुट्टीनंतर मुलांनी घरी जाऊन डबा खायचा आहे. तर नववीपासून पुढच्या इयत्तांचे वर्ग पूर्णवेळ भरतील असे अजित पवार यांनी सांगितले. फिरत्या मोबाईल व्हॅनमधून लसीकरण मोहिम राबवण्यात येणार आहे. तसेच 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण शाळेतच करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. 

कारसह चालकाचा होरपळून मृत्यू,नागपूर जिल्ह्यातील उमरेडमधील घटना

भरधाव कारची धडक डीवायडरला लागल्यामुळे झालेल्या अपघातात कारने पेट घेतला, या घटनेत कारसह चालकाचा सुद्धा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथे काल घडली आहे. 


अशोक राऊत असे मृत झालेल्या कार चालकाचे नाव आहे. अशोक राऊत हे वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (वेकोली) येथे कार्यरत होते. 


अपघातानंतर अनेकांनी त्यांना पेटलेल्या कार मधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला,मात्र त्यात कुणालाही यश आले नाही.

सोलापुरात आज पुन्हा 1 हजारहून अधिक ट्रक कांद्याची आवक

सोलापुरात आज पुन्हा 1 हजार हुन अधिक ट्रक कांद्याची आवक, आतापर्यंत नोंदवलेल्या गाड्यांची संख्या 1 हजार, गुरुवारी झालेल्या आवकमुळे काल शुक्रवारी बाजार बंद ठेवावा लागला होता, आज पुन्हा विक्रमी आवक असल्याने उद्या पुन्हा बाजार बंद ठेवावा लागण्याची शक्यता


 

परीक्षा ऑनलाईन घ्या, साताऱ्यात विद्यार्थांचे महाविद्यालयासमोर ठिय्या आंदोलन

रयत शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील विद्यार्थांनी महाविद्यालयासमोरच ठिय्या मंडून आंदोलन केले. एसवाय आणि टीवायच्या विद्यार्थांची परीक्षा ही ऑनलाईन घेतली जाणार असे सांगितले जात असताना अचानक व्यवस्थापनाने निर्णय घेऊन ही परिक्षा ऑफलाईन घेतली जाणार असल्याचे सांगितले. त्यावर विद्यार्थी वर्गामध्ये नाराजी पसरली होती. महाविद्यालयाचा ठाम निर्णय असल्याचे सांगण्यात आल्यानतंर मात्र विद्यार्थी आक्रमक झाले आणि त्यांनी महाविद्यालयासमोरच ठिय्या धरून महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाचा निषेध नोंदवला. सध्या एसटी सुरु नाही. ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्याव विद्यार्थांचे मोठे हाल होत आहे. मोठी कसरत करावी लागते. त्यात परीक्षेच्या वेळेत विद्यार्थांना परीक्षेला पोहचता येणार नाही. त्यामुळे व्यवस्थापनाने आपला निर्णय बदलून परिक्षा ऑनलाईन पध्दतीने घ्याव्यात अशी मागणी केलीय

शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून युवतीची आत्महत्या

शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून युवतीची आत्महत्या


कोल्हापूर जिल्ह्यातील अर्जुनवाडा येथील घटना


संशयित अमित कुंभार या शिक्षकाला अटक


लग्न करण्यासाठी तगादा लावल्याने तरुणीने केले होते विषप्राशन


आकांक्षा सातवेकर असं आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव

हुपरीतील खुनाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल

हुपरीतील खुनाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल


इम्तियाज नदाफ याने पत्नी समीनाचा सत्तुराने वार करून केला खून 


25 जानेवारीच्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर


सत्तूराने सपासप वार करून निर्दयीपणे खून केल्याचं आलं समोर


जीव वाचवण्यासाठी समिनाने केला होता आक्रोश


इम्तियाजला अडवण्यापेक्षा लोकांनी केले चित्रीकरण

शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून युवतीची आत्महत्या;कोल्हापूर जिल्ह्यातील अर्जुनवाडा येथील घटना


शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून एका युवतीनं आत्महत्या केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अर्जुनवाडा येथे ही घडली आहे. संशयित अमित कुंभार या शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. लग्न करण्यासाठी तगादा लावल्याने तरुणीने  विषप्राशन केले होते. आकांक्षा सातवेकर असं आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

नवी मुंबई महानगरपालिका प्रभाग रचना मंगळवारी जाहीर होणार

नवी मुंबई महानगर पालिका प्रभाग रचना मंगळवारी जाहीर होणार,  राजकीय पक्षांची प्रतीक्षा संपणार ,  महानगर पालिकेची 111 नगरसेवक संख्या आता होणार 122,  नगरसेवक संख्या वाढल्याने पुर्वी असणारी नगरसेवक प्रभागाची रचना बदलणार , बदलणाऱ्या प्रभाग रचनेबाबत उमेदवारांना उत्सुकता...

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी शहरात शुक्रवारी दुपारी पूर्ववैमनस्यातून दोन गटांत तुफान राडा

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी शहरात शुक्रवारी दुपारी पूर्ववैमनस्यातून दोन गटांत तुफान राडा झाला, या घटनेत एकाची निर्घृणपणे हत्या देखिल करण्यात आली होती. शहरात सध्या तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी संचारबंदी देखिल लागू केलीय. मयत असलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव राहुल साळवे असून त्याच्यावर रेल्वे पोलिसांकडे व शहर पोलिसांत विविध गुन्हे दाखल आहेत. संशयित २० ते २५ आरोपी फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. हातात तलवारी, कोयते, चॉपर घेत या टोळक्याने दहशत माजवली. ३ चारचाकीं, ५ दुचाकींसह घरांवर देखिल दगडफेक करण्यात आली. विशेष म्हणजे इतकं सगळं घडत असताना पोलिस नक्की कुठे होते ? हा प्रश्न आता उपस्थित होतोय. 

सातारा जिल्ह्यात काल एकाच दिवशी दोन विद्यार्थीनींची आत्महत्या

सातारा जिल्ह्यात काल एकाच दिवशी दोन विद्यार्थीनींनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली असून यातील एका मुलीने आपल्याला सेमी इंग्लीश नको म्हणून मी आत्महत्याकरत असल्याचे तिने चिठ्ठीत लिहून ठेवले आहे. कराड मलकापूरातील पायल लेंढे ही इयत्ता 9 वी मध्ये शिकत होती. तिने घरात गळफास घेऊन आत्महात्या केली. तर सातारा शहरातील धुमाळ आळी येथे राहणारी 15 वर्षाची अनुष्का पवारनेही राहत्या घरात गळफास घेऊन आत्म्हात्या केली. 9 वी मध्ये शिकत होती. अनुष्काने आत्महात्या करण्यापुर्वी तिने लिहीलेल्या चिठ्ठीत सेमी इंग्लीश मला नोक असल्यामुळे मी आत्महात्या करत असल्याचे तिने चिठ्ठीत लिहून ठेवले आहे. असलेल्या या दोन विद्यार्थीनींनी केलेल्या आत्महात्येमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. पायल का आत्महत्या केली हे मात्र समजू शकले नसून शाहूपुरी पोलिस याचा शोध घेत आहेत.

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

१. मुंबईत मालमत्ता कराच्या थकबाकीदारांना पालिकेकडून २१ दिवसांची मुदत, थकबाकी न भरल्यास मालमत्ता जप्त होणार, मार्च अखेरपर्यंत सुमारे दीड हजार कोटी वसुलीचे उद्दिष्ट


२. सुपरमार्केटमध्ये वाईनविक्रीचा निर्णय आणि नाईट लाईफच्या संकल्पनेवरुन संभाजी भिडेंची आगपाखड,  तर लिव्ह इन रिलेशनशिपबाबतच्या निर्णयावरुन चक्क न्यायमूर्तींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य


३. एन. डी. पाटलांच्या निधनानंतर अंधश्रद्धा निर्मुलन समितीतला अंतर्गत वाद चव्हाट्यावर, हमीद आणि मुक्ता दाभोलकरांनी ७ कोटींचा ट्रस्ट ताब्यात घेतल्याचा अविनाश पाटलांचा आरोप


डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमधे पडलेली फुट अधिकच मोठी होताना दिसतेय.  डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी नरेंद्र दाभोलकर यांच्या कुटुंबीयांच्या समितीत सक्रिय होण्यास आक्षेप घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये दोन गट पडले आहेत. एक गट डॉक्टर हमीद दाभोलकर आणि मुक्ता दाभोलकर यांच्या सोबत काम करतोय तर दुसरा गट अविनाश पाटील यांच्या सोबत काम करतोय. नुकतेच एन डी पाटील यांचे निधन झाल्यावर या दोन गटातील वाद पुन्हा उफाळून आलाय.  एन डी पाटील हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष होते.  त्यांच्या जागेवर एन डी पाटील यांच्या पत्नी सरोज पाटील यांची निवड करण्याचा निर्णय हमीद आणि मुक्ता दाभोलकर  गटाने घेतला.  मात्र अविनाश पाटील यांनी याला आक्षेप घेतलाय. येत्या जून महिन्यात संस्थेच्या कार्यकारिणीत याबद्दल निर्णय घेण्यात येईल असं अविनाश पाटील यांनी पत्रक काढून म्हटलंय. त्याचबरोबर हमीद आणि मुक्ता दाभोलकर यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सात कोटी रुपयांची मालमत्ता असलेल्या ट्रस्टवर अवैधरित्या ताबा मिळवल्याचा आरोप  अविनाश पाटील यांनी केलाय. त्याचबरोबर नरेंद्र दाभोलकरांच्या कुटुंबीयांवर घराणेशाहीचा आरोपही त्यांनी केलाय. यावर अद्याप हमीद आणि मुक्ता दाभोलकर यांच्याकडून मात्र काही प्रतिक्रिया आलेली नाही. दोन्ही 


४. तूर्तास मास्कमुक्त महाराष्ट्राचा गैरसमज डोक्यातून काढून टाका, कोरोनापासून वाचण्यासाठी मास्कच मोठं हत्यार असल्याचं आदित्य ठाकरेंचं मत


५. दहावी आणि बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्यात घ्या, शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांची सूचना, परीक्षेआधी लसीकरण पूर्ण करण्याचीही विनंती


६. मध्य प्रदेशातील भिंडमध्ये सिंध नदीत नौका बुडाली, १२ पैकी १० जणांना वाचवण्यात यश, दोन लहान मुलांचा शोध सुरु

 मध्य प्रदेशातल्या भिंड जिल्ह्यातून वाहणाऱ्या सिंध नदीत एक नौका बुडाली.. दुर्घटनेवेळी बोटीत १२ जण होते. त्यापैकी १० जणांना वाचवण्यात आलंय. मात्र दोन लहान मुलं अजूनही बेपत्ता आहेत..या दुर्घटनेची काही दृश्य इतर बोटीतल्या उपस्थितांच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे..
 
७. बेस्टच्या ताब्यात लवकरच नव्या रुपातल्या ९०० डबलडेकर इलेक्ट्रिक एसी बसेस येणार, मुंबईकरांचा प्रवास गारेगार आणि आणखी सुकर होणार
 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.