Maharashtra Live Update : राज्यसभेच्या एका जागेसाठी निवडणूक जाहीर, 25 जूनला मतदान आणि मतमोजणी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

ज्योती देवरे Last Updated: 27 May 2024 02:58 PM
 Mumbai : मुंबईत निवडणुका संपताच बोरिवलीत गुजराती बोर्डाचा मुद्दा पुन्हा तापला

 Mumbai : मुंबईत निवडणुका संपताच बोरिवलीत गुजराती बोर्डाचा मुद्दा पुन्हा तापला.


वॉर्ड ऑफिसरच्या केबिनमध्ये कार्यकर्त्यांसोबत आंदोलन करण्यासाठी बसले भाजप नेते गोपाळ शेट्टी.


बोरिवली पश्चिमेतील स्वतंत्र वीर सावरकर उद्यानातील गुजराती फलक हटवण्याची नोटीस बीएमसीने दिली होती.


त्यानंतर आज भाजप नेते गोपाळ शेट्टी बोरिवली आर/मध्य विभागाच्या कार्यालयात बसले आहेत.


गोपाळ शेट्टी म्हणतात की, नागपूर न्यायालयाने पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत, तरीही बीएमसी नोटीस देत आहे.


जोपर्यंत बीएमसी योग्य प्रतिसाद देत नाही तोपर्यंत मी बीएमसी कार्यालय सोडणार नाही, असे गोपाळ शेट्टी यांनी सांगितले.

Pune Car Accident : पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी पोर्शे गाडीचे प्रतिनिधी पुण्यात दाखल

Pune Car Accident : पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरण


पोर्शे गाडीचे प्रतिनिधी पुण्यात दाखल


पोर्शे गाडीचे अधिकृत प्रतिनिधी त्यांच्या पथकासह मुंबईतून पुण्यात दाखल 


पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्यात या प्रतिनिधींकडून गाडीची तपासणी


गाडीत तांत्रिक विश्लेषण जाणून घेण्यासाठी प्रतिनिधी दाखल


पुणे आर टी ओ चे अधिकारी सुद्धा येरवडा पोलीस ठाण्यात दाखल


१९ मे रोजी झालेल्या अपघातात याच पोर्शे गाडी ने दिलेल्या धडकेत २ जणांचा मृत्यू झाला होता

Nashik - मालेगाव चिंचवे महिला आणि ग्रामस्थांचा मालेगाव पंचायत समितीवर हंडा मोर्चा

 


Nashik - मालेगाव चिंचवे महिला आणि ग्रामस्थांचा मालेगाव पंचायत समितीवर हंडा मोर्चा ..
- मालेगाव तालुक्यातील चिंचवे गावात पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागते भटकंती..


- गाव विहिरीत पाणी असूनही काम केले जात नसल्याने ग्रामस्थांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ..
- ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाई परिस्थिती असूनही गावचा टँकरचा प्रस्ताव दिला गेला नसल्याने गावकऱ्यांवर पाणी बाणी..
- जोपर्यंत तोडगा निघणार नाही तो पर्यंत गावकरी आंदोलनावर ठाम...
- गट विकास अधिकाऱ्यांची मधस्थी अयशस्वी...

Nashik - मालेगाव चिंचवे महिला आणि ग्रामस्थांचा मालेगाव पंचायत समितीवर हंडा मोर्चा

( नाशिक )...ब्रेकिंग..


Nashik - मालेगाव चिंचवे महिला आणि ग्रामस्थांचा मालेगाव पंचायत समितीवर हंडा मोर्चा ..
- मालेगाव तालुक्यातील चिंचवे गावात पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागते भटकंती..


- गाव विहिरीत पाणी असूनही काम केले जात नसल्याने ग्रामस्थांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ..
- ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाई परिस्थिती असूनही गावचा टँकरचा प्रस्ताव दिला गेला नसल्याने गावकऱ्यांवर पाणी बाणी..
- जोपर्यंत तोडगा निघणार नाही तो पर्यंत गावकरी आंदोलनावर ठाम...
- गट विकास अधिकाऱ्यांची मधस्थी अयशस्वी...

Pune : विशाल अग्रवालला पोलीस कोठडी, पुणे न्यायालयाने दिली परवानगी

Pune : पुणे पोलिसांना मिळाली विशाल अग्रवालची पोलीस कोठडी


पुणे न्यायालयाने दिली परवानगी


आजच येरवडा जेलमधुन विशाल अग्रवालला घेणार ताब्यात


हिट अँड रन प्रकरणात चालकाला डांबून ठेवण्या प्रकरणी पुन्हा अटक


याच गुन्ह्यात विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल


सुरेंद्र अग्रवाल याला आधीच अटक करण्यात आली आहे

Solapur : माजी आमदार रमेश कदम, ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांच्यासह 72 जणांना 1 महिन्याची शिक्षा 

Solapur : माजी आमदार रमेश कदम, ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांच्यासह 72 जणांना 1 महिन्याची शिक्षा 


मोहोळ तेथील उड्डाण पुलाखालील जाळी तोडणे आणि पोलीस स्टेशनवर मोर्चा काढल्याप्रकरणी दाखल झाला होता गुन्हा 


2015 साली मोहोळ शहरातील उड्डाण पुलाखाली छोट्या व्यापाऱ्यांना बसण्यासाठी मज्जाव करत प्रशासनाकडून जाळी मारण्यात आली.


मात्र तत्कालीन आमदार रमेश कदम यांनी याविरोधात मोर्चा काढत जेसीबीद्वारे जाळी तोडली होती. 


तसेच पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत आंदोलन केल्याप्रकरणी माजी आमदार रमेश कदम, शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांच्यासह एकूण 72 जणांना 1 महिना कारावास आणि 1 हजाराचा दंड थोठावण्यात आला.

Palghar Accident : पालघरमध्ये विक्रमगड - वाडा मार्गावर विचित्र अपघात, भरधाव कंटेनरची सहा वाहनांना धडक

Palghar Accident : पालघरमध्ये विक्रमगड - पाली- वाडा मार्गावर विचित्र अपघात.


भरधाव कंटेनरची सहा वाहनांना धडक


अपघातात दोघांचा जागीच मृत्यू


भरधाव कंटेनरची दोन बाईक,  बस आणि कारला धडक


स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल .

Manoj Jarange : जालना-बीड मधील जातिवाद हा महाराष्ट्रासाठी चांगला संदेश नाही,-मनोज जरांगे

Manoj Jarange :  जालना-बीड मधील जातिवाद हा महाराष्ट्रासाठी चांगला संदेश नाही,-मनोज जरांगे



बीड मधील जातीय वादावरती मनोज जरांगेंची प्रतिक्रिया.



बीड मधील जातिवाद हा महाराष्ट्रासाठी चांगला संदेश नाही, आता सुधीर मनगुंटीवार आणि शंभूराज देसाई यांनी याचे उत्तर द्यायला हवं ,


त्यांचं म्हणणं होतं की बीड जिल्ह्यात जाती ते निर्माण होत त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते कोणी जातीवाद केला आणि कधी जातीवाद केला? आता कोण जातिवाद करतोय हे तुमच्या डोळ्यासमोर आहे,



आता किती दिवस आमच्यावर अन्याय करतात ते बघूया लोकसभा होऊन गेली आता विधानसभेला बघू अगोदर कोणाचं नाव घेतलं नाही त्यावेळेला नाव घेऊ.


वंजारी आणि मराठा समाजाचे कधी कुणाचे बांध कापलेत?


तुम्हाला मतदान केलं तर चांगलं नाही केलं तर वाईट ही कसली लोकशाही?

ST : स्टोअर कार्डमुळे एसटी कर्मचारी गणवेशापासुन वंचित, एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदिप शिंदे यांची माहिती

ST : स्टोअर कार्ड मुळे एसटी कर्मचारी गणवेशापासुन वंचित.


महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदिप शिंदे यांची माहिती


बदली झालेल्या कर्मचार्यांना स्टोअर कार्ड न मिळाल्याने गणवेश व कापड मिळण्यास अडचण.
 


कर्मचारी एका विभागातुन दुसरीकडे गेल्यावर त्या विभागत ते स्टोअर् कार्ड पाठवणे आवश्यक होत.


मात्र प्रशासनाकडुन ते न गेल्याने अनेक कर्मचारी कापडापासून वंचित रहात आहेत. 


ते कार्ड तातडीने त्या विभागात ट्रानस्फर करुन कर्मचार्यांना कापड मिळालं पाहिजे.


एसटी कर्मचारी संघटनेची मागणी.


तसेच मागील सर्व थकबाकी मिळायला हवी


   

Nashik : मोबाईल चोरांचा नाशकात धुमाकूळ, घरात घुसून 10 ते 12 मोबाईल चोरी

Nashik : मोबाईल चोराचा नाशकात धुमाकूळ


घरात घुसून १० ते १२ मोबाईल चोरी


चोरीच्या घटना सीसीटीव्हीत कैद


नाशिकच्या सिडको परिसरातील पवन नगर, उत्तम नगर, सावता नगर भागात मागील १५ दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून १० ते १२ नागरीकांचे मोबाईल घरात घुसून चोरण्यात आले आहे.... यामुळे नागरीक भयभीत झाले असून पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी केलीये... 

Rajya Sabha Election : राज्यसभेच्या एका जागेसाठी निवडणूक जाहीर, 25 जूनला मतदान आणि मतमोजणी

Rajya Sabha Election : राज्यसभेच्या एका जागेसाठी निवडणूक जाहीर 


प्रफुल पटेल यांच्या राजीनाम्यानं राज्यसभेची जागा रिक्त  


25 जूनला मतदान आणि मतमोजणी होणार आहे


13 जूनला अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख

Bajrang Sonawane : मराठा-वंजारी संघर्षामागे कोणाचा हात? बजरंग सोनवणेंनी स्पष्टचं सांगितलं..

Bajrang Sonawane : मराठा-वंजारी संघर्षामागे कोणाचा हात? बजरंग सोनवणेंनी स्पष्टचं सांगितलं..


बीड लोकसभेत जाती-पातीचं राजकारण झाल्यावर यावर अखेर शिक्कामोर्तब झालाय.


कारण याचं राजकारणाचे आता पडसाद उमटू लागलेत.


दोन गावांतील वंजारी समाजाच्या ग्रामस्थांनी थेट मराठा समाजाच्या व्यक्तींकडून काही खरेदी करू नये. असा निर्णय घेतलाय.


यानिमित्ताने बीड लोकसभेतील जातीय संघर्ष टोकाला गेल्याचं दिसून येतंय.


अचानक हे गावकरी संतप्त का झाले? कोणती शक्ती यामागे आहे? नेमकं कोण विष कालवत आहे?


याबाबत शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणें यांनी स्पष्ट केलंय

Chhagan Bhujbal : आम्हाला चातुर्वर्ण व्यवस्था मान्य नाही. त्यामुळेच आम्ही मनुस्मृति जाळली आहे.- छगन भुजबळ 

Chhagan Bhujbal : पहिली निवडणूक संपली आहे. तोच दुसरी निवडणूक सुरू झाली आहे. - छगन भुजबळ 

आचारसंहिता सुरू झाल्यामुळे काम थांबतील. माझं मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे यातून आपल्याला मार्ग काढायला पाहिजे. जेणेकरून आमदारांना ताकद मिळेल. - छगन भुजबळ 


भाजपने 400 पार चा नारा दिला. त्यामुळे दलित समाजात संविधान बदलणार हे बिंमल गेलं. ते त्यांच्या मनातून काढण्यासाठी नाकी नऊ आले.- छगन भुजबळ 


पंतप्रधान मोदींनाही मुलाखतीतून वारंवार संविधान बदलणार नाही हे सांगावं लागते. - छगन भुजबळ 


आता नवीन मनुस्मृतीचं आलय. त्यामुळे आता झालं कल्याण. आम्हाला चातुर्वर्ण व्यवस्था मान्य नाही. त्यामुळेच आम्ही मनुस्मृति जाळली आहे. हे थांबलं पाहिजे नाहीतर यातून मोठा भडका उडेल. - छगन भुजबळ 

SSC Result 2024 : ज्या मुलांना कमी टक्के मिळाले, त्यांना पुन्हा टक्के वाढविण्यासाठी संधी - मंत्री दीपक केसरकर

Deepak Kesarkar : आज दहावीचा निकाल 1 वाजता जाहीर होत आहे - मंत्री दीपक केसरकर
ज्या मुलांना कमी टक्के मिळाले त्यांना पुन्हा टक्के वाढविण्यासाठी संधी आहे - दीपक केसरकर
पुन्हा एक परीक्षा असते - दीपक केसरकर
जे नापास झाले ते सुद्धा या परीक्षेला बसू शकतात - दीपक केसरकर


नैराश्य येऊ देऊ नका... पुन्हा परीक्षा द्या चांगले गुण मिळवा - दीपक केसरकर
ताबडतोब दुसरी परीक्षा देऊ शकतात- दीपक केसरकर

Yavatmal : वादळी वाऱ्यामुळे निर्माणाधीन इमारतीची भिंत कोसळून 6 जण जखमी

Yavatmal : वादळी वाऱ्यामुळे निर्माणाधिन इमारतीची भिंत कोसळून 6 जण जखमी


यवतमाळच्या पुसद तालुक्यातील अवकाळी पावसा आणि वादळी वाऱ्यामुळे वसंतनगर परिसरातील निर्माणाधिन इमारतिचिभिंत कोसळून सहा जण जखमी झाल्याची घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली.

Sunil Tatkare : लोकसभा निवडणूक निकाल आधी बिहार, राजस्थान एनसीपी प्रदेश अध्यक्ष. सोबत आहे. यावरून समजून येते पुढे काय होणार - सुनिल तटकरे 

 


Sunil Tatkare : लोकसभा निवडणूक निकाल आधी बिहार, राजस्थान एनसीपी प्रदेश अध्यक्ष. सोबत आहे. यावरून समजून येते पुढे काय होणार - सुनिल तटकरे 


निवडणूक टप्प्यात अल्पसंख्याक समाजला भिती वातावरण केले

Gold Rate : सोन्याचे दर 74300 वर, ग्राहकांना काही अंशी दिलासा

Gold Rate : मागील महिन्यात सोन्याचे दर हे जी एस टी सह 76800 वर जाऊन पोहोचले होते, त्या नंतर गेल्या चार दिवसात सोन्याच्या दरात 2500 रुपयांची घट झाल्याने सोन्याचे दर 74300 वर आल्याने ग्राहकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे

Manoj Jarange : अन्याय बंद करायचा असेल तर आपल्याला सत्तेत जावं लागेल - मनोज जरांगे

Manoj Jarange : अन्याय बंद करायचा असेल तर आपल्याला सत्तेत जावं लागेल - मनोज जरांगे
ज्या जातीने मराठ्यांवर अन्याय केलाय त्या उमेदवाराच्या विरोधात उमेदवार द्यायचा नाही मात्र त्याला नाव घेऊन पाडल्याशिवाय राहायचं नाही त्यांनी जातीवाद थांबवला नाही तर लोकसभेत तुम्ही साधून घेतलं पण आता विधानसभा आल्यात, तुमची माणसं कुठेतरी महाराष्ट्रात उभे राहणारच आहेतसरकारने आम्हाला सगळ्यांच्या अंमलबजावणीचा शब्द दिला त्याला आज पाच महिने होऊन गेले अजून किती दिवस पाहिजेत सरकारला?

Bacchu Kadu : मतदानाच्या माध्यमातून लोकभावना राष्ट्रभावना निर्माण व्हायला पाहिजे होत्या...- बच्चू कडू 

बीड जिल्ह्याची घटना ही धोक्याची घंटा आहे... - बच्चू कडू 


मतदानाच्या माध्यमातून लोकभावना राष्ट्रभावना निर्माण व्हायला पाहिजे होत्या...- बच्चू कडू 


आम्ही राजकीय नालायक लोकांनी जातीय भावना पेरल्या... कारण आमच्यात कामं करण्याची धम्मक नव्हती...जिथं कामं नाही दाखवायला तिथं आम्ही जात पेरली... - बच्चू कडू 


हे बी राष्ट्रीय स्तरावरच्या नेत्यांनी पेरलं आहे... त्याचे परिणाम आता गाव स्तरावर दिसत आहेत... हे शिवरायांच्या हिंदवी  स्वराज्याचे पतन आहे...- बच्चू कडू 


महाराष्ट्र हा साधू संतांचा देश आहे... अशा घटना कुठलाही समाज करीत असेल तर त्यावर कारवाई झाली पाहिजे... राष्ट्रत्व निर्माण झालं पाहिजे....- बच्चू कडू 

Gondia : गोंदिया-कोहमारा महामार्गावर स्कॉर्पिओ गाडीला आग लागल्याने गाडी जळून खाक, चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

Gondia : गोंदिया-कोहमारा महामार्गावर स्कॉर्पिओ गाडीला आग लागल्याने गाडी जळून खाक.... चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली... 


गोंदिया कोहमारा महामार्गावर स्कार्पिओ गाडीला अचानक आग लागल्याने स्कार्पिओ गाडी जळून खाक झाल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे.


पांढरवानी येथील एक कुटुंब भंडारा जिल्ह्यातील चांदपूर देवस्थान येथे दर्शनासाठी गेलो होते.


चांदपूर येथून परत येत असताना डव्वा गावाजवळ अचानक स्कार्पिओ गाडीमधुन धुर निघु लागला.


ही बाब चालकाच्या लक्षात येताच चालकाने गाडी थांबवली.


त्यानंतर गाडीमध्ये बसलेले 8 लोक बाहेर निघाले. मात्र, थोड्याच वेळात आगीने रौद्ररूप धारण केले.


यात, कुठलीही जीवित हानी झाली नाही. मात्र स्कार्पिओ गाडी पूर्णतः जळून खाक झाली आहे.

Rain Update : रायगडमध्ये आज सकाळपासून आकाशात ढगाळ वातावरण, पावसाची शक्यता 

Rain Update : रायगडमध्ये आज सकाळपासून आकाशात ढगाळ वातावरण 


 पावसाची शक्यता 


महाड पोलादपूर म्हसळा श्रीवर्धन माणगाव तालुक्यात ढगाळ वातावरण

Nashik - मनमाड युनियन बँक एफडी घोटाळ्याची आमदार सुहास कांदे यांनी घेतली दखल

Nashik - मनमाड युनियन बँक एफडी घोटाळ्याची आ.सुहास कांदे यांनी घेतली दखल..


- बँकेच्या वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर  आ.कांदे यांनी स्वतः फिर्यादी होत केली मनमाड पोलिसात तक्रार..
- ठेवीदारांसह आ.कांदे पोलीस स्थानकात दाखल....
- बँकेच्या अधिकाऱ्यांची  कसून चौकशी करण्याची मागणी..
- फसवणूक ठेवीदारांचे पैसे तातडीने द्या...आ. कांदे 
- आठ दिवसांत निर्णय  न लागण्यास  बँकेच्या मुख्य कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा 
- ठेवीदार व शिवसैनिक  होणार आंदोलनात सहभागी...

Mumbai : बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी 394 मीटर लांबीचा एडीआयटी मध्यवर्ती बोगदा पूर्ण

Mumbai : बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी 394 मीटर लांबीचा एडीआयटी मध्यवर्ती बोगदा पूर्ण



यामुळे 21 किमी लांबीचा बीकेसी आणि शिळफाटा दरम्यानचा बुलेट ट्रेन बोगदा तयार करणे सोपे होईल.


मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीच्या इंटरमीडिएट बोगद्याचे (एडीआयटी) खोदकाम करण्यात आले आहे.


यामुळे महाराष्ट्रातील बीकेसी ते शिळफाटा दरम्यान २१ किलोमीटर लांबीच्या बोगद्याच्या बांधकामाला गती मिळणार आहे.

Mumbai : मुख्यमंत्र्यांची एकीकडे नालेसफाईची पाहणी,तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या आमदाराचे  नालेसफाई संदर्भात प्रशासनाला पत्र 

Mumbai : मुख्यमंत्र्यांची एकीकडे नालेसफाईची पाहणी,तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या आमदाराचे  नालेसफाई संदर्भात प्रशासनाला पत्र 


मुंबईतील आणि दिंडोशी येथील नाल्यांची साफसफाई पावसाआधी करा शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांचे पत्र


लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत मुंबईतील अनेक भागांत पावसाळापूर्व कामे रखडलेली आहेत


 दिंडोशी विधानसभा क्षेत्रातही पावसाळा तोंडावर आला असताना वर्षभरापासून खोदलेले रस्ते, तुंबलेले नाले अशीच स्थिती आहे


त्यामुळे पालिकेने पावसाळ्यापूर्वी रस्ते, नालेसफाईची कामे तातडीने पूर्ण करावीत अशी मागणी शिवसेना नेते आमदार सुनील प्रभू यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे...


दिंडोशी विधानसभा क्षेत्र हे बहुतांशी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या उतारावर वसलेले आहे


त्यामुळे अतिवृष्टीत या नागरी वस्तीत पाण्यासोबत मोठमोठे दगड, माती, कचरा धोकादायकरीत्या वाहून येतो

Vasai : वसईत भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने दोन महिलांना चिरडल्याची घटना

Vasai : वसईत भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने दोन महिलांना चिरडल्याची घटना घडली आहे. 



वसई पूर्व सातीवली येथे आज सकाळी साडे नऊ वाजता ही घटना घडली आहे.


मंजिता जितू सरोज (वय 35) आणि जिंदादेवी शैलेश सिंग (वय 50) असे अपघातात चिरडलेल्या महिलांचे नाव आहेत.  या दोघी वसई च्या गावराई पाडा आणि एव्हरशाईन परिसरात राहणाऱ्या आहेत.



आज सकाळी या दोघी महिला पायी कामावर जाताना भरधाव वेगात आलेल्या डंपर ने दोघीना जोरात धडक मारून, अक्षरशा चिरडले आहे. 
यात दोन्ही महिलांच्या शरीराचा चेंदामेंदा झाला आहे.

Political : सोनिया दुहान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याच्या बातमीवर अखेर शिक्कामोर्तब 

Political : सोनिया दुहान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याच्या बातमीवर अखेर शिक्कामोर्तब 


सोनिया दुहान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बैठकीसाठी पोहचल्या 


सातत्याने पक्षप्रवेशाच्या बातम्या फेटळणाऱ्या सोनिया दुहान बैठकीसाठी मागचा दरवाज्याने पोहचल्या

Pune Car Accident - अगरवाल कुटूंबाच्या विरोधात तक्रार देण्यासाठी दुसरा तक्रारदार आला पुढे

Pune Car Accident - अगरवाल कुटूंबाच्या विरोधात तक्रार देण्यासाठी दुसरा तक्रारदार आला पुढे,


- तक्रारदार दत्तात्रेय कातोरे अगरवाल कुटूंबाच्या विरोधात पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार दाखल करणार 


- तक्रारदार कातोरे अगरवाल यांच्या ब्रम्हा बिल्डर्स कंपनीकडे 2000 ते 2005 दरम्यान खोदाईचे काम करत होते


- या कामाचे अगरवाल कुटूंबाकडे 84 लाख 50 हजार रुपये बाकी


- दरम्यान पैसे मिळत नसल्यामुळे तक्रारदाराचा मुलगा शशी कातोरे यांनी जानेवारी महिन्यात आत्महत्या केली आहे


- मुलाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वडील दत्तात्रेय कातोरे पोलिसांना आज तक्रार देणार 


- पुणे पोलिसांच्या आवाहनानंतर अगरवाल कुटूंबाच्या विरोधात तक्रार देण्यासाठी तक्रारदार आलेत पुढे


- यापूर्वी शिवसेना नेते अजय भोसले यांनी पहिली तक्रार दाखल केली आहे

Pune Car Accident - अगरवाल कुटूंबाच्या विरोधात तक्रार देण्यासाठी दुसरा तक्रारदार आला पुढे

Pune Car Accident - अगरवाल कुटूंबाच्या विरोधात तक्रार देण्यासाठी दुसरा तक्रारदार आला पुढे,


- तक्रारदार दत्तात्रेय कातोरे अगरवाल कुटूंबाच्या विरोधात पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार दाखल करणार 


- तक्रारदार कातोरे अगरवाल यांच्या ब्रम्हा बिल्डर्स कंपनीकडे 2000 ते 2005 दरम्यान खोदाईचे काम करत होते


- या कामाचे अगरवाल कुटूंबाकडे 84 लाख 50 हजार रुपये बाकी


- दरम्यान पैसे मिळत नसल्यामुळे तक्रारदाराचा मुलगा शशी कातोरे यांनी जानेवारी महिन्यात आत्महत्या केली आहे


- मुलाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वडील दत्तात्रेय कातोरे पोलिसांना आज तक्रार देणार 


- पुणे पोलिसांच्या आवाहनानंतर अगरवाल कुटूंबाच्या विरोधात तक्रार देण्यासाठी तक्रारदार आलेत पुढे


- यापूर्वी शिवसेना नेते अजय भोसले यांनी पहिली तक्रार दाखल केली आहे

Pune Car Accident - अगरवाल कुटूंबाच्या विरोधात तक्रार देण्यासाठी दुसरा तक्रारदार आला पुढे

Pune Car Accident - अगरवाल कुटूंबाच्या विरोधात तक्रार देण्यासाठी दुसरा तक्रारदार आला पुढे,


- तक्रारदार दत्तात्रेय कातोरे अगरवाल कुटूंबाच्या विरोधात पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार दाखल करणार 


- तक्रारदार कातोरे अगरवाल यांच्या ब्रम्हा बिल्डर्स कंपनीकडे 2000 ते 2005 दरम्यान खोदाईचे काम करत होते


- या कामाचे अगरवाल कुटूंबाकडे 84 लाख 50 हजार रुपये बाकी


- दरम्यान पैसे मिळत नसल्यामुळे तक्रारदाराचा मुलगा शशी कातोरे यांनी जानेवारी महिन्यात आत्महत्या केली आहे


- मुलाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वडील दत्तात्रेय कातोरे पोलिसांना आज तक्रार देणार 


- पुणे पोलिसांच्या आवाहनानंतर अगरवाल कुटूंबाच्या विरोधात तक्रार देण्यासाठी तक्रारदार आलेत पुढे


- यापूर्वी शिवसेना नेते अजय भोसले यांनी पहिली तक्रार दाखल केली आहे

Pune Car Accident - अगरवाल कुटूंबाच्या विरोधात तक्रार देण्यासाठी दुसरा तक्रारदार आला पुढे

Pune Car Accident - अगरवाल कुटूंबाच्या विरोधात तक्रार देण्यासाठी दुसरा तक्रारदार आला पुढे,


- तक्रारदार दत्तात्रेय कातोरे अगरवाल कुटूंबाच्या विरोधात पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार दाखल करणार 


- तक्रारदार कातोरे अगरवाल यांच्या ब्रम्हा बिल्डर्स कंपनीकडे 2000 ते 2005 दरम्यान खोदाईचे काम करत होते


- या कामाचे अगरवाल कुटूंबाकडे 84 लाख 50 हजार रुपये बाकी


- दरम्यान पैसे मिळत नसल्यामुळे तक्रारदाराचा मुलगा शशी कातोरे यांनी जानेवारी महिन्यात आत्महत्या केली आहे


- मुलाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वडील दत्तात्रेय कातोरे पोलिसांना आज तक्रार देणार 


- पुणे पोलिसांच्या आवाहनानंतर अगरवाल कुटूंबाच्या विरोधात तक्रार देण्यासाठी तक्रारदार आलेत पुढे


- यापूर्वी शिवसेना नेते अजय भोसले यांनी पहिली तक्रार दाखल केली आहे

Pune Car Accident - अगरवाल कुटूंबाच्या विरोधात तक्रार देण्यासाठी दुसरा तक्रारदार आला पुढे

Pune Car Accident - अगरवाल कुटूंबाच्या विरोधात तक्रार देण्यासाठी दुसरा तक्रारदार आला पुढे,


- तक्रारदार दत्तात्रेय कातोरे अगरवाल कुटूंबाच्या विरोधात पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार दाखल करणार 


- तक्रारदार कातोरे अगरवाल यांच्या ब्रम्हा बिल्डर्स कंपनीकडे 2000 ते 2005 दरम्यान खोदाईचे काम करत होते


- या कामाचे अगरवाल कुटूंबाकडे 84 लाख 50 हजार रुपये बाकी


- दरम्यान पैसे मिळत नसल्यामुळे तक्रारदाराचा मुलगा शशी कातोरे यांनी जानेवारी महिन्यात आत्महत्या केली आहे


- मुलाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वडील दत्तात्रेय कातोरे पोलिसांना आज तक्रार देणार 


- पुणे पोलिसांच्या आवाहनानंतर अगरवाल कुटूंबाच्या विरोधात तक्रार देण्यासाठी तक्रारदार आलेत पुढे


- यापूर्वी शिवसेना नेते अजय भोसले यांनी पहिली तक्रार दाखल केली आहे

SSC Result 2024 : दहावीचा निकाल जाहीर, राज्यातील 95.81 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

 SSC Result 2024 : दहावीचा निकाल जाहीर, राज्यातील 95.81 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण


- कोकण विभाग 99.01 टक्क्यांसह अव्वल
- नागपूर विभागाचा निकाल 94.73 टक्के
- निकालात मुलींची बाजी, 97.21 टक्के मुली उत्तीर्ण
- मुलांचा निकाल 94.56 टक्के
- 72 पैकी 18 विषयांचा निकाल 100 टक्के
- 9382 शाळांचा 100 टक्के

Narhari Zirwal :  विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचा संबळ वरील डान्स व्हायरल

Narhari Zirwal :  विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचा संबळ वरील डान्स व्हायरल ...


- दिंडोरी तालुक्यातील चौसाळे येथील बोहाडा उत्सवात संबळ  नृत्य करीत  उत्सवाचा घेतला  आनंद


- या अगोदर देखील नरहरी झिरवाळ यांच्या नृत्याचे व्हिडिओ झालेत व्हायरल
 
- लोकसभा निवडणुकी नंतर नरहरी झिरवाळ पारंपारिक कार्यक्रमात व्यस्त


- नरहरी झिरवाळ आपल्या नृत्यांच्या कलेबाबत आहेत प्रसिद्ध...

Pune Car Accident : ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी विशाल अगरवाल याला अटक होण्याची शक्यता

Pune Car Accident : ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी विशाल अगरवाल याला अटक होण्याची शक्यता


विशाल अगरवाल यांच्या विरोधात आणखी एक प्रोडक्शन वॉरंट


ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी केलेल्या ब्लड रिपोर्ट फेरफार केल्याप्रकरणी विशाल अगरवाल याच्या विरोधात वॉरंट


विशाल अगरवाल ने केले होते अजय तावरे याला फोन


पोलिसांना करायची आहे विशाल अगरवाल ची चौकशी

Pune Car Accident : ससून रुग्णालयातील डॉक्टरांवरून माझ्यावर आमदार रवींद्र धंगेकरांनी जे आरोप केलेले आहेत ते फक्त प्रसिद्धीसाठी - हसन मुश्रीफ

 


Pune Car Accident : ससून रुग्णालयातील डॉक्टरांवरून माझ्यावर आमदार रवींद्र धंगेकरांनी जे आरोप केलेले आहेत ते फक्त प्रसिद्धीसाठी आहेत


धंगेकरांच्या आरोपांवर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा पलटवार 


जर धनगेकरांनी माझी माफी मागितली नाही तर बदनामी चा दावा मी त्यांच्यावर करेन


 माझा फोन आणि त्या दोन डॉक्टरांचे फोन धनगर यांनी पोलिसांच्या ताब्यात द्यावेत आणि तपास करायला सांगावा


 अशी खोटी माहिती आणि अफवा पसरवणाऱ्या उमेदवाराला लोकसभा निवडणुकीत पराभवाची धूळ चाखावी लागेल असे माझे भाकीत आहे

Shirur : पतीच्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू... दोषीला अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही नातेवाईकांची भूमिका..

Shirur : पतीच्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू...


दोषीला अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही नातेवाईकांची भूमिका..


काल दुपारपासून देवणी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या... सकाळी मृतदेह घेतलं ताब्यात


किरकोळ कारणावरून पतीने पत्नीला केली जबर मारहाण.....मारहाणीत पत्नीचा मृत्यू....


शिरूर अनंतपाळ तालुक्यातील कानेगाव येथील धक्कादायक घटना....

Pune Car Accident : विशाल अग्रवालच्या फोनवर आला होता डॉक्टर अजय तावरेचा कॉल, संशय बळावला.

Pune Car Accident : विशाल अग्रवालच्या फोनवर आला होता डॉक्टर अजय तावरेचा कॉल.


ससून रुग्णालयातून पहिलाच रिपोर्ट अल्पवयीन आरोपीने नशा न केल्याचा आल्याने संशय बळावला.


११ वाजल्यानंतर आलेल्या प्राथमिक अहवालात अल्पवयीन आरोपीने नशा न केल्याचा रिपोर्ट.


त्यानंतर पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने घेतले.


खबरदारी म्हणून दुसरी वैद्यकीय तपासणी आणि डीएनए टेस्ट औंधमधल्या सरकारी रुग्णालयात करण्यात आली.


औंधमधल्या सरकारी रुग्णालयात वडिलांचेही रक्ताचे नमुने पोहोचवण्यात आले.


औंधमध्ये झालेल्या तपासणीत दुसऱ्यांदा घेतलेले रक्त आणि वडिलाचे डीएनए जुळल्याच समोर आलं मात्र पहिले रक्ताचे दुसऱ्याच व्यक्तीचे असल्याचेही समोर आल.


पोलिसांनी पाहिले रक्ताचे नमुने घेणाऱ्या डॉ श्रीहरी हळणोरला अटक केली.


श्रीहरी हळणोरने पोलिसांच्या चौकशीत अजय तावरे यांच्या सांगण्यावरून रक्ता…

Nashik : नाशिकच्या अंबड वेअर हाऊस परिसरात ठाकरे गटाकडून जागता पहारा, चार पदाधिकारी तैनात 

Nashik :  नाशकात कोण मारणार बाजी, उत्सुकता शिगेला असतांनाच नाशिकच्या अंबड वेअर हाऊस परिसरात ठाकरे गटाकडून जागता पहारा


- ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम बाहेर ठाकरे गटाचा पहारा


- सीसीटीव्ही कंट्रोल रूम आणि ईव्हीएम स्ट्रॉंग रूम यांच्या बाहेर चार पदाधिकारी तैनात 


- प्रशासनाची परवानगी घेत ठाकरे गटाकडून स्ट्रॉंग रूम बाहेर पहारा 


- ईव्हीएम मशीन मध्ये छेडछाड होण्याच्या भीतीने ठाकरे गटाकडून नियोजन 


- 4 जून पर्यंत तीन सत्रात  ठाकरे गटाचे पदाधिकारी देणार पहारा... 


- नाशिक मध्ये ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे विरुद्ध शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांच्यात थेट लढत


- नाशकात कोण मारणार बाजी, उत्सुकता शिगेला.

Shahapur : शहापूरात समृद्धी महामार्गावरील वेठबिगारी कामगारांना डंप्परने चिरडले, एकाचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी 

Shahapur : समृद्धी महामार्गावरील वेठबिगारी कामगारांना डंप्परने चिरडले


एकाचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी 


शहापूर तालुक्यात कसारा विभागातील वाशळा गावानजीक समृद्धी महामार्गाचा अंतिम टप्प्याचा काम सुरू आहे.


या मार्गावर काम करण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील कामगार काम करण्या करीता या ठिकाणी आले आहेत .


काल संध्याकाळी काम आटपून 25 ते 30 वेठबिगारी कामगार  समृद्धी महामार्गाच्या झालेल्या कामाच्या ठिकाणी रात्री झोपले होते.


गाड झोपेत असताना समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या एका डंपरने झोपलेल्या कामगारांवर डंपर चढविले


यामुळे डंपर खाली तीन वेठबिगारी कामगार चिरडले गेले


यात अशोक मोहीते वय 50 यांचा जागीच मृत्यू झाला.  


तर अंकुश मोहीते वय 28 व सुमन पवार वय 60 हे दोन जण गंभीर जखमी झाले आहेत


.
मात्र या अपघाता नंतर मोठ्या प्रमाणात पोलिस रूग्णालयाच्या आवारात तैनात करण्यात आले आहे.

पुण्यातील ससून रुग्णालय हे रुग्णालय आहे की 'गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा ' आहे? - विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar : पुण्यातील ससून रुग्णालय हे रुग्णालय आहे की 'गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा ' आहे? - विजय वडेट्टीवार


आधी ललित पाटीलचे धंदे याच हॉस्पिटल मधून सुरु होते. ललित पाटीलचे अवैध धंदे सरकारमधील कोणत्या मंत्र्याच्या आशीर्वादाने सुरू होते हे महाराष्ट्राला माहिती आहे 


आता पुण्याच्या आरोपीला वाचवण्यासाठी ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी ब्लड रिपोर्ट मध्ये फेरफार केली.


हे हॉस्पिटल गुंड आरोपी यांच्यासाठी आहे का?
ललित पाटील प्रकरणापासून या हॉस्पिटलच्या कारभारावर आधीच शंका होती, पण सरकार आणि रुग्णालय प्रशासनाने ह्या शंकेवर शिक्कमोर्तब केले. 


पुणे 'हिट अँड रन'  प्रकरणात पूर्ण व्यवस्थेने आरोपीला मदत केली आहे. दारू पिऊन दोन लोकांची हत्या करणाऱ्याला मदत करण्यासाठी किती जणांनी मेहनत घेतली हे समोर येत आहे


या सर्वांना कठोर शिक्षा व्हायला हवी. म्हणून आम्ही न्यायिक चौकशीची मागणी करत आहोत. पोलिस ते हॉस्पिटल सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे.

Pune Car Accident : सुरेंद्र अगरवाल याने ड्रायव्हरला ज्या गाडी मध्ये जबरदस्ती ने बसवलं होतं, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून शोध सुरू

Pune Car Accident : सुरेंद्र अगरवाल याने ड्रायव्हरला ज्या गाडी मध्ये जबरदस्ती ने बसवलं होतं त्याचा शोध पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सुरू आहे


ड्रायव्हर ने त्याच्या जबाब मध्ये सुरेंद्र अगरवाल याने धमकावून एका गाडीत नेले होते 


त्या bmw गाडीचा शोध पोलिसांकडून सुरू आहे

Igatpuri : इगतपुरी तालुक्यातील वैतरणा धरणात बुडून तिघे जण बुडाले, धरणावर फिरण्यासाठी आले असता घडली घटना

Igatpuri : इगतपुरी तालुक्यातील वैतरणा धरणात बुडून तिघे जण बुडाले


दोन जण धरणाच्या झारवड शिवारात बुडाले तर एक जण वावी शिवारात बुडाल्याची असल्याची माहिती 


धरणावर फिरण्यासाठी आले असता घडली घटना


काल बचाव पथकाद्वारे शोध कार्य घेण्यात आले मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने शोधकार्यात येत आहे अडथळा 


आज परत बचाव पथक शोधकार्य करण्यासाठी रवाना झाले आहे


गेल्या आठवड्यातील इगतपुरी तालुक्यातील तिसरी घटना

Jalgaon : जळगावात वादळामुळे घर कोसळून एकाच कुटुंबातील चार जण ठार झाल्याची दुर्दैवी घटना

Jalgaon : वादळामुळे घर कोसळून एकाच कुटुंबातील चार जण ठार झाल्याची दुर्दैवी घटना*


जळगाव जिल्ह्यात यावल तालुक्यात अंबापाणी गावात घडल्याने खळबळ उडाली आहे


घटनेत सुदैवाने चार वर्षाचा मुलगा बाल बाल बचावला आहे 


काल सायंकाळच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्यात यावलच्या आंबा पाणी गावाजवळील  येथे  मातीच घर कोसळले


सातपुडा पर्वत रांगेतील ही घटना


यात चार जण ढीगाऱ्या खाली दबल्या गेल्याने जागीच ठार झाले आहेत या मधे पती पत्नी  आणि दोन मुलांचा समावेश आहे


सदरील मृतदेह यावलच्या ग्रामीण रुग्णालयात शेविच्छेदन करण्यासाठी दाखल झाले असल्याची माहिती

Dharashiv : धाराशिव फटाका कारखान्यात झालेल्या स्फोटातील जखमी कामगाराचा अखेर मृत्यू

Dharashiv : धाराशिव च्या वाशी तालुक्यातील तेरखेडा येथे फटाका कारखान्यात झालेल्या स्फोटातील जखमी कामगाराचा अखेर मृत्यू


चांगदेव धावारे अस मृत्यू झालेल्या कामगाराच नाव 


शुक्रवारी तेरखेडा येथील संतोष फायर वर्क्स या फटाका निर्मीतीच्या कारखान्यातील रुम मध्ये झाला होता स्फोट 


कारखान्यात रुममध्ये काम करत असताना स्फोट झाल्याने कामगार चांगदेव धावारे झाले होते गंभीर जखमी 


रुग्णालयात उपचारादरम्यान झाला मृत्यू

Jalna : जालन्यात डीजे वर नाचण्यावरून किरकोळ वाद.दोन गटात मारहाण एकाचा मृत्यू.

Jalna : जालन्यात डीजे वर नाचण्यावरून किरकोळ वाद.दोन गटात मारहाण एकाचा मृत्यू.


7 संशयित ताब्यात.


जालना शहरातील शास्त्री मोहल्ला भागात रात्री हळदी कार्यक्रमात डिजे वर नाचताना किरकोळ वाद 


दोन गटा मध्यें लाठ्या काठ्यांनी मारहाण झाली या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला ,


व्यंकटेश गायकवाड असे मयत तरुणाचे नाव असून यात आणखी एक तरुण गंभीर जखमी झालाय या प्रकरणी पोलिसांनी 7 संशयितांना ताब्यात घेतलय.

Solapur : सोलापूर जिल्ह्याला वादळी वाऱ्याच्या पावसाने झोडपले, मोहोळ, पंढरपूर तालुक्यात मोठे नुकसान 

Solapur : सोलापूर जिल्ह्याला वादळी वाऱ्याच्या पावसाने झोडपले, मोहोळ, पंढरपूर तालुक्यात मोठे नुकसान 



मोहोळ तालुक्यात वादळी वारे आणि पावसाच्या तडाख्यात फळबागा झाल्या भुईसपाट 


मोहोळ तालुक्यातील पापरी, पाटकुल  परिसरात वादळी वाऱ्यांमुळे घरांचे पत्रे उडाले, फळ शेतीचे मोठे नुकसान 



पापरी गावातील भोसले पाटील कुटुंबाची केळी बाग झाली आडवी, पाटकुल गावातील अनेक घरांचे नुकसान 


फुलचिंचोली येथील बाजीराव काळे-पाटील यांच्या घरासमोरील जवळपास 50 वर्षाचे चिंचेचे झाड जनावरांच्या शेडवर कोसळल्यामुळे जनावरांना झाली दुखापत 


सोलापूर पुणे महामार्गावरील देवडी पाटी जवळील पेट्रोल पंपाचा वादळी वाऱ्यांमुळे भाग कोसळला

Heat : सूर्याचा 25 मे पासून रोहिणी नक्षत्रात प्रवेश, पुढील सात दिवस विदर्भवासियांसाठी आणखी कठीण

Vidarbha : सूर्यानं 25 मे  पासून रोहिणी नक्षत्रात प्रवेश केला असून विदर्भात नव तपाला सुरुवात झाली आहे...  


नव तपाच्या पहिल्याच दोन दिवसात विदर्भात विक्रमी तापमानाची नोंद झाली


पारा 45 आणि 46 अंशांच्या घरात पोहोचला आहे...


त्यामुळे नव तपाचे पुढील सात दिवस विदर्भवासियांसाठी आणखी कठीण जाणार आहेत...


हवामान विभागाने ही 29 मे पर्यंत विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा दिला आहे...


त्यामुळे वैदर्भीय जनतेने उष्माघातापासून बचाव करण्याची खास गरज आहे...

Mumbai : घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी समितीकडून तत्कालिन पोलिस आयुक्तांची चौकशी होणार

Mumbai : घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात महत्वाची अपडेट


होर्डिंग दुर्घटने प्रकरणी नेमलेल्या उच्चस्तरीय चौकशी समितीकडून तत्कालिन पोलिस आयुक्त कैसर खालीद यांंची चौकशी होणार


कैसर खालिद यांची बदली होण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच १९ डिसेंबर रोजी इगो मिडिया प्रायवेट लि कंपनीला होर्डिंगसाठी परवानगी दिल्याची माहिती चौकशीतून समोर आली आहे


तर कैसर खालिद यांच्या बदलीचा आदेश हा १६ डिसेंबर रोजी आला असल्याची माहिती समोर आली आहे.


तसेच होर्डिंग प्रकरणात निविदा प्रक्रिया ही देखील योग्य पद्धतीने पार पडली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे


सदर भूखंड हा शाळा, प्रशासकिय इमारत किंवा रहिवाशी इमारतीकरता होता राखीव


या भूखंडावर प्रशासनाची अंतिम मंजूरी नसताना पेट्रोलपंपचे काम सुरू करण्यात आल्याची माहितीही तपासात उघड

Pune Car Accident :  ससून मधील दोन्ही डॉक्टरांना पुण्यातील लष्कर पोलीस स्टेशनच्या लॉकअप मध्ये ठेवण्यात आलं

Pune Car Accident :  पुण्यातील कल्याणी नगर कार अपघात प्रकरणात अपडेटस


ससून मधील दोन्ही डॉक्टरांना पुण्यातील लष्कर पोलीस स्टेशनच्या लॉकअप मध्ये ठेवण्यात आलं आहे..


या दोन्ही डॉक्टरांचे मोबाईल सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत..



डॉक्टर अजय तावरे आणि विशाल अग्रवाल यांचे फोनवरून अपघाताच्या दिवशी बोलणं झालं आहे हे देखील पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाला आहे...

 Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजी नगर परिमंडळात 9 हजार 753 वीज चोरीची प्रकरणे

 Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजी नगर परिमंडळात 9 हजार 753 वीज चोरीची प्रकरणे; वर्षभरात 1591 जणांवर गुन्हे दाखल. 


छत्रपती संभाजीनगर परिमंडळात महावितरणने वीज चोरीवर आळा घालण्यासाठी 2023 ते 2024 पर्यंत वीज चोरांविरुद्ध विशेष मोहीम सुरू केली होती.


या मोहिमेत 1 वर्षात 9 हजार 753 वी चोरीची प्रकरणे समोर आणली होती. आणि यापैकी 1 हजार 591 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती


महावितरण कार्यालयाच्या वतीने देण्यात आली. दरम्यान या वीज चोरी प्रकरणात 80 लाख 86 हजार 158 युनिट विजेची चोरी झाल्याच उघड झाल असून यामध्ये सर्वाधिक ग्रामीण भाग आघाडीवर असल्याचही आकडेवारीवरून दिसून आलय. त्यामुळे नागरिकांनी अधिकृत वीज जोडणी घेऊनच विजेचा वापर करावा असं आवाहन महावितरण केलय.

Vasai :  मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर एका कारला लागलेल्या आगीचा Video व्हायरल

Vasai :  मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर एका कारला लागलेल्या आगीचा Video वायरल होतोय. ही घटना रविवार दुपारची आहे. 


वसई च्या नायगाव बापाने परिसरात मुंबई लेनवर मारुती सुझुकी कंपनीच्या ए स्टार या कारला भिषण आग लागल्याची घटना घडली होती. कार मध्ये शॉर्ट सर्किट  झाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. कार चालक वेळीच बाहेर पडल्यामुळे मोठी जिवीतहानी टळली आहे.


स्थानिक नागरिक आणि  वाहतूक पोलिसांनी त्वरित वसई विरार महापालिकेच्या 
अग्निशमन विभागाने ही आग तात्काळ आटोक्यात आणण्यात यश मिळवल आहे. मात्र कार पूर्णतः जळून खाक झाली आहे.

Beed : बीड लोकसभा निवडणुकीनंतर जातीय संघर्ष बीड जिल्ह्यात शिगेला पोहोचला

Beed : बीड लोकसभा निवडणुकीनंतर जातीय संघर्ष बीड जिल्ह्यात शिगेला पोहोचला..


वंजारा समाजातील दोन गावांनी मराठा समाजातील व्यक्तीकडून कोणतीही वस्तू खरेदी न करण्याचा घेतला निर्णय..


या लोकसभा निवडणुकीमध्ये बीड जिल्ह्यातील जातीय संघर्ष अगदी टोकाला पोहोचला होता आणि याच संघर्षाचे परिणाम आता दिसायला लागली आहेत..


17 मेला सकाळी दहा वाजता मुंढेवाडी मध्ये गावातील एका मंदिराच्या पारावर सगळे गावकरी जमा झाले

Sangali : तासगाव तालुक्यातील बिरणवाडी फाट्यावर रास्ता रोको केल्याप्रकरणी 10 जणांवर गुन्हा  दाखल

Sangali : तासगाव तालुक्यातील बिरणवाडी फाट्यावर रास्ता रोको केल्याप्रकरणी 10 जणांवर गुन्हा  दाखल


कडेगाव तालुक्यामध्ये मशागत सुरु असताना रोटर मध्ये सापडून चालकाचा मृत्यू


जत तालुक्यातील येळवी परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी


मिरज तालुक्यातील कळंबी मधील दरोडेखोरांच्या टोळीतील एकास अटक,  दोन संशयित ताब्यात

Bhandara : चुलबंद नदीच्या कोरड्या पात्रातील छोट्या झरण्याच्या पाण्यावर भातपीक वाचविण्याची धडपड

Bhandara : चुलबंद नदीच्या कोरड्या पात्रातील छोट्या झरण्याच्या पाण्यावर भातपीक वाचविण्याची धडपड


उष्णतेच्या प्रखरतेनं शेतातील पीक मरणासन्न


भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नजरा लागल्यात मान्सूनकडं


Anchor : भंडारा जिल्ह्यातील प्रमुख नदी असलेल्या वैनगंगा नदीसह विविध तालुक्यातून उपनद्याही वाहतात. यासोबतचं अकरापेक्षा अधिक तलाव आहेत. मात्र, एप्रिल महिन्यापासूनचं जिल्ह्यातील सुर, बावनथडी, चुलबंद या उपनद्या कोरड्या पडल्या आहेत. नदीच्या विस्तीर्ण पत्रात पाण्याऐवजी आता सर्वदूर नदीचं कोरडं पात्र उघडं पडल्याचं बघायला मिळत आहे.

Nanded : नांदेड जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा, भीषण पाणी टंचाईचा सामना

Nanded : नांदेड जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा.


नांदेड जिल्ह्यात दुष्काळ परिस्थिती अधिक गडद बनली आहे.


नांदेड जिल्ह्यातील कंधार,मुखेड लोहा या तालुक्यातील अनेक वाडी तांड्यांवर भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे.


कंधार तालुक्यातील आनंदवाडी या गावातील रहिवाशी हंडा भर पाण्यासाठी मैलो मैल दूर भटकंती करत आहेत.


तीन ते चार किलो मीटर दूरवरून आनंद वाडी या गावातील लहान मुले, महिला पाण्यासाठी कडक उन्हात पायपीट करीत आहेत.


चार किलो मीटर दूर असलेल्या या विहिरीत जीव धोक्यात घालून पाणी काढावं लागत आहे.


दरवर्षी उन्हाळ्यात या गावाला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.


जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील पाझर यालाव आणि विहीर पूर्णतः अटल्या आहेत.जनावरांच्या पाण्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे

Nanded : नांदेड जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा, भीषण पाणी टंचाईचा सामना

Nanded : नांदेड जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा.


नांदेड जिल्ह्यात दुष्काळ परिस्थिती अधिक गडद बनली आहे.


नांदेड जिल्ह्यातील कंधार,मुखेड लोहा या तालुक्यातील अनेक वाडी तांड्यांवर भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे.


कंधार तालुक्यातील आनंदवाडी या गावातील रहिवाशी हंडा भर पाण्यासाठी मैलो मैल दूर भटकंती करत आहेत.


तीन ते चार किलो मीटर दूरवरून आनंद वाडी या गावातील लहान मुले, महिला पाण्यासाठी कडक उन्हात पायपीट करीत आहेत.


चार किलो मीटर दूर असलेल्या या विहिरीत जीव धोक्यात घालून पाणी काढावं लागत आहे.


दरवर्षी उन्हाळ्यात या गावाला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.


जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील पाझर यालाव आणि विहीर पूर्णतः अटल्या आहेत.जनावरांच्या पाण्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे

Washim : वाशिममध्ये सांडलेल्या डांबरात फसून दोन गायींचा मृत्यू

Washim : वाशिममध्ये सांडलेल्या डांबरात फसून दोन गायींचा मृत्यू


 कंत्राटदाराचा हलगर्जीपणा  बेतला गाईच्या जीवावर 


वाशिम-पुसद मार्गावरील शेलू बु. फाट्यानजीक रस्त्याच्या बाजूला सांडलेल्या डांबरात फसून दोन गायींचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना घडली.  तर एक गाय गंभीर जखमी झाली .


वाशिम-पुसद रस्त्याचे काम करण्यात येत असताना शेलू बु. फाट्यानजीक कंत्राटदाराने २५ ते ३० डांबराच्या टाक्या  रस्ता कामा साठी आणल्या होत्या...मात्र उन्हाचा पारा वाढल्यानर डांबर पातळ होऊन रस्त्याच्या नालीत सांडल्या. त्यामुळे ही नाली १०० फूट अंतरापर्यंत डांबराने तुडुंब भरली आहे.

Dharashiv : धाराशिव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस

Dharashiv : धाराशिव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस


कळंब,तुळजापूर,परंडा व वाशी तालुक्यात वादळी वाऱ्याचा कहर


अनेकांची घरे,पञ्याचे शेड वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त


परंडा शहरात वादळी वाऱ्यामुळे पञा शेड गेले उडुन


विजेच्या कडकडाटासह जिल्हाभर अवकाळी पावसाची तुफान बॅटींग

Pune Car Accident : आणि डॉक्टरांचं बिंग फुटलं..! ससुनच्या डॉक्टरांनी त्या अल्पवयीन मुलाचे ब्लड सॅंपल बदलले

Pune Car Accident : ससुनच्या डॉक्टरांनी त्या अल्पवयीन मुलाचे ब्लड सॅंपल बदलले


अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाला रविवारी वैद्यकीय तपासणीसाठी पुण्यातील ससून सरकारी रुग्णालयात नेण्यात आले.


यावेळी मुलाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना पैशांचे आमिष दाखविले. डॉक्टर अजय तावरे हे ससुन रुग्णालयाच्या forensic medicine and toxicology चे प्रमुख आहेत तर डॉक्टर श्रीहरी हरलोल हे अपघात विभागात चीफ मेडिकल ओफिसर आहेत.


त्या मुलाचे ब्लड स्यांपल श्रीहरी हरलोल यांच्या विभागानं घेतले मात्र त्यामध्ये दारूचा अंश येऊ शकतो हे लक्षात आल्यावर ते बदलायचे ठरवले. त्यासाठी रजेवर असलेल्या डॉक्टर अजय तावरे यांनी हस्तक्षेप केला.


खरं तर डॉक्टर अजय तावरे हे गेल्या काही दिवसांपासून रजेवर आहेत. मात्र तरीही तावरे यांनी ब्लड स्यांपल बदलायला सांगितले. त्यानंतर दुसऱ्याच एका रुग्णाचे ब्लड स्यांपल टेस्टिंग साठी देण्यात आले. मात्र पुणे पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने आणखी एका लेबला पाठवून DNA टेस्ट करायचं ठरवलं आणि डॉक्टरांचं बिंग फुटलं..

Solapur : सोलापुरातील अक्कलकोटमध्ये पशुधन वाचवण्यासाठी शेतकऱ्याची धडपड सुरु


Solapur : सोलापुरातील अक्कलकोटमध्ये पशुधन वाचवण्यासाठी शेतकऱ्याची धडपड सुरु असल्याचे पाहायला मिळतं आहे.


सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे.


शेतातील उभी पिकं पाण्याअभावी जळून गेले आहेत.


तर दुसरीकडे गाय- म्हैस यांची देखभाल करण्यासाठी शेतकरी संकटावर मात करत पशुधन जगवण्याचे प्रयत्न करत आहे.


अक्कलकोट तालुक्यातील चपळगावातील सुरवसे कुटुंबाची 18 म्हशी जगवण्यासाठी धडपड सुरूय

Chhatrapati Sambhaji Nagar : संभाजीनगर शहरात रक्ताचा तुटवडा, सुमारे 10 शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याची वेळ

Chhatrapati Sambhaji Nagar : संभाजीनगर शहरात रक्ताचा तुटवडा


उन्हाची तीव्रता, सुट्यांमध्ये नागरिक पर्यटनास गेल्यामुळे सध्या रक्तदान शिबिरांचे आयोजन बंद आहे.


परिणामी छत्रपती संभाजीनगर शहरात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे.


विशेष म्हणजे  रक्ताअभावी शहरात रोज होणाऱ्या ६० पेक्षा अधिक शस्त्रक्रियांपैकी सुमारे १० शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याची वेळ आली आहे.


शहरातील ६ ब्लड बँकांमध्ये रोज जवळपास ४३५ रक्त पिशव्यांची मागणी केली जाते. परंतु, १३३ पिशव्याच रक्तपुरवठा होत आहे.


४३५ रक्तपिशव्याचा शहरात मागणी


१३२ पिशव्यांचा रोज होतो पुरवठा


१० शस्त्रक्रिया एका दिवसासाठी पुढे ढकलाव्या लागतात


०५ तासांपर्यंत सिझेरियन प्रसूती करताना रक्तासाठी पाहावी लागते वाट

Pune Car Accident : पुण्यातील कल्याणी नगर कार अपघात प्रकरणात अपडेट, ससुन रुग्णालयाच्या 2 डाॕक्टरांना अटक

Pune Car Accident : पुण्यातील कल्याणी नगर कार अपघात प्रकरणात अपडेट


ससुनच्या 2 डाॕक्टरांना अटक


ब्लड रिपोर्ट मधे फेरफार केल्याचा आरोप

Dharashiv : धाराशिव जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे एकाचा मृत्यू, घरावरील पत्रा डोक्यावर पडल्याने मृत्यू

Dharashiv : धाराशिव जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे एकाचा मृत्यू 


घरावरील पत्रे उडून गेल्याने दगड डोक्यात पडून झाला मृत्यू 


हनुमंत कोळपे असं मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव


धाराशिव तालुक्यातील सांगवी या गावातील घटना


घटनेची माहिती मिळताच खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांची घटनास्थळालां भेट देउन केली पाहणी 


कुटुंबीयांचे सांत्वन करून तातडीने महसूल , आरोग्य , आणि पोलीस प्रशासनाला दिल्या पंचनामा करण्याच्या सूचना

Pune : रक्त तपासणीचे हजारो सॅम्पल ट्यूब कालव्याच्या कडेला टाकल्याचा धक्कादायक प्रकार 

Pune -रक्त तपासणीचे हजारो सॅम्पल ट्यूब कालव्याच्या कडेला टाकल्याचा धक्कादायक प्रकार 


-पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे पुणे नाशिक महामार्गलगत कालव्या लगत रक्त तपासणीचे हजारो सॅम्पल ट्यूब टाकण्यात आल्यात 


-या ट्यूब मध्ये विविध आजाराच्या प्रकारचे रक्त असू शकते आणि हे रक्त पाण्यात जाऊन इतरांना हानिकारक होण्याची शक्यता 


-रक्तामध्ये विविध प्रकारचे रोगराई चे रक्त असण्याची शक्यता 


-संबंधित ज्यांनी हे टाकले आहे त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची 

Political : लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा संपताच मनसेतील खदखद बाहेर, इन कॅमेरा रेकॉर्ड करण्यात आल्या कार्यकर्त्यांच्या भावना

Nashik : लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा संपताच मनसेतील खदखद बाहेर,
-


इन कॅमेरा रेकॉर्ड करण्यात आल्या कार्यकर्त्यांच्या भावना
-
मिसळ पार्टीच्या निमित्ताने  एकत्र आले होते दोनशेहून अधिक कार्यकर्ते
-
मिसळ  पार्टीतील नाराजीच्या फोडणीने उठलेल्या ठसक्यानं पक्षात खळबळ
-
नाराजीचा ठसका पोचणार राज ठाकरेंपर्यंत


पक्ष प्रमुख राज ठाकरेंना दाखविली जाणार इन कॅमेरा रेकॉर्ड झालेली नाराजी


लोकसभा निवडणुकीत महायुती ला बिनशर्त पाठींबा देणाऱ्या मनसेत नाराजांचा भरणा
-
स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या कारभारा विषयी  अनेकांनी व्यक्त केली उघड नाराजी
-
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दखल घ्यावी  नाशिककडे लक्ष देण्याची सर्वच कार्यकर्त्यांनी केली मागणी


-

Political : महाराष्ट्र विधान परिषद कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात मनसे कडून अभिजीत रमेश पानसे यांना उमेदवारी

Political : महाराष्ट्र विधान परिषद कोकण विभाग पदवीधर मतदार संघात मनसे कडून अभिजीत रमेश पानसे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेदवारी दिलेली आहे

Malegaon - मालेगावात माजी महापौरांवर गोळीबार, गोळीबारात गंभीर जखमी, मालेगाव शहरात तणावाचे वातावरण

Malegaon Breaking  - मालेगावात माजी महापौरांवर गोळीबार..
- अब्दुल मलिक युनूस इसा असे त्यांचे नाव असून AMIM चे मालेगाव महानगर अध्यक्ष आहेत..
- अज्ञात हल्लेखोरांनी अब्दुल मलिक यांच्यावर ३ गोळ्या केल्यात फायर..
- गोळीबारात मलिक गंभीर जखमी..
- उपचारासाठी मलिक यांना नाशिक येथे हलविण्यात आले..
- मध्यरात्री १२ ते १ च्या दरम्यान घटना घडली..
- हॉटेलवर चहा पिण्यासाठी बसलेले असतांना मलिक यांच्यावर झाला हल्ला..
- MIM आमदार मौलाना मुफ्ती यांनी भेट घेत घटनेची चौकशी करत अटक करण्याची केली मागणी..
- मालेगाव शहरात तणावाचे वातावरण..
- मालेगावात गुंडाराज सुरू असल्याचे आमदार मुफ्ती यांनी केलेत आरोप..

Anil Deshmukh : चार जून नंतर हा चमत्कार पाहायला मिळणार - अनिल देशमुख

Anil Deshmukh : लोकसभा निवडणुकीत आधी विदर्भात चमत्कार घडणार असं सांगणाऱ्या अनिल देशमुखांनी यांनी आता महाराष्ट्राचं चमत्कार घडणार अशा आशयाचे होर्डिंग नागपूर मध्ये लावलेत


महाविकास आघाडी महाराष्ट्रात 35 जागा जिंकत असून ...


चार जून नंतर हा चमत्कार पाहायला मिळणार आहे. आम्हाला सोडून गेलेले अनेक नेतेमंडळी आमच्या पक्षात परत येण्याच्या मार्गावर आहे,


मात्र शरद पवार यांना ज्यांनी धोका दिला त्या कोणत्याही नेत्यांना आम्ही परत पक्षात देणार नाही,


मग ते अजित पवार असले तरी त्यांना पक्षात घेणार नसल्याचे अनिल देशमुखांनी सांगितले आहे

Buldhana : खामगाव शेगाव रोडवर सुसाट्याच्या वाऱ्यामुळे थांबलेल्या बसवर टपरी धडकली

Buldhana : खामगाव शेगाव रोडवर सुसाट्याच्या वाऱ्यामुळे थांबलेल्या बसवर धडकली टपरी


बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे गेल्या तासाभरापासून सुसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे.


तर धुळे शेगाव ही बस खामगाव येथून शेगाव कडे जात असताना अचानक जोरदार वादळी वारा आल्यामुळे चालकाने बस रस्त्याच्या कडेला उभी केली होती.


वारा जोरदार असल्यामुळे रोडच्या कडेला असलेली टपरी बस वर धडकल्याने एक प्रवासी किरकोळ जखमी झाला आहे. तर यामध्ये बसचे नुकसान झाले आहे.

Buldhana : चक्रीवादळ आणि अवकाळी पावसाने पश्चिम विदर्भात मोठं नुकसान, शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान

Buldhana : चक्रीवादळ आणि अवकाळी पावसाने पश्चिम विदर्भात मोठं नुकसान.


रविवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे आणि अवकाळी पावसामुळे पश्चिम विदर्भातील चार जिल्ह्यात मोठे नुकसान


पश्चिम विदर्भातील अकोला बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यात काल सायंकाळी अचानक चक्रीवादळ आणि अवकाळी पावसाच्या धारा बरसल्या


यामुळे मात्र शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.


शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला भाजीपाला अक्षरशः भिजल्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड बुधवारी महाड येथे जाऊन मनुस्मृतीची होळी करणार 

Jitendra Awhad : पाठ्यपुस्तकात सरकारच्या वतीने मनुस्मृतीतील श्लोक समाविष्ट करण्याचे प्रकरण 


जितेंद्र आव्हाड यांच्याकडून सरकारच्या निर्णयाचा जोरदार विरोध 


जितेंद्र आव्हाड बुधवारी महाड येथे जाऊन मनुस्मृतीची होळी करणार 


डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथेच मनुस्मृतीची होळी केली होती ही बाब लक्षात घेत सरकारचा निषेध करण्यासाठी आव्हाड देखील महाड येथेच मनुस्मृतीची होळी करणार 


मनुस्मृति तील श्लोकाचा अभ्यासक्रमात समावेश करण्यासंदर्भातल्या सरकारच्या निर्णया विरोधात जितेंद्र आव्हाड यांनी सर्वांना एकत्र येण्याचं आव्हान केलं

Jitendra Awhad : सत्ताधारी मागच्या दाराने मनात असतील गोष्ट पूर्ण करत आहे - जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad : सत्ताधारी मागच्या दाराने मनात असतील गोष्ट पूर्ण करत आहे.


जितेंद्र आव्हाड यांची संविधानावर प्रतिक्रिया


आमचं संविधान म्हणजेच मनुस्मृती.. असं म्हणणारे जेव्हा सत्तेत येतात तेव्हा काय घडतं त्याचं उदाहरण म्हणजे पाठ्यपुस्तकांचा यादीत पुस्तकात मनुस्मृतीचा समावेश होत आहे.


ज्या मनुस्मृतीने भारताच्या वाटोळं केलं त्या समाजाच्या मध्ये दूरी वाजवली आहे. समाजामध्ये चातुर वळण्याचा समावेश केला.जातीभेद निर्माण झाला... स्त्रियांना तर सर्वात घाणेरडी वागणूक घेण्याची पद्धती या मनुस्मृतीने जन्मला घातली..


ती मनुस्मृती परत आणली जात आहे.


जे लोक १९५० साली म्हणाले की आम्हाला तुमचा संविधान मान्य नाही.


आमच्या संविधान म्हणजेच मनुस्मृती तिचं लोक मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न करत आहे.


तुम्हाला आणि आम्हाला संविधान वाचवायचा आहे.


बाबासाहेब आंबेडकरांनी १९२७ मध्ये मनुस्मृती दहन केलं आणि १९५० मध्ये संविधान जन्माला घातलं त्या साठी आपण महाडला जात आहोत.


बाबासाहेब आंबेडकरांच स्मरण करून आपण मनुस्मृतीच दहन करतोय संविधानासाठी दो बलिदान..

Jalgaon : उष्णतेच्या लाटेने रस्त्यावर राहणाऱ्या 50 हून अधिक लोकांचा गेल्या आठ दिवसात मृत्यू

Jalgaon : उष्णतेच्या लाटेने रस्त्याच्या कडेला राहून उदर निर्वाह करणाऱ्या 50 हून अधिक लोकांचा गेल्या आठ दिवसात मृत्यू झाल्याची घटना



यामध्ये वीस लोकांची ओळख पटू शकली नव्हती,


अशा लोकांच्या मृत देहावर कोणी अंत्यसंस्कार करायचे असा प्रश्न निर्माण


मंत्री गिरीश महाजन यांच्या जी एम फाऊंडेशन चे वतीने या मृत देहांवर विधिवत अंत्य संस्कार करण्यात आले आहेत

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : राज्यासह देशातील महत्त्वाच्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये घेतला जातो.  राज्यासह देशातील आजच्या ठळक बातम्या, दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स तसेच इतर अपडेट्स जाणून घ्या..

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.