Maharashtra News LIVE Updates : महाराष्ट्रासह देश विदेशातील बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Maharashtra LIVE Updates News: गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात कोल्ड वॉर असल्याची चर्चा रंगली आहे. यासह महाराष्ट्र आणि देश-विदेशातील महत्वाच्या अपडेट्स एका क्लिकवर...
पार्श्वभूमी
Maharashtra LIVE Updates News: गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात कोल्ड वॉर असल्याची चर्चा रंगली आहे. भाजपकडून शिंदेंची जमेल तेवढी कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची...More
वडगाव शेरीत मध्यरात्री अनेक वाहनांची तोडफोड
वाहनांचा मोठ नुकसान
दोन गटात बाचाबाची सुरु झाली आणि त्यानंतर वाहनांची तोडफोड करण्यात आली
पुण्यात मागील काही दिवसांपासून वाहन तोडफोडीचे सत्र सुरू आहे.
या तोडफोडीत सर्वसामान्य पुणेकरांचे मात्र अतोनात नुकसान होत आहे.
शुक्रवारी मध्यरात्री वडगाव शेरी परिसरात दहा ते बारा जणांच्या टोळक्याने पुन्हा वाहनांची तोडफोड करत नासधूस केली.
यामध्ये ५ चारचाकी, ५ दुचाकी, २ ऑटो रिक्षांची तोडफोड करण्यात आली. तर रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या अनेक दुचाकींची नासधूस करण्यात आली.
चंदन नगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पन्हाळगडचा रणसंग्राम या लघुपटाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार
लघुपटाचा आणि 13 D थिएटर चा लोकार्पण सोहळा होणार
गुरुवार ६ मार्च २०२५ रोजी सायंकाळी लोकार्पण सोहळा होणार
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा होणार
आमदार विनय कोरे यांची माहिती
वसई विरार शहर महानगरपालिकेची पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईप लाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे. विरारच्या नारंगी बायपास रोडलगत आज सकाळी ही घटना घडली आहे. स्थानिक नागरिकांनी वेळेवर तक्रार करूनही नगरपालिकेने तात्काळ दखल घेतली नाही. पाण्याच्या नासाडीमुळे नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.
चिपळूण : दोन्ही तालुक्यात उद्धवसेनेतील गळती थांबलेली नाही. सावर्डेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा बैठकीच्या वेळी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत दोन्ही तालुक्यातील तब्बल आठ सरपंच, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. आमदार शेखर निकम यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत प्रवेश केल्याचं प्रवेशकर्त्यांनी सांगितलं. यावेळी दोन्ही तालुक्यातील अनेक शिवसेना कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल झाले. प्रदेशाध्यक्ष खासदार तटकरे व आमदार शेखर निकम यांनी त्यांचं राष्ट्रवादीत स्वागत केलं.
Breaking
exam bord alert
- कालच्या दहावी पहिल्या पेपर फुटीच्या पार्श्वभुमीवर आज बोर्डाचे अधिकारी अलर्टवर
- नागपूर विभागीय बोर्डाचे अध्यक्ष चिंतामन वंजारी यांच्याकडून परिक्षा केंद्रावर पाहणी
- नागपूर विभागातील बोर्डाचे ५० च्या वर भरारी अलर्ट मोडवर
- कॅापी किंवा पेपर व्हॅाटॲपवर व्हायरल झाल्यास संस्था संचालक व दोषी शिक्षकांचे होणार निलंबन आणि फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे चिंतामण वंजारी यांनी सांगितले.
बाईट - चिंतामण वंजारी, विभागीय अध्यक्ष, नागपूर
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते नरेंद्र राणे परतीच्या वाटेवर
नरेंद्र राणे त्यांचे भाऊ आणि दिनकर तावडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या भेटीला प्रदेश कार्यालयात पोहोचले
निवडणुकीपूर्वी मुंबई कार्याध्यक्ष पदी असणारे नरेंद्र राणे, जनरल सेक्रेटरी पदी असणारे विलास माने यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता
निवडणुकासंपताच पुन्हा राणे आणि त्यांचे समर्थक पदाधिकाऱ्यांना परतीचे वेध लागल्याची सुत्रांची माहिती
सध्या नरेंद्र राणे आणि त्यांच्या ४ सहकाऱ्यांना पक्षातून विरोध असल्यामुळे पक्ष प्रवेशाची तारीख निश्चित झाली नसल्याची सूत्रांची माहिती
राहुल नार्वेकर
- सुनिल केदार याच्या संदर्भात सर्व कायदेशीर प्रक्रिया झाल्यानंतरचं कारवाई केली होती
- कोकाटे यांच्या संदर्भातही घटनेत दिलल्या तरतुनुसार कायदेशीर कारवाई झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया होईल
- माझासाठी तुलना करणं गरजेच नाही. अध्यक्ष म्हणून मी या प्रकरणात कायदेशीर प्रक्रिया झाल्यानंतर पुढील कारवाई होईल
- कुठच्याही प्रकाची हिंसा ही लोकशाहीसाठी घातक आहे. ही घटन खेद जनक आहे.
- मोदीजी सर्वांना सोबत घेऊन चालणारे नेते आहे. ते सर्वांना सोबत घेऊन चालतात आणि कुठच्याही पक्षाचा नेता असला तरी ते त्यांचा आदर करतात
नाशिक शहरातील काठे गल्ली येथील धार्मिक स्थळांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी नाशिक महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाकडून गेल्या दोन तासांपासून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे नाशिक शहरामध्ये वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जात आहे. मात्र मुस्लिम धर्मगुरू मौलाना इब्राहिम व शेहर ए खतीब यांच्यासह काही धर्मगुरूंनी स्वतः अतिक्रमणाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली त्यामुळे त्या ठिकाणी कोणतेही अनुचित घडले नसल्याचं सांगत त्यांनी शांततेचा आव्हान केल आहे.
बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळा
पुढचा आठवड्यात सिल्लोड, परभणी आणि लातूर पोलिस स्टेशन येथे बनावटी दस्तावेजचा आधारावर फसवणुकीने जन्म प्रमाणपत्र प्राप्त केल्याचा विरोधात घुसखोर बांगलादेशींचा विरोधात तक्रार करणार
सिल्लोड लातूर परभणी येथे 2000 हून अधिक बांगलादेशी घुसखोरांनी येथे जन्म झाल्याचे प्रमाणपत्र मिळविले
किरीट सोमैया
चिपळूण, संगमेश्वर तालुक्यात शिवसेना उबाठाला जोरदार धक्का
चिपळूण, संगमेश्वर तालुक्यात दोन्ही तालुक्यात उद्धवसेनेतील गळती थांबलेली नाही. सावर्डेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा बैठकीच्या वेळी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत दोन्ही तालुक्यातील तब्बल आठ सरपंच, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. आमदार शेखर निकम यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत प्रवेश केल्याचं प्रवेशकर्त्यांनी सांगितलं. यावेळी दोन्ही तालुक्यातील अनेक शिवसेना कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल झाले. प्रदेशाध्यक्ष खासदार तटकरे व आमदार शेखर निकम यांनी त्यांचं राष्ट्रवादीत स्वागत केलं..
बीड ब्रेकिंग: सुरेश धस केज पोलीस ठाण्यात दाखल
देशमुख कुटुंब आणि मस्साजोग ग्रामस्थांची भेट घेतल्यानंतर धस केज पोलीस ठाण्यात दाखल
सरपंच देशमुख हत्या प्रकरणाशी पोलिसांना माहित असलेल्या संबंधित विषयावर करणार चर्चा
पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्यासोबत चर्चा करून घेणार माहिती
या भेटीनंतर सुरेश धस परळीत मुंडे कुटुंबाची भेट घेण्यासाठी रवाना होतील
सोलापूर ब्रेकिंग
====
फिर्याद का घेत नाही असा जाब विचारत फेसबुक लाईव्ह करणाऱ्या युवकाला पोलिसांकडूनच मारहाण झाल्याचे उघड
एक वर्षांपूर्वीच्या प्रकरणातील cctv फुटेज माहिती अधिकारातून आले समोर
बार्शी पोलीस स्टेशनच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडूनच मारहाण झाल्याच्या घटनेचे Cctv फुटेज समोर
7 जानेवारी 2024 रोजी झालेल्या या मारहाणीचे Cctv फुटेज पिडीत युवकाने माहिती अधिकारातून मिळवले आहे
जानेवारी 2024 मध्ये आरटीआय कार्यकर्ते विनोद जाधव हे त्यांना झालेल्या मारहाणीची तक्रार देण्यासाठी बार्शी पोलीस स्टेशनला गेले होते
मात्र पोलीसांनी यावेळी गुन्हा दाखल केला नाही म्हणून विनोद जाधव यांनी फेसबुक लाईव्ह केलं मात्र. फेसबुक लाईव्ह का केला यासाठी चिडलेल्या पोलिसणी मारहाण केल्याचा आरोप जाधव यांनी केला होता
तसेच पोलिसांनी मारहाण करून उलट त्यांच्यावरच शासकीय कामात अडथळा निर्माण करणे आणि खंडणीचा गुन्हा दाखल केल्याचा आरोप विनोद जाधव यांनी केला होता
या प्रकारणानंतर माहिती अधिकारांतर्गत पोलीस स्टेशनचे सिसिटीव्ही मागितले होते
या सिसिटीव्ही फुटेजमध्ये पोलीसच मारहाण करतं असल्याचे दिसतं आहे
त्यामुळे मारहाण करणाऱ्या पोलिसांवर गुन्हा दाखल करून तात्काळ कारवाई करावी अशी मागणी पिडीत विनोद जाधव यांनी केलीय.
मीरा रोडवर नशेत ऑटो चालकाने प्रवाशाला चिरडण्याचा प्रयत्न
मिरा रोड : मीरा रोडच्या रामदेव पार्कमध्ये १८ फेब्रुवारी रोजी नशेत असलेल्या ऑटो चालकाने प्रवाशाला चिरडण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करत असलेल्या ४४ वर्षीय व्यक्तीला रिक्षा चालकाच्या बेजबाबदार वर्तनाचा सामना करावा लागला. भाड्याच्या वादातून रिक्षा चालकाने दुप्पट पैसे मागितले आणि नकार दिल्यावर शिवीगाळ करत रिक्षा चालवून चिरडण्याचा प्रयत्न केला.
या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज मिळूनही, चार दिवसांनंतर मीरा रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडिताने घटनेची तक्रार मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांकडे नोंदवली असून, सध्या तपास सुरू आहे.
अमरावती....
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बाईट
ऑन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दौरा..
- महायुती सरकारच्या पुढाकाराने 20 लक्ष घर मंजूर झाली..
- 20 लाख घरांचं आवर्तन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार..
- 20 लाख घरांचा वाटप होणे हा आजचा ऐतिहासिक दिवस.. चंद्रशेखर बावनकुळे
- सर्व लाभार्थ्यांना आज चेकचे वितरण केले जाईल..
- इथल्या दोन पालकमंत्र्यांचा प्रश्न हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार मिळून सोडवतील..
ऑन राज ठाकरे उदय सामंत भेट
- राज ठाकरे यांचे सर्वांची चांगले संबंध आहेत.. ते सर्वांचे मित्र आहे.. त्यामुळे अशा किती होत असतात..
ऑन अण्णा हजारे यांनी धनंजय मुंडे,कोकाटे राजीनामा मागणी
- अण्णा हजारे यांनी जी मागणी केली आहे त्याबद्दल आपले सरकार ऐकून घेतील.. आणि त्यावर निर्णय करतील..
ऑन एकनाथ शिंदे
- एकनाथ शिंदे महायुतीत नाराज नाहीत..
- एकनाथ शिंदे प्रबल ग आणि महायुतीतील महत्त्वाचे घटक आहेत..
- एकनाथ शिंदे महायुतीला मजबूत करण्यासाठी काम करतात..
- एकनाथ शिंदे यांच्या विधानाचा वेगळा अर्थ काढू नये.
- विरोधकांना नामोहर करण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी नेहमी केल आहे.
- हिंदुत्वाचा वसा घेतलेलं काम एकनाथ शिंदे करत आहेत..
- बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची शिवसेना पुढे नेण्याचं काम शिंदे करत आहेत..
- त्यामुळेच भाजप सेना युती अधिक मजबूत झाली आहे.
- आता राजकारण नको लोकांना जी आश्वासने दिली ती पूर्ण करायची आहे..
- महाराष्ट्र विकसित महाराष्ट्र व्हावा यासाठी आता महायुती काम करते आहे..
ऑन नितेश राणे वक्तव्य
- भाजप मजबूत झाली पाहिजे ही सहाजिक भावना नितेश राणेंनी व्यक्त केली..
- प्रत्येक जण आपला पक्ष मजबूत झाला पाहिजे यासाठी काम करत आहे..
ऑन सुरेश धस देशमुख भेट
- सुरेश धस यांनी भेटी घेतल्या पाहिजे.. भेटी होत असतात.. त्यात काही वेगळं नाही..
हेमंत पवार शिवसेना शहर प्रमुख (शिंदे गट)
ऑन गणेश नाईक जनता दरबार
- गणेश नाईक ज्येष्ठ नेते आहेत परंतु हे विसरले आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागे जनता आहे.
- दिघे साहेबांनी दरबार भरवण्याची प्रथा चालू केली आणि ती आज पर्यंत सुरू आहे.
- जनता दरबार आधी दिघे साहेब रात्री ३ वाजेपर्यंत चालवायचे आणि त्यांच्या पश्चात एकनाथ शिंदे सुद्धा जनता दरबार भरवतात , आनंद आश्रमात सुद्धा खासदार नरेश म्हस्के जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी बसलेले असतात , मंत्री प्रताप सरनाईक देखील बसतात
- दुसरा प्रश्न असा उपस्थित होतो गणेश नाईक इथे जनता दरबार घेत आहेत मग आमचे ३ वेळा आमदार असलेले संजय केळकर जनतेची काम करत नाहीत का?
- केळकर साहेब काम करतात म्हणून ५६ हजाराचे मतदान ठाणेकरांनी दिले आहे.
- संजय केळकर , एकनाथ शिंदे , प्रताप सरनाईक , नरेश म्हस्के हे नेहमी जनतेच्या दरबारात काम करत असतात मग हा नवीन फंडा कशासाठी
- केळकर हे भाजपचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत त्यांचा क्लीन चेहरा आहे भाजपाचा चेहरा आहे , तळागाळात भाजप वाढवण्याचे काम संजय केळकर यांनी केलं
- केळकर साहेबाना मंत्री पद मिळावं अस एक शिवसैनिक असून वाटत होत
- मुकेश बाबाच्या आशीर्वादाने ज्यांना मंत्रिपद मिळाले त्यांनी जनतेची काम करावी पण जनता दरबार सारखा घाट घालू नये
- शिंदे साहेब जिथे उभे राहतात जिथे जिथे त्यांची गाडी थांबते तिथे तिथे त्यांचा जनता दरबार सुरू होतो
- ह्या नवीन फॅड ला ठाणेकर दाद देणार नाहीत
ऑन ओन्ली कमळ नारा
* त्यांनी हा जो नारा दिला आहे पण ठाणेकर जनता ही शिवसेनेच्या मागे उभी आहे.
* त्यांचा मुलगा राष्ट्रवादीतून उभा राहतो , मग त्याच्याकडे जनतेने कसं बघायचं
* नाईक यांची खंत एकच आहे मंदा म्हात्रे निवडून आल्या त्याला कारणीभूत एकच आहे शेवटची मीटिंग शिंदे साहेबांनी घेतली , शिंदे साहेबांनी युती धर्म पाळल
* ठाणे जिल्ह्यात जेवढे भाजप चे जेवढे आमदार आहे तिथे जाऊन सभा घेतल्या खासगी मीटिंग घेतल्या सर्वांच्या कडे जाऊन युती धर्म पाळल
* युती धर्म न पाळणारे जिल्ह्यामध्ये आहे जे उगाचच युती मध्ये मिठाचा खडा टाकत आहेत
* भाजपचा एक नियम आहे की ७५ वर्ष झाल्यावर मंत्री पदावर राहता येत नाही हा नियम त्यांना पुढच्या वर्षी लागू होईल कारण त्याचं वय झालेलं आहे
ऑन महापालिका निवडणुका
* महापालिकेवर हा झेंडा आनंद दिघे यांनी लावला भगवा झेंडा हेच काम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत
* निवडणुका आल्या म्हणून आम्ही कोणताही काम करत नाही आमचे कार्यालय २४ तास , शाखा २४ तास चालू असतात
* आमचे नगरसेवक जरी नसले तरी काही माजी नगरसेवक रस्त्यावर बसून काम करतात
* आम्हाला निवडणुका नवीन नाही
* आमचाच महापौर बसेल यात दुमत नाही
ऑन समाजकारण राजकारण
* समाजकारणाचा वसा दिघे यांनी घेतला होता तोच वसा शिंदे यांनी चालू ठेवला आणि तोच वसा सर्व मंत्री बाळासाहेब भवन ल आमचे मंत्री जनता दरबार घेतात
* लाडकी बहीण योजना शिंदे साहेब त्याचे जनक आहेत त्याच्या मुळे महायुतीला एवढ मताधिक्य मिळाले
* जनता दरबाराची आवश्यकता कोणाला आहे माहीत नाही ठाण्यात दोनच दाढी आहेत केळकर आणि शिंदे हे दोघेच सक्षम आहेत
गणेश नाईक यांना शिवसेनेच्या वतीने जनता दरबार वरून डीवचण्याला सुरवात....
पुण्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर चर्चा सत्र
राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते चर्चासत्र चे उद्घाटन
केंद्र सरकारने लागू तयार केलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर चर्चा होणार
येत्या शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण महाराष्ट्रात लागू होणार आहे.
पुण्यातील फरगुशन कॉलेजमध्ये विद्याभारती आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी कडून शिक्षण परिषद आयोजन
कल्याण पूर्व येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना डिसेंबर मध्ये घडली होती या घटनेत पोलिसांनी आरोपी विशाल गवळी त्याची पत्नी साक्षी गवळी या आरोपी विरोधात कल्याण न्यायालयात ९४८ पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या गुन्हयाचे न्यायालयीन कामकाज पाहण्यासाठी शासनाकडुन विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे.
गडचिरोली-चामोर्शी राष्ट्रीय महामार्गावरील कुनघाडा बस स्थानकाजवळ उभा असलेल्या ट्रकला दुचाकीस्वाराने धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. आनंद महामंढरे असे ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. दुचाकीस्वार हा चामोर्षीकडून गडचिरोलीकडे येत होता. दरम्यान ट्रकला जोरदार धडक बसल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांत मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे दरम्यान महागाव तालुक्यातील कोठारी येथील परीक्षा केंद्रावर मराठीचा पहिलाच पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता अखेर कोठारी येथील शाळेचे केंद्र संचालक श्याम तास्के आणि एक अज्ञात व्यक्ती यांच्यावर महागाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील 36 हजार 7 लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले आहेत. लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्र आणि प्रथम हप्त्याचे वितरण आज शनिवारी होणार असून जिल्हास्तरीय कार्यक्रम नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालयात येथे दुपारी पार पडणार आहे. या कार्यक्रमात 15 हजार पेक्षा अधिक लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरीत केला जाणार आहे.
सातारा: जावळी तालुक्यात महू -हातगेघर धरणाचे काम मागील 28 वर्षापासून अपूर्णच असून 1.36 टीएमसी क्षमतेचं पाणीसाठा या धरणात आहे या धरणातील प्रकल्पग्रस्तांना अद्यापही अजून न्याय मिळाला नसल्याने शेतीला पाणी नाही आता उपजीविकेसाठी धरणाच्या पाणीसाठ्यात जल पर्यटन सुरू करण्यास परवानगी मिळावी या मागणीसाठी धरणाच्या भिंतीवरच या भागातील प्रकल्पग्रस्तांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर येत्या 27 फेब्रुवारीला याच धरणाच्या पाण्यात जलसमाधी घेणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील पासोडी येथे मजुराच्या पत्र्याच्याशेडवर वाळूचा टिप्पर खाली केल्याने 7 कामगार दबले गेले. यात 2 जणांना वाचवण्यात यश आले असून , या घेटनेत 5 जणांचा दबून मृत्यू झाला. पहाटे 4 वाजता ही घटना घडली. या घटनेत एका तेरा वर्षीय मुलीला आणि एका महिलेला वाचवण्यात यश आल आहे.
वैद्यकिय उपचारासाठी आणलेला आरोपी जे जे रुग्णालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला
संघर्ष म्हस्के २४ असे या आरोपीचे नाव आहे
आरोपी संघर्षलाला याला पंतनगर पोलिसांनी जळगावहून आणले होते
या आरोपीला शुक्रवारी दुपारी १२ व वैद्यकिय तपासणीसाठी जेजे रुग्णालयात आणले असता
आरोपीला रुग्णालयातील अपघात विभागात दुपारी ३ ते ४ वा दरम्यान जेवणासाठी ठेवले होते
त्यावेळी पोलिसांची नजर चुकवून आरोपीने जे जे रुग्णालयातून पळ काढला
या प्रकरणी पंतनगर पोलिस ठाण्यात नेमणुकीसाठी असलेल्या पोलिस हवालदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून जे जे मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
आयएनएस गुलदार बनणार भारतातील पहिले अंडरवॉटर म्युझियम आणि कृत्रिम रीफ
भारतीय नौदलाच्या निवृत्त जहाजाचा वापर करण्याचा हा भारतातील पहिलाच उपक्रम
काल भारतीय नौदलाने आयएनएस गुलदारला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ लिमिटेड (एमटीडीसी) ला पाण्याखालील संग्रहालय आणि कृत्रिम रीफमध्ये रूपांतरित करण्यासाठी कारवारमध्ये सुपूर्द केले
फिर्याद का घेत नाही असा जाब विचारत फेसबुक लाईव्ह करणाऱ्या युवकाला पोलिसांकडूनच मारहाण झाल्याचे उघड
एक वर्षांपूर्वीच्या प्रकरणातील cctv फुटेज माहिती अधिकारातून आले समोर
बार्शी पोलीस स्टेशनच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडूनच मारहाण झाल्याच्या घटनेचे Cctv फुटेज समोर
7 जानेवारी 2024 रोजी झालेल्या या मारहाणीचे Cctv फुटेज पिडीत युवकाने माहिती अधिकारातून मिळवले आहे
मंत्री उदय सामंत राज ठाकरे यांच्या भेटीला
काही वेळात मंत्री उदय सामंत भेटीला
मराठी भाषा दिनानिमित्त घेणार भेट
मंगरूळपीर शहरातील एका अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरण पीडितेच्या कुटुंबिया कडून देण्यात आलेल्या तक्रारीवरून मंगरूळपीर पोलिसांनी दोन आरोपींवर गुन्हा दाखल केलाय. आरोपीने ३० जानेवारी पिडितेला त्यांच्या मित्रा सह चारचाकी वाहनात बसवून नेले आणि इच्छेविरुद्ध वारंवार लैंगिक शोषण केल्या प्रकरणी पीडितेच्या जबाबांच्या आधारे मंगरूळपीर पोलिसांनी बीएनएसमधील कलम १३७ (२), ६४, ६५ (१), ३ (५) तसेच ४, ६ पोक्सो कायद्यान्वये दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल केला. घटनेचा तपास मंगरूळपीर पोलिस करत आहेत..
निकालाची प्रत आल्यावर विधिमंडळ कोकाटेवर कारवाई करणार
विधिमंडळ सूत्रांची माहिती
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक सत्र न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे
याची प्रत विधिमंडळ सचिवालयाला प्राप्त झाली की कारवाई केली जाणार
आमदार सुनील केदार यांच्या शिक्षेची प्रत आल्यावर विधिमंडळाकडून अपात्र करण्यात आलं होतं
- नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी उड्डाणपूल खचल्याचं कारण शोधण्यासाठी नेमलेल्या चौकशीचा अहवाल सादर
- ओव्हरलोडमुळे बुटीबोरी उड्डाणपूल खचल्याचे चौकशी अहवालात स्पष्ट
- १८७ टन वजनाचा ट्रक पुलावरुन गेल्याने उड्डाणपूल खचल्याचा अहवाल
- १० दिवसांनंतर होणार उड्डाणपूल दुरुस्तीचं काम, ४५ दिवसांत काम पूर्ण होणार
- उड्डाणपूल खचल्यामुळे वाहतूक बंद केल्याने सध्य बुटीबोरीत रोज विदर्भातील सर्वात मोठं ट्राफीक जाम
- ट्राफीक जाममुळे स्थानिक त्रस्त, विद्यार्थ्यांनाही मोठा मनस्ताप
जीबीएस व्हायरसच्या लागणमुळे नागपूरमध्ये आणखी एका ३२ वर्षीय रुग्णाचा मृत्यू ..
नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील घटना...
मयत रुग्णाने सुरवातीला खासगी रुग्णालयात उपचार घेतला त्याची प्रकृती खालावत गेल्याने त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यात आले..
मागच्या दोन महिन्यात जीबीएने मृत्यू झाल्याची ही तिसरी घटना...
जीबीएस ची लग्न झालेले तीन रुग्णावर सद्या याच रुग्णालयात उपचार सुरू ...
राज ठाकरे, अभिनेता विकी कौशल एकाच मंचावर मराठी कविता वाचन करणार; शिवाजी पार्कवर गुंजणार मराठी आवाज
शिवाजी पार्कवर येत्या मराठी भाषा दिनानिमित्त मराठी कविता वाचन करणार आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या कार्यक्रमाची घोषणा केली आहे.
यावेळी अभिनेता विकी कौशल, ज्येष्ठ गायिका आशा भोसले, प्रख्यात लेखक जावेद अख्तर, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, सोनाली बेंद्रे ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार
बुलढाणा जिल्ह्यातील अंढेरा पोलिसांच्या हद्दीत शेतकऱ्याने केली चक्क अफूची शेती.
अफू च्या शेतीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई.
अंदाजे ३ कोटी रुपयांची अफूची झाडे जप्त.
स्थानिक गुन्हे शाखेने शेतकरी संतोष सानप याला घेतलं ताब्यात.
जिल्ह्यात पहिल्यांदाच अफूची ( अमली पदार्थ ) आढळल्याने खळबळ.
अद्यापही कारवाई सुरूच.
वनविभागातील खात्रीलायक सूत्रांची माहिती, वाघांच्या शिकारी साठी कुख्यात असलेल्या अजित राजगोंड अटक प्रकरणात वनविभागाच्या विशेष तपास पथकाने हुडकून काढले शिकारी टोळीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन, वाघांच्या शिकारीच्या मोबदल्यात बहेलिया टोळीला पैसा पुरविणाऱ्या मिझोराम राज्याची राजधानी आयजोल येथून जमखानकप नावाच्या व्यक्तीला करण्यात आली होती बुधवारी अटक, तर या आधी मेघालय राज्याची राजधानी असलेल्या शिलॉंग येथून लालनेईसंग आणि निंग सॅन लुन यांना करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार वाळू माफीयांवर स्वतः कारवाई करून आळा घालण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे शासकीय ठेका घेऊन नियम धाब्यावर बसवून वाळू तस्करी केली जात आहे. असाच प्रकार नाळेश्वर इथे समोर आला. नाळेश्वर, राहटी या घाटावरून वाळू उपसा करून ती वाळू वाघी येथील वाळू डेपोवर टाकण्याचे काम एका वाळू ठेकेकेदाराला मिळाले आहे. पण या ठिकाणावरून रात्री वाळू उपसा आणि वाळू वाहतूक केली जात आहे. रात्रीच्या वेळी वाळू उपसा आणि वाहतूकीला बंदी आहे. पण असे असताना संगनमताने रात्री वाळू उपसा सुरु आहे. शिवाय रात्रीच्या वेळी वाळू उपसा करून ती वाळू डेपोला न नेता थेट त्या वाळूची इतरत्र तस्करी होत आहे.
नविन आर्थिक वर्षात सरपंचांची यादी मी घेउन बसणार आहे. उबाठाला शुन्य टक्के निधी देणार हे निश्चित आहे. भाजपचे खासदार, मुख्यमंत्री, पंतप्रधान आहेत हे कुणीही विसरू नये. तुमची सत्ता आलेली आहे. समित्या, पदांवर भाजपच्या कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले जाईल. संधीच सोन करा असं आवाहन राणेंनी कार्यकर्त्यांना केलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आमच्यावर अन्याय झाला. सगळी कामं नाकारली, निधी दिला नाही. महाविकास आघाडीच्या काळात सगळे अनुभव आम्ही घेतले. सगळ्या प्रकल्पांना स्थगिती देण्याच काम केलं. आमच्या लोकांना जेलमध्ये टाकल गेलं. आता जंगल दाखवायचं काम आम्ही करणार आहोत. कर्जाची परतफेड व्याजासह करणार आहोत. मी पालकमंत्री झालो म्हणून काहीजण गोव्यात जात आहे. मालमत्ता विकत आहेत. पण, गोव्यातही मुख्यमंत्री भाजपचे प्रमोद सावंत आहेत हे लक्षात ठेवावं असा इशारा नितेश राणेंनी दिला.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra News LIVE Updates : महाराष्ट्रासह देश विदेशातील बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...